शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

सनातन भाग ५ : विठ्ठल

नमस्कार सनातनी मित्रानो,

सनातन ह्या मालिकेतील गोष्टी वाचता आहात, शेयर लाईक करत आहात, कौतुकही करत आहे हे पाहून दररोज सनातन हिंदू धर्मातील एक गोष्ट तुमच्यासमोर मांडावी अस सारख वाटत पण दररोज असे होईलच असे नाही कारण एखादी गोष्ट आठवली, वाचली तरी तुमच्यपर्यत पोहचवण्याआधी तिची विस्तृत माहिती काढणे त्या माहितीला लिहून काढणे यात किमान चार ते पाच तास कुठे निघून जातात हे कळत नाही. तरीही कमीत कमी वेळेत नवीन आणि तुम्ही न ऐकलेल्या किंवा ऐकलेल्या पण विस्मृतीत गेलेल्या गोष्टी आणण्याचे मला व्यसन लागले आहे. ह्या व्यसनाची झिंग तुमच्या मनावर, बुद्धीवर,शरीरावर चढावी अशी माझी इच्छा असते. ब्लॉगमधून हिंदू जनजागृती व्हावी, हिंदू सजग व्हावा, संघटित व्हावा यासाठी चाललेल्या ह्या प्रयत्नांना तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे. मी मांडत असलेली माहिती आणि तुमच्या माहितीत विसंगती असेल तर ती मला नक्की सांगत जा ही नम्र विनंती....
 
आजची गोष्ट आहे विठ्ठलाची. विठ्ठल हा नक्की कोण? याच्या जन्माची गोष्ट काय अस तुम्हाला विचारले तर त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल असे नाही. मुळात विठ्ठल हा देवच नाही असं म्हंटल तर तुम्ही मला वेडात काढाल याची अपेक्षा असली तरी मी ते मत तुमच्या पुढे व्यक्त होत आहे. हो विठ्ठल नावाचा कोणताही देव नाही आणि हीच आजची कथा आहे पण त्याआधी विठ्ठलाच्या ह्या नयनरम्य, सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊया

विठ्ठल ह्या शब्दाची फोड केल्यास वीट आणि थल हे शब्द सापडतात. पुंडलिकाने फेकलेली वीट आणि थल म्हणजे जमीन. पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभा राहून त्या थल जमिनीवर विराजमान झालेला विठ्ठल. 
विठ्ठल ह्या शब्दचा दुसरा सुंदर अर्थ म्हणजे
वि - विधाता
ठ्ठ  - नीलकंठ
ल - लक्ष्मीकांत
परमपिता ब्रम्हा विधाता, नीलकंठ भगवान महादेव आणि लक्ष्मीचा पती असलेला लक्ष्मीकांत भगवान विष्णू याचे नाव एकाच नावात आहे तो विठ्ठल.

इतक्या वर्ष तुम्ही ही मूर्ती पहिली आहे पण केवळ ती पहिली तिचे निरीक्षण केले का हो कधी? आज तुम्ही जी माहिती वाचाल ती तुम्हाला नवीन काही माहिती देऊन जाईल यात मला शंका वाटत नाही..

वर अनुउल्लेख केल्याप्रमाणे देवाचे देव परमात्मा ब्रम्हा, विष्णू आणि महेश याचे स्वरूप असलेली ही मूर्तीची माहिती सर्वप्रथम आपण घेऊ. विठ्ठलाच्या डोक्यावर असणारी मुकुटासारखी टोपी आपल्याला शिवलिंगाचा भास करून जाते. चेहरा उभट, गाल फुगीर तर डोळे समचरण म्हणजेच आपल्या दर्शन घेणाऱ्या भक्तांकडे पाहणारी, केंद्रित झालेली आहे.कानात खांद्यापर्यत येणारी मत्स्यकुंडले, गळ्यात हार, दंडावर आणि मनगटावर आभूषणे दिसतात. सनातन भाग ३ मध्ये सांगितल्या प्रमाणे तपस्वी भृगु यांनी बालाजीच्या छातीवर पाय मारल्याने झालेली जखम देखील विठ्ठलाच्या मूर्तीवर उजव्या छातीवर पहायला मिळेल. सनातन हिंदू छोट्या छोट्या डिटेल्स, गोष्टींची एकमेकात असलेली गुंफण इतकी बेमालूमपणे केलेल्या आहेत की त्या गोष्टी नसून वास्तव होत्या म्हणूनच त्याची इतकी छान सांगड सनातन धर्मात पहायला मिळते अशी ही गुंफण इतर कोणत्याही पंथाच्या कथानकात पाहायला मिळत नाही कारण त्या गोष्टी बनावटी आहेत हे समजायला अध्यात्मिक लोकांना क्षणाचा विलंब लागणार नाही.  विठ्ठलाचे दोन्ही हात कमरेवर असून डाव्या हातात शंख तर उपड्या उघड्या असणाऱ्या उजव्या हातात कमळाचे फुलांचा देठ पहायला मिळतो. पोटावर नाभी, कमरेवर सुंदर वस्त्राचे धोतर तर दोन्ही पायाच्या मध्ये घुंगराची काठी स्पष्ट दिसते अशी ही काळ्या रंगाच्या ओबडधोबड दगडात असलेली मूर्ती एका विटेवर गेली अठ्ठावीस युगे उभी असणारी प्रतिमा आकर्षक आणि सुंदर दिसते.

मला माहीत आहे ही श्रीविठ्ठलाच्या मूर्तीचे हे वर्णन वाचल्यानंतर प्रत्येक डिटेल्स तुम्ही आज पहिल्यांदाच निरीक्षण करण्यासाठी फोटो न्याहाळत असणार असो......

विठ्ठल जन्माची कथा
द्वापार युगात मुचकंद नावाच्या पराक्रमी राजाने देव दानव याच्या युद्धात देवांना मदत करत असुरांना हरवले. देवाचा राजा इंद्र या गोष्टींमुळे खूप प्रसन्न झाला आणि मुचकंद राजाला हवा तो वर मागण्यास सांगितले. युद्धात केलेल्या पराक्रमामुळे राजा खूप थकला होता म्हणून त्याने इंद्राकडे एकांतात गाढ झोप हवी आहे असा वर मागितला पण एकदा झोपल्यावर माझा निद्रानाश जो करेल त्याच्याकडे केवळ पाहिल्याने मृत्यूदंड देण्याचा अधिकार मागितला. इंद्र आणि इतर देवतांनी त्याची ही मागणी मान्य करत तथास्तु म्हंटले. थकलेला राजा मुचकंद एका गुहेत जाऊन झोपून घेतले. 
कृष्ण अवतारात माजलेला मदमस्त आणि बदलाच्या आगीत होरपोळणाऱ्या जरासंध याने कालयौवन नावाचा राक्षसाला कृष्णाला मारून टाकण्याची आज्ञा केली. कालयौवन राक्षसाला कोणत्याही अस्त्र, शस्त्र याने मारता येणार नाही असे वरदान होते शिवाय परमात्मा विष्णू याना मायेचा सहारा घेत अनेक लीला करायची सवय असल्याने कालयौवन याच्याशी लढाई न करता तिथून पळून जाणे बरोबर वाटले. युद्धातून पळून जाणाऱ्या श्रीकृष्णाला म्हणूनच रनछोडदास ही उपाधी मिळाली होती. श्रीकृष्णाने युद्धात पाठ दाखवत थेट त्या गुहेत गेले जिथे पराक्रमी राजा मुचकंद आराम करत होता. मुचकुंद राजाच्या अंगावर स्वतःचे उपरणे टाकून श्रीकृष्ण अंधारात लपून बसले. श्रीकृष्णाला ठार करण्यासाठी कालयौवन राक्षस देखील गुहेत घुसला. श्रीकृष्णाच्या उपरण्यावरून कृष्ण तिथे झोपला आहे असं समजत त्याने मुचकंद राजाच्या छातीत जोरात पाय मारला. जोरात झालेला हा प्रहारामुळे मुचकंद राजाची निद्रानाश झाला आणि मिळालेल्या वरदानानुसार केवळ कालयौवन यांच्याकडे पाहत जागेवर भस्मसात केले. श्रीकृष्णनी योजलेली ही क्लुप्ती पूर्ण होताच ते मुचकंद राजाच्या समोर उभे ठाकले आणि सर्व कथा त्यांना सांगितली. स्वतः श्रीविष्णू याचा अवतार श्रीकृष्ण समोर उभे आहेत हे पाहताच मुचकंद राजाने कृष्णाला माझ्या समोर असाच उभा रहा असे आवाहन केले. आपल्या प्रत्येक अवतारात लीला करणाऱ्या श्रीविष्णूने मुचकंद राजाला त्याची ही इच्छा त्याच्या पुढच्या जन्मी पूर्ण होईल असे आश्वासन दिले. हाच मुचकंद राजा त्याच्या पुढच्या जन्मात पुंडलिक नावाच्या माणसाच्या रूपात पंढरपूर जवळ जन्म झाला.

श्रीकृष्ण आणि रुक्मिणी याचा एकदा वाद झाला आणि वादाचा परिणाम रुक्मिणी देवी नाराज होऊन श्रीकृणाला सोडून वनात तपश्चर्या करायला बसली. ज्यावेळी श्रीकृष्ण आपल्या पत्नीला शोधत शोधत पंढरपूरजवळील वनात आले त्यांनी देवी रुक्मिणीना तपश्चर्येत लिन पाहिले. तिची तपश्चर्या मध्ये विघ्न न घालता ते मागच्या जन्मी मुचकंद राजाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी निघून गेले. श्रीकृष्णा रूपातील स्वतः श्रीविष्णू पुडलिकाच्या घरी त्याला भेटायला गेले असता पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करणे होता. सेवेत खंड पडू नये म्हणून श्रीकृष्णाकडे एक वीट फेकत त्यावर उभा राहून थोडा वेळ वाट पाहण्याची विनंती केली. धैर्यशील श्रीविष्णू आपल्या भक्ताने छातीवर लाथ मारल्यानंतरही तपस्वी मुनी भृगु याच्या पायाला लागले तर नाही ना अशी काळजी वाटणाऱ्या देवाने स्मितहास्य करत गुपचूप त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाची आई वडिलांची सेवा पूर्ण केल्यावर श्रीकृष्णाकडे परतले आणि आहे त्या परिस्थितीत आहे त्या विटेवर आजन्म तुमचा वास पंढरपुरात असावा असे मागणे मागितले. तेव्हा पासून श्रीकृष्ण पुंडलिकाने फेकलेल्या त्या विटेवर उभे आहे म्हणूनच विटेवर पंढरपूरच्या थल/ जमिनीवर उभ्या कृष्णाला विठ्ठल असे म्हटले जाते.

लेखाच्या सुरुवातीला केलेल्या दाव्याप्रमाणे विठ्ठल नावाचा हा देव दुसरा तिसरा कोणी नसून कृष्णवतार आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे. मग आजची ही कथा तुम्हाला आवडली का? अश्याच अनेक सनातन धर्मातील निवडक गोष्टी वाचण्यासाठी, धर्म जागृती, हिंदू संगठन दृढ करण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका. पुढची अशीच एक सनातन गोष्ट तुमच्यासमोर आणेपर्यत 

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

सनातन भाग 4 भगवद्गीता

सनातन भाग चार.

