सोमवार, ४ एप्रिल, २०२२

कॉमेडी आणि कॉमेडियन

जय श्रीराम मनुष्य,पृथ्वीवरील सर्वात बुद्धीमंत प्राणी. इतर प्राण्यांपेक्षा वेगळा कारण म्हणजे त्याच्या व्यक्त करत असलेल्या भाव भावना, भाषा, विचार. प्रत्येक दिवशी काही तरी नवीन शिकण्याची जिद्द असलेला हा मनुष्य मात्र ठराविक वयाच्या टप्प्यावर घर,कुटुंब,नोकरी,पैसे या चक्रव्यूहात अडकला जातो पण तरीही जे महाभारतात अभिमन्युला जमले नाही ते चक्रव्यूह फोडण्याचा नाहींच तर निदान चक्रव्यूहात आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतो. आनंद घेण्याचा, अनुभवण्याचा प्रत्येक व्यक्तीच्या निकष जरी वेगवेगळा असला तरी प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात विनोदाला/ कॉमेडी ला एक वेगळीच जागा असतेच. दिवसभराच्या ताण तणावाच्या, सुख दुःखाच्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी विनोदाची गरज प्रत्येकाला पडतेच, नाही का? कॉमेडी, लहानपणी छोट्या मोठ्या विनोदातून चालू होणारी ही मैफिल आयुष्यात चालू होते. एक म्हातारी लहानपणीच मेली असेल किंवा हत्ती आणि मुंगी यांचे एकाहून एक सरस विनोद सगळ्यांना आठवत असतीलच. थोडं अजून मोठं झाल्यावर सोबतीला संटा आणि बंटा आले आणि छोट्या मोठ्या प्रसंगात बरेच हसण्याचे प्रसंग देऊन गेले. पुढं आयुष्यात ओठांवर केस यायला लागल्यावर थोडे अश्लीलत्याकडे वळणारे विनोद प्रत्येकानेच केले असणार हे नक्की.काही वर्षांपूर्वी कॉमेडी मराठीतील दादा कोंडके, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाधव यांची विनोदी शैली असेल किंवा हिंदी चित्रपटातील जॉनी वॉकर, जयदीप,असराणी वा कॉमेडी चित्रपटाचा नायक गोविंदा यांनी लोकांना हलक्या फुलक्या विनोदाने हसवत राहिले त्याही पुढं जाऊन कॉमेडियन लोकांची कॉमेडी सर्कस आणि त्याचे प्रत्येक चॅनेलवर येणारे तत्सम कार्यक्रम काही वर्षांपूर्वी खूपच हिट झाले होते. काही तर अजून चालू आहे जसे हास्यजत्रा, चला हवा येऊ द्या किंवा कपिल शर्माच्या विनोदी (?) कार्यक्रम. ह्याही पुढची स्टेप म्हणजे विदेशातील कार्यक्रमाचे केलेले अनुकरण ज्यात आजचे विद्वान शिव्या, कमरेखालील विनोद करून त्याला स्टँड अप कॉमेडी अशी ओळख दिली आहे कधी कधी त्यात देव देवतांचा अपमान केला जातो तर कधी राजकारणी लोकांची उणिधुनी काढताना धर्मावर घसरले जाते तर कधी भारत देशावर अशी टिप्पणी केली जाते की काँट्रॅव्हरसी निर्माण होते तर कधी थोर राजे, प्रथा यांचे विडंबन केले जाते आणि त्यानंतर एखादी संघटना त्यावर कारवाई ही करते म्हणजेच काय विनोद आणि विनोदवीर यांची चांगली चलती आहे. असाच एक कोमीडियन एका राज्याच्या मुख्यमंत्री पदावर बसलेला आहे जो काही वर्षांपूर्वी कॉमेडियन म्हणून टीव्हीवर यायचा तर भारत देशात असे काही मुख्यमंत्री आहेत हे मुख्यमंत्री झाल्यावर कोमीडियन झाले. असो असाच एक कोमीडियन एका देशाचा राष्टाध्यक्ष झाला आहे तो देश म्हणजे युक्रेन. युक्रेन रशिया युद्ध का होत आहे याचा अंदाज आता सगळ्यांना आला असेलच किंवा नसेल पण हा विध्वंस, संहार थांबबता आला असता पण तस न होण्यामागेही कॉमेडियन जवाबदार आहे हे विसरता येणार नाही.महाराष्ट्र असो की पंजाब इथे जे राजकीय कॉमेडीचा उदय झालाय त्याला सर्वस्वी जवाबदार इथली जनता आहे आणि माझे पेटंट वाक्यनुसार गर्दीला डोकं नसत त्याच प्रकारे डोके नसलेल्या ह्याच गर्दीला राजकारणातील ही कॉमेडी जोपर्यत लक्षात येईल तोपर्यत खूप उशीर झालेला असणार ह्यात शंका नाही. कोमीडियन च्या हातात सत्ता गेल्याने काय होत हे जग युक्रेन कडे पाहून समजून घेईल पण भारतीय लोकानो तुम्ही कधी सजग बनणार, संघटित बनणार?

कश्मीर फाईल्स

 जय श्रीराम,


कश्मीर पृथ्वीवरील स्वर्ग, लहानपणी चित्रपटात दिसणारा कश्मीर, तिथला निसर्ग, झाड झुडपे, तळी, त्यात फिरणाऱ्या होड्या आणि आपल्या भागात कधीही न पडणारा,दिसणारा बर्फ आणि बर्फाचा पाऊस सगळं पाहून वाटायचं की किती भारी आहे हे सगळं आणि चित्रपट चालू असतानाच आई वडिलांकडे तिकडे जाण्याचा हट्ट केला जायचा तितक्याच उस्फुर्तपणे तो मान्य ही केला जायचा पण तो कधी पूर्ण होऊ शकला नाही, तेव्हा ही आणि आजही. कटारा, वैष्णवदेवीला जाऊन आलो पण अजूनही कश्मीर फाईल्स माझ्यासाठी अनोळखी आणि खूप लांब आहे. भविष्यात नक्कीच कश्मीर फिरणार असा मनोदय लहानपणी होता तसा आजही आहे फक्त तो पूर्ण कधी होणार हे सांगणं थोडं अवघड आहे.

चाकणसारख्या गावात लहानाचा मोठा झालेलो मी लहानपणापासून एक गोष्ट पाहत आलोय ती म्हणजे तो अल्पसंख्याक समाज वेगळा राहायचा, गरज म्हणून एकत्र असण्याचे नाटक ही करत असावा पण ती लोक त्यांची मूल फक्त त्याच्यात धर्माच्या लोकांशी एकत्र असत. शॉट पिच क्रिकेटच्या स्पर्धा भरायच्या जागोजागी लहानपणी त्यावेळीