शुक्रवार, २३ डिसेंबर, २०२२

व्यावसायिकांचे व्यवहार चातुर्य आणि अडाणी ग्राहक

व्यावसायिकांचे व्यवहार चातुर्य आणि अडाणी ग्राहक

रोज सकाळी दात घासण्यासाठी जी टूथपेस्ट वापरता तिचे तोंड मुद्दाम मोठे बनवले गेले आहे जेणेकरून ती जास्त प्रमाणात बाहेर येऊन लवकरात लवकर संपावी

लहानपणी कधी तरी मौज म्हणून आपल्याला मिळणारा बिस्कीपुड्याची 30 चाळीस वर्षांपूर्वी किंमत आणि आजची किंमत सारखीच असली तरी बिस्कीटपुड्याचे वजन प्रत्येकवेळी कमी होत गेले आहे पण ह्या गोष्टी दैनंदिन धावपळीत आपण इतके अडकलो आहोत की लक्ष देत नाही, दिले तरी दुर्लक्ष करतो आणि ह्याचाच फायदा हे धंदे करणारे घेत असतात.

आजचा जमाना ऑनलाइनचा, मोबाईलमध्ये इंटरनेट नसलेला माणूस शोधणे म्हणजे अंधारात सुई शोधण्याचे अवघड काम. भविष्यात कदाचित अजून कोणती नवीन प्रणाली येऊ शकते की ज्यामुळे आपलं शरीराचं एक यंत्र बनवलं. पैश्याची जागा देखील मोबाईलने घेतली आहे, पत्ता आता कोणाला विचारायचा नसतो तो मोबाईलमध्ये पहायचा असतो असे कैक फिचर असलेला मोबाईल आणि त्यासाठी लागणारे इंटरनेट ही काळाची गरज झाली आहे पण हे इंटरनेट पुरवठा करणाऱ्या कंपन्या सांगतात, दावा करतात त्यापेक्षा कमी स्पीडने इंटरनेट पुरवतात. फेब्रुवारी महिन्याचा अपवाद सोडला तर एक महिना म्हणजे 30 नाही तर 31 दिवस पण टेलिकॉम कंपन्यांचा महिना 28 दिवसांचा असतो म्हणजे 3 दिवस ग्राहकांची फसवणूक, बर न्यायालयात प्रकरण गेल्याने आता 31 दिवसाचा प्लॅन आला आहे पण त्याची किंमत 28 दिवसाच्या प्लॅनपेक्षा अधिक आहे. थोडक्यात न्यायालयाने कान पिळल्यानंतर त्यांनी 31 दिवसाचा प्लॅन आणला. टेलिकॉम कंपन्यांचे सर्वांत कमी मासिक प्लॅन हा 1 gb इंटरनेट, अमर्याद कॉल, प्रतिदिन 100 संदेश असा तर कमाल प्लॅन प्रतिदिन 4 gb  पर्यंत मला माहितीत आहे. मर्यादा नसलेले कॉलमुळे लोकांचे लक्ष कॉल पेक्षा इंटरनेटवर आले, त्यात वेबसिरीज, सोशल मीडिया यामुळे दररोजचा हा इंटरनेटचा डाटा संपवण्यासाठी उगाच मोबाईलमध्ये दिवसभर डोकं घातलेली डोकी, लहानापासून म्हातार्यापर्यत हे लोण पसरले आहे ते मर्यादित इंटरनेट डेटामुळे हे तुम्हाला हे वाचण्याआधी लक्षात आलेच नसेल याची गॅरंटी मला आहे. ह्या मोबाईलमुळे संवाद कमी झालाय, लोक जवळ यायची सोडून घराच्या एक एक कोपऱ्यात बसली आहे. हे कुठंतरी थांबले पाहिजे. मुळात लोकांना सुरवातीला फुकट इंटरनेट देऊन त्याची सवय ह्या टेलिकॉम कंपन्यांनी लावली आता त्या सवयीचा कहर झालाय. सवय आता व्यसन बनले आहे आणि इंटरनेटच्या ह्या जाळ्यात सगळी लोक अडकून पडली आहेत. येत्या काही काळात तंबाखू, दारू याचे व्यसनमुक्ती ठिकाणे जशी असतात तस इंटरनेटमुळे सतत ऑनलाइन असण्याचे व्यसनमुक्ती पासून ऑफलाईन होण्याची केंद्र उघडली जातील.

टूथपेस्टचे तोंड कमी करण्यासाठी, बिस्कीट पुड्याचे वजन कमी न होण्यासाठी किंवा गरजेपुरता इंटरनेट पॅक मिळण्यासाठी ग्राहक म्हणून आपल्याला जागे व्हावे लागेल. ग्राहकाला कंपन्यांची व्यवहार चातुर्य समजत नाही किंवा समजत असेल तरी त्याविरुद्ध पाऊल उचलण्यासाठी वेळ नाही किंवा इतका छोटा विचार करून स्वतःचे जगासमोर हसे करून घेणे लोकांना पटत नसावे बहुतेक पण एखाद्या गोष्टीचा जोपर्यत अतिरेक होत नाही, ती गोष्ट डोळ्याला खुपत नाही तोपर्यंत तुम्ही लोक जागे व्हाल अस वाटत नाही. 500mb प्रतिदिन असा पॅक ऑनलाइन मोहजाळातून बाहेर पडण्यासाठी पुरेसा आहे पण कंपन्यांचे तुम्हाला मोबाईलमध्ये अडकून पैसे कमावण्याचे धंदा असल्याने इतका छोटा पॅक त्यांनी मुद्दाम उपलब्द केलेला नाही आणि जरी असला तरी त्याची किंमत जास्त आणि फायदे कमी असतात त्यामुळे झक मारून ग्राहक 1gb किंवा त्यावरचाच रिचार्ज निवडतो. 24 तासांचा दिवस इंटरनेटमुळे छोटा वाटणाऱ्यानी इंटरनेटशिवाय एखादा दिवस काढा, तुम्हाला दिवस इतका मोठा वाटेल की तो संपणार नाही. विरंगुळा म्हणून मोबाईल मध्ये डोके घालणारे इतर कशात डोके घालू लागतील. पुस्तक वाचतील, घरातल्यांशी चार शब्द बोलले जातील, वेळ सत्कारणी लागू शकतो त्यामुळे आपण कोणत्या गोष्टीचा अतिरेक करतोय हे समजणे, ओळखणे गरजेचे. कंपन्यांनी उभा केलेला व्यवसाय वाढवणे यासाठी चातुर्य लावले असेल तर ग्राहकांनी आपले चातुर्य विकले आहे का? 


गुरुवार, २२ डिसेंबर, २०२२

शेयर मार्केटचे वास्तव

    शेयर मार्केट म्हणजे सट्टा नसलेला सट्टा. सट्टा नसलेला का तर हा सट्टा नाही आणि सट्टा का तर इथे ठराविक लोक, लोकांचा समूह स्टॉकची किंमत वाढवू किंवा घटवू शकतात. कित्येक वेळा मी असे ट्विट केले आहे ते केवळ त्या लोकांसाठी ज्यांना त्याच्या हुशारीवर आंधळा विश्वास आहे आणि शेयर मार्केट मधून ते गर्भ श्रीमंत बनण्याचे स्वप्न पाहत आहे. इथे तुम्ही फक्त स्वतःची कष्टाने कमावलेले पैसे इतरांच्या घश्यात घालू शकाल किंवा फार फार तर सेव्हिंग, एफडी पेक्षा अधिक पैसे कमावू शकाल, अपवाद सगळीकडे असतात पण ते अपवाद केवळ नशिबाने दिलेली साथ हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. मार्केट सोप्प नाही. इथे कॅम्पस चे उदाहरण पहा. आयपीओ जाहीर झाल्यापासून तो केवळ उंच आणि उंच भरारी घेत होता आणि वाहत्या पाण्यात हात धुण्यासाठी जसे सामान्य गुंतवणूकदार यात आले तसे त्या स्टॉकला कारण नसताना वर आणलेल्या लोकांनी आपला प्रॉफिट बुक केला. आता ज्यांनी पैसे जास्त भावात गुंतवले त्यांना 
एकतर स्टॉक परत वर येण्याची वाट पाहत गुंतवणूक अडकून ठेवण्याखेरीज वा तोट्यात विक्री करत मिळेल ती रक्कम स्वीकारण्याची पाळी आली आहे. मी ही गोष्ट अधोरेखित करू इच्छितो की स्टॉक मध्ये वाढ वा घट होण्यामागे सामान्य गुंतवणूकदारांचा हिस्सा अत्यल्प असतो तर मोठे गुंतवणूकदार यांनी केलेली खरेदी वा विक्री ही कमाल कारणीभूत असणारी गोष्ट आहे. कॅम्पस कंपनी किंवा त्याचा व्यवसायाचे ताळेबंद, Fundamental or Technical, बाजाराची सध्याची स्थिती, कच्चा मालाचे भाव, सामाजिक, आर्थिक परिस्थिती अश्या कैक गोष्टी सांगून तो स्टॉक का पडला वा चढणार हे सांगणारे खंडीभर लोक आहेत पण प्रथम दर्शनी तेच सत्य असले तरी एखाद्या स्टोकमध्ये प्रचंड पैसा गुंतवणारे बाजारात त्या स्टोकची जाहिरात करतात, सामान्य नागरिक त्याला भुलतो, गुंतवणूक करतो स्टॉक अजून मोठ्या गतीने पळू लागतो. ज्यांनी तो कमी किंमतीत घेतला नाही त्यांना आपली कमावण्याची संधी जाते की काय असे वाटल्याने सगळे लोक आपापल्या ताकदीप्रमाणे पैसे लावतात आणि हीच ती वेळ असते की ज्यांनी त्या स्टॉकला हवा दिली ते त्याची मिळकत, डबल ट्रिपल झाली असताना अचानक काढून घेतात. एकदम मोठ्या प्रमाणात झालेली विक्री स्टॉक पडला अशी दवंडी पेटवते आणि मग सुरू होतो विक्रीचा हल्लाकोळ. काही वाचतात, काही ठेचळतात पण ठेचळणारे नक्की कोण असते? सामान्य गुंतवणूकदार.

मार्केट सोप्प नाही आणि इतकं वाचूनही डोक्यात प्रकाश न पडलेल्या, कुत्सित हास्य तुमच्या चेहऱ्यावर येत असेल तर आपल्याला मार्केट समजत ह्या गर्वाचे घर खाली झाल्याखेरीज तुम्हाला ही गोष्ट समजणार नाही. असो,याचा अर्थ तुम्ही शेयर मार्केटमध्ये गुंतवणूक करायचीच नाही का? तर तसे ही नाही पण गुंतवणूक करण्यासाठी आपण आपल्याला पुढच्या दोन तीन वर्षात न लागणारा, सगळं खर्च, बचत बाजूला ठेवून उरणारा पैसा बँकांपेक्षा अधिक रिटर्न मिळवण्यासाठी शेयर मार्केट मध्ये गुंतवलाच पाहिजे पण त्यासाठी मार्केट कसे चालते हे सामान्य ज्ञान घेतलेच पाहिजे.

शनिवार, १७ डिसेंबर, २०२२

भविष्यवाणी


भविष्य हा असा विषय आहे की प्रत्येक माणसाला ते जाणून घेण्याची सुप्त इच्छा असते. त्यासाठी ज्योतिषशास्त्र असेल की जगातील अनेक इतर प्रकार यामुळे माणूस भविष्याचा अंदाज लावण्याचे प्रकार पूर्वापार चालू आहेत. डिसेंबर महिना आला की अश्या भविष्यावाण्याना पाय फुटावे असे बाहेर येत असतात. ज्यातील अनेक इतक्या बालिश असतात की भविष्यवाणी आहे की एप्रिल फुल बनवतात हे समजणे अवघड असते तर काही भविष्यवाणी ह्या तर्कसंगत असल्याने त्याबद्दल कमालीचे औत्सुक्य प्रत्येकाला वाटणे स्वभाविक असते. भविष्य म्हणजे काहींसाठी अभ्यासातून, अनुभवातून व्यक्त केलेले मत असते तर काहींसाठी ढोकताळे, काहींसाठी निव्वळ थाप असते पण जो कोणी ते व्यक्त करतो आणि तसच काहीस होण्याचे प्रमाण अधिक असेल तर त्या व्यक्तीला जग भविष्यवेत्ता म्हणून पोचपावती देत असते. असे भविष्यवेत्ते गावागावात प्रसिद्ध असतात. काहींची ख्याती इतकी वाढते की जगात त्याच्या भविष्य सांगण्याच्या गोष्टीवर विश्वास ठेवला जातो.

एखाद्या न्युज चॅनेल, वर्तमानपत्र यात तुमच्यापैकी अनेकांनी बाबा वेंगा आणि त्याच्या भविष्यात होणाऱ्या घटना यांची भाकिते, अंदाज वाचले असतीलच.नास्त्रेदमस हे नाव तर बहुतांश लोकांच्या माहितीतील असणार ह्याला शंकेला वाव नसावा. आता ह्या लोकांच्या नावाने प्रसिद्ध होणारे भविष्य कथन नक्की त्याचेच हे कोणी पहायला जात नाही केवळ मनोरंजन म्हणून त्या बातम्या पाहणारे, वाचणारे अनेक आहेत. सत्य, असत्य, अंदाज, अनुभव यात किंवा ह्या बाबा वेंगा किंवा नास्त्रेदमस बद्दल माहिती देण्याचा हा लेख नाही तर भविष्यकथानाची अशीच इच्छा माझ्या मनात उड्या मारत असल्याने मला भविष्यात ज्या गोष्टी होतील असे वाटत त्या क्रमशः रूपात इथे मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे म्हणजे मला जे वाटत तस झालंच तर त्याचे क्रेडिट घेत मी माझी कॉलर उडवत मी तर अस म्हंटलोच होतो म्हणायला मी मोकळा होऊ शकतो. हे माझे केवळ अंदाज, ठोकताळे असले तरी त्यामागे काहींना काही विचार नक्कीच असेल हे तितकेच खरे. 

वेळोवेळी केलेले हे अंदाज त्याची वेळ, तारीख याच्या पडताळणीसाठी ट्विटरवरील हा थ्रेडची लिंक इथे पेस्ट करतोय 


निरस, संथ, कंटाळवाणे 50 षटकाचे सामन्यानमुळे पुढचा विश्वचषक ४० षटकाचा असेल.#भविष्यवाणी 
क्रिकेट खेळण्याचे कसब पाहता महिला आणि पुरुष एकाच संघात खेळवणे सहज शक्य होईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर मिक्स संघ खेळण्याच्या आधी अस घडताना आयपीएल तसेच रणजी मध्ये हा प्रयोग नक्की घडणार #भविष्यवाणी 


 क्रमशः

माझा राजा, माझे दैवत

#हरहरमहादेव डोळ्याला सुखावणारा ट्रेलर आहे, चूक काढायची अस म्हंटल तर भाषा, बोलण्याची लकब चित्रपटात आहे तशी महाराज त्याच्या काळात वापरत असतील अस वाटत नाही. जुने चित्रपटात महाराज शांत, संयमी बोल बोलायचे

ट्रेलर पाहिल्यावर ह्या भावना, चित्रपट पाहिल्यानंतर बदलल्या असे नसले तरी. महाराजांना भगव्या कपड्यात पाहताना मज्जा आली, उर भरून आला. अफजल्याला उचलून नरसिंहासारखे फाडणे हा नसलेला इतिहास मांडणे गैर असले तरी महाराजांचे व्यक्तिमत्त्व आहे त्यापेक्षा मोठे दाखवण्याचा दिग्दर्शकाचा क्रीयेटीव्ह लिबर्टी घेतल्याचे दुःख छत्रपतींच्या वंशजांना वा महाराजांच्या आजच्या मावळ्यांना का होते आहे हे कळण्यापालिकडे आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छ्त्रपती संभाजी महाराज हे मराठीच नाही तर संपूर्ण देशाचे आदर्श आहेत किंवा आदर्श कमी दैवत्व मिळालेले व्यक्ती आहेत. खोटा इतिहास नावाची पुडी, महाराजांचे नाव पुढं करत स्वतःचा राजकीय डाव खेळणारी लोकांनी वाद वाढवण्यापेक्षा सर्जनशील स्वातंत्र्य घेऊन तयार झालेला चित्रपट अस म्हणत चित्रपटाला साह्य करणे अपेक्षित होत. आजी आजोबांनी सांगितलेल्या गोष्टी, शैक्षणिक आयुष्यात शिकलेला इतिहास, चित्रपटातून वा सोशल मीडिया, मित्र परिवारातून ऐकलेला इतिहास हा योग्य की इतिहासाचा अभ्यास करणारे, बखरी, त्यावेळची भाषा यांचे ज्ञान असलेल्या लोकांचा अभ्यास यात तफावत असू शकते. चित्रपटात बाजी प्रभू देशपांडे याच्याशी महाराजांची झालेली लढाई हा सुद्धा एक वादाचा मुद्दा आहे असं काही  जीतूद्दीन सारखे नाठाळ करतात ज्याचे उत्तर सामान्य ज्ञान असलेला माझ्यासारखा व्यक्ती ते चूक की बरोबर हे सिद्ध करू शकत नसला तरी इतिहासाचे अभ्यासक, ज्यांनी कैक वर्ष इतिहास वाचण्यासाठी घालवले ते उत्तर देण्यास खरे लायकीचे माणसे आहेत. माझ्या सामान्य ज्ञानाप्रमाणे तशी लढाई त्या दोघात झाली असेल अस मला तरी वाटत कारण शिवाजी महाराज यांना जसे पुण्याची जहागिरी त्याच्या वडिलांकडून मिळाली होती तशीच जहागिरदारी आजूबाजूच्या अनेक सरदाराची असावी हा माझा कयास आहे. हिंदवी स्वराज्य उभं करण्याची शपथ घेतल्यावर, यवन/लांडे आदिलशहा,निजाम, मुघल सारख्या बलाढ्य शत्रूच्या सैन्यापासून जनतेचा बचाव करण्याचे, सगळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य उभ करताना युवा शिवाजी महाराज यांना ह्या जहागीरदारांनी विरोध केला नसेल का? बाजीप्रभू देशपांडे बांदल घराण्याचे एकनिष्ठ होते ते सहजासहजी हत्यार टाकून महाराजांना पाठिंबा दिला असेल का? जावळीतील अनेक जहागीरदार यांचा किंवा जावळीच्या मोऱ्याचा इतिहास ज्यांनी ज्यांनी वाचला आहे ते पाहता शिवाजी महाराज साम्राज्य विस्तार करत होते त्याला विरोध आपल्याच लोकांचा, जहागीरदार, वतनदार, महसूल गोळा करणाऱ्यांचा होता हे आपण जाणतोच मग बाजीप्रभूंनी बांदल घराण्याची निष्ठा सोडून लगेच शिवाजी महाराजांवर निष्ठा ठेवली असेल असं घडलं असेल का? नाही ना, महाराजांनी साम्राज्य  विस्तार करण्यासाठी केले की विखुरलेल्या मराठी जनतेला एकत्र करण्यासाठी की मुसलमानी राजवटीतून लोकांना वाचवण्यासाठी मुद्दा काहीही असला तरी आपआपली जहागिरदारी सोडायला ती लोक तयार नव्हती म्हणूनच ज्यांना बोलून समजेल त्यांना बोलून, ज्यांना बोलून समजणार नाही त्याच्याशी  लढाई करत सगळ्यांना एक उद्देश, एक ध्येय, एक झेंड्याखाली आणण्यासाठी महाराजांना जे जे करायला लागले ते सत्य इतिहास अभ्यासकांनी लोकांपुढे आणले पाहिजे. चुकीचा इतिहास नावाची बोंब करून आपल्या उथळ ज्ञानाची कबुली देणाऱ्यांनी वरील गोष्टींचा विचार तरी करावा ही विनंती. आजकाल शिवप्रेमी इतके जहाल झालेत की महाराजांच्या नावापुढे छत्रपती न म्हंटल्यास नावामागे महाराज न म्हटल्यास कोणालाही ट्रोल केले जाते ज्याचा परिणाम चित्रपटात शिवाजी महाराजांचे शत्रू असलेले पात्र मग तो क्रूरकर्मा अफजल्या असो की इतर कोणीही लांडया सरदार महाराजांचा उल्लेख आदरपूर्ण करताना दिसतो जे शत्रू त्या काळात करत असेल अस कोणाला कसे वाटू शकेल? वाद नकोत म्हणून केलेली ही सारवासारव चुकीच्या इतिहास मांडण्याच्या प्रकारात येत नाही का? महाराजांना भवानी मातेने तलवार दिली हा इतिहास खोटा की खरा? खरा असेल असं आपण मानतोच पण खोटा आहे असला तरी तो नाकारण्याचे धाडस कोणीही करू शकणार नाही. खोटा असेल तर तो त्या काळात का पसरवला गेला असावा याचेही अंदाज आपण आज लावू शकतो. स्वराज्य निर्मिती करण्याचे दिव्य हाती घेतलेल्या एका युवा नेतृत्वाबद्दल आदर, आस्था निर्माण करण्यासाठी चक्क भवानी माता ह्या देवाने निवडलेला माणूस अशी बातमी ज्यावेळी तळागाळात, निरक्षर, अज्ञानी, शेती करणे, पिकवणे आणि उदरनिर्वाह करणाऱ्या जनतेपर्यत पोहचल्यावर शिवाजी महाराज याच्यावर जनतेची श्रद्धा, विश्वास द्विगणिक करण्याचा तो सगळ्यात सोप्पा पर्याय, युक्तीदेखील असू शकते त्यामुळे हर हर महादेव चित्रपटात महाराजांची व्यक्तिरेखा आहे त्यापेक्षा मोठी करण्याचा,दाखवण्याचा प्रयत्न झाला, खोटा इतिहास म्हणत गरळ ओकली जात आहे ती अयोग्य नाही का? बरं चुकीचे आहे असं जरी मानलं तर सप्रमाण सिद्ध करायचे सोडून केवळ प्रकरण तापवणे, वाद निर्माण करणे, चित्रपटग्रहातून चित्रपट काढण्यास भाग पाडणे, आता दूरचित्रवाणीवर प्रदर्शित करण्यापासून अडवणे हे चुकीचे नाही का? मुळात संपूर्ण महाराष्ट्राचे दैवत असलेला माझा राजा याचे वंदन, अभिमान त्यांच्या वंशजांना द्यायला मराठी जनता तयार आहे पण त्याच्या वंशजांनी केवळ महाराजांचे वंशज म्हणून त्याचा गैरफायदा घेत अडवणूक करणे देखील चुकीचे नाही का? राज्यपाल यांनी अपमान केला, अबक ने हे बोलले, दुसऱ्याने ते बोलले अस करत केवळ राजकीय स्वार्थ साध्य करणाऱ्या लोकांना आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा हक्क नाही. काँट्रॅव्हरसी तयार करण्यापेक्षा खरा इतिहास सप्रमाण जनतेपुढे आणावा, गड किल्ले याचे संवर्धन करावे, प्रत्येक किल्याचा इतिहास, वीर पुरुष, लढाई असे इतिहास  लोकांना पाहता येईल, अनुभवता येईल अशी शिवसृष्टी उभारणे, मराठी समाजाला महाराजांच्या नावाखाली, भगव्या झेंड्याखाली एकसंध , एकत्रित, संघटित करण्याचे सोडून केवळ वाद निर्माण करणे थांबवले गेले पाहिजे. गड किल्ले यावर गेल्यावर त्या जागेचा मान प्रत्येकाने राखलाच पाहिजे पण एखादी चुकीची घटना करणाऱ्यांना शिवप्रेमी लाथाबुक्यांचा मार देतात तेही चुकीचेच. एखाद्या व्यक्तीने केलेली चूक निदर्शनात आणून देने,समज देणे, जास्तीत जास्त त्या उचापती व्यक्तिची रीतसर पोलीस तक्रार करणे योग्य पण कायदा हातात घेत मारहाण करणे, व्हिडीओ काढणे, प्रसिद्ध करणे चुकीचेच नाही का? बर योग्य मानले तर नवाब मलिक किंवा त्याच्याच धर्माची लांडे लोक स्वराज्याच्या राजधानी रायगडावर येतात पण महाराजांचा जयजयकार करण्याचे टाळतात त्यावेळी नाही ही शिवप्रेमी विरोध करत, ना त्या व्यक्तीला जयजयकार करण्यास बाध्य करत, का त्यावेळी तुमचं शिवप्रेम बाहेर उफाळून येत नाही का? महाराजांच्या नावाने चुकीची कामे करणाऱ्यांनी स्वतः अंतर्मनात डोकावणे खूप गरजेचे. खोट नाट काय यात वेळ दडवणे, सामान्य शिवप्रेमी, पाठीराखे याना भडकवणे बंद झाले पाहिजे. कोरेगाव भीमा दंगलीत शिवाजी महाराज यांचे चित्र असलेले जॅकेट घालणाऱ्या व्यक्तीचा खून झाला त्यावेळी कुठे होते शिवप्रेमी? तो संज्या महाराजांचे वंशज पुरावे मागत होता त्यावेळी का शांत होते हे शिवप्रेमी? कित्येकवर्षं दादोजी कोंडदेव बाळ शिवाजीचे शिक्षक म्हणून पाठ्य पुस्तकात होते ते गायब करणारे, लाल महालातून पुतळा उखडणाऱ्या विरोध केला का ह्या शिवप्रेमींनी? माझ्या राजाला जाणता राजा म्हणू नका म्हणणाऱ्यांना केला का कधी विरोध? गो मातेचा, ब्राह्मणरक्षक माझा राजा नाही अशी आवई उठवणाऱ्यांना दिले का फटके कधी? शिवभोजन, शिवबंधन, शिववडा, शिवसेना ह्या सगळ्यात माझ्या राजाचे नाव वापरताना केले जाणारे राजकारण, स्वार्थ ह्याला कधी विरोध केला का? अरे थांबवा हा सेलेक्टिव्ह अँपरोच, ज्या राजाने तुम्हाला हिंदू म्हणून ओळख दिली, हिंदू म्हणून भारतात एकहाती सत्ता आणली, मुस्लिम शासकांना पळवत अटकेपार भगवा फडकवला त्या राजाच्या जनतेला, शिवप्रेमींत फूट पाडण्याचे काम करू नका. भारतीय सैन्यात प्रत्येक बटालियन कोणत्या ना कोणत्या देवाचे नाव घोषणा देत शत्रूवर चाल करते केवळ मराठा बटालियन कोणत्याही देवाचा नाही तर आपल्या छत्रपतींचा उद्घोष करत शत्रूवर तुटून पडते याचा तरी विचार करत महाराजांच्या नावावर एकत्र येण्याचा प्रयत्न करा, भगव्या झेंड्याखाली संघटित व्हा........

कानात डुल, चेहऱ्यावर दाढी, डोक्यावर शिवगंध, पांढरे कपडे, कपड्यावर महाराजांचा चित्राचा बिल्ला अस बाह्य दर्शनीय रूप घेऊन जगाला फसवू शकाल पण स्वतःला कसे फसवाल बर? 

मंगळवार, १३ डिसेंबर, २०२२

बांगलादेश दौरा: कसोटी

 

बांगलादेश दौरा: कसोटी

एकदिवसीय सामन्यात पानिपत झाल्यानंतर कसोटीत निर्विवाद यश मिळवणे हे झालेल्या अपमानाचा बदला घेण्याची वेळ आहे. उद्या सकाळी ठीक 9 वाजता बांगलादेश भारत यांच्यात सामना चालू होईल ज्याचे प्रतिस्पर्धी पाहता मोल कमी असले तरी सामन्याचा निकाल भारतीय संघाचे WTC च्या अंतिम सामन्यात खेळण्याचे भवितव्य ठरवण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे अश्यावेळी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी सर्वोत्तम संघ निवडण्याची ही समीक्षा.