लवजिहाद असेल की प्रेम प्रकरणे हे जातीबाह्य विवाह याचे मूळ कारण चित्रपट, आधुनिक जीवन किंवा पालकांचे दुर्लक्ष हे कारण आहेच शिवाय हिंदूंनी आपल्या घरात, घराबाहेर हिंदू संस्कृती, धर्मग्रंथ याचे अनुकरण बंद केल्याने आपला सनातन हिंदू धर्माची शिकवण मुलांमध्ये प्रवाहित होत नाही.समजा जर भगवद्गीतेसारखा प्राचीन पुरातन धार्मिक ग्रंथ याचा थोडा जरी हिंदूंनी घरात वाचला असता तर कदाचित मुलांची मानसिकता आज जशी आहे तशी राहिली नसती. दुसऱ्या पंथाची लोक कट्टर असण्याची आणि हिंदू तसे नसण्याचे  कारण धर्मग्रंथांना घरात नसलेले स्थान हेच आहे. पटत नाही ना? मग पुढे वाचाच
भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुनविषादयोग म्हणजे युद्धाला सुरुवात होण्याआधी रणांगणात आपल्याच रक्ताचे  भाऊ, आप्त, गुरू, नातेवाईक याच्याविरुद्ध युद्ध करण्याची वेळ आली त्यावेळी त्याचे हातपाय गळून पडले, अर्जुन भयभीत झाला, त्याला भयंकर दुःख झाले आणि पडलेले अनेक प्रश्न त्याने योगेश्वर श्रीकृष्णाना विचारू लागला. हेच प्रश्न भगवद्गीतामधील श्लोक, भगवद्गीता घरात शिकवली, बोलली गेली असती तर त्याचा परिणाम मुलांवर होऊन विवाह संस्था, धर्म जाती याचे महत्व मुलांना लहानपणीच कळले असते आणि मोठे झाल्यावर त्याचे अनुकरण ही 
केले असते असा माझा तरी समज आहे. हा सगळेच नाही पण बहुतांश मुलांना लव जिहाद, धर्म किंवा जाती बाहेर प्रेम वा लग्न न करण्याचे कारण कळले असते अस मला वाटते. काही प्रगत झालेल्या, विकसित, पाश्चात्य देशाची संस्कृती, वैयक्तिक आयुष्य, खुलेपणाचा स्वीकार करणाऱ्यांना कुंपण वाटेल पण त्या वाटण्यापेक्षा धर्माने कसे वागावे, योग्य अयोग्य याची ओळख लहानपणीच झाली असती. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना आवाहन करेल की आता तरी आपल्यात बदल घडवा, सजग व्हा कारण हिंदू म्हणून असलेली ही ओळखच माणसाला माणूस म्हणून जगण्यास मदत करते. दिवसातील अर्धा तास, एक एक श्लोक असे ध्येय ठेवले तरी घरातील अबालवृद्ध मध्ये अध्यात्मिक जागृती तुम्ही करू शकता त्यासाठी आता तुम्हाला कोण्या गुरुची गरज आहे असे नाही. हातातील हा मोबाईल ज्यावर तासनतास बिभस्य रील पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा एखादे भगवद्गीता अँप, youtube वरील भगवद्गीता विश्लेषण  व्हिडीओ यातूनही ज्ञान घेता येऊ शकते. आता तुम्हाला वर दिलेले मुद्दे भगवद्गीतेत आहे हेच माहीत नसेल. मुळात आयुष्यात पडणारे कोणतेही प्रश्न याचे उत्तर गीतेत आहे असं साधू संत म्हणून गेलेत ते काही उगीच नाही. अर्जुनाला पडलेले प्रश्न श्रीकृष्णांना विचारात असताना त्याने उपस्थित केलेले हे प्रश्न आणि त्याची मीमांसा यासाठी आजचा हा थ्रेड. उदारणार्थ अध्याय एक श्लोक 38 ते 43 याची माझ्या बौद्धिक पातळीवर मीमांसा मी करतो आहे.ज्याची माहिती तुम्ही स्वतः स्वतंत्र पद्धतीने नक्की करा असंही मी सांगू इच्छितो. चला ह्या ब्लॉगमुळे गीतेचा पहिला अध्याय


अर्जुनविषादयोग आहे हे आज भरपूर लोकांना समजले असेल. जोडलेल्या स्क्रिन शॉट मधील हे श्लोक अर्थ असा आहे की अति लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्याना कुळाचा (कुटुंब वा वंश) नाश होण्यामुळे निर्माण होणारे दोष व मित्राशी वैर केल्याचे पाप दिसत नसले तरी बुद्धी नितीमत्तेने वागणाऱ्या लोकांनी तरी लाभापासून दूर का राहू नये. कुळाचा नाश झाला तर परंपरागत कुळधर्म नष्ट होतो आणि कुळधर्म नष्ट झाला तर मोठ्या प्रमाणात पाप वाढण्यास मदत होते. पाप वाढल्याने कुळातील स्त्रिया बिघडतात. कुळात वर्णसंकर उत्पन्न होतो ( वर्णसंकर म्हणजे भिन्न जातीच्या स्त्री पुरुषाच्या जवळ आल्याने जन्मणारी व्यक्ती) वर्णसंकरामुळे कुळाचा नाश होतो, नरकात ढकलतो. वर्णसंस्कारामुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म उधवस्थ होतात. एकदा का कुळधर्म नष्ट झाला तर अनिश्चित काळासाठी नरकात रहावं लागते.

असा शब्दशः अर्थ आहे. समजा भगवद्गीता घराघरात शिकवली गेली असती तर लहानपणीच पाल्याना कुळ म्हणजेच वंश, धर्म,जाती याची माहिती मिळाली असती ह्या  माहितीच्या आधारे जगात घडणारे लव जिहाद सारख्या प्रकारात न अडकण्याचे शिक्षण लहानपणीच समजले असते तसे संस्कार त्याच्यावर झाले असते. मुलगा असो की मुलगी यांना जातीबाह्य विवाह चुकीचे असतात त्यामुळे दोष निर्माण होऊ शकतात हे बाल्यवयातच कळल्याने तरुणपणात प्रेम प्रकरणे, जाती बाहेर लग्न यासारखे प्रश्नच उद्भवले नसते का? पण हिंदूंनी चार पुस्तक शिकून धर्मग्रंथांना बाजूला सारले ज्यामुळे संस्कृती मुलापर्यत पोहचत नाही आणि जे व्हायला नको ती पावले मूल तरुणपणात घेतात. काहींना जे वाचतोय ते खटकेल, संकुचित वाटेल, चुकीच्या वाटतील पण ज्या पालकांच्या मुलीचे 40 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले जातात किंवा मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून त्याचा उपभोग करून सोडून दिले जाते त्या पालकांना किंवा ज्यांनी असे प्रसंग जवळून घडलेले पाहिले त्यांना अर्जुनाने मांडलेले मुद्दे चुकीचे वाटतील का हो? भले आज आपण जाती व्यवस्था मानत नसलो, प्रगत पुढारलेले झालो असेल तरी जवळच्या व्यक्तीचे असे आंतरजातीय विवाह कपाळावर आठ्या निर्माण करतात की नाही. भले असे विवाह झाल्याने नरकात अनिश्चित काळासाठी अडकणार नाही पण आयुष्याचाच नरक झाला तर?  माझा उद्देश गीतेतील श्लोक सांगून, जातीभेद, धर्म, आंतरजातीय विवाह, आजची जगण्याची पद्धत यावर बोट ठेवायचे नाहीच मुळी. कसे वागायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे पण जर आपण आपल्या धर्मीक ग्रंथांना जवळ घेतले, त्याचा अभ्यास केला,घरात चर्चा केली तर नैतिकता, सभ्य असभ्य वर्तन, समाजात वावरण्याचे पद्धत यांचे सामान्य ज्ञान मुलाना देऊ शकू याची खात्री वाटते. प्रसंग बेतल्यावर त्याचे गांभीर्य समजण्यापेक्षा ते आधीच समजले तर वाईट कुठे आहे. जीवापाड प्रेम असणाऱ्या आपल्या जवळच्या लोकांचे भले व्हावे, आयुष्यभर त्यांनी सुखात रहावे यासाठीच झटत असतो ना आपण मग हा छोटासा बदल केवळ धार्मिक नाही तर कौटुंबिक स्वास्थ सुधारणा करेल अस मला वाटत. भगवद्गीतेचा मी काही खूप मोठा अभ्यासक नाही कदाचित छोट्या तोंडी मोठा घास घ्यावा तसा उपदेश द्यायचा मला काहीच अधिकार नाही पण समाजातील आजची परिस्थिती पाहता हिंदूंना जागृत करण्यासाठी, धर्माशी जोडण्यासाठी भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ खूप मोठे काम करू शकतो अस मला वाटले. गेल्या दोन तीन महिन्यांपासून मी स्वतः पहिलाच अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपणच आपले धार्मिक ग्रंथांना जवळ करणार नाही तर कोण करणार. भले त्यातल्या सगळ्याच गोष्टी पटणार नाही पण काही तर पटतील. आज पाहिल्यानंदा लेखाचा शेवट कसा करायचा हे समजत नाही आहे. कित्येकदा लिहलेले खोडुन परत लिहले पण शेवट काही जमेना पण कुठं तरी थांबावे लागेल त्यामुळे हिंदूंनो  भविष्यकाळातील धोके ओळखून सजग व्हा, संघटित व्हा ह्या माझ्या पेटंट डायलॉग मारून विश्रींती घेतो. पुढचा लेख येईपर्यत

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०२३

सनातन भाग 3 : श्री व्यंकटेेश्वरा बालाजी कथा


मी तुमचा मित्रा सनातन, आज पुन्हा एकदा एक सनातन भागातील पुढील कथा घेऊन तुमच्या समोर उपस्थित झालो आहे.
PK नावाचा फालतू कलाकार गरीब घाण याचा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. त्यात हिंदू देव देवता, रूढी परंपरा याचा केलेला अपमान पाहून लोकांना हसायला आलेले त्यात तो एका दगडाला पानात असलेला भगवा रंग लावून देव असल्याचा बनाव करतो आणि परीक्षेला येणाऱ्या विद्यार्थी तिथं डोकं टेकवतात, पैसे टाकतात हा प्रसंग वास्तवदर्शी वाटतो की नाही? हो मी वास्तवदर्शी म्हणालो कारण मूर्ख हिंदू समाज कोणतीही माहिती न घेता कोणत्याही नसलेल्या देवाच्या पायावर डोकं ठेवायला, भोंदू स्वयंघोषित बाबा बुवा महाराज यांच्या दावणीला स्वतःला बांधून घेतात ही वस्तुस्थिती आहे. हिंदूंनी सजग होणे, डोळस होणे किती गरजेचे आहे हे यातून आपण शिकले पाहिजे.

आज व्यक्त होतोय ते एक अशी गोष्ट तुमच्यासमोर घेऊन येतोय जी तुम्हाला निश्चित माहीत नसणार आणि तरीही बहुतांश हिंदू लोक त्या देवतेच्या पाया पडायला तिथे जातात, केस दान करतात पण त्या देवाची माहिती शून्य असते.केस दान का करतात हे माहीत नसते तरीही त्या देवाला गेल्यावर तिथं जाऊन टक्कल करणे म्हणजे देवाला गेलो याचा पुरावाच समाजात.

सुरुवात वाचून तुम्हाला समजले असेलच की मी जे देवस्थानबद्दल बोलतोय तो देव म्हणजे आंध्रप्रदेशमधील आणि भारतातील सर्वात श्रीमंत देव व्यंकटेश्वरा म्हणजेच बालाजी. आजची ही गोष्ट नक्की वाचा आणि नवीन माहिती मिळाली असेल तर नक्की आपल्या मित्रमंडळीत शेयर करायला, माझा ब्लॉग, ट्विटर follow करायला विसरू नका.
गोष्ट खूप जुनी आहे. देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी पूर्वापार पासून होम हवन, यज्ञ करणे सनातन हिंदू धर्मात आघाडीचे काम. असाच एक यज्ञ देवता करायला घेतात पण ह्या यज्ञचा भोग कोणत्या देवाला द्यायचा असा मोठा प्रश्न देवतांना पडला. सृष्टीचे जनक श्री ब्रम्हा, तारणहार श्री नारायण विष्णू की दुष्टाचा संहार करणारा षी शंकर या परमात्म्यापैकी कोणाला भोग द्यायचा याबद्दल वाद वाढू लागला. प्रत्येक देवता आपआपल्या आराध्य देवाचे नाव घेऊ लागली त्यामुळे कोणत्या देवाला सर्वोत्तम मानायचे हे ठरेना. पडलेला हा प्रश्नाचे उत्तर मी शोधून काढतो अस म्हणत श्री ब्रह्मा याचा पुत्र तपस्वी योगी भृग जवाबदारी डोक्यावर घेतो. परमात्मा देवाच्या त्रिकुटात नक्की कोण सर्वोत्तम शोधण्यासाठी भृगु त्याच्या रागाची, करुणेची, दयेची परीक्षा घेणार असतो.

परीक्षा घेण्यासाठी भृगु सर्वात प्रथम आपल्या पित्याच्या म्हणजेच श्री ब्रम्हा याच्या घरी जातो पण आपल्या पित्याला नमस्कार न करता त्याच्याशी बोलत बसला. मुलाच्या अश्या वागण्याने खरतर श्री ब्रम्हा याना खूप राग आला होता. मुलाची चूक दाखवत त्यांनी आपल्याला प्रणाम कर अशी आज्ञा भृगुला केली मात्र त्याला स्पष्ट नकार देत भृगु त्यांना तो त्याचा मुलगा म्हणून नाही तर परीक्षक म्हणून आला अस म्हणाला. आधीच कोपिष्ट झालेले ब्रम्हा मुलाला मारण्यासाठी त्याचा कमंडलू उचलला. परिस्थिती हाताबाहेर जाते हे पाहत भृगुने तिथून धूम ठोकली ते सरळ हिमालयात महादेवाच्या घरात घुसले. महादेव आपल्या पत्नी माता पार्वतीबरोबर एकांतात होते पण अचानक आलेल्या भृगुमुळे त्याचा एकांत विरून गेला. रागाच्या भरात महादेवांनी आपला त्रिशूल उचलणार तेच भृगु तिथूनही धूम ठोकत श्री विष्णू याच्या क्षीरसागरात प्रवेश केला. भगवान विष्णू शेषनागावर विश्रांती घेत पहुडले होते तर त्याची पत्नी त्याचे पाय दाबत बसली होती. भृगुने कोणताही विचार न करता भगवंताच्या छातीवर पाय मारला ज्यामुळे भगवंताची निद्रा भंग पावली पण तरीही स्मित हास्य करत त्यांनी श्री ब्रम्हापुत्राच्या पायाला हातात घेऊन भृगुला कोठे लागले तर नाही ना याची चौकशी करू लागले. झालेल्या ह्या प्रकारामुळे भृगु मुनी सर्वोत्तम देव कोण या परीक्षेच्या निष्कर्ष पर्यत पोहचले. तिन्ही परमात्माची माफी मागत त्याने केलेल्या वाईट वर्तनाचे कारण सांगून परत देवतांचा यज्ञस्थळी परत आले. जमलेल्या सर्व तपस्वी, साधू आणि देवतांना झालेला प्रसंग सांगत सर्वोत्तम देव म्हणून श्री विष्णू योग्य आहे असे घोषित केले.

कथेचा पहिला भाग झाला पण इथे श्री व्यंकटेश बालाजी कुठे असा प्रश्न तुम्हाला पडणे अपेक्षित आहे आणि हाच ट्विस्ट वाचण्यासाठी कथेचा हा उत्तराधार्थ वाचू या.

कोण कुठला तपस्वी येतो. सृष्टीच्या पालनकर्त्याला छातीवर पाय मारतो त्याला शासन करण्याचे सोडून त्याच्या पायाला लागले की नाही अशी चिंता करणाऱ्या श्री विष्णूचा माता लक्ष्मी यांना खूप राग आला. पतीचा डोळ्यादेखत झालेल्या ह्या अपमानाने त्या खूप व्यथित झाल्या. ज्यावेळी विष्णू वराह अवतार घेऊन सृष्टीला वाचवत होते त्यावेळी लक्ष्मी माता वैकुंठातून गायब झाला आणि आपला देहत्याग केला. देहत्याग करून माता लक्ष्मी चोल राजाच्या घरात पद्मावती रूपात जन्म घेऊन मानवी अवतारात जगू लागल्या. वैकुंठातून लक्ष्मी गायब झाल्याने विष्णूनी खूप शोधाशोध केली आणि शेवटी लक्ष्मी मातेचा वैकुंठ सोडण्याचा आणि पद्मावती रूपात पृथ्वीवर विहार लक्षात आला. लक्ष्मी मातेला पुन्हा प्राप्त करण्यासाठी विष्णूनी मानवी रूपात श्रीनिवास रूपात अवतार घेऊन मानवी हाल अपेष्टा दुःख सहन करत, कोणत्याही मायेचा वापर न करण्याचा प्रण करत पद्मावतीला मिळवण्याचे ध्येय ठेवले.

पद्मावती देवी एकदा जलक्रीडा करण्यासाठी वनात भटकंती करत असताना एका हत्तीने त्याच्यावर हल्ला केला. जवळच असलेले भगवंत विष्णूनी श्रीनिवास रूपात पद्मावतीला हत्तीच्या हल्ल्यातून वाचवले. दोघांनी एकमेकांना पाहिले आणि ते प्रेमात पडले. पद्मावती झालेल्या प्रसंगानंतर राजमहाल परतली खरी पण श्रीनिवास याच्या विरहात त्यांनी खाणे पिणे बंद केले ज्याची उपरिती त्या आजारी पडण्यात झाले.दुसरीकडे श्रीनिवास घरी तर परतले पण त्यांचे लक्ष कशात लागेना. पद्मावतीचा शोध घेण्यासाठी त्यांनी घरोघरी फिरून ज्योतिष सांगणे चालू केले. राजा चोल मुलीच्या आजारपणामुळे काळजीत पडले बरेच औषध उपचार केल्यानंतर ही तब्बेतीत सुधार न झाल्याने राजकन्यांच्या आजाराच्या शोधासाठी शहरात दवंडी पेटवली. श्रीनिवासची ज्योतिष सांगण्यामुळे ते अल्पवधीत प्रसिद्ध झाले होते त्यांना राजकन्या चा आजाराचे कारण शोधण्यासाठी बोलवण्यात आले. ज्योतिष पहायला आलेल्या श्रीनिवास यांना पाहून पद्मावती बऱ्याच दिवसांनी हसली तेच श्रीनिवास यांनी राजा चोल याना वनात घडलेला प्रसंग सांगून हत्तीपासून वाचवणाऱ्या व्यक्तीवर राजकन्येचा जीव जडला आहे असे सांगितले शिवाय ती व्यक्ती कोणी साधी सुधी व्यक्ती नसून भगवान श्रीविष्णू याचा अवतार असल्याचे सांगितले. श्रीविष्णूचा अवतार आपला जावई होणार यामुळे चोल राजा प्रसन्न झाला आणि आनंदाच्या भरात आपल्या मुलीचा विवाह त्याच मुलाशी करण्याची घोषणा केली.

श्रीनिवास मानवी अवतारात असल्याने त्याच्याकडे लग्न करण्यासाठी धन नव्हते. लग्नाची बातमी तिन्ही लोकांत पसरली होती अश्यावेळी स्वतः श्रीनिवास मात्र चिंताचुर होते. लक्ष्मी देवींनी विष्णूची साथ सोडल्याने ते निर्धन झाले होते अश्यावेळी धनाची देवता कुबेर त्याच्यासमोर प्रगट होऊन हवे तेवढे धन देण्याची आर्जव करू लागले पण मनुष्य देह घेतलेल्या श्रीनिवास यांनी ते धन घेण्यास नकार देत कर्ज रूपात धन देण्याची विनंती कुबेरांना केली. कुबेरांना देवाची अशी विनंती खटकली पण श्रीनिवास मात्र कर्जरूपात धन घेण्याच् अटीवर ठाम होते. श्रीब्रम्हा आणि महादेव याच्या साक्षीने मानवी देहात मानवी सुख दुःख, पैशाची अडचण समजून घेण्यासाठी कर्जरूपात धन घेण्यावर ठाम होते. श्रीनिवास यांचा ठाम निर्धार पाहून कुबेरानी घेत असलेले कर्ज कसे फेडणार अशी विचारणा केली. श्रीनिवास म्हणाले की हे कर्ज मी नाही तर माझे भक्त फेडतील. भक्तांच्या भक्तीला माझी कृपा भेटली की ते धनवान होतील. माझ्यामुळे धनवान झालेले भक्त मला दान रूपात जे देतील त्यातून मी कर्जाची परतफेड करेल. कालियुगाच्या अंतापर्यत माझी लोक पूजा अर्चना धनाची देवता म्हणून करतील. माझ्यामुळे मिळालेल्या संपत्तीत ते माझा वाटा ठेवतील आणि मला ते देत राहतील. मी माझ्या भक्तांना कधीच निर्धन ठेवणार नाही त्यामुळे तुझे कर्ज मी भक्तांच्या दानातून पूर्ण करेल. शेवटी कुबेरानी कर्ज रूपात श्रीनिवास याना मुबलक धन दिले ज्यामुळे श्रीनिवास आणि पद्मावतीचा विवाह थाटामाटाने संपन्न झाला. असे म्हंटले जाते की आजही कुबेराचे कर्ज फिटलेले नाही आणि त्या कर्जातून मुक्तता मिळण्यासाठी आजही बालाजीचे भक्त भरभरून दान करत असतात.

श्री बालाजी याच्यावर असलेल्या श्रद्धेपोटी भक्त तिरूमला डोंगरावर जात असतात पर्यटन आणि देवाचे दर्शन यासाठी लोकांच्या झुंडी च्या झुंडी एकमेकांचे अनुकरण करत बालाजीला जात असतात पण देवाच्या अवताराची ही गोष्ट मात्र सगळ्यांना माहीत असतेच असे नाही.
एका पौराणिक कथेनुसार तिरूमला डोंगरावर एक गवळी आपल्या गायी चरण्यासाठी घेऊन जायचा पण रोज त्याच्या गायींतील एक गायीचे दूध येत नसे अश्यावेळी त्याने त्या गाईवर विशेष लक्ष ठेवले आणि त्याला निदर्शनास आले की ती गाय रोज डोंगरावर एका वारुळवर आपले दुधाचा वर्षाव करत असायची हे पाहून तो गवळी खूप चिडला आणि हातात असलेली कुऱ्हाड त्या वारुळावर फेकली.  ह्या हल्ल्यात वारुळात वास करत असलेल्या बालाजीच्या डोक्याला जखम झाली आणि त्याचे केसही उडून गेले. मुलाला झालेली जखम त्याच्या आईने पाहिली आणि तिने आपल्या केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले. सुंदरतेची प्रतीक असलेले केस सहज सोडल्यामुळे जो भक्त नवसपूर्तीनातर स्वतःहून मला केस दान करेल त्याच्या सर्व इच्छा मी पूर्ण करेल असे आश्वासन आपल्या आईला दिले म्हणूनच बालाजीला जाणाऱ्या अनेक लोक देवाला नवस बोलतात आणि नवस पूर्ण झाल्यावर तिथे केस दान देत असतात. 

मग कशी वाटली आजची गोष्ट. आवडली ना? अशीच एक सनातनी गोष्ट माहिती रूपात परत घेऊन तुमच्या समोर हजर राहतो तोपर्यत हा ब्लॉग जास्तीत जास्त शेयर करायला विसरू नका बर का...... तोपर्यत

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।




मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०२३

सनातन भाग २


सनातन च्या दुसऱ्या भागात आपले सहर्ष स्वागत. आजचा हा भाग थोडासा किचकट विषय वाटेल पण सांगण्याचा मोह मला आवरता येत नाही आहे. जास्त काही मांडण्यापेक्षा लेखाला सुरुवात करूया.