अभिमन्यू ईश्वरण,सौरभ कुमार, श्रीकर भारत हे 200% पाण्याच्या बाटल्या, केळी किंवा हॅन्डग्लोव्हज याचे आदानप्रदान करणारे प्रवासी खेळाडू असतील. खेळपट्टीचा अंदाज घेऊन स्पिनर दोन खेळवायचे की तीन ठरल्यावर दोन जलदगती म्हणजे मिडीयम फास्ट गोलंदाज ठरवले जातील. 

कर्णधार केल्याने के एल राहुलची संघात जागा पक्की आहे ज्याच्याबरोबर शुभमन गिल खेळेल.जितकी प्रतिभा आहे त्यामानाने मिळालेल्या संधीत केलीत त्यापेक्षा अधिक शतके शुभमनच्या खात्यात हवी होती पण हे रेकॉर्ड सुधारण्याची चांगली संधी त्याला ह्या दोन सामन्यात मिळेल. के एल राहुलबद्दल नो कमेंट्स. 

अजिंक्य रहाणे बरोबर निरोपाचा नारळ मिळता मिळता राहिलेला, कौंटी क्रिकेटमध्ये उधळलेले रंग यामुळे अजून एक संधी मिळालेला चेतेश्वर बॉल खेळणे अपेक्षित आहे, खाणे नाही. दिवसाअंती धावाचे मोल अधिक असते हे चेतेश्वरला समजणे गरजेचे

चौथ्या क्रमांकावर येणाऱ्या विराटने केवळ जगातील नावाजलेले खेळाडू जसे स्मिथ, लबुसचेंगने, जो रूट, तो शेबडा बाबर यांनी नुकत्याच केलेल्या मोठ्या खेळीचे आकडे पाहून मैदानात उतरावं. कर्णधारपद गेल्याचे दुःख, एकटेपणा ही सगळी नाटक बाजूला सारून धावा कराव्या. बाद झाल्यावर आश्चर्यकारक चेहरा करण्याची नाटक करू नये. 

जादूगार श्रेयसने इन्स्टाग्राम रिल्सवर जादूचे प्रयोग करण्यापेक्षा क्रिकेटच्या रियल फील्डवर जादू दाखवणे गरजेचे असणार आहे.यानंतर येणारे महत्त्वाचे नाव म्हणजे रिषभ पंत ज्याला एकदिवसीय संघात स्थान न देता पाणी देण्याचे काम देत त्यात प्राविण्य देण्याचे काम भारतीय संघ व्यवस्थापन करताना दिसत होते. टी ट्वेंटी किंवा एकदिवसीय सामन्यात संधी मिळण्याची शक्यता कमी झाल्याने कसोटी आपली जागा अबाधित राखणे 24 25 वर्षाच्या, तुलना करण्याच्या वयाच्या जवळ नसणाऱ्या, नट्याना सोशल मीडियात उत्तर देणाऱ्या रिषभला गरजेचे. 

100 कसोटी सामने खेळणे हे उद्दिष्ट ठेवून उरलेल्या प्रत्येक सामन्यात अधिकाधिक विकेट घेऊन आपली उपयोगिता सिद्ध करण्याचे आव्हान अश्विनच्या डोक्यावर आहे. सध्या जरी संघातून बाहेर जाण्याची त्याची शक्यता नसली तरी एकदा का त्याचे 100 कसोटी सामने झाले की त्याने निवृत्त व्हावे, दुसऱ्या खेळाडूला संधी द्यावी अशी बोंब मार्केट मध्ये सोडली जाईल. ऑस्ट्रेलियन नॅथन लायनने वेस्टइंडिज विरुद्ध विकेट घेऊन अश्विनला एक घर मागे सरकवले आहे त्याला परत मागे सारत निवृत्ती घेईपर्यत त्याच्यापुढे राहण्याचे अश्विनचे लक्ष असणार हे साहजिकच आहे.बांगलादेश दौऱ्यात असनाऱ्या खेळपट्या फिरकीला पोषक असल्याने अश्विनबरोबर अधिमधी संधी मिळणारा अक्सर आणि चायनिज वस्तूंप्रमाणे अल्पावधीत खराब झाल्यासारखे चायनामन गोलंदाज कुलदीप खेळतील अशी अपेक्षा ठेवता येईल पण राहुल द्रविड अनपेक्षित धक्का देत सौरभ कुमार ज्याने अनधिकृत सामन्यात बॅट आणि बॉल याने बरी कामगिरी केली तो खेळताना दिसू शकेल. काही वर्षांनी सौरभ कुमारचा जयंत यादव झालेला आपल्याला दिसेल याची खात्री वाटते. आता उरल्या दोन जागा आणि खेळाडू पाच ज्यात सिराजला भारतीय संघ मैदानात उतरवणार हे जवळजवळ काळ्या दगडावरची पांढरी रेष अश्यावेळी  पाचवा गोलंदाज एक ऑलराउंडर शार्दूल असावा? की एकमेव डावखुरा वेगवान गोलंदाज, 12 वर्षानंतर संघात येणार जयदेव उनाडकट, की बुमराह, शमी सारखे एकके जखमी असल्यावर संधी मिळणारा उमेश यादव की निष्प्रभ ठरलेला नवदीप सैनी यातील एकाला संधी मिळण्याची दाट शक्यता.

संघाची निवड ही जवळपास काय असणार हे ठरलेले असते अश्यावेळी वारंवार संधी मिळणाऱ्या त्या खेळाडूंनी किमान जनाची नाही पण मनाची लाज बाळगत उत्कृष्ट कामगिरी करत बांग्लादेशसारख्या शाळकरी मुलाच्या संघाची वाताहत करत दोन्ही सामने निर्विवाद जिंकणे महत्वाचे. पहिल्या कसोटीत हा संघ खेळताना दिसू शकतो 

संभावित भारतीय संघ:

राहुल

शुभमन

चेतेश्वर

विराट

श्रेयस

रिषभ

रवीचंद्रन

अक्सर

कुलदीप

सिराज

उमेश

शनिवार, १० डिसेंबर, २०२२

विराट

@imVkohli स्वतः एक दिग्गज, अद्भुत फलंदाज आहे तो आजकाल त्याच्या सर्वोच्च फॉर्ममध्ये नाही पण तरीही तो करत असलेल्या धावा ह्या त्याची दृढशक्ती दाखवते. एक दोन गोष्ट खटकत आहेत 
1. बाद झाल्यावर वा झेल घेतल्यावर त्याच्या चकित झालेल्या भावमुद्रा 
2.दुसऱ्या खेळाडूंच्या खेळासाठी टाळ्या वाजवणे दुसऱ्या खेळाडूचे कौतुक करणे ठीकच पण त्यापेक्षा वरचढ खेळण्याची जिद्द तर हरवला नाही ना अस उगाच वाटत. आरे ला कारे करणारा, बाद झाल्यावर गोलंदाजाला डोळे दाखवणारा, निर्भीड, कोणाची तमा न बाळगणारा विराट हरवलाय. तो हरवलेला विराट शोधण्याचे, त्याला परत आणण्याचे काम विराट तुलाच करायचे आहे. नाही पाहवत तुझे हे आजचे रुप.अस आतून तुला काही गोष्टी खटकत असाव्या बहुतेक पण त्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात सर्वोच्च धावा मिळवण्याचे ध्येय साकार करण्याचे स्वप्न उराशी ठेवून खेळणे गरजेचे. ज्या ज्या वेळी तू ठरवले त्या त्या वेळी तू शतक ठोकले ते संघासाठी मीडियाने शेवटचे शतक दोन वर्षांपूर्वी झाले वगैरेची बोंब केली त्यावेळी तू पहिल्यांदा स्वतःसाठी खेळतोय अस वाटलं पण नशिबाने तुला साथ दिली नाही. अनपेक्षितरित्या टी ट्वेंटीत शतक झाले अन मीडियाची शतक नाही याची एक एक दिवस मोजण्याची सवय तोडली . टी ट्वेंटी वर्ल्डकप मध्ये पोर्किस्तान किंवा एकंदरीत स्पर्धेत चांगल्या खेळीचे जगातील सगळ्यांनी कौतुक केले असेल पण तुला माहीत असेल की त्या धावा बनण्यामागे कौशल्यापेक्षा नशिबाचा भाग जास्त होता. त्या खेळया अप्रतिम होत्याच, त्याला तोड नाही पण त्या खेळीत सामन्यावर असलेले नियंत्रण, फलंदाज म्हणून तुझ्या व्यक्तिमत्वाचा ठसा तुझी दहशत नव्हती हे तुही मान्य करशील. कर्णधारपद म्हणजे काही सर्वस्व नाही आणि ते काढून घेतले म्हणून  तू कोणत्या शेल मध्ये जाणे, धोनी शिवाय कोणी फोन केला नाही, गर्दीत असूनही मी एकटा असतो अशी वक्तव्य तू मनाने खचला आहेस हे दाखवत. मैदानात प्रत्येक निर्णयात तू असण्याचा, टीव्हीवर कॅमेऱ्याच्या फोकसवर असणारा तुला त्या गोष्टी नसल्याचा नाही तर त्या गोष्टी परत तुझ्याकडे येईल असे काम करावं लागेल. प्रतिस्पर्ध्याला डोळे दाखवत, भल्या भल्या गोलंदाजाला आकाश दाखवत जमिनीवर आणणारा तू स्वतःला विसरलाय. तुला फक्त मोकळं खेळायचं आहे इतकंच पण मनातील विचार तुला अडथळे निर्माण करत आहे. कृपया यातून लवकर बाहेर ये. अजून खूप लांबपर्यत तुला पळायचे आहे, एकदिवसीय आणि कसोटीत सचिनचे सर्वाधिक धावांचे रेकॉर्ड तोडायचे आहे, सर्वात जास्त शतक करायची आहे. जर ते तुला साध्य करता आले नाही तर आजपर्यत केलेल्या प्रत्येक धावेची माती होईल. तुला तुझ्या जुन्या रस्त्यावर आज चालताना नाही पळताना पाहिले पाहिजे. श्री हनुमानाला जेव्हा समुद्र लांघून माता सीतेचा शोध घ्यायचा होता त्यावेळी त्याच्याकडे असलेली शक्ती याची जाणीव जांबुवंतला करून द्यावी लागली होती कदाचित माझे हे छोटे शब्द तुला तुझ्या खऱ्या शक्तीची आठवण करून देतील आणि तू क्रिकेटच्या मैदानात परत मोठी उडी मारशील अशी अपेक्षा करत मी थांबतो

शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

विश्वचषक आणि भारतीय संघ निवड भाग २


https://diarynotes137.blogspot.com/2022/12/blog-post_3.html

मागील ह्या भागातून बांगलादेश दौरा त्यातील संघ निवड याबद्दल भाकीत केले होते. आज शालेय संघाने कॉलेजच्या संघाला हरवलं, बांगलादेश सारख्या बारक्या संघाने भारतासारख्या बलाढ्य संघाला एखाद्या सामन्यात हरवणे वेगळे पण एखादी श्रुखला जिंकणे हे एक क्रिकेट रसिक म्हणून पटतच नाही. ज्या पद्धतीने भारतीय संघाने टी ट्वेंटी विश्वचषक हातातून घालवला ते पाहून निराश असल्याने हे दोन्ही सामने मी पाहिले नाहीत पण धावफलक पाहत होतो. 

पहिल्या सामन्यात थोडासा अवघड पण त्यातल्या त्यात सोप्पा असलेला झेल सोडून तर दुसऱ्या सामन्यात 100च्या आत 6 खेळाडू बाद झालेले असताना मोठी धावसंख्या बनण्यामागे के एल राहुलच्या चुका होत्या हे कोणीही बोलताना दिसत नाही. दुसऱ्या सामन्यात जर नवव्या स्थानी येऊन आतिषबाजी खेळी करण्याची शक्ती रोहितच्या अंगात होती तर त्याने आधीच मैदानात उतरून सामन्याचा निकाल निकाली लावण्याचे धाडस का केले नाही? ज्यावेळी एखाद्या मांजराला कोपऱ्यात मागे सरकवत सरकवत ढकलले तर मागे जाण्याचा मार्गच संपल्यामुळे पुढं कितीही मोठा धोका असला तरी त्यावर आक्रमण करण्याची शक्ती ते मांजर करते तसच काहीस रोहितची ती खेळी असावी का? मुळात बांगलादेश विरुद्ध पराभव हा खूप मोठा पराभव आहे पण रोहित शर्माची जिगरबाज खेळी किंवा निवडणूकाचे निकाल यामुळे त्याची हवा तसा धिंगाणा झालेला नाही.