सनातन धर्म आणि त्यातील कथा ह्या काल्पनिक वाटतील इतक्या कमालीच्या आहेत. काल्पनिक वाटण्याचे कारण म्हणजे माणूस स्वतःला अतिशहाणा, बुद्धिमान प्राणी समजतो त्यामुळे जोपर्यत एखादी घटना विज्ञानाने सप्रमाण सिद्ध होत नाही तोपर्यत ती मान्य करणे माणसाला सहजासहजी शक्य होत नाही. मुळात सनातन धर्मातील गोष्टी इतक्या मोठ्या प्रमाणात लिहल्या आहेत की त्याचा एकमेकांशी असलेला संबंध सप्रमाण सिद्ध होत असतो.

आज बोलण्याचा जो विषय आहे तो म्हणजे मल्टियुनिव्हर्स म्हणजेच ब्रम्हांड. ब्रम्हांड म्हणजे आपण राहतो ती पृथ्वी त्याचबरोबर असणारी सूर्यमाला आणि इतर प्रत्येक गोष्ट ही केवळ एकच आहे का? नाही अश्या अनेक सूर्यमाला, ग्रह, पृथ्वी समांतरपणे आहेत पण याचे ज्ञान स्वतःला बुद्धिवान समजणाऱ्या माणसाला नाही पण आपल्या पुरातन, सनातन धर्मात ह्या प्रत्येक गोष्टीची माहिती आहे. आपला सनातन धर्मात इतके ज्ञान आहे की त्याच ज्ञानाची चोरी करून अनेक शास्त्रज्ञांनी वेगेवेगळे प्रयोग साध्य केले आहेत. उदाहरण द्यायचे म्हंटले तर आपले ज्योतिष शास्त्र. आज नासा सारखी संस्था चंद्र, सूर्य याची उगवण्याची मावळण्याची, ग्रहण यांची  माहिती देण्यासाठी प्रगत संगणकाचा वापर करते पण ही सगळी माहिती केवळ पंचांग बघून आपले लोक सांगतात पण अश्याया सनातन गोष्टींची माहिती सांगितली की आपलेच लोक आपल्यावर हसतात, हेटाळणी करतात. ब्रम्हांड त्यातील अजब गोष्टी यावर बनणारे चित्रपट पाहून लेखकाच्या लिखाणाचे कौतुक करणारे कमी नाही. आजच्या विषयाला अनुसरूनच काही मल्टि युनिव्हर्स चित्रपट पाहून तुमचे तोंड उघडेच्या उघडे नक्की राहिले असतील असे चित्रपट म्हणजे डॉ. स्ट्रेज इन द मल्टियुनिव्हर्स मॅडनेस, किंवा स्पायडरमॅन नो वे होम किंवा इंटरस्टेलर सारखे चित्रपट तुम्ही निश्चितच पाहिले असणार

हे चित्रपट पाहत असताना त्या जादुई चित्रीकरण, वेगेवेगळ्या जगातील काल्पनिक चित्र पाहण्यात तुम्हींच काय मी ही आश्चर्यचकित झालो होतो पण हे चित्रपटापेक्षा जुनी अनेक ब्रह्माड असलेली कथा सनातन धर्मात आहे असे सांगितले तर तुम्हाला पटेल का? नाही पटणार पण अश्यायाच कथा तुमच्यासमोर मांडून सनातन हिंदू धर्माचे महात्म्य सांगण्याचा वसा घेतल्याने आज अशीच एक गोष्ट तुमच्यासमोर सादर करत आहे. कृपया तुम्ही वाचल्यानंतर ती शेयर करायला विसरू नका आणि जमलेच तर follow करा तुमच्या भावाला.
महाशक्तीशाली चिरंजीवी हनुमान यांचे श्रीरामांवर प्रेम तर तुम्हाला माहीतच आहे अश्या श्रीरामाची पत्नी माता सीता पतीच्या दीर्घआयुष्यासाठी आपल्या केसात शेंदूर लावायच्या हे पाहून हनुमानाने पूर्ण शेंदूर आपल्या सर्वांगाला लावले होते ते आपल्या प्रभू श्रीरामाच्या दीर्घ आयुष्यासाठी ही गोष्ट तर तुम्हाला माहीतच असेल शिवाय महापराक्रमी हनुमान याच्या शक्तीपूढे कोणत्याही देवाची शक्ती तोकडी पडायची म्हणूनच स्वतः यमराज देखील श्रीरामाच्या अवतार कार्य संपल्यानंतर त्यांना घ्यायला येत नव्हते. शेवटी श्रीरामाना यातून मार्ग काढण्याची विनंती यमराजांनी केली. अवतार कार्य संपल्यामुळे श्रीरामाना देहत्याग करायचा होता पण हनुमान जोपर्यत जवळ आहे तोपर्यत असे होणे शक्य नव्हते म्हणूनच एक दिवस हनुमान श्रीरामाना भेटायला येत आहे हे पाहून श्रीरामांनी आपली अंगठी दरबारातल्या जमिनीच्या भेगेत फेकली आणि सूक्ष्म रूप घेऊन ती काढून आणण्याची आज्ञा हनुमानांना केली. क्षणांचा विलंब न करता हनुमान यांनी सूक्ष्म अति सूक्ष्म देह रूपांतर करून भेगेत घुसले खरे पण ती छोटीशी भेग काही संपेना. खूप प्रयत्न केल्यावर निमुळत्या होत गेलेल्या रस्त्याने जात ते नागलोकात पोहचले. तिथे उभे असणाऱ्या नागलोकाच्या रखवालदाराने तिथे येण्याचे कारण हनुमानाला विचारले. हनुमानाने ते तिथे श्रीरामाची हरवलेली अंगठी शोधण्यासाठी तिथे आले अस सांगत रखवालदाराला अंगठी कुठे पाहिली का असा प्रश्न विचारला. चेहऱ्यावर स्मित हास्य करत चमचमणाऱ्या एका डोंगराकडे बोट करत नागदेवेतने अंगठीचा पत्ता हनुमानाना दिला. तडक तिकडे झेप घेत हनुमानानी श्रीरामाची अंगठी उचलली खरी पण तश्याच अनेक अंगठ्या तिथे पडून एक मोठा डोंगर झाला होता. आता इतक्या साऱ्या अंगठ्या पाहून हनुमान नेमकी श्रीरामांची अंगठी कोणती या अवघड प्रश्नात अडकले. शेवटी न राहवून त्याने नागदेवतेला इतक्या अंगठ्याचे रहस्य विचारले आणि श्रीरामाची योग्य अंगठी शोधून देण्याची विनंती केली. हनुमान अंगठी घेण्यासाठी घेतलेली झेप, अंगठी शोधण्यासाठी लागलेला हा वेळ श्रीरामाना आपला अवतार संपवून पुन्हा क्षिरसागरात जाण्यासाठी मुबलक होता. हनुमानाच्याया अनुपस्थितीचा फायदा घेत यमराजांनी श्रीराम रुपी भगवान नारायण विष्णूंना परत वैकुंठात घेऊन गेले होते. नागदेवतेने स्मित हास्य ठेवत हनुमानाना सांगितले की अनेक ब्रह्मांडात प्रत्येक अवताराच्या अंताच्या वेळी भगवान विष्णू अशीच एक अंगठी भेगेत टाकतात आणि तुला त्याच्यापासून दूर करतात. जोअपर्यत तू त्याच्याबरोबर सावलीसारखा उभा राहतोस तोपर्यत खुद्द यमराजदेखील श्रीरामाचा अवतार कार्य पूर्ण झाल्यावर घ्यायला यायला घाबरतात अश्याया वेळी भगवान विष्णू दरवेळी एक अंगठी फेकून ती शोधण्याची जवाबदारी त्याझ्यासारख्या प्रत्येक हनुमानाला देतात. हा अंगठ्याचा डोंगर दुसरा तिसरा काही नाही तर वेगेवेगळ्या ब्रह्मांडातून टाकलेल्या विष्णूच्या अवतार समाप्तीची घोषणाच आहे पण अस करताना तुझा व्यत्यय होऊ नये म्हणूनच ही माया त्यांनी उभी केली आहे. हनुमानाला हे सत्य समजताच दुःख तर झाले पण त्याच्या श्रीरामाच्या सहवास लाभण्याचा बालिश हट्टाची शरम देखील वाटली पण तरीही हे सत्य त्यांनी आनंदाने स्वीकारले. 

मग कशी वाटली आजची मल्टि युनिव्हर्स गोष्ट. निश्चितच बहुतांश हिंदूंना ही माहिती असेलच असे नाही त्यामुळे ही माहिती इतर सनातनी मित्रांसोबत शेयर करा. बर ही एकच गोष्ट आहे का सनातन धर्मात तर नाही अश्या अनेक गोष्टी आहेत त्यातील अजून एक गोष्ट संक्षिप्त रूपात तुमच्यासमोर मांडतो.

पुरातन काळात रेवतक राजाची मुलगी रेवतीचया लग्नासाठी वरमुलगा शोधत होते पण लग्नासाठी योग्य वर मिळत नसल्याने ते स्वतः आणि त्याची मुलगी ब्रह्मलोकात परमपिता ब्रह्मा यांच्याकडे गेले आणि आपल्या मुलींसाठी योग्य वर कोण असा प्रश्न केला. इतक्या छोट्या गोष्टीसाठी राजा आणि त्याची मुलगी ब्रह्मलोकांत आल्याचे ब्रह्मदेवाना आश्चर्य वाटले पण तरीही थोडाही वेळ न दडवता पृथ्वीवर असणाऱ्या श्रीकृष्णाचा मोठा भाऊ बलराम योग्य वर आहे असं सांगत तात्काळ पृथ्वीवर परतण्याची पितापुत्रीला आज्ञा केली. आनंदाने राजाला रेवतक ब्रह्मदेवाना नमस्कार करून परत पृथ्वीवर परतले तर पृथ्वीवर सगळे चित्रच बदलले होते. पृथ्वीवरची सगळी माणसे त्याच्या तुलनेत खूपच बुटकी होती अश्यावेळी झाडाखाली बसलेल्या बलरामाना त्यांनी त्याच्या येण्याचे आणि बदललेल्या परिस्थितीबद्दल प्रश्न विचारला. बलरामानी त्यांना पृथ्वीवरील वेळ आणि ब्रह्मदेव याच्या वेळेत असणारी तफावत सांगत सतयुगात असताना तुम्ही भेटायला गेला होता पण ब्रह्मलोकांतून परतत असे पर्यत पृथ्वीवर सतयुग आणि त्रेतायुग संपून द्वापारयुग चालू झाले असे सांगितले. प्रत्येक युगात माणसाची देहबोली खुंटत गेली त्यामुळे आजच्या युगात माणसाची उंची कमी आहे असे सांगितले. हे ऐकून राजा रेवतक चिंतीत झाला आणि आपल्या मुलीचे लग्न बलरामशी कसे होणार याच्या चिंतेत त्याचा चेहरा बारीक झाला. त्यांची ही चिंता ओळखून बलरामानी त्याचा नांगर रेवतीच्या डोक्यावर दाबला ज्यामुळे रेवतीची उंची द्वापारयुगामधील लोकांसारखी झाली हे पाहून रेवतक राजाचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांनी बलराम आणि रेवतीचे लग्न लावून दिले.

ह्या दोन्ही गोष्टी सनातन धर्माची शक्ती आणि आजचे विज्ञान याची सत्यता स्पष्ट करते. आज अनेक वैज्ञानिक मल्टियुनिव्हर्स असण्याची शक्यता बोलतात शिवाय ते शोधण्याचे कार्य देखील जोरात चालू आहे. वेगेवेगळ्या ब्रम्हांडात वेळेचा वेग वेगळा असतो असाही शोध आजचे प्रगत शास्त्र मान्य करते यातून आपली सनातन संस्कृती, गोष्टी है केवळ काल्पनिक नसून ती वास्तव आहेत याचेच हे पुरावे आहेत पण आजच्या पिढीला ह्या गोष्टी माहीत नसतात त्यामुळे वैज्ञानिक दृष्टिकोन, बुद्धिमत्ता सिद्ध करताना पौराणिक, सनातन गोष्टी नाकारण्याचे प्रमाण जास्त आहे शिवाय ह्या गोष्टी कुटुंबात चर्चिल्या जात नसल्याने आजच्या पिढीच्या लोकांना याबाबत माहितीच नसते त्यामुळे ही माहिती अधिकाधिक लोकांपर्यत पोहचवून सनातन धर्माची महत्ता सर्वदूर पोहचवण्यासाठी तुम्ही मदत करणार ना??

अशीच दुसरी एखादी गोष्ट घेऊन परत तुमच्यासमोर येईपर्यत माझा नमस्कार.

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।                          ।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।

गुरुवार, १६ फेब्रुवारी, २०२३

सनातन



#सनातन ह्या थ्रेडमध्ये आपले स्वागत.हिंदू सनातन धर्म नाही तर जगण्याची पद्धत आहे पण जसे एका नाण्याला दोन बाजू असतात तसे प्रांत, बोली भाषा आणि माणसाच्या स्वार्थाने वेगवेगळे पंथ तयार केले ज्याला ती लोक धर्म अस संबोधायला लागली. त्यांनी त्यांच्या पंथाला काही ना काही नाव दिले तसच आपल्याला हिंदू हे नाव मिळाले असावे. हिंदू नावाचा इतिहास म्हणजे सिंधू नदीच्या तीरावर वसलेले लोकांना पाश्चात्य देशातील लोक सिंधू अस म्हणत पण त्यांना सिंधू अस म्हणता येतच नव्हते किंवा त्याचा उच्चार सिंधू ऐवजी हिंदू असा व्हायचा आणि हिंदू हे नाव प्रचलित झाले अस काही इतिहासकार सांगतात 

मुळात धर्म हा शब्द भगवद्गीतेत किंवा पौराणिक ग्रंथात खूप वेळा आलेला आहे असं तुमच्या चाणाक्ष बुद्धीने हेरले असणार हे नक्की पण महाभारत काळात कोणता दुसरा धर्म अस्तित्वात होता का हो? कोणी पाद्री, मौलाना होता का? तसा साधा उल्लेख तरी सापडतो का? नाही म्हणजे हिंदूंच्या देशात किंबहुना जगात केवळ हिंदूच होते पण कोणताही पंथ अस्तित्वात नसल्याने हिंदू धर्म अस नामकरणाची गरजच नव्हती कारण जगण्याची जी पद्धती होती ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला हस्तांतरित केली जायची आणि तीच पद्धत रूढ होत होत आजची सनातन हिंदू पद्धती निर्माण झाली. धर्म ह्या शब्दाचा अर्थ भगवद्गीतेत येतो ते माणसाचे कर्तव्य म्हणून ना की त्या व्यक्तीचा पंथ म्हणून. थोडस वेगळं वाटत असले तरी शांत डोकं ठेवून केल्यास मी व्यक्त केलेला हा विचार तुम्हाला थोडा का होईना योग्य वाटेल. महत्वाचे म्हणजे तुम्ही हा वाक्यप्रचार खूप वेळा ऐकला असाल आणि तो ही अर्धाच  ऐकला असणार " अहिंसा परमो धर्म" पण  श्लोकाचा उर्वरित भाग " धर्म हिंसा तथैव च" हा भाग काही महाभागांनी न शिकवल्यामुळे हिंदू म्हणून घेणाऱ्या लोकांचे बरेच नुकसान झाले. असो
“अहिंसा परमो धर्म: धर्म हिंसा तथैव च “ ह्या श्लोकात उल्लेख झालेला धर्म हा शब्द कोणता पंथाची माहिती देत असावा बर? मुळात आधी व्यक्त झालो  त्याप्रमाणे जगात केवळ सनातन धर्म असल्याने धर्म ह्या शब्दाचा अर्थ पंथ असा घेणेच चुकीचे आहे. माणसाच्या स्वार्थी स्वभावाने माणसाचे विभागणी झाली त्यावेळी प्रत्येक गटाला धर्म अस संबोधले जाऊ लागले असावे अस माझं मत आहे. गूगलवर शोधलं तरी अस मत सापडणे अवघडच पण मनात आलेल्या ह्या भावना व्यक्त होण्यासाठीच मी हे माध्यम वापरत असतो आणि तेच पुन्हा आज मी करतोय ह्याचा मला आनंदच आहे. आता “अहिंसा परमो धर्म: धर्म हिंसा तथैव च “ ह्या श्लोकात धर्म ह्या शब्दाचा अर्थ कर्तव्य असा घेतल्यास श्लोकाचा अर्थ असा होतो की अहिंसा हे माणसाचे परम कर्तव्य आहे पण ह्या अहिंसा कर्तव्यावर कोणी आघात करणार असेल तर हिंसा करणे चुकीचे नाही. असो आजच्या काळात धर्म म्हणजे पंथ हे एक अधिक एक बरोबर दोन हे गणित जसे फिट्ट बसवले आहे तस धर्म ही संकल्पना इतरांच्या डोक्यात घुसवणे अवघड. #सनातन ह्या शब्दाचा मराठीत अर्थ पारंपरिक, पुरातन, वैश्विक असा होतो तर इंग्लिश मध्ये Eternal असा अर्थ होतो आपला सनातन धर्म इतका प्रगल्भ आहे की एखाद्याने चार वेद, अठरा पुराणे आणि कैक हजारो पुस्तके तोंडपाठ असणारा व्यक्ती स्वतःला पंडित समजत असला तरी त्याचे ज्ञान समुद्रातुन बादलीभर पाणी काढून घेणे इतकेच असेल म्हणजेच बुद्धीमंत माणूस जेव्हा ज्ञानसागरात उभा राहील तर त्याचे केवळ  पायाचे तळवे  ज्ञानसागरात भिजलेले असतील. माझ्या ब्लॉग किंवा ट्विटचा मूळ उद्देश अश्याच साध्या पण विसरत चाललेल्या किंवा ज्या गोष्टी आपण प्रथा परंपरा नावाखाली करतो त्याची पार्श्वभूमी, त्यामागची गोष्ट सांगता येईल अशा ठेवण्याचा मी प्रयत्न करत असतो. #सनातन हा क्रमशः प्रकारातील थ्रेड असणार आहे ज्याची सुरुवात आजच्या ह्या प्रश्नाने करतो. मुळात कोणत्याही गोष्टीची सुरुवात ही आद्यदेवता गणपतीचे स्मरण करून करायचे असते त्यामुळे आजचा प्रश्न देखील गणपतीबद्दलच आहे. गणपतीच्याच नावाने सुरुवात का करतात याची माहिती हवी असल्यास  कमेटमध्ये व्यक्त व्हा म्हणजे ती ही गोष्ट ब्लॉग रूपात घेऊन  तुमच्या समोर सादर करतो. आजचा साधा प्रश्न म्हणजे ज्यावेळी आपण गणपती देवाचा उद्घोष करतो त्यावेळी "गणपती बाप्पा मोरया" अस म्हणतो पण हे #मोरया म्हणजे नक्की काय हा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? नाही पडला तर आज पडलाय अस समजा आणि सांगा बर हे मोरया म्हणजे काय आहे ते

अपेक्षेप्रमाणे कोणाचेही उत्तर आले नाही पण सनातन धर्म त्यातील गोष्टी यांची माहिती आजच्या धक्काधकीच्या आयुष्यात होण्यासाठी घेतलेला वसा टाकू नये या उक्तीप्रमाणे गणपती बाप्पा मोरया यातील मोरया हा शब्द कोठून आला हे मीच मांडतो.

चौदाव्या शतकात श्रीगणेश याचा एक भक्त होऊन गेले होते जे केवळ आणि केवळ गणपती ह्या देवतेला पूजत असायचे, आद्यदेवता अस समजायचे. आयुष्यभर त्यांनी श्रीगणेशाची भक्ती केली मोरगाव ह्या अष्टविनायक गणेशाने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे त्यांनी मोरगाव सोडून गणेश भक्तीत लिन होण्यासाठी चिंचवड गावात आपले बस्तान बसवले.कऱ्हा नदीच्या पात्रात त्यांना तांदळा स्वरूपात श्रीगणेश भेटले आणि त्यांनी आयुष्यभर त्याची पूजा करत शेवटी संजीवनी समाधी घेतली अश्या परमोच्च भक्तांची दखल श्रीगणेशाने नाही तर समाजाने घेतली होती आणि त्याचे प्रतीक म्हणूनच आद्यदेवता श्रीगणेश बरोबर त्याचे नाव जोडले गेले त्या भक्ताचे नाव म्हणजे मोरया गोसावी. चिंचवड गावात असणारा मोरया गोसावी हे मंदिर श्रीगणेश आणि त्यांचा भक्त मोरया गोसावी याची समाधी यासाठी प्रसिद्ध आहे. भक्तांची भक्ती भक्ताला युगाच्या आतापर्यत आपल्या आराध्य देवतेच्या नावाबरोबर जोडून टाकते.


शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०२३

शिवनेरी आणि महादेव कोळीचा उठाव


फेब्रुवारी महिना आला की तरुणाईला दोन सण खूप खुणावतात त्यातील महत्वाचा,प्रमुख सण म्हणजे #शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मतारखेवरून वाद असले तरी महाराष्ट्र सरकारने 19 फेब्रुवारी ही निश्चित केलेल्या तारखेशिवाय मराठी पंचांगानुसार एप्रिल महिन्यातदेखील शिवजयंती देशभरात उत्साहाने साजरा केला जाणारा सण आहे. मुळात दररोज साजरा करावा असा हा शिवजयंतीचा सण केवळ दोन दिवस साजरा होणे खूपच कमी पण तरीही दोन्ही दिवशी महाराष्ट्रातील जनतेसोबत देशातील लोक शिवजयंती धुमधडाक्यात साजरी करतात. महाराष्ट्रात तर पोर बोलायला शिकले की छत्रपती शिवाजी महाराज की जय ही आरोळी द्यायलाच पहिले शिकते म्हंटले तर वावगे ठरणार नाही. महाराजांचा जन्म शिवनेरी ह्या किल्ल्यावर झाला होता. ह्याच किल्ल्याच्या एका कमी प्रसिद्ध पण महत्वाच्या घटनेकडे तुमचे लक्ष केंद्रित करण्यासाठीच हा थ्रेड.