बांग्लादेश एकदिवसीय शृंखला 2-0 असताना शेवटचा सामना जिंकून उरला सुरला आत्मसन्मान राखण्याचे मोठे आव्हान भारतीय संघासमोर आहे. त्यातच रोहित शर्माची दुखापत, तंदुरुस्त नसताना मैदानात उतरण्याची घाईमुळे मागील सामन्यात दीपक चहर तर वर्ल्डकप आधी जसप्रीत बुमराह जायबंदी झालेला. कुलदीप नवखा शिवाय त्याची पहिल्या सामन्यात कामगिरी इतकीही उत्तम नव्हती की याची अनुपस्थिती भारताला मारक ठरेल. उरलेल्या खेळाडूमधून संघ निवडणे इतकेही अवघड निश्चितच नाही अश्यावेळी पर्यायच नसल्याने केएल राहुल आणि धवन यांनी सलामीला खेळावे. यष्टीरक्षण करून दोन सामन्यात बळजबरीने खेळवला गेलेला केएल यानेच ह्या सामन्यात यष्टीरक्षक केले पाहिजे जर केवळ सलामीच्या जागी त्याला खेळवून इशान किशनला पाचव्या क्रमांकावर किंवा इशान सलामीला केएल मधल्या फळीत खेळताना दिसला तर संघ निवडण्यात राजकारण, काही खेळाडूंना झुकते माप दिले जाते हे सर्वश्रुत होणार आहे. त्यानंतर विराट आणि श्रेयस याची जागा जवळपास पक्कीच आहे. पाचव्या स्थानी रजत किंवा राहुल त्रिपाठी यांनाच घेऊन किमान वर्ल्डकपची तयारी त्याद्वारे नवीन खेळाडूंना संधी देण्याचे काम भारतीय संघ करतोय अस चित्र उभे करणे गरजेचे वाटते की नाही हे स्पष्ट होईल. राहुल त्रिपाठीपेक्षा रजत पाटीदार याने नुकतीच केलेली आयपीएल आणि देशांतर्गत सामन्यात केलेली कामगिरी फाटक रजतला पाचव्या स्थानी खेळण्याची संधी मिळाली पाहिजे. अक्षर, वॉशिंग्टन, शार्दूल, सिराज आणि उमरान याना खेळवल्यानंतरही एक जागा रिकामी राहते अश्या वेळी एक फलंदाज म्हणून इशान किशन की एक गोलंदाज म्हणून कुलदीप यादव याची संघात निवड करण्याची डोकेदुखी संघ व्यवस्थापनेवर असणारच आहे. कुलदीप यादवने भूतकाळात अनेक सामने गाजवले आहेत शिवाय येणारा वर्ल्डकप भारतातच होत असल्याने फलंदाजांना बुचकळ्यात टाकणारा चायनामन गोलंदाजाला थोड्याफार 

संघ व्यवस्थापन संभावित संघ असा असू शकतो

इशान

धवन

विराट

श्रेयस

के एल राहुल

रजत पाटीदार

अक्षर

वॉशिंग्टन

शार्दूल

सिराज

उमरान

एकंदरीत उद्या उतरणार संघ यातून संघ व्यवपस्थापनाचा वर्ल्डकप च्या दृष्टीने करत असलेला विचार, खेळाडूंच्या निवडीबाबत ते किती निरपेक्षपणे काम करतात हे दिसणार आहे.


क्रमशः

लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा, असेच लेख वाचण्यासाठी follow करा. 

ट्विटर @pincode410501 

ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com

 डेलीहंट @cm_newsinformation












वृद्धाश्रम


छोट्याश्या गावातून येऊन शहरात स्वतःचा फ्लॅट, चारचाकी गाडी, एक छान जर्मन शेपर्ड कुत्रा रिंगर आणि एका चांगल्या आंतरराष्ट्रीय खाजगी कंपनीत सहा आकडी पगार घेणारा विनय आणि विनंती याच्या घरी लवकरच तिसरं माणूस रहायला येणार असत. तिसऱ्या माणसाची येण्याची आतुरता, त्यासाठी लागणारी तयारी यात विनय बराच कष्ट घेत होता. रात्रीचे जेवण उरकल्यावर विनंतीचा हात हातात घेऊन बाल्कनीत हवा खात बसला होता. नेहमी बडबड करणारी विनंती आज कमालीची शांत आणि कोणत्यातरी विचारात मग्न होती.

लग्न झाल्यावर पहिली दोन वर्षे लगेच मुल नको असा हट्ट करणारी नंतर मुलं होत नाही म्हणून नाही नाही त्या देवाला जाणारी, देवापुढे लोटांगणे झाली, प्रतिष्ठित डॉक्टरांचे उपचार यानंतर अडीच वर्षांनी कुठं विनय-विनंती यांच्या घरात पाळणा हलणार होता. जितका जास्त आनंद विनंतीला होता त्यापेक्षा कैक जास्त पट विनयच्या चेहऱ्यावर तिला दिसत होता. डिलिव्हरीला किमान महिना अवकाश होता पण त्याआधी घराला रंग, येणाऱ्या मुलांसाठी कपडे, खेळणी, पाळणा सगळी तयारी झाली होती तरीही ऑफिसच्या कामातून विनयला यापेक्षा जास्त वेळ काढता येईल असे नव्हते मग मुलं झाल्यानंतर त्याची देखभाल असेल की घरातील कामासोबत विनय त्याची ऑफिसची तयारी, एकंदरीत सगळा संसार कस सावरायचे अश्या प्रश्नात विनंती अडकून पडली होती. 

न राहवून शेवटी विनयने त्या शांततेला संपवण्यासाठी काळजीपोटी तुला काही होत तर नाही ना? इतकी कशी तू शांत आज? असा प्रश्न विचारला. विनंतीदेखील सगळं ठीक आहे असं म्हणत वेळ काढून नेण्याचा प्रयत्न करत होती पण विनयला तिची देहबोली, चिंताचुर चेहरा समजून येत होता. विनंतीने मनातील सल बोलून दाखवली, कदाचित येणाऱ्या मुलाची तयारी करण्यात गुंग असणारा विनय विनंतीने उभे केलेले प्रश्न याचा विचारच केला नव्हता पण विनंतीच्या प्रश्नाचे उत्तर त्याने लगेच दिले. विनंतीला तिच्या आईला काही महिण्यासाठी आपल्याकडे रहायला बोलावं म्हणजे सगळी चिंताच दूर होईल असं म्हणाला. त्याच्या ह्या तोडग्यावर मात्र विनंतीच्या कपाळावरील आठ्या मोठ्या झाल्या. 

खरतर तिला अश्याच पर्यायाची अपेक्षा होती पण येणाऱ्या बाळाचे सगळं करून, घरातील सगळी जवाबदारी तिला स्वतःच्या आईंच्या अंगावर पडावी अशी लांबलांबपर्यत इच्छा नव्हती. तिच्या आईला बोलवावे ती केवळ बाळंतपणानंतर सोबत म्हणून पण विनयच्या ह्या पर्यायमुळे विनंतीला मांडलेल्या सारीपाटात सोंगट्या चुकीच्या पडल्याची भावना मनात उभी राहिली.

विनय विनंती याचा प्रेम विवाह मात्र त्यासाठी दोघांनी आपापल्या घरातून परवानगी मिळवली होती हे विशेष. विनंती आणि विनय याची पहिली भेट झालेली ती ऑफिसमध्ये, तिथूनच त्याचे प्रेम फुलत गेले होते. लहानपणापासून लाडाने वाढलेल्या विनंतीला आपल्या आई बापाचा खूपच जास्त लळा होता म्हणूनच लग्नानंतर आई वडिलांच्या सोसायटीच्या जवळ असलेला फ्लॅट तिने विनयला बुक करायला भाग पाडले होते. रिंगर म्हणजे हट्टाने आणलेल्या जर्मन शेफर्ड ह्या कुत्र्याला फिरवण्याच्या बहाण्याने रोजचे तिचे आई वडील राहतात त्या सोसायटीत येणे जाणे होते. लग्न झाल्यावर रितिभाती पाळण्याच्या बहाण्याने विनयच्या जन्मगावी असलेल्या घरी जे चार पाच दिवस काढले ते सोडले तर परत कधी विनंती गावाकडच्या घरी गेली नव्हती. विनयच्या घरची परिस्थिती बेताचीच त्याने जे काही कमावले होते ते स्वतःच्या मेहनतीवर पण गावाकडचे घर असेल की गावातल्या घरात एकटी राहणारी विनयची आई ह्या दोन्ही गोष्टी काही तिला पटलेल्या नव्हत्या. प्रत्येकवेळी विनय वर्षातून एकदा दोनदा गावाकडे एकटाच आईला भेटायला जात असे.

कपाळावरच्या आठ्या पाहत विनय चिंतेच्या स्वरात विनंतीला काळजीचे कारण विचारू लागला. विनंती अक्षरशः अश्याच प्रसंगाची वाट पाहत होती की काय देव जाणे पण तिने विनयच्या आईला बाळाची काळजी घेण्यासाठी आणण्याचा हट्ट केला त्याचबरोबर काही दिवस आपल्याला त्याच्या बरोबर राहता येईल असा युक्तिवादही केला. अनपेक्षित पर्याय दिल्याने खरतर विनयला आश्चर्याचा धक्का बसला पण त्याला देखील हा पर्याय खूपच आवडला होता. पुढच्या रविवारीच जाऊन आईला घेऊन येतो असे म्हणत चला आता उद्या कामाला जायचे आहे म्हणत विनंतीला उभं करत पावले बेडरूमच्या दिशेला टाकली.

विनयची आई खूपच सदाचारी, विनयचे वडील गेल्यानंतरही गावाकडच्या घरात एकटीच राहण्याचा तिचाच निर्णय होता. तसही तिला मुलाच्या शहरी भागात जमवून घेता येईल असं वाटत नव्हते त्यापेक्षा लग्न झालेल्या पोराच्या संसारात आपली कशाला लुडबुड म्हणून हट्टाने ती गावाकडे राहिली होती. कमी शिकलेली, गावाकडील ग्रामीण लेहज्यात बोलणारी, टिपिकल गावातील थोराड बायकांसारखी पेहराव करणारी विनयची आई विनंतीला आवडली नव्हती म्हणूनच कामपूरते बोलण्यापलीकडे दोघींचे इतक्या वर्षात बोलणे नव्हते.

चुटकी वाजवावी तस आठवडा निघून गेला, रविवारी सकाळी लवकर उठून विनय गावाकडे आईला आणण्यासाठी निघाला. विनयला विनंतीचा हा निर्णय खूप आवडला होता आणि तो त्याच्या गावाला जाण्याच्या घाईत स्पष्ट दिसत होता. घाईघाईने त्याने आपली गाडी गावाकडे वळवली आणि जितक्या लवकर शक्य होते तितक्या लवकर त्याने गाव गाठले. कोणतीही पूर्वसूचना नसल्याने विनयची आई विनयला पाहून गडबडलेली पण विनयने त्याचे येण्याचे कारण सांगितल्यावर मात्र ती सुखावून गेली. तिचे डोळे हलकेच ओले झाले, भरून आलेले विनयच्या लक्षात आलेच होते. लगबगीने पोराच्या घरी जाण्याची तयारी विनयची आईने केली आणि माय लेक शहराच्या दिशेने मार्गस्थ झाले.

विनयच्या घरात लक्ष्मी आली, लहान मुलीची, सुनेची, लेकाची, घरातील काम आणि रिंगर कुत्र्याची सगळी जवाबदारी विनयच्या आईने स्वतःच्या डोक्यावर सक्षमपणे सांभाळली होती. घरातील स्वछता असेल की स्वयंपाक, बाळाची काळजी असेल की कुत्रा रिंगर याला सोसायटीच्या परिसरात फिरून आणणे ह्या सगळ्या जवाबदाऱ्या सहन होत नसतानाही विनयची आई अगदी सहजरित्या पेलून नेत होती. विनंतीची आईदेखील दररोज आपल्या लेकीला भेटायला यायची मात्र बेडरूमचा दरवाजा बंद करून माय लेकी एकत्र तासंतास गप्पा मारण्यापलीकडे काही दुसर करत नसत. हळू हळू का होईना दिवस सरले छोटी वेदा आता वर्षाची झाली होती. वर्षभराची सवयीचा भाग असेल म्हणूनच की काय घराची सर्व जवाबदारी अजूनही विनयची आई समर्थपणे वाहत होती.

विनंतीला कोणतेच काम पडत नसले तरी विनयची आईशी सलगी, वेदांचे आजीकडे झुकत चाललेला ओढा डोळ्यात, डोक्यात खुपत होता. विनंतीला परत आपले घर आणि ती, विनय आणि लेक वेदा याच्या त्रिकोणी कुटुंबाचे स्वप्ने पडू लागली म्हणूनच की काय हळूहळू घरात कुरबुरी, भांड्याला भांड लागण्याचे प्रमाण वाढत होते. विनंती आता विनयच्या आईच्या कामातील चुका त्यावर बोलणे विनय समोर चालू केले होते. वेदाला जरी मारून मुटकून बेडरूम मध्ये कोंडून ठेवणे, आजीकडे जाण्यापासून थांबवण तिला शक्य झाले असले तरी विनय असेल की रिंगर मात्र म्हतारीच्या आसपास सदैव असत. कधी कधी विनयच्या आईचा राग रिंगरवर देखील काढायला आता विनंती मागेपुढे पाहत नव्हती. घरातील वाद, विसंगती दिवसेंदिवस वाढतच होती.

गावाकडचे घराची भिंत पावसाळ्यात पडली होती आणि शहरातील घरातील नात्यांना तडे पडत चालले होते. विनयचे परिस्थिती सामान्य करण्याचे प्रत्येक प्रयत्न अयशस्वी होत होते आणि सरत शेवटी मार्ग निघाला तो वृध्दाश्रमाचा..................... 
कोणत्याही माऊलींवर जी वेळ येऊ नये ती वेळ आज विनयच्या आईवर आली होती. विनय ह्या निर्णयावर खुश तर अजिबात नव्हताच पण बायकोच्या हट्टामुळे आणि आईची होणारी फरकटदेखील तो पाहू शकत नव्हता. शहरात त्याने एक वृध्दाश्रम शोधले होते आणि आता उद्या तिकडे आईला घेऊन जायची कठीण जवाबदारी त्याच्यावर पडली होती. दररोज टिक टिक करणारे घड्याळ आज काहीश्या जास्त वेगाने पळते आहे की काय अस विनयला वाटू लागले.