छत्रपती शिवाजी महाराज हे जहागीरदार आणि आदिलशहाच्या सैन्यात असलेले मराठा सरदार शहाजी भोसले यांचे मुलगे, पुण्याची जहागिरदारी शहाजी भोसले यांनी पत्नी जिजाबाई आणि बालशिवाजीच्या यांच्या खांद्यावर देखरेखीची जवाबदारी दिली गेली होती. ह्याचकाळात पुणे जहागिरीत फिरताना शिवाजी महाराज आणि जिजाबाई यांनी मराठी जनतेची चाललेली गळेचीपी, हाल आणि सतत कोणत्या ना कोणत्या यवन सैनिकांच्या तडाख्यात होणारे हाल ह्यात जनता पिचून गेलेली पहिली होती. कधी आदिलशाही, कधी निजाम तर कधी मुघल तलवारीच्या जोरावर मराठी जनतेचे शोषण करत होते. लहानपणापासून शूर योद्धे, रामायण महाभारत याच्या गोष्टी ऐकत मोठे होणाऱ्या बालशिवाजीला आजूबाजूला चाललेल्या स्वैराचाराचा खूप राग येत असे म्हणूनच समविचारी सवंगड्याना सोबत घेत हिंदवी स्वराज्याची मुहुर्तमेढ उभी करण्याची शपथ रायरेश्वराच्या मंदिरात घेतली होती. तयार झालेल्या ह्याच संगठणाने गमती गमतीत पुणे जहागिरीमधील तोरणा राजगड, पुरंदर सारखे महत्वाचे किल्ले जिंकल्यामुळे त्यावही प्रसिद्धी केवळ शत्रूच्या दरबारात न होता महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात पसरू लागली होती. केवळ स्वराज्याच्या सीमा वाढवून त्यावर सत्ता न गाजवणाऱ्या शिवाजी महाराजांचे  व्यक्तिमत्त्व, त्याचे परस्त्रिय मातेसमान,गरिबांना मदत करणारा,शेतकऱ्याच्या शेतातील पात्याला हात न लावणारा, ज्वलंत हिंदुत्ववादी, देव देवता,मंदिर यांची काळजी घेणारा राजा अशी प्रसिद्धी सर्वदूर पसरत होती. हीच प्रसिद्धी, स्वतःचे राज्य यातून प्रेरित होऊन शिवनेरी किल्ल्यावर काही कोळी तरुणांनी यवनांचे अधिपत्य नाकारत स्वतःचा झेंडा उभा करण्याची प्रेरणा घेत धूळखात आणि यवनांचे दुर्लक्ष झालेल्या शिवनेरीवर स्वतःचे निशाण फडकवले.

कोण होते हे वीर?


जुन्नर शहराला पुराणिक तसेच ऐतिहासिक महत्व, ह्याच शहराच्या जवळ असलेला समृद्ध नाणेघाट जुन्नर शहराचे प्राबल्य सिद्ध करण्यास पुरेसे आहे. जुन्नर तालुक्यात सर्वात जास्त बौद्धकालीन गुहा देखील आहे. केवळ ऐतिहासिक नाही तर आर्थिकदृष्ट्या जुन्नर आणि आसपासच्या परिसर खूप महत्त्वाचा त्यामुळे जुन्नरच्या शिवनेरी किल्ल्याला वेगळेच महत्व प्राप्त झालेले होते. अश्या जुन्नर शहर आणि आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी शिवनेरी ह्या किल्ल्याचे महत्व खूप होते. ह्या किल्ल्यावर सत्ता निजामाची असो की आदिलशाहीची वा असो मुघलांची काळजी घेण्यासाठी गडावर महादेव कोळी समाज असायचा. कोळी समाज म्हणजे मासेमारी करणारा अस ठरलेले असलं तरी जो कोळी समाज शेती करायचा त्याला महादेव कोळी अस संबोधलं जात. जुन्नरच्या आसपास राहणाऱ्या ह्या कोळी समाजाकडे किल्ल्याची राखणदारी,देखभाल ही काम पूर्वापार चालू होती. यवनांच्या दूर्लक्ष झालेल्या ह्या गडावर स्वतःचे अधिपत्य सांगून स्वतःचे राज्य उभे करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजाच्या स्वराज्य ह्या गोष्टीतून कोळी बांधवांनी घेतली होती हे विशेष. कोणताही संघर्ष नाही, कत्तल नाही पण गडावरचे निशाण आता बदलले होते.

गडावरचे निशाण बदलल्याची बातमी दिल्लीचा पातशहा जहांगीरच्या कानावर पडली. दक्षिणेत राज्य विस्तारासाठी त्याने त्याचा क्रूर, कपटी, धर्माध औरंगजेब मुलाला पाठवले होते. आदिलशहाचे दुर्लक्ष तसेच संपत चाललेल्या निजामाच्या गडांवर मुघलांचे वर्चस्व स्थापन करण्यास औरंगजेब आग्रही होता. शिवनेरी किल्ल्याचे भौगोलिक तसेच आर्थिक महत्व लक्षात घेत औरंगजेबाने शिवनेरीवर फार मोठी सैन्याची तुकडी पाठवली. सैन्याच्या ह्या तुकडीने गडावरील महादेव कोळीच्या गटाला पराभूत करत अटक केली. हा गट थोडा थोडका नसून किमान हजार लोकांचा तरी होता त्यांनी केलेले बंड आणि किल्ला ताब्यात घेतला म्हणून औरंगजेब खूप रागावला होता. अटकेत असणंऱ्या ह्या सगळ्या लोकांचा अमानुष छळ तो करत राहिला. धर्माध औरंगजेबाने एक दिवस शिवनेरी गडाच्या माथ्यावर मधोमध असलेल्या चौथऱ्यावर एका एक कोळी बांधवांना आणून त्याचा शिरच्छेद केला. इस्लामी धर्माध पुस्तकानुसार इतर धर्मीयांचे शिरच्छेद करणे, त्या शिराचे ढीग निर्माण करून दहशत माजवणे त्यातून धर्मातर करणे हे प्रकार त्यावेळी प्रसिद्ध होते. चौथाऱ्यावर केलेला हा रक्तपात एक धडा म्हणून कायम रहावा अशी ह्या क्रूर औरंगजेबाची इच्छा होती. चौथरा असलेल्या हे ठिकाणावर नंतर एक गोल घुमट बांधण्यात आले तसेच इथे फारसी भाषेत शिलालेख आढळतो. पुढे खिळखिळी झालेली आदिलशाहीकडून छत्रपती शिवाजी महाराज यांनी शिवनेरी किल्ला हस्तगत केला होता.


बंड अयशस्वी झाले, हजारो महादेव कोळी समाजाचे तरुणांची हत्या झाली असे हे शिवनेरी गडावरील ठिकाण बहुतांश लोकांना माहीत असेलच असे नाही म्हणूनच हा लेख. कधी शिवनेरीवर गेलाच तर त्या वीरांचे स्मरण करण्यासाठी इथे नक्की भेट द्या. शिवजन्मभूमी च्या शेजारी हेलिकॉप्टर उतरण्यासाठी जिजामाता आणि बाल शिवाजी याच्या पुतळ्यामागे जी बाग आहे तिथून थोड्याच अंतरावर हे ठिकाण आहे.




मंगळवार, ७ फेब्रुवारी, २०२३

धार्मिक शिक्षणाची गरज भाग 2

धार्मिक शिक्षणाची गरज ह्या आधीच्या लेखाचा दुसरा भाग आज तुमच्या पुढे मांडताना मला आनंदच होतोय. 

विराटने घातले आता हिंदूंनो तुम्हीही घाला हातात कलावा. डोक्यावर चंदन टिळक, हातात कलावा ह्या दोन गोष्टी हिंदू असण्याचे प्रतीक म्हणून मी स्वतः अंगभूत केलेली गोष्ट आहे. तुम्ही ही करा काही लोकांना कपाळावर टिक्का लावणे हे बुरसटलेले,जुन्या विचारसरणीचे लक्षण वाटते तर कधी ऑफिस,शाळा अश्या ठिकाणी परंपरागत धार्मिक गोष्टीचे समाजात अनुकरण करणे शक्य होत नाही त्यावेळी पाण्याचा टिळा लावणे सहज शक्य कारण लोकांना तो दिसणार नाही पण तुम्ही तो लावलाय याचे समाधान तुम्हाला मिळणार विराट एकटा पडला, वैयक्तिक कामगिरी ढासळली, अडचणी वाढल्या त्यावेळी देवाला नतमस्तक झाला आणि आयुष्यात झालेल्या सकारात्मक बदलामुळे त्याची अध्यात्मिक रुची वाढली अस म्हणायला हरकत नाही. देवावर श्रद्धा त्याची आधीही असेल पण आता निष्ठा वाढली हे सरळ स्पष्ट होते. जे होते ते चांगल्यासाठीच अस म्हटलं तर वावगे ठरू नये पण बहुतांश हिंदू कुटुंब, समाजात धार्मिक विधी, कर्मकांड, शिक्षणाला दुय्यम महत्व दिले जाते कारण पालक असलेल्या व्यक्तींना असे शिक्षण त्याच्या पालकांनी दिलेले नसते. पाचव्या सहाव्या वर्षी मुलांना शाळा ह्या चक्रात अडकवले जाते ज्यामुळे वयाच्या 21 बावीस वर्षापर्यत शालेय शिक्षण, डिग्री वा मुलाच्या आवड निवड असलेल्या गोष्टीत मास्टरकी मिळवण्यात निघून जातात. मास्टरकी मिळवली की पैसे कमावण्याचे पुढचे ध्येय मग लग्न त्यानंतर येणारी जवाबदारी, होणारी मुलाचे पालनपोषण यामुळे धार्मिक गोष्टीचे शिक्षणात हिंदू अशिक्षित राहतो. बर हिंदू ही इतकी मोठी शिक्षण पद्धती आहे की त्यात हजारो पुस्तके, कैक कोटी देव यामुळे कितीही शिक्षण, ज्ञान घेतले तरी ते समुद्रातून वाटीभर पाणी काढल्यासारखे. घरात देवघर असले पाहिजे, सकाळ संध्याकाळ त्याची पूजा अर्चना व्हायला हवी, शुभंकरोती, प्रमुख आराध्य देवाचे मंत्र, श्लोक तोंडपाठ हवे. पण सणसूद साजरे करण्याव्यतिरिक्त, सुट्टीच्या दिवशी फिरणे उपक्रमात वा अडचणीत सापडल्याशिवाय हिंदू देवळात जात नाही अश्यावेळी धार्मिक ज्ञान नसलेला हिंदू कोणत्याही स्वयंघोषित बाबा बुवांच्या भक्तीत जाण्याचा धोका असतो. कलियुगात बाबा, बुवा अवतारी पुरुष होऊ शकतील यावर माझा विश्वास नसल्याने भोलेनाथ, भगवान विष्णू या प्रमुख देवता तसेच आदर्शवत असलेल्या राम, कृष्ण याच्या नामस्मरणात नतमस्तक सनातनी हिंदूंनी व्हावे अशी माझी इच्छा असते. शेवटी हिंदू धर्माला चौकट कोणीही उभारू शकत नसल्याने किनी कोणाची भक्ती करावी हे ठरवता येऊ शकत नसले तरी सत्याच्या कसोटीवर परीक्षा घेत कोणावर विश्वास ठेवावा वा न ठेवावा हे लोकांनी ठरवले पाहिजे. भगवद्गीतेसारखा ग्रंथ घरात असेल तर त्याचे वाचन करावे, श्लोक पाठ करावे अश्या साध्या साध्या गोष्टीतून मुलांमध्ये धार्मिक गोष्टीची आवड, ज्ञान, माहिती देता येईल. हिंदूंनो जितके शाळेतील शिक्षण महत्वाचे तितकेच धार्मिक शिक्षण महत्वाचे हिंदूंनो विचार करा, सजग व्हा, संघटित व्हा.......

असाच एखादा लेख घेऊन तुमचा मित्र सनातन तुमच्यापुढे पुन्हा येईल, तोपर्यत माझा तुम्हाला नमस्कार. 

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०२३

गृहपती अवतार

!! ॐ नमः शिवाय !!


प्रत्येक अवताराच्या नावावर क्लिक केल्यास त्या त्या अवताराची प्राश्वभूमी ब्लॉग तुमच्या समोर उघडला जाईल. आज सातवा अवतार गृहपती अवतार आपल्यापुढे सादर करत आहे.

गृहपती हा भगवान शंकराचा सातवा अवतार आहे. कथेनुसार, नर्मदेच्या तीरावर असलेल्या धरमपूर नावाच्या नगरात विश्वनर नावाचा एक साधू आणि त्याची पत्नी शुचिष्मती राहत होते. शुचिष्मती दीर्घकाळ निपुत्रिक राहिली पण एके दिवशी तिला पतीपासून शिवासारखा पुत्र मिळावा अशी इच्छा झाली. मुनी विश्वनरांनी काशीला जाऊन भगवान शंकराच्या विरेश लिंगाची पूजा केली. एके दिवशी मुनी विरेश लिंगाच्या मध्यभागी एक बालक प्रकटले. मुनींनी शिवाची बालरूपात पूजा केली. तिच्या उपासनेने प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी गर्भातून अवतार घेण्याचे शुचिष्मतीचे वरदान दिले. कालांतराने, शुचिष्मती गरोदर राहिली आणि भगवान शंकर शुचिष्मतीच्या गर्भातून पुत्राच्या रूपात प्रकट झाले.

गृहपती बालकाचे वय वाढत होते त्याच्या जन्मानंतर घरात आनंदाचे वातावरण होते. एक दिवस देवर्षी नारद भ्रमण करत मुनींच्या आश्रमात आले. बालकाकडे पाहत तुमचा मुलगा अप्लायुषी आहे असं मुनींनी सांगितलं. नारदाच्या वक्तव्याने मुनी आणि त्याची पत्नी दुःखी झाले. पालकांना दुःखी पाहून गृहपतीने महादेवांची आराधना करत महामृत्युंजय मंत्र मिळवण्याचा निग्रह केला.

एक चांगल्या मुहूर्तावर गृहपतीने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन एका शिवलिंगाची स्थापना करत आराधना चालू केली. थोड्याच दिवसाच्या उपासनेनंतर देवेंद्र इंद्र गृहपतींपुढे अवतरीत होऊन हवा तो वरदान मागण्याचे आव्हान करू लागले. नम्र भाषेत गृहपतीने नकार देत त्याचे आराध्य देव महादेवाची उपासना करत असून तेच मला वरदान देतील अस सांगितलं. गृहापतीच्या उत्तराने इंद्र रागावले आणि गृहपतीवर प्रहार करण्यास चाल केली. हल्ला होण्याआधीच तिथे महादेव अवतरीत होऊन इंद्राच्या रूपात गृहापतीची परीक्षा घेत होते सांगत यमराजाच्या प्रभावापासून वाचवण्याचे वरदान दिले.

ज्याठिकाणी गृहपतीनी लिंग तयार केले होते ते आज अग्निश्वर म्हणून प्रसिद्ध असून त्याची आराधना केल्याने वीज, अग्नी यापासून रक्षण होते असा भाविकांची भावना आहे.

पुढच्या भागात महादेवाचा आठवा अवतार ऋषी दूर्वासा 


!! ॐ नमः शिवाय !!

क्रमशः 




शुक्रवार, ३ फेब्रुवारी, २०२३

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका

भारतीय संघ जिंकतोय याचा आनंद आहे पण सतत जिंकत राहिल्याने चुकीच्या गोष्टीकडे डोळेझाक कानाडोळा होत असते, होण्याची शक्यता असते. खेळाडू अतिआत्मविश्वासी होऊ शकतात ज्याचा तोटा भारताला महत्वाच्या, मोठ्या स्पर्धेत म्हणजेच विश्वचषकात होतो. भारतीय संघाने हरावे अशी इच्छा नसली तरी खेळाडूंचे पाय जमिनीवर राहावे म्हणून अधून मधून एखाद दुसरा पराभवाचा झटका बसल्याने खेळाडूंना रियालिटी चेक मिळत राहील ज्याने विजय मिळवण्याची इच्छा वाढण्यास मदत होईल. मोठ्या स्पर्धेत संघ निवड हे सगळ्यात मोठे आव्हान आहे कारण योग्य खेळाडूंना संधी मिळाली पाहिजे ना की त्या खेळाडूंना ज्याचे कर्णधार वा निवड होण्यास कारणीभूत असणाऱ्या लोकांशी जवळीक आहे. दिनेश कार्तिक आणि अश्विन याची टी ट्वेंटी विश्वचषकात झालेली निवड त्यातून संघाची झालेल्या फरकट यातून भारतीय संघाने शिकण्याची गरज. संघ निवडीमध्ये आवड निवड याना पाठबळ मिळते याचे मोठे उदाहरण म्हणजे के एल राहुल. आता WTC फायनलच्या आधी महत्वाची असणारी शेवटची श्रुखला ऑस्ट्रेलिया विरुद्ध आहे ज्यात निवडलेल्या संघात पंतच्या जागी दुसरा यष्टीरक्षक म्हणून के एस भारत ह्याला अंतिम संघात प्रवेश मिळणे क्रमप्राप्त असताना सूर्याला खेळवण्यासाठी के एल राहुल यष्टीरक्षक करण्यास भारतीय संघ लावू शकतो किंवा भारतला टाळून इशान किशनला संधी देऊ शकतो असे झाले तर कित्येक दिवसांपासून दुसरा यष्टीरक्षक म्हणून संघात बाकावर बसणाऱ्या के एस भारताशी धोका होणार नाही का? के एस भारत पंतची रिप्लेसमेंट आहे का? की केवळ वृद्धीमान साहा ह्याला दूर करण्यासाठी केलेली निवड समितीची चाल होती? बांगलादेश दौऱ्यात निवड झालेले,बाकावर बसून मोठ्या खेळाडूसाठी पाणी ने आण करणारे अभिमन्यू ईश्वर, सौरभकुमार याचा विचार तरी केला आहे ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी? के एस भारत किती खेळला, कसा खेळला याची जास्त माहिती नाही पण एन जगदीश्वरन जो आयुष्याच्या सर्वोच्च फॉर्मात असताना त्याला संधी न देणे कितपत योग्य? भारतीय संघात तेच ते खेळाडू खेळतात ते केवळ आताच नाही याआधी सेहवाग, द्रविड, सचिन,सौरभ,धोनी, कुंबळे, हरभजन अशी फिक्स खेळाडू खेळण्याने अनेक प्रतिभाशाली खेळाडू जसे अभिजित काळे, अमोल मुजुमदार, लक्ष्मीरतन शुक्ला सारख्या अनेक प्रतिभाशाली खेळाडूंना भारतीय संघात स्थान न मिळण्याचे अनेक दाखले भूतकाळात दडून बसलेले आहे. संजू सॅम्पसन हा असाच शापित खेळाडू आहे ज्याला निवडले तर जाते पण संघात जागा बनत नाही, जागा बनली तर निरंतर खेळवले जात नाही, खेळवले तर हा खेळाडू जखमी तरी होतो किंवा संघाची गरज बघता त्याच्या पोटेन्शलपेक्षा कमी कामगिरी करत संघबाहेर होतो. मोठ्या, मुख्य स्पर्धेत योग्य खेळाडूंची निवड होणे महत्त्वाचे त्यासाठी एका जागेसाठी 4 चार पर्याय उपलब्द असल्याने कोणी एकच निवड होत असल्याने इतरांवर अन्याय झाला ही भावना होणे स्वाभाविक असले तरी निवड झालेल्या खेळाडूंनी भारतीय संघाला विजयी करण्यासाठी सर्वोत्तम कामगिरी केली पाहिजे

हो अजून 10-12 दिवसाचे अंतर आहे ऑस्ट्रेलिया दौरा चालू होण्यासाठी पण ज्या पद्धतीचा खेळ आणि खेळाडू त्याच्याकडे आहे ते पाहता क्रिकेट रसिकांना ह्या श्रुखलेकडून बऱ्याच अपेक्षा असतील यात दुमत नसेल. आज ऑस्ट्रेलिया संघाचा थोडासा अंदाज घेऊ या अस वाटल्याने हा थ्रेड वाढवतो आहे.

पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली येणारा हा संघ त्याच्या इतर भूतकालीन संघांप्रमाणे भारतात शृंखला जिंकण्याच्या मनसुब्याने येत असणार हे निश्चितच. क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलिया संघ बलाढ्य होता आणि आहे पण ह्या बलाढ्य संघाला भारतात भारताला हरवणे अनेकवेळा अवघड गेले आहे.
ऑस्ट्रेलिया संघ पुढील
प्रमाणे आहे
उस्मान ख्वाजा
डेव्हिड वॉर्नर
मारनस लबुसचेंजने
स्टीव्ह स्मिथ
ट्रविस हेड
अॅलेक्स कॅरी
कॅमेरून ग्रीन
नॅथन लायन
पॅट कमिन्स
जोश हेजलवूड
मिचेल स्टार्क

या आघाडीच्या खेळाडूंबरोबर
मॅट रेनशॉ
पीटर हॅन्डस्कॉम्ब
अशटोन अगर
मिचेल स्वीपसन
स्कॉट बोलंड
टॉड मर्फी आणि
लान्स मॉरिस

भारतीय भूमीत 70 च्या दशकात मिळालेल्या यशाची पुनरावृत्ती करण्याच्या इच्छेने भारतात येणार आहे. खेळाडूंचा गठ्ठा पाहता कोणाला खेळवायचे, कोणाला वगळायचे ही प्रमुख डोकेदुखी ऑस्ट्रेलिया संघावर आहे हे निश्चितच.
वर उल्लेख केल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाचा हा संघ धोकेदायक तर आहेच हे कोणाच्याही लक्षात आलेच असेल पण टॉड मर्फी आणि लान्स मॉरिस सोडले तर बाकीचे सदस्य देखील पट्टीचे खेळाडू आहेत. पहिला सामना नागपुरात आहे आणि नागपूरमध्ये खेळपट्टी जलदगती गोलंदाजांना जास्त सहकार्य करते असा इतिहास आहे
अश्या परिस्थितीत काही दिवसांपासून उत्तम कामगिरी करणाऱ्या बोलंडला संधी देण्यासाठी कमिन्स कोणाचा बळी देईल बर? मिचेल स्टार्क की ग्रीन असो पण इतर उर्वरित संघ फिक्स आहे. खेळपट्टी पाहून लायनला साथ देण्यासाठी अगर किंवा स्वीपसन याना वेगवान गोलंदाजांच्या ऐवजी जागा संघात मिळू शकते.

पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी भारतीय संघ देखील घोषित झालेला आहे ज्यात
रोहित
शुभमन
पुजारा
विराट
श्रेयस/ सूर्या
के एस भारत/ के एल राहुल
जडेजा
अश्विन
शमी
सिराज
कुलदीप

तसेच
उमेश यादव
जयदेव उनाडकट
इशान किशन
अक्सर पटेल खेळाडूंचा समावेश आहे.