सकाळ झाली, रोजच्या सवयीप्रमाणे सगळी कामे चोख बजावत विनयच्या आईने स्वतःची पिशवी भरली. मुलाचा संसार, त्याचे घर संसार, मुलगी वेदा याना डोळयांत किती सामावून घेऊ आणि किती नको असं तिला झाले होते. चेहऱ्यावर जरी दाखवत नसले तरी मनाने विनयची आई खचलेली होती. वेदांच्या गालावर पापा घेत नकळत तिच्या डोळ्यातला एक अश्रु वेदाच्या कपाळावर पडला, कोणाला तो दिसू नये ह्या तत्परतेने तो पुसून टाकत लेका सुनेला आशीर्वाद देत माऊली घराच्या बाहेर पाऊल टाकले. बाहेर रिंगर शेपटी हलवत उभा होता, आता फेरफटका मारायला जायचे म्हणून उगाच विनयच्या आईच्या पायाशी घोटाळत होता पण आज त्याला फिरायला जायला मिळणार नव्हते हे त्याला माहित नव्हते. विनयने मोठ्या मुश्कीलीने त्याला पिंजऱ्यात बंद केले आणि आईला घेऊन तो वृध्दाश्रमाच्या रस्त्याला लागला होता.

विनयची आई वृद्धाश्रमात जाऊन दोन दिवस झाले होते, घरात दररोज असणारी गडबड सारखीच असली तरी आई घरात नसल्याची पदोपदी आठवण विनय, वेदा आणि पटणार नाही पण रिंगरला देखीक होत होती. विनंती मात्र कोणतीही भावना चेहऱ्यावर न आणत घरात वावरत होती. वर्षभर आरामात काढल्यानंतर तिला आता घरातील कामे होत नव्हती, त्यात विनयची तयारी, घराची स्वछता, आवराआवर, स्वयंपाक, वेदाच्या मागे पुढे पळणे यात तिची धावपळ होत होती. सगळ्या कामाच्या गराड्यात रिंगर कडे दुर्लक्ष होणे साहजिकच होत. थकलेली भाजलेली विनंती आता पहाटे उठू लागली आणि घर सांभाळू लागली होती. दरवाजा उघडून तिने सवयीप्रमाणे रिंगरच्या पाण्याच्या भांड्यात त्याचा पीडिग्री टाकले आणि एकदम तिला लक्षात आले की रिंगर तर पिंजऱ्यात नाहीच आहे मुळी. धावत घरात जात तिने घडलेला प्रसंग विनयला सांगितला. विनय लगोलग उठून रिंगरच्या शोधात बाहेर पडला. घाई गडबडीत नाईट ड्रेस वरतीच बाहेर पडला होता. सोसायटी, आजुबाजूच्या, मैदानात इतकेच काय विनंतीचा घरापर्यत त्याने रिंगरचा शोध घेतला पण रिंगरचा ठावठिकाणा काही त्याला लागला नव्हता. ऑफिसला जायची तयारी बाकी असल्याने तो घरी परतला आणि रिंगर गेला तसा परत येईल अशी अपेक्षा करायला लागला. नाहीच आला तर ऑफिसमधून परतल्यावर त्याचा शोध घेण्याची चर्चा विनय विनंती यात झाली.

घड्याळाचे काटे वेगाने ओहिरत होते. ऑफिसमध्ये असणारी मिटिंग यामुळे घाईत तो बाथरूम मध्ये अंघोळीसाठी घुसला. इकडे विनंती ब्रेकफास्टच्या तयारीला लागलेली. लॅपटॉप, मोबाईल जय्यत तयारी करून ब्रेकफास्ट करायला घेत असतानाच विनयचे लक्ष मोबाईलवर पडले,जवळपास पंधरा मिस कॉल पाहून तो तर बुचकळ्यात पडलेला होता. ते पंधरा मिस कॉल एका अपरिचित नंबरवरून आले होते. विनयच्या काही लक्षात आले नसले तरी अनाहूतपणे त्याने त्या नंबरवर रिटर्न कॉल केला. दुसऱ्या बाजूने त्रासिक आवाज करत एक वृद्ध हॅलो म्हणत जवळजवळ विनयवर खेकसला होता. तो फोन त्याच्या आईच्या वृद्धाश्रमातून होता. फोनवरील खाष्ट म्हातारा विनयची कोणतीही दयामाया न करता त्याला झाप झाप झापत होता. पंधरा पंधरा कॉल करून ते न उचलणाऱ्या विनयला अक्षरशः बोलुही देत नव्हता. रागाच्या भरात तो चिडलेला व्यक्ती म्हणाला 

" हे वृद्धाश्रम आहे, वृध्दाश्रम. हे काही पाळीव प्राणी सांभाळायचे ठिकाण नाही. विशेषतः इथे सगळेच म्हातारी माणस असताना पाळीव प्राणी निषिद्ध आहेत असे असतानाही केवळ दोन दिवसांपूर्वी आलेल्या तुमच्या माणसाने एक कुत्रा घरात आणला हे काही योग्य नाही, वृध्दाश्रमाच्या नियमांची तमा न बाळगणाऱ्या, वेळेवर कॉल न घेणारे तुम्ही आताच्या आता इथे या" 

एव्हाना घडलेला प्रकार विनयच्या लक्षात आला होता, ब्रेकफास्टचे ताट बाजूला सारत तो थेट वृद्धाश्रमात निघाला. काही मिनिटात तो वृद्धाश्रमात पोहचला होता. वृद्धाश्रमाच्या बागेत शेपटी हलवत रिंगर विनयच्या आईच्या पायाशी बसलेला होता, मध्येच तो उड्या मारत तर कधी आईच्या पायात घोटाळत होता. मुक्या जनावर ते पण वर्षभराच्या जिव्हाळ्याच्या बदल्यात त्याने पिंजरा तोडून विनयच्या आईकडे धाव घेतली होती, विनय मात्र पिंजऱ्यात अडकून राहिला होता. रिंगरच्या एका कृतीने त्याने केलेली चूक त्याच्या लक्षात आली. केलेली चूक त्याच्या इतकी जिव्हारी लागली होती त्याच्या डोळ्यातून कधी पाणी गळायला लागले हे त्याला देखील समजले नाही. आपसूक मुलाची आणि आईची दुरून का होईना नजरानजर झाली. लहान पोर जस धावत जात तसा विनय आईकडे धावत गेला. आईच ती, तिला तिच्या लेकरांच्या भावना समजल्या होत्या तसही तिच्या मनात कोणताही राग नव्हता पण पळत आलेल्या लेकाला पाहतच तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण हास्य उभारले होते. विनय पळत येताच त्याने माऊलीचे पाय धरले. धाय मोकलून तो रडू लागला. त्याच्या रडण्याने वृद्धाश्रमातले सगळेच लोक बाहेर येऊन घडणारा प्रकार पाहत होते. विनय आईचे पाय धरत माफी मागत होता, आताच्या आता परत घरी चल अशी विनवणी करत 



समाप्त.................



लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा, असेच लेख वाचण्यासाठी follow करा. 

ट्विटर @pincode410501 

ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com

 डेलीहंट @cm_newsinformation





बुधवार, ७ डिसेंबर, २०२२

दाक्षिणात्य चित्रपट

आयुष्यात मनोरंजन नसेल तर ते निरस वाटते. दिवसभराच्या कामातून, अनेक कचकटीतून मनोरंजनाचे सगळ्यात मोठे साधन म्हणजे चित्रपट. त्याच चित्रपटांबद्दल आज व्यक्त होतोय. आजकाल भारतीय चित्रपटसृष्टीत दाक्षिणात्य सिनेमाचा वरचष्मा दिसतो. बाहुबली असो की पुष्पा की केजीएफ की असो आरआर आर. दाक्षिणात्य चित्रपटांनी बॉलीवूड चित्रपटाची सत्ता हलवून सोडली आहे. बॉलीवूड किंवा हिंदी चित्रपटसुष्टी सध्या तरी गटातील राजकारण, हिंदू द्वेष, सुमार पटकथा, म्हातारे आणि तेच ते रटाळ अभिनय करणारे अभिनेते याला जनता विटली आहे शिवाय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर एक से बढकर एक अप्रतिम गोष्टी यांची रेलचेल असताना हिंदी चित्रपटातील तोच तोच पणा लोक किती दिवस सहन करणार?

     दाक्षिणात्य सिनेमांनी एकदम हे यश चाखले का? नाही त्यासाठी बऱ्याच वर्षांपासून केलेली मेहनत आहे. सर्वप्रथम ईडीएट बॉक्स वर त्यांनी संपूर्णवेळ हिंदी चित्रपटाचा चोरला, एकवेळ तर अशी होती की जवळजवळ प्रत्येक चॅनेलवर केवळ आणि केवळ डब केलेले साऊथचे चित्रपट टेलकास्ट व्हायचे. त्यातील सर्वसामान्य दिसणारा गहुवर्णीय हिरो, सूंदर नट्या, कुटुंबाला प्राधान्य देणारी, हिंदू संस्कृतीचा, पेहरवाचा पुरस्कार केलेले चित्र त्याशिवाय अकल्पनिय अशी मारामरीची दृश्य यांची रेलचेल म्हणजे साऊथचे चित्रपट असत.ह्या सगळ्यात त्याची चित्र विचित्र नाच विसरता कामा नये. सतत दूरचित्रवाणीवर हेच चित्रपट येत असल्याने कालांतराने त्याची हीच शैली अजब गजब वाटण्यापेक्षा आपल्याकडच्या प्रेक्षकांनी आपलीशी करून घेतली ज्याचा परिणाम आजच्या हिंदी भाषिक चित्रपटाची झालेली वाताहत स्पष्ट करते.

     आजही कित्येक प्रसिद्ध झालेले दाक्षिणात्य चित्रपटाचे अधिकार विकत घेऊन त्याचे रिमेक बनवले जात आहेत. सगळ्यात जवळच संदर्भ घ्यायचाच म्हंटल तर नुकताच झालेला विक्रमवेदा हा चित्रपट. हिंदी भाषेत डब केलेले असो रिमेक केलेले असो सध्या दाक्षिणात्य चित्रपटाचा बोलबाला चित्रपटसुष्टीवर दिसतोय हे कोणीही मान्य करेल. दूरचित्रवाणी असो की थिएटर की ऑनलाइन जगाच्या ह्या काळात दक्षिणेकडचे चित्रपट मनोरंजनाचे नेतृत्व करत आहे. ह्याची सुरुवात नक्की कधी झाली याबाबत तर्कविकर्त, वाद संवाद करणारे करू शकतात पण माझ्यामते तरी नव्वदच्या दशकात दाक्षिणात्य चित्रपटांनी आपले पाऊल दक्षिणेकडून भारताच्या इतर तिन्ही दिशांना टाकायला सुरुवात केली होती. त्यातील काही निवडक डब चित्रपटांनी आजच्या दाक्षिणात्य चित्रपटासाठी तयार केलेला कच्चा रस्ता आणि कदम दर मजल त्यांनी केलेला प्रवास तुमच्यापुढे मांडण्याचा हा छोटा प्रयत्न..... आणि हो ह्यात केवळ त्याच प्रसिद्ध चित्रपटांना स्थान देतोय ज्याची माझ्या बालपणात बरीच हवा होती त्यामुळे कदाचित तुमच्या आणि माझ्या लिस्टमध्ये फरक असण्याची दाट शक्यता आहे. एखादा उल्लेख राहून गेलेला चित्रपट जर तुमच्या लक्षात असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगून माझी चूक दाखवायला विसरू नका.

१९८३ साली आलेला कमल हसन आणि श्रीदेवी याचा अप्रतिम चित्रपट 

सदमा

सदमा म्हणजे धक्का आणि हा चित्रपट म्हणजे एका पवित्र प्रेमाची धक्कादायक कथा आहे. त्यातील गाणी असतील की कलाकारी तुम्हाला निशब्द केल्याखेरीज राहणार नाही त्यानंतर आलेला खऱ्या अर्थाने नावाजलेला मोठा चित्रपट ज्याने बॉलीवूड मध्ये वाजत गाजत आया है राजा, लोगो रे लोगो अशी आरोळी टाकली तो म्हणजे १९८९ मध्ये आलेला 

अप्पूराजा 

एक टिपिकल हिंदी चित्रपटला शोभेल अशी कथा पण सामान्य आकाराच्या माणसाने तीन साडे तीन फुटाचा उभा केलेला अप्पू हे पात्र, त्याच्या कसरती, नाच हे सगळे बघण्यासारखे होते. १९९० साली आलेला मूक चित्रपट 

पुष्पक 

हा एक चमत्कारिक चित्रपट, काळाच्या आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन एका माणसाचा प्रवास त्यातील गमतीजमती, सुख दुःख पाहण्यासारखे आहे. १९९० साली आलेला नागार्जुनने अभिनय केलेला 

शिवा

हा विशेष प्रसिद्ध झाला ती त्यातील कॉलेजमधील राजकरण आणि हाताला सायकलची चैन बांधून मारामारी करणाऱ्या हिरोमुळे. शिवानंतर चर्चा झालेला मोठा चित्रपट १९९२ साली आलेला 

रोजा 

अभिनेत्री मधू, अभिनेता अरविंद स्वामी याचा हा भावनिक तसेच देशप्रेम दाखवणारा हा चित्रपट, त्यातील गाणी सगळंच कस श्रवणीय आणि दर्शनीय होते. 

उत्तम कथा, श्रवणीय संगीत, तितकेच सुंदर गाणी, अप्रतिम निसर्ग सौंदर्य याबरोबर संस्कृती आणि कौटुंबिक चित्रपट यामुळे दाक्षिणात्य चित्रपट चित्रपट रसिकांच्याया हृदयात हळू हळू जागा करत होते 

१९९४ साली आलेला हम से है मुकाबला

हा चित्रपटातील गाणी यामुळे तुफान प्रसिद्ध झाला होता. उर्वशी आणि मुकाबला ह्या गाण्यांनी केलेला कहर त्यावर प्रभुदेवाची अनोखी नृत्यकला यामुळे त्या काळात हा खूपच प्रसिद्ध झालेला चित्रपट होता. अरविंद स्वामी आज मनीषा कोईराला याचा 

बॉम्बे 

हा हिंदू मुस्लिम प्रेम आणि त्याकाळात झालेल्या मुंबई दंगलीची पार्श्वभूमीवर निर्माण केलेला एक अप्रतिम संगीत, गाणी असलेला चित्रपट लोकांच्या मनावर दाक्षिणात्य चित्रपटाचे गारुड उभे करत होते. १९९५ ला आलेला नागर्जूनचा

क्रिमिनल 

चित्रपटाची केलेली जाहिरात आज त्यातील तू मिले, दिल खिले ह्या गाण्यामुळे भाव खाऊन गेला होता. १९९६ साली कमल हसनचा 

हिंदुस्थानी 

चित्रपटातील गाणी, कथा यापेक्षा दुहेरी भूमिकेतील म्हताऱ्या देशभक्त माणसाची भूमिका विशेष गाजली होती.