श्रेयसला झालेली दुखापत आणि न्यूझीलॅन्ड
मालिकेतून घेतलेली माघार पाहता पहिल्या कसोटी श्रेयस की सूर्या हे फिटनेस टेस्ट ठरवू शकते. तस सूर्या कसोटीत काही दिवे लावले असे मला वाटत असल्याने श्रेयसने फिट व्हावे ही इच्छा आहे. संघातील काहींचा आवडता के एल राहुल हा देखील ह्या पाचव्या नंबरसाठी आग्रही असण्याची शक्यता आहे अन्यथा
यष्टीरक्षक बनल्याशिवाय संघात त्याची जागा बनत नाही. कैक दिवसापासून दुसरा यष्टीरक्षक म्हणून हिंडणारा के एस भारतच पहिली कसोटी खेळेल अस वाटत असेल तरी राहुलला बेंचवर बसलेले पाहणे टीम मॅनेजमेन्टसाठी अवघड निर्णय असू शकतो. भारतीय भूमीत कसोटी आणि फिरकी गोलंदाज याची प्रेम कहाणी खूप जुनी अश्यावेळी अश्विन, जडेजा, कुलदीप हे त्रिकुट चारपैकी 3 कसोटीत खेळताना मी तरी पाहतोय. यातही अश्विनने दमदार कामगिती करावी अशी मनोमन इच्छा असली तरी कुलदीप प्रकशझोतात असण्याची दाट शक्यता वाटते.अक्षर पटेलला संधी केवळ रवींद्र जाडेजाच्या जागी मिळू शकेल अन्यथा नाही. शमी सिराज हे दोन वेगवान गोलंदाज इतर फिरकी गोलंदाजांना मदत करताना दिसू शकतात. दोन्ही संघ बघता विजय मिळवणारा हा संघ अस कोणीही ठामपणे सांगू शकणार नसले तरी जिंकणारा आणि हरणारा यांच्यात धाग्याइतके फरक असणार आहे. नशीब ज्याचे बलवत्तर तो जिंकेल. जरी मालिका भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असली तरी वैयक्तिकदृष्ट्या खेळाडू एकमेकांना वरचढ राहण्याचा प्रयत्न करतील. उदा अश्विन विरुद्ध लायन अश्विन 88 सामन्यात 449 तर लायन 115 सामन्यात 460 विकेट आहेत. 4 सामन्याची ही लढाई दोघात देखील पहायला मिळणार आहे


दुसरी महत्त्वाची जोडी म्हणजे विराट विरुद्ध स्मिथ. 104 सामन्यात 8119 धावा 49 च्या सरासरीने जमवणारा विराटच्या विरुद्ध 92 सामन्यात 8647 धावा 61 च्या सरासरीने करणारा स्मिथ. दोघांच्या खेळलेल्या सामन्यात आणि स्वतःच्या खात्यात धावा जमावण्यात तफावत असली तरी दोघांतील संघर्ष जोरदार होईल

इतर खेळाडूंचे म्हणाल तर फेस टू फेस स्पर्धा नसली तरी प्रत्येक खेळाडू वैयक्तिक कामगिरी चांगली करत आपल्या नावाचे नाणे वाजवण्याचा प्रयत्न करेल. भारतच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाचा संघ उजवा वाटतो तो त्याच्या रेकॉर्डस् आणि त्याच्या खेळण्याच्या शैलीमुळे. कसोटीत संयमाची परीक्षा असली तरी एकदा मैदानात पाय रोवले की ख्वाजा, वॉर्नर,मारन्स मोठ्या खेळी खेळण्यात तरबेज आहेत. त्याचा हेड, ग्रीन आणि कॅरी हे रिषभ पंत जश्या ताबडतोब खेळया खेळतो तश्या करण्यात माहीर आहेत. गोलंदाजीत कमिन्स, हेझलवूड, स्टार्क यांच्याबद्दल जग जाणतेच. स्टार्क जखमी असल्याने त्यांच्या बदली खेळाडू बोलंडदेखील तितकाच घातक गोलंदाज. फिरकी गोलंदाजात लायनला सोबत एकतर अगर करेल किंवा स्वीपसन. दोघे लायन इतके कुशल नसले तरी एखाद दुसरी सर्वोत्कृष्ट खेळी करण्याची त्याच्यात ताकद आहे. ऑस्ट्रेलियन थिंक टॅन्कची मनस्थिती आणि भूतकाळातील संघ निवड पाहता 3 वेगवान, 1 फिरकी, ऑलराउंडर ग्रीन अशी
गोलंदाजाची फळी सोबत यष्टीरक्षक आणि प्रमुख 5 फलंदाज असा संघ ते निवडतील हे जवळपास फिक्स आहे. कारण कामचलाऊ गोलंदाजी करण्यासाठी त्याच्याकडे एक सोडून दोन दोन लेग स्पिनर आहेत, स्मिथ आणि लबुसचेंजने
तुलनेत भारताकडे असणारे खेळाडु कामगिरीत कमी नसले तरी त्याची कामगिरीचा आलेख वर खाली असण्याचे प्रमाण पाहता ऑस्ट्रेलिया संघापेक्षा कमकुवत संघ वाटतो.ज्याप्रकारे ऑस्ट्रेलियाचा कोणता संघ खेळेल हे जवळपास पक्के आहे तिथे भारतीय संघात कोणाला घ्यायचे याबद्दल ठाम मत सामन्याच्या आधी तयार होईल
टीम मॅनेजमेंटचा आवडता खेळाडू के एल राहुलची जागा संघात बनवण्यासाठी संघाचा समतोल बिघडला जाईल अस माझं वैयक्तिक मत आहे. राहुलला सलामीला खेळवायचे की दुखापतग्रस्त श्रेयसच्या जागी की श्रीकर भारतला डावलून यष्टीरक्षक म्हणून खेळवायचे हे लवकर ठरेल असा विषय नाही. माझ्या मतानुसार शुभमन गिल ज्या फॉर्मात आहे ते पाहता रोहितसह सलामीला खेळवले पाहिजे. पुजाराने केवळ चेंडू न खाता धावा काढल्या पाहिजे. विराट चौथ्या तर पाचव्या स्थानी के एल आणि सूर्या यातील एकाची निवड. यष्टीरक्षक म्हणून श्रीकरला पहिल्या कसोटीत स्थान मिळाले पाहिजे. जडेजा आणि अक्सर समान शैलीचे खेळाडू असल्याने
त्यातील एक, अश्विन याबरोबर फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर कुलदीपला संधी दिल्यास ऑस्ट्रेलिया संघातील खेळाडूंची पिसे उडवण्यास सोप्प पडेल. बुमराहच्या अनुपस्थितीत सिराजने केलेली उत्तम कामगिरी सोबत अनुभवी शमी असा संघ निवडला जाऊ शकतो. अक्सर, उमेश गुणवत्ता असूनही संघाबाहेर रहावे लागेल
जयदेव उनाडकट आणि इशान किशन राखीव खेळाडू म्हणून सध्यातरी योग्य वाटत आहे. तुलनेत ऑस्ट्रेलिया खेळाडू सरस असले तरी भारतीय खेळपट्टीवर कसलेल्या फिरकी गोलंदाजांना सामोरे जाणे त्यांना सोपे जाईलच असे नाही. असो भारतीय संघाने ही मालिका जिंकावे हीच इच्छा कारण हेच पहिले ध्येय भारतीय खेळाडु असायला हवे नंतर WTC ची फायनल. भारतीय संघाने मालिका जिंकल्यास क्रिकेटच्या प्रत्येक प्रकारात पहिल्या क्रमांकावर येणारा पहिला संघ बनू शकतो. खेळातील शत्रुत्व पाहता येणाऱ्या ह्या चार कसोट्या जोरदार होतील यात कोणतीही शंका नाही. केवळ भारत वा ऑस्ट्रेलियात नाही तर जगातील क्रिकेट रसिक
ह्या कसोटी मालिका सुरू होण्याची वाट पाहत असणार हे नक्की.


                                           ------- सनातन

बुधवार, १ फेब्रुवारी, २०२३

धार्मिक शिक्षणाची गरज

एक दोन महिन्यांपूर्वी असे वाचले होते की हिंदू आपल्या मुलांना धार्मिक ग्रंथ लहानपणी वाचण्यास देत नाही ज्यामुळे त्याच्यात धर्माची पाळेमुळे, संस्कृतीची जाण इतर कट्टरवाद्यांप्रमाणे येत नाही. थोडासा विचार केला आणि वाक्याचे शब्दनशब्द खरे वाटले. थोडी फार देवपूजा,शुभम करोती,आता विश्वात्मके देवे व्यतिरिक्त देवळाच्या पुढून जाताना घाईघाईत एका हाताने, डोळे मिचकावून, छातीला हात लावून, हात उंचावून मान वाकवून नमस्काराचे वेगवेगळे प्रकार करणारे कित्येक भेटतील. माझ्या स्वतःच्या घरात श्रीभगवद्गीता लहानपणापासून आहे पण ना ती माझे पालक वाचताना आढळले ना त्यांनी मला कधी सक्ती केली. सनातन हिंदू धर्मात इतकी पुस्तक, ज्ञान आहे की एका जन्मात ते सगळे आत्मसात करणे कोणालाही शक्य नाही त्यामुळे केवळ एक जादुई पुस्तकाचा रट्टा मारून धर्माध बनणाऱ्या शांतिदूतांपेक्षा आपला धर्म खूप वेगळा आणि मोठा आहे.शक्यतो पालक पैसे कमवण्यासाठी मरमर काम करतात तर आपल्या सारखे आयुष्य मुलाच्या वाट्याला येऊ नये म्हणून मुलांना अभ्यासाची सक्ती करतात त्यामुळे घरात धर्माचे शिक्षण दिले जातेच अस नाही. बहुतांश वेळा वर्षभरात साजरे होणारे सणसूद का साजरे करतात, त्यामागे काय धार्मिक महत्व आहे, कथा काय आहे याबद्दलची माहिती देखील हिंदूंना नसते.केवळ कॅलेंडरमध्ये सण आला की नवे कपडे आणि त्या दिवसाच्या रितिभाती पूर्ण केल्या की सण साजरा झाला याचे समाधान करत सुट्टीचा आनंद घेणारे कैक आहेत. विज्ञानाच्या ह्या युगात धार्मिक शिक्षण घ्या असा माझा आग्रह नाही पण धर्माला विसरून केवळ पोटापाण्याची सोयीचा विचार केल्यास धर्म संपण्याची, मागे पडण्याची, ह्या प्रवृत्तीचा फायदा घेत इतर धर्मीय धर्मातर करण्याचा सपाटा तर लागतच आहे हे वास्तव पाहण्यासाठी कुटुंबाखेरीज आजूबाजूला काय चालले आहे त्याकडे लक्ष द्यायला विसरू नका. मुलांना सनातन धर्माचे ज्ञान देण्याचा प्रयत्न प्रत्येक हिंदू कुटुंबाने केला पाहिजे किमान प्रमुख धार्मिक पुस्तक जसे भगवद्गीता घरात असलीच पाहिजे. गेल्या काही महिन्यापासून मी आणि माझ्या दोन मुली यांनी एक एक श्लोक करत प्रथम अध्याय अर्जुनविषादयोग मधील पहिले 21 श्लोक तोंडपाठ केले आहे. दररोज संध्याकाळी ठीक साडे सहा वाजता गीतेचा एक श्लोक पाठ करण्याचा, त्यानंतर उजळणी म्हणून पहिला श्लोक ते आज पाठांतर चालू असणारा श्लोकपर्यत करणे हा नित्यक्रम झाला आहे. मुलांना आता रोजच्या ह्या दिनक्रमाची सवय लागल्याने स्वतःहून त्या आनंदाने गीता वाचण्यास, पाठ करण्यास बसतात पण अस करणे अवघड आहे कारण आपली बोली भाषा मराठी तर धार्मिक पुस्तक संस्कृतमध्ये असतात. संस्कृत वाचायला, समजायला अवघड शिवाय संस्कृत शिकवत नाही ना शाळेत त्यामुळे धार्मिक पुस्तक वाचण्याचा संकल्प जास्त दिवस चालवणे तसे अवघड. त्यामुळे डिजिटल मदत घेत श्लोक उच्चार, अर्थ समजावून घेत एक एक श्लोक समजवून घेत पाठ करणे, घरात अध्यात्मिक वातावरण वाढवणे, मुलांना धर्माची ओळख करून देणे, माहिती देणे हे प्रत्येक सनातनी हिंदूंचे आद्यकर्तव्य असले पाहिजे.हिंदूंनो मूठभर हिंदू जागे होऊन धर्माचे रक्षण होऊ शकणार नाही त्यामुळे सजग व्हा, संघटित व्हा.


सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...