बॉलीवूड मध्ये दाक्षिणात्य चित्रपट आणि तिथल्या कलाकारांनी पाय हळूहळू रोवण्यास केलेल्या ह्या खेळाला अनेक डब चित्रपटांनी पाया घालण्याचे काम केले ज्यात मास, गुंडाराज, इंद्रा द टायगर, चाची ४20 यांनी केलेल्या जोरकस प्रयत्न त्यानंतर केबल टीव्हीवर हिंदी चित्रपटपेक्षा अधिक प्रमाणात दाक्षिणात्य चित्रपटांनी घेतलेली जागा, बॉलीवूडचे माजूरडे, निरस कथातसेच हिंदू धर्माविरुद्ध अजेंडा आणि मधेच आलेला कोरोना ह्या रोगामुळे घरबसल्या मोबाइल, लॅपटॉप वर भन्नाट डब चित्रपट, मालिका यामुळे दाक्षिणात्य चित्रपटाचा एक मोठा चाहता निर्माण झाला त्याचाच फायदा अलीकडे प्रत्येक दाक्षिणात्य चित्रपट घेताना आपल्याला दिसत आहे आणि दिसत राहील अस चित्र दिसत आहे.......


समाप्त.




लेख आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रियाची अपेक्षा असेच लेख वाचण्यासाठी follow करा. 

ट्विटर @pincode410501 

ब्लॉगर पोस्ट diarynotes137.blogpost.com

 डेलीहंट @cm_newsinformation

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

चिरंजीवी

“ अश्वत्थामा बलिर्व्यासः हनूमांश्च बिभीषणः।
कृपः परशुरामश्चैव सप्तेते चिरंजीविनः॥ 

सप्तैतान् संस्मरेन्नित्यं मार्कण्डेयमथाष्टमम्।
जीवेद्वर्षशतं सोपि सर्वव्याधिविवर्जित॥ "

म्हणजेच अश्वत्थामा, बली, व्यासऋषी, हनुमान, बिभीषण, कृपाचार्य, परशुराम हे सात व्यक्ती चिरंजीवी आहेत, यांच्या व्यतिरिक्त मार्केण्ड ऋषी हेदेखील चिरंजीवी होते ज्यांना मृत्यूची देवता यम देखील हात लावू शकता नाही. पुरातन काळापासून कालियुगाच्या अंतापर्यत ह्या व्यक्ती आपल्यात मिसळून राहणार आहे. अनंत काळासाठी जीवन नक्कीच तोटा असला तरी काहींच्या चांगल्या कर्माचे तर काहींच्या वाईट कर्माचे फळ म्हणजे चिरंजीवी आयुष्य. आज आपण ह्याच सात चिरंजीवी व्यक्तीची थोडक्यात माहिती घेऊ.

परशुराम


आईवर चिडलेल्या वडील जमदग्नी ऋषी यांना आज्ञा देताच त्याच क्षणी परशुरामजींनी आईचे मस्तक धडपासून वेगळे केले, आज्ञाधारक मुलाचे कर्तृत्व, धाडस पाहून जमदग्नींचा राग अचानक शांत झाला आणि त्यांना आनंद झाला. परशुरामजींना काहीही वर मागण्यास सांगितले,तेव्हा परशुरामजींनी युद्धात माझा सामना करणारा कोणी नसावे आणि मला दीर्घायुष्य मिळावे म्हणूनच त्यांना जमदग्नी ऋषीकडून चिरंजीवी होण्याचे वरदान मिळाले होते.

बळी राजा

श्री विष्णू यांच्या वामन अवताराची गोष्ट तर तुम्हाला माहित असेलच. दानशूर, दिलेल्या शब्दाला जागणारा बळीराजा याच्या डोक्यावर तिसरे पाऊल ठेवून त्याला पाताळात ढकलले. बळीराजाची सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती, भगवंताबद्दल असलेले प्रेम, भक्ती पाहून बळीराजाला श्री विष्णूनी अपार वैभव दिले आणि कालियुगाच्या अंत झाल्यावर इंद्रपद देण्याचे आश्वासन दिले म्हणूनच बळी राजा चिरंजीवी झाला.

हनुमान

हनुमानाची श्रद्धा, भक्ती याचा श्रीराम याना सदैव हेवा वाटत असायचा. ज्यावेळी राम ह्या अवताराचे कार्य पूर्ण झाले त्यावेळी त्याची कल्पना त्यांनी हनुमानाला दिली. हनुमानाने श्रीराम याचा सहवास लाभावा म्हणून त्याच्याबरोबर जाण्याचा हट्ट करू लागला पण जलसमाधी घेतल्यानंतर माता सीता, लव कुश यांची काळजी घेण्यासाठी, पृथ्वीवर हनुमानाचे अवतार कार्य अजूनही बाकी असल्याची सबब पुढे करत श्रीरामांनी हनुमानाला चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला. 

विभीषण

असुर कुळात जन्मलेल्याया, रावणाचा सख्खा भाऊ असलेला धर्माने, नैतिकतेने वागणाऱ्या विभीषण याच्या सत्कर्माचे फळ आणि विश्वाच्या अंतापर्यत धर्म, नैतिकता याचे मार्गदर्शन जगाला देण्याचे वरदान श्रीराम यांच्याकडून मिळाल्याने विभीषण चिरंजीवी झालेले आहेत. चिरंजीवी विभीषण यांचा हनुमानाची भिमाशी भेट उल्लेख महाभारत काळात झाला होता त्याचप्रकारे पांडवांचा राजसुय यज्ञाच्या वेळी सहदेव आणि नकुल याची विभीषण याच्या भेटीचा उल्लेख मिळतो

अश्वत्थामा

रागाच्या, बदला घेण्याच्या विचाराने ब्रह्मस्त्र सारखे भयानक शस्त्र चालवून लाखो पांडव सेनेचा बळी घेण्यासाठी चालवले पण श्रीकृष्णाच्या कानउघडणीनंतर त्याची दिशा बदलून पांडवांचा वंशाचा सर्वनाश करण्यासाठी गर्भाच्या आत असलेल्या न जन्मलेल्याया अर्भकाला मारून टाकल्यामुळे चिडून श्रीकृष्णाने अश्वत्थामाच्या कपाळावरील माणिक तोडून टाकला आणि विश्वाच्या अंतापर्यत तुझी कपाळावरील जखमेतून घाण वाहत राहील, तुला कोणीही जवळ घेणार नाही, सगळे तुला झिडकरात राहतील असा शाप मिळाल्याने शिक्षा म्हणून का होईना अश्वत्थामा चिरंजीवी झाला

कृपाचार्य

कृपाचार्य याचा उल्लेख सप्तऋषीपैकी एक असा मिळतो शिवाय ते कौरव आणि पांडव याचे गुरू होते. ते सदैव निःपक्षपाती स्वभावाने वागायचे, कौरव पांडव युद्धाची सुरुवात होण्याआधी सामोपचाराने निर्णय घेण्याचा, दोन्ही गटात तह करण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. महाभारतात पांडवांच्या विजयानंतर ते पांडवासोबत गेल्याचा शिवाय पांडवानंतर त्याचा वंशाच्या राजा परीक्षित याला शस्त्र, शास्र याचे शिक्षण दिल्याचा देखील दाखला पुराणात मिळतो

महर्षी वेद व्यास

महर्षी व्यास द्वापर युगांपासून आपला आयुष्यकाळ चालू झाला त्यानी भविष्यात धर्माचा होणारा ह्रास ओळखला होता ज्यामुळे मनुष्याची बुद्धी आणि आयुष्य कमी होईल असा तर्क बांधला होता. मानवाला योग्य धर्माची साथ लाभण्यासाठी त्यांनी चार वेद, अठरा पुराणे, महाभारत सारखा सर्वात मोठा ग्रंथ लिहला. 

मार्कण्डेय ऋषि

मार्कन्डेय ऋषि खरतर अल्पायुषी होते पण त्यांनी कठोर साधना करून भगवान शंकराला प्रसन्न केले. मृत्यूला हरवण्यासाठी महामृत्युंजय मंत्राची निर्मिती केली याचमुळे शंकर भगवानानी त्यांना चिरंजीवी होण्याचा आशीर्वाद दिला होता.









रविवार, ४ डिसेंबर, २०२२

अंतरात्मा

अंतरात्मा..........
     साधारणतः संध्याकाळ झाली की गावाबाहेरील त्या वस्तीत पुरुषाची वर्दळ वाढायची. ती वस्ती शरीर विकणाऱ्या काही स्त्रियांची होती. त्याची वेळ वाईट म्हणून त्या ह्या मार्गाला लागल्या असतील पण एकदा का त्या नरकात पडले की तेच त्याचे आयुष्य बनते. काही स्वतःहून तर काही इच्छेविरुद्ध शरीर विकण्याचे हे काम करत असत. ह्या वस्तीत आयशा नावाची एक सुंदर स्त्री होती जिच्या सुंदरतेवर भाळलेले अनेक जण देहभान विसरून त्या गल्लीत फेरफटका मारायचे. काही पैश्याच्या मोबदल्यात तिच्या शरीराचा मनसोक्त उपभोग घ्यायचे, लचके तोडायचे. एकाची शरीराची भूक संपते ना संपते तिथं दुसरा ग्राहक रांगेत असायचा आणि शरीराचा उपभोगण्याचा हा कार्यक्रम न थांबता अव्याहतपणे चालूच रहायचा.....

     वस्तीच्या हाकेच्या अंतरावर एक जुनी मशीद होती आणि मशिदीची देखभाल करण्यासाठी तिथं एक मुल्ला, अब्दुल दिवसरात्र काबाडकष्ट करायचा. मशिदीमधली साफसफाई, नीटनेटकेपण आणि दिवसातून पाच वेळा अजाण देणारा अब्दुल दिवसरात्र अल्लाच्या नामस्मरणात काढायचा. त्याचा दिवसाची सुरुवात उजाडण्यापूर्वी तर शेवट रात्री उशिरा होत असायचा.

दोन भिन्न व्यक्ती, भिन्न कामाचे स्वरूप एकाला समाजात उच्च स्थान होते तर दुसऱ्याचे समाजात स्थानच नव्हते. असे असले तरी देवाने बनवलेल्या ह्या सृष्टीवर दोघेही देवाने त्याच्यासाठी लिहलेल्या पटकथेत आपआपली पात्र आयशा आणि अब्दुल निभावत होते.

     दिवसांमागून दिवस सरत होते. दिवस उजाडण्यापूर्वी अब्दुल ईश्वरी सेवेत रुजू व्हायचा तर दिवस मावळल्यावर आयशा कामाला रुजू व्हायची. अश्याच एका सकाळी अचानक धरणी थरथरू लागते झोपलेल्याना जागे होण्याआधी धरणीकंप होतो. झाडे, इमारती जोरजोरात थरथरू लागतात. काळ कोणाला काही समजण्याच्या आधीच घाव घालतो आणि पत्त्याच इमारत कोसाळावी तसे गावातील मातीची घरे, दुमजली इमारती जमीनदोस्त होतात ह्याला अपवाद ना अब्दूलची मशीद होती ना आयशाची कोठी. काही क्षणात होत्याचे नव्हते झाले होते, सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती........

     शांतता सहन करण्याच्या पलीकडे गेली होती, जड झालेले डोळे मिचकवत, डोळे चोळत अब्दुल उभा राहण्यासाठी प्रयत्न करू लागला. डोळ्यासमोर लख्ख पांढरा प्रकाश यामुळे अब्दुलचे डोळे पूर्ण उघडेही होत नव्हते. डोळे छोटे मोठे करून अब्दुल सभोवताली पाहू लागला. अब्दूलच्या डोळयांसमोर स्वच्छ पांढऱ्या कपड्यात असलेले लहान मोठ्या लोकांची गर्दी होती. काही काळ्या कपड्यात असणारी लोक सर्वांना रांगेत उभे करत, गर्दीला आवरण्याचे काम करत होती. गर्दीतले बहुतेक सगळेच त्या गावातील लोक होते, काहींचे डोके फुटलेले होते तर कोणाचे हात पाय तुटले होते. जखमी लोकांची तर गणनाच होऊ शकत नव्हती. काही कण्हत होते,काही रडत होते तर कोणी शून्यात पाहत उभे होते. ज्यांना वेदना सहन होत नव्हत्या ते मोठंमोठ्याने ओरडत होते आणि ह्याच लोकांचा गोंधळ कमी करण्यासाठी काळे कपडे घातलेले, रांगडे, मोठ्या मोठ्या मिश्या असलेले, हातात चाबूक असलेले, अंगा खांद्याने धिप्पाड लोक आकाश पातळ एक करत होते. अचानक एक हात अब्दूलच्या खांद्यांवर पडला, मागे वळून पाहताच तोच एक धिप्पाड माणूस रांगेत उभे राहण्याची खून अब्दूलला करू लागला. 
तिथं दोन रांगा होत्या त्यातल्या एका रांगेत अब्दूलला त्या माणसाने उभे केले. हळूहळू दोन्ही रांगा मुंगीच्या गतीने पुढे सरकू लागल्या. अब्दूलला नक्की काय होतंय हे समजतच नव्हतं, कोणाला काही विचारावं तर कोणी बोलत नव्हतं, बोलायला जावं तर जोरात चाबकाचे आसूड पाठीवर ती धिप्पाड माणस मारायला मागे पुढे पाहत नव्हती. शेवटी पर्यायच नसल्याने अब्दुल रांगेत हळूहळू पुढे सरकत राहिला. 

     आजूबाजूला ओळखीचे कोणी दिसत का याचा अंदाज घेऊ लागला त्यातच त्याला दुसऱ्या रांगेत गावातील पुरुष जिच्या सुंदरतेवर भाळले होते ती ललना आयशा दिसली. अब्दुल तिची सुंदरता पाहतच राहिला. आयशा संथ पाण्यासारखी शांत होती, चेहऱ्यावर जखमा असल्या तरी कोणतीही संवेदना चेहऱ्यावर न दाखवत, दुःखी अंतकरणाने रांगेत मार्गस्थ होत होती. आयशाला पाहण्यात अब्दुल देहभान विसरला, वेळचे त्याला भान राहिले नाही अश्यात त्याची ही तंद्री एका कणखर आवाजाने तुटली.

गर्दीला नियंत्रित करणाऱ्या लोकांचा सरदार अब्दूलला हाक मारत असतो. सरदारांच्या हातात एक पुस्तक असते त्या पुस्तकातील नोंदी पाहत त्याने अब्दूलच्या पायापासून चेहऱ्याचे निरीक्षण करत, तुच्छतेने पाहत मोठ्याने ओरडला
जहन्नुम "
अतिशय निष्ठुरतेने दोघांनी अब्दूलला पकडले आणि खेचू लागले. अब्दूलला काही समजत नव्हते पण जखमी असूनही तो त्या धिप्पाड माणसाला प्रतिकार करू लागला, हाथ पाय झाडू लागला ओरडू लागला. सरदार पुढच्या व्यक्तीला पाहत पुस्तकात पाहू लागला आणि मोठ्याने ओरडला 
" जन्नत" 
ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून आयशा होती.

जहन्नुम, जन्नत याच्या रांगा, गर्दीला नियंत्रित करणारे लोक यावरून अब्दूल समजून चुकला की भूकंपाच्या आघातात आपण जिवंत राहिलेलो नाही तसेच रांगेत असलेले हे सगळे देखील मरण पावले आहे. आयुष्यभर केलेल्या कर्माचे फळ म्हणून जहन्नुम, जन्नत ची विभागणी होत होती. स्वतः अब्दुल जहन्नुम तर शरीरविक्री करणारी आयशा जन्नतमध्ये हे पाहून त्याची तळपायाची आग मस्तकात जात होती.
जहन्नुमचा दरवाजा जवळ येत होता, अब्दुल  विनवण्या करत होता, ओरडत जाब विचारत होता, एकच गोंधळ घालत होता हे पाहून सरदाराने त्याला त्याला ओढणाऱ्या सेवकांना थांबवले आणि परत बोलवले. 

जहन्नुम म्हणजे आगीत होरपळण्याची शिक्षा तर जन्नत म्हणजे 72 हूर आणि खाण्यापिण्याची आलबेल, सुखच सुख आणि तेच सुख हातातून निसटताना पाहून रडवेला चेहरा करत सरदाराला तो कोण, त्याने आयुष्य कसे व्यतीत केले हे अब्दुल सांगू लागला. सरदाराला पुस्तकात परत बघण्यास सांगत होता, काहीतरी चूक होते आहे,माझे नाव जन्नत मध्येच असेल असं ओरडत होता. ह्या सगळ्या झटापटीत त्याचे लक्ष पुन्हा आयशाकडे गेले. अंगात असलेली सगळी शक्ती गोळा करत त्याने आयशा एक वेश्या आहे, तिचा संबंध दिवस रात्र कामक्रीडेत जात होता, ही व्यभिचारी हिला कसा जन्नत आणि माझ्यासारख्या अल्लाची भक्ती जीवापाड करणाऱ्याला जहन्नुम? 

सरदाराने गोंधळ थांबवून अनिच्छेने अब्दूलची मागणीनुसार पुन्हा पुस्तकात डोकावले. अब्दुल आणि आयशा दोघांचे आयुष्य डोळ्याखालून काढले आणि आपण केलेला निर्णय योग्यच आहे असा निर्णय दिला. अब्दुल ते मान्य करत नव्हता, त्याच्या डोळ्यासमोर केवळ नरकातील आग दिसत होती आणि जन्नतमधली सुख दूर जाताना दिसत होती. जहन्नुम, जन्नतच्या दरवाज्याची रखवली करणाऱ्या त्या सरदाराने कठोर वाणीने अब्दूलला सांगितले की निर्णय योग्यच आहे. जरी तू तुझे सर्व आयुष्य चांगल्या कामात घालवले पण तुझ्या मनात मात्र कायम विषयवासना असायची, तू शरीराने मशिदीत असायचा पण मनाने मात्र कुंटखाण्यात असायचा. तुझे मन सतत शरीरसुखाची अभिलाषा बाळगत होते पण समाजात असलेल्या तुझ्या प्रतिमेमुळे तू प्रत्यकक्षात मात्र सदविवेकी माणसाचा बुरखा घालून जीवन जगत होता ह्याउलट आयशा तिचे जीवन कुंटखाण्यात व्यतीत करत होती मात्र तिच्या मनाशी सदैव कधी त्या नरकातून बाहेर पडेल, ईश्वराची सेवा करेल असे भाव होते. क्षणाक्षणाला ती ईश्वराची आठवण काढत असायची आणि त्याचेच हे फळ की ती आज जन्नत तर तू जहन्नुम मध्ये जात आहे. तुझे आणि तिचे बाह्यरूप आणि अंतरात्मा यात जमीन अस्मानचा फरक. बाह्यरुप कितीही सुंदर का असेना ज्याचे मन, अंतरात्मा कुरूप त्याला दुसरे काय मिळणार..................

समाप्त.





शनिवार, ३ डिसेंबर, २०२२

एकलव्य (सनातन धर्मातील गोष्टी)

माझ्या सर्व हिंदू वाचकांना नमस्कार,

आज खूप दिवसांनी सनातन धर्मातील गोष्ट तुमच्यासमोर मांडतोय याचा मला आनंदच आहे पण ही गोष्ट फक्त तुमच्यापर्यत मर्यादित ठेवू नका ती जितकी जास्त शेयर करता येईल, जितक्या हिंदू लोकांपर्यत पोहचवता येईल तितक्या लोकांपर्यत पोहचवण्यासाठी मदत करा.

आज तुमच्यापुढे एक अशी गोष्ट सादर करतोय जी तुम्ही सगळ्यांनी लहानपणी ऐकली असेल त्यातून गुरुची महती, शिष्याचे कर्तव्य, स्वार्थी गुरू, गुरू दक्षिणा देताना केलेले साहस किंवा आजकाल हिंदू धर्माला बदनाम करणाऱ्या लोकांनी जी खरी गोष्ट लपवून ठेवतात ती गोष्ट तुमच्यापुढे मांडत आहे. 

आजची गोष्ट आहे एकलव्याची आणि त्याने दिलेल्या गुरुदक्षिणेची, गोष्ट आहे द्रोणाचार्यांची, एकलव्य आणि द्रोण पुत्र अश्वत्थामाची. 
एका रम्य संध्याकाळी अश्वत्थामा आणि त्याचे वडील कौरव, पांडव सारख्या क्षत्रिय मुलाना शिकवणारे ब्राह्मण गुरू द्रोण निवांत बसलेले असतात. त्याच्या निवांत गप्पा चालू असतात अश्यावेळी अश्वत्थामा गुरू द्रोणाना एक कठीण प्रश्न विचारण्याची परवानगी मागतो. गुरू द्रोण त्याला परवानगी देतात. अश्वत्थामाला परवानगी मिळूनही तो प्रश्न विचारायला कचरत असतो आणि त्याची ही अडचण गुरु द्रोण चटकन त्याची मनस्थिती ओळखतात, मुलाला विश्वासात घेऊन तुला हवा तो प्रश्न मला विचार अस अश्वत्थामाला सांगितल्यावर थोडीशी हिंमत करून अश्वत्थामा म्हणतो

" लहानपणी ज्यावेळी एकलव्य सारखा अप्रतिम शिष्य भेटला असताना तुम्ही गुरुदक्षिणा म्हणून त्याचा अंगठा मागितला त्याचे कारण तो ब्राह्मण नाही म्हणून का? की तो एक आदिवासी होता म्हणून की तो अर्जुनापेक्षा वरचढ ठरत होता म्हणून? "

अश्वत्थामाच्या ह्या प्रश्नाने गुरू द्रोणाच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले आणि भूतकाळाचे स्मरण त्यांना होऊ लागले.

एकदा द्रोणाचार्य, पांडव, तसेच कौरव धनुर्विद्येचा सराव करण्यासाठी अरण्यात गेले. 

त्यांच्या समवेत एक कुत्राही होता, जो फिरत फिरत जरा पुढे निघून गेला. थोड्या वेळाने कुत्रा परतला त्यावेळी त्याच्या तोंडात लागू नये आणि त्याचे केवळ भुंकणे बंद व्हावे, अशा रितीने सात बाण त्याच्या तोंडात मारले होते. ते पाहून स्वतः द्रोणाचार्य आश्चर्यचकित झाले होते. इतका अचूक धनुर्धर नक्की कोण, त्याने असे का बाण मारून मुक्या जीवाला त्रास दिला असे कैक प्रश्न त्याच्या डोक्यात येऊ लागले आणि त्या धनुर्धराला शोधण्यासाठी ते जंगलात जाऊ लागले.

थोडं अंतर गेल्यावर एक भिल्ल, आदिवासी जंगलात राहणारा मुलगा एका मातीच्या पुतळ्यासमोर वेगवेगळ्या शस्त्रचा अभ्यास करताना दिसला. अधिकारवाणीने गुरू द्रोण यांनी त्याला हाक मारून कुत्र्याच्या तोंडात तूच बाण मारले का आणि कशासाठी असा प्रश्न केला. तो मुलगा म्हणजे दुसरा तिसरा कोणी नसून एकलव्य होता त्याने गुरू द्रोण याना पाहील्यावर त्याला खूप आनंद झाला आणि शस्त्रांचा अभ्यास करताना त्रास होत असल्याने त्याने ते बाण मारले अस सांगितले. गुरू द्रोण यांना खर तर हे खूप विशेष वाटले आणि त्याची परीक्षा घेण्यासाठी एक अवघड लक्ष साधायला लावले जे एकळव्याने क्षणाचा विलंब न लावता साध्य केले. गुरू द्रोण त्याच्या अदभूत कलेवर आनंदी झाले आणि आनंदाच्या भरात त्यांनी त्याच्या गुरुचे नाव विचारले. एकलव्य गुरू द्रोण याच्यापुढे नतमस्तक होऊन आपणच माझे गुरू आहे ज्यावेळी तुम्ही राजपुत्रांना शिकवत असता ते मी लपून पाहतो आणि तुमच्या या मातीच्या पुतळ्यासमोर येऊन मी सराव करतो. गुरू द्रोण यांना खरतर ह्या गोष्टीचे खूपच अप्रूप वाटले पण पुढच्याच क्षणाला अर्जुनाला सर्वोत्कृष्ट धनुर्धारी बनवण्याचे वचन आठवले. पांडू पुत्र अर्जुन एकलव्य आणि द्रोण यांच्यातील संवाद, गुरूंचा चेहरा पाहून त्याच्या मनातील भाव समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. गुरू द्रोणानी अर्जुनाच्याया मनातील अडचण समजली होती. एकलव्यला जवळ घेत त्यांनी त्याला कौतुकाने शाबासकी दिली, कौशल्याची आणि समर्पणाची खूप प्रशंसा केली ज्यामुळे एकलव्याला आनंद होत होता हा आनंद कैक घटकाचा असेल असं कोणालाही वाटले नसेल. गुरू द्रोण यांनी एकलव्यला त्याच्याकडून शिकलेल्या कौशल्याची परतफेड गुरुदक्षिणा म्हणून उजव्या हाताचा अंगठा मागीतला 


क्षणाचा विलंब न लावता डाव्या हातात सुरा घेऊन उजव्या हाताचा अंगठा जो एका धनुर्धारीसाठी सर्वस्व असतो तो कापून गुरू द्रोण याच्या पायाशी रक्ताचा सडा घातला. झालेल्या ह्या प्रसंगात गुरू द्रोण आनंदी नव्हते पण आनंदी असणारे दोन व्यक्ती तिथे उपस्थित होते एक आज्ञाधारक शिष्य एकलव्य तर दुसरा अर्जुन. दोघांच्या आनंदाचे कारण वेगळे होते. गुरुदक्षिणा दिल्याचा आनंद एकलव्यला होत होता तर सर्वोत्तम धनुर्धारी असणारा एकलव्य आपोआप अडसर दूर झाल्याने अर्जुन खुश होता. 

हा सगळा प्रसंग जशाच्या तस गुरू द्रोण याच्या डोळयांसमोर चालत असताना अश्वत्थामाने त्यांना त्यांच्या तंद्रीतून जागे करत परत अंगठा मागण्याचे कारण विचारू लागला..................

अशी ही एका शिष्याची अद्भुत गोष्ट, कठोर, स्वार्थी शिक्षकाची गुरुची ही गोष्ट तुम्ही ऐकली असेलच. खरच का मागितला असेल द्रोणानी एकलव्याचा अंगठा? अर्जुनाला सर्वोत्तम धनुर्धारी बनवण्यासाठी?  त्या काळात देखील जात पात होती का? शिक्षक, गुरू म्हणून द्रोण स्वार्थी झाले का असे कैक प्रश्न तुमच्या मनात लहानपणी आले नसतील पण आजच्या सोशल मीडियाच्या काळात काही लोक राजकरण खेळण्यासाठी, ब्राह्मण दलित यात वाद निर्माण होण्यासाठी ह्या गोष्टीचा आसरा घेताना आपण पाहिले असेल. 

खरतर एकलव्य भिल्ल असला आदिवासी असला तरी तो एक क्षत्रिय होता त्याचे वडील कौरव पांडू याचे शत्रू राष्ट्र मगध देशाच्या राजा जरासंध याच्या सैन्यात सरदार होते त्याचे नाव राजा हिरण्य धनु नामक निषाद त्यामुळे दलित असल्याने ब्राह्मण द्रोणानी त्याच्यावर अन्याय केला हा दावा खोटा ठरतो. मग तरीही धनुष्य चालवण्यात सर्वोत्कृष्ट शिष्याचा अंगठा गुरुदक्षिणेत का घेतला याचे उत्तर म्हणजे एकलव्य जे काही शिक्षण घेत होता ते चोरून, लपून छपून घेत होता आणि ह्या चोरीची शिक्षा म्हणूनच गुरू द्रोण यांनी त्याचा अंगठा गुरुदक्षिणेत मागितला होता त्यामुळे एका खड्यात त्यांनी दोन पक्षी मारले होते. 

एकलव्य मोठा होऊन अंगठ्याशिवाय उत्तम धनुर्धारी झाला इतकेच नाही तर महाभारताच्या युद्धात तो कौरवांच्या बाजूने लढला देखील होता. विशेष बाब म्हणजे अंगठा नसूनही धनुर्धारी एकलव्य अंगठ्याशेजारील बोट म्हणजेच तर्जनी आणी मधले बोट याच्या मदतीने लक्षवेध करण्याची जी कला उत्पन्न झाली तिचाच उपयोग आजच्या वर्तमानकाळात धनुष्यबाण चालवणारे करतात, ना की अर्जुनासारखे अंगठ्याच्या मदतीने.


सनातन धर्माबद्दल गैरसमज, चुकीच्या गोष्टी पसरवून हिंदू धर्माला बदनाम करणारे खूप आहेत त्यांना काउंटर करण्यासाठी गोष्टीमागचे खरी माहिती आपल्याला हवीच म्हणून तुमच्यासमोर ही गोष्ट मांडली आहे. आवडले तर नक्की शेयर करा.


समाप्त.....

विश्वचषक आणि भारतीय संघ निवड

उद्या म्हणजे ४ डिसेंबर पासून भारताची बांगलादेश विरुद्ध एकदिवसीय श्रुखला चालू होईल. बांगलादेश हा त्याच्या घरच्या मैदानावर धोकादायक संघ असला तरी भारतीय संघापेक्षा कधीही कमकुवतच त्यामुळे भारतीय संघाने त्याच्याविरुद्ध तगडा संघ निवडणे हास्यास्पद होईल कारण प्रतिष्ठित खेळाडूंना संधी देऊन त्याची जागा संघात मजबूत करून काही महिन्यांनी येणारा विश्वचषक तुम्ही जिंकू शकणार आहे का?

भारतीय संघ:
रोहित शर्मा (कप्तान), केएल राहुल (उपकप्तान), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), शाहबाज़ अहमद, अक्षर पटेल , वाशिंगटन सुंदर, शार्दुल ठाकुर, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन और उमरान मलिक

बांगलादेश विरुद्ध संघात असणारे राहुल त्रिपाठी, रजत पाटीदार आणि कुलदीप सेन यांना तिन्ही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली पाहिजे पण असे होताना आपल्याला दिसणार नाही. याचाच अर्थ नवखे खेळाडू याना केवळ राखीव खेळाडू म्हणून निवडणे त्यांना मोठ्या खेळाडूबरोबर ड्रेसिंग रूम शेयर करण्याचा, सराव करण्यासाठी आणि सामन्यात पाणी पोहचवण्याचे काम काढून घेणे बंद केले पाहिजे.

कर्णधार म्हणून रोहितने निवडलेला चुकीचा संघ यामुळे टी ट्वेन्टी विश्वचषक भारताच्या हातातुन निघून गेला असताना अनुभवी आणि त्याच त्या खेळाडूंना वेळोवेळी, सतत संधी देऊन नवख्या खेळाडूंवर अन्याय होतो. के एल राहुल उपकर्णधार असल्याने तो प्रत्येक सामना खेळणार त्यात फक्त एकदिवसीय सामने खेळणारा शिखर धवन संघात असताना सलामीला रोहित बरोबर नक्की कोण खेळणार हे पाहणे महत्वाचे. धवन धावा करत असला तरी त्याच्या खेळात जुना आत्मविश्वास कमी वाटतो अश्यावेळी धवन पुढच्या विश्वचषकात असेल की नाही यात संभ्रम आहे शिवाय केएल प्रत्येकवेळी मिळणारी संधीचे सोने करत आपली जागा पक्की करून महत्वाच्या सामन्यात, स्पर्धेत माती खातो हे विसरता येत नाही. सलामीसाठी शुभमन, पृथ्वी शॉ, ऋतुराज गायकवाड सारखे खेळाडू आपल्या संधीची वाट पाहत असताना धवन आणि केएल याच्यावर विश्वास ठेवत सतत त्यांना संधी देने म्हणजे इतरांवर अन्यायच. रोहित, केएल आणि धवन संघात असताना त्यातील सलामीला खेळणार नाही हे निश्चित आहे म्हणजेच केएल उपकर्णधार असल्याने संघात राहून मिडल ऑर्डरमध्ये खेळत नवख्या रजत आणि राहुल त्रिपाठी याच्या खेळण्याची संधी हुकवणार हे स्पष्ट आहे. डावखुरा पर्याय म्हणून धवनचा पर्याय इशान किशन देखील एखादा सामना खेळताना आपल्याला दिसेल असा माझा अंदाज आहे.

तिसरा क्रमांकावर खेळणारा खेळाडू हा जवळजवळ फिक्स आहे त्याला कोणीही किमान पुढच्या विश्वचषकापर्यत हात लावूच शकत नाही असा हा खेळाडू आहे, विराट कोहली.

चौथ्या क्रमांकावर सध्याच्या संघात जरी श्रेयस खेळणार असला तरी त्या जागेसाठी सुर्यकुमार यादवची दावेदारी तगडी आहे त्यामुळे श्रेयसला तिन्ही सामन्यात असामान्य खेळी करून आपली दावेदारी सिद्ध करावी लागणार आहे. पाचव्या आणि सहाव्या जागी फॉर्मात नसलेला ऋषभ पंत सध्या खेळेल किंवा केएल खेळेल म्हणजे रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी केवळ प्रवासी खेळाडू म्हणूनच खेळले जाणार हे नक्की होते. महत्वाचे म्हणजे हे सहा खेळाडू किंवा त्याचे पर्याय असणारे शुभमन, पृथ्वी, ऋतुराज, सूर्या ह्यात केवळ श्रेयस हा एकमेव असा खेळाडू आहे जो कामचलावू गोलंदाजी करू शकतो असाच दुसरा खेळाडू म्हणजे दीपक हुड्डा. ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाचा दिवस वाईट ठरतो अश्यावेळी त्याची षटके टाकणारा कामचलावू गोलंदाज भारतीय संघात नाही हे मोठे दुर्दैव. यापूर्वीच्या संघात सचिन, सेहवाग, युवराज, रैना सारखे हरहुन्नरी  एकापेक्षा एक वरचढ खेळाडूंची फळी सध्या भारतीय संघात दिसत नाही. यष्टीरक्षक धरून सहा फलंदाज, एक ऑलराउंडर आणि चार गोलंदाज याच्या जीवावर भारतीय संघ सामने जिंकू शकेल पण विश्वचषक जिंकेल अशी परिस्थिती वाटत नाही.

बांगलादेश दौऱ्यात असलेल्या गोलंदाजांची फळी पाहता शाहबाज आणि अक्षर जवळपास सारख्याच शैलीचे गोलंदाज आहेत ज्यात अक्षरला झुकते माप मिळण्याची शक्यता अधिक आहे. वॉशिंग्टन सुंदर याने ऑस्ट्रेलियामध्ये केलेली कमाल, सध्या न्यूझीलॅन्ड मध्ये केलेली कामगिरी पाहता अक्षर आणि शाहबाज पैकी एकाबरोबर संघात गोलंदाजी करताना आपल्याला दिसेल. ह्या तिन्ही खेळाडूंना खरी स्पर्धा असेल ती युझुवेंद्र चहल आणि रवींद्र जडेजा यांची. ऑलराउंडर म्हणून संघात वॉशिंग्टन, जडेजा, अक्षर, हार्दिक , शार्दूल, दीपक चहर, दीपक हुड्डा तसेच  वेंकटेश अय्यर अशी मोठी स्पर्धा असली तरी हार्दिक पंड्या त्यात विजयी होणार हे सर्वश्रुत आहे अश्या वेळी बांगलादेश दौऱ्यात शार्दूल तसच दीपक चहर याच्यावर कामगिरी करण्याचे अधिक दडपण असणार यात शंका नाही. मोहमद सिराज तिन्ही सामने खेळताना दिसेल तर त्याला उमरान मलिक जोडीदार असण्याची दाट शक्यता वाटते. वेगाच्या जोरावर बांगलादेश च्या फलंदाजाना उमरान नाचवेल अस वाटत असले तरी तिथल्या धावपट्या त्याला किती साथ देतील हे मोठं प्रश्नचिन्ह आहे. वेगाने चेंडू टाकणे हा फायदा असला तरी तोटा देखील असतो हे सुजाण क्रिकेट रसिक जाणतोच त्यामुळे उमरान मलिक ही दुधारी तलवार आहे कधी ती शत्रूची तर कधी भारतीय संघाची विकेट घेईल अस माझं मत आहे अश्या वेळी संघात असलेला कुलदीप सेन ज्याने मागील आयपीएल आणि स्थानिक सामन्यात चांगले प्रदर्शन करूनही राखीव खेळाडूत बसण्याचा बहुमान त्याला मिळेल अशी शक्यता आहे.

एकंदरीत बांगलादेश दौऱ्यात तीन सामन्यासाठी भारतीय थिंक टॅंक आणि कर्णधार कोणता संघ निवडणार हे निश्चित आहे आणि नवखे खेळाडू बेंच गरम करत राहून पुढच्या स्पर्धेच्या वेळी ही मंडळी संघात नसतील हे मी अनुभवाच्या जोरावर म्हणू शकतो. भारतीय संघ कोणता संघ उतरवेल याचा माझा अंदाज खालील प्रमाणे

रोहित
धवन
विराट
श्रेयस
के एल राहुल
पंत/ इशान
शार्दूल/ दीपक
शाहबाज/ अक्षर
वॉशिंग्टन सुंदर
सिराज
उमरान

बेंचवर रजत पाटीदार, राहुल त्रिपाठी आणि कुलदीप सेन

कोण खेळणार कोण नाही हे ओळखणे इतके सोप्प आहे. पंत कदाचित तिन्ही सामने खेळेल, धवन ला बसवून इशान खेळताना दिसेल पण के एल आणि श्रेयस याच्या बदल्यात रजत आणि त्रिपाठी याना संघ खेळवेल अस वाटत नाही.

जर भारताला आपल्या घरात होणारा विश्वचषक जिंकायचा असेल तर त्याच त्या खेळाडूंना अधिकाधिक संधी देऊन भरवश्याच्या म्हशीला टोनगा ह्या म्हणीप्रमाणे भारतीय संघ स्वतःच्या पायावर स्वतःच घाव करत आहे. विश्वचषक जिंकण्यासाठी काहीतरी नवे करावं लागणार आहे, अनपेक्षित बदल, कठोर निर्णय घ्यावे लागणार आहे पण ते भारतीय संघ घेणार का? हे बांगलादेश विरुद्धची ही श्रुखला आणि येत्या काळातील स्पर्धा निश्चित करतील. तस वैयक्तिक दृष्ट्या भारतीय संघात कोणते मोठे बदल पाहता येतील अशी शक्यता मला वाटत नसली तरी लेखाच्या माध्यमातून मी वेळोवेळी माझे मत तुमच्यापुढे आणत राहील.

बांगलादेश दौऱ्यात माझा अपेक्षित संघात केएल, श्रेयस, अक्षर, सिराज पंत याना कमीत कमी संधी देवुन नवीन खेळाडूंना संधी दिली पाहिजे असं माझं मत असलं तरी तस भारतीय संघ आणि थिंक टॅन्क करेल असे वाटत नाही.

पुढच्या वर्षी होणारा विश्वचषकात कोणत्या कोणत्या खेळाडूंची निवड होईल, खेळणारा संघ काय असेल हे जवळपास 90% ठरलेले आहे एखाद दुसरी जागा सोडली तर नवीन खेळाडूंना संधी मिळेल याबाबत दूरदुरपर्यत शक्यता नाही. 2023 च्या भारतीय संघात हेच खेळाडू खेळताना दिसतील ह्याची मला गॅरंटी आहे त्यामुळे भारतीय संघ परत विश्वचषक जिंकेल हे स्वप्न पूर्ण होणे अवघडच आहे. रोहित, विराट, सूर्या, हार्दिक, रवींद्र जडेजा, बुमराह, चहल, के एल, पंत हीच नाव पुढच्या वर्षीच्या विश्वचषकात दिसणार असल्याने त्याआधी होणाऱ्या द्विपक्षीय स्पर्धेत निवडले जाणारे खेळाडू हे केवळ बेंचवर बसणारे आणि प्रवासी खेळाडू म्हणूनच ओळखले जातील.

ज्याप्रकारे टी ट्वेन्टी विश्वचषक हरल्यानंतर निवड समिती बरखास्त झाली, टी ट्वेंटी संघात वरिष्ठ, नावाजलेल्या खेळाडूंना सुट्टी देण्याची भाषा येत आहे तसेच काही 2023 चा विश्वचषक झाल्यानंतर बहुतांश मोठे खेळाडू निवृत्त होतील, काहींना हुसकावले जाईल त्याखेरीज नवीन खेळाडूंना संधी मिळेल अशी सुतराम शक्यता दिसत नाही

क्रमशः

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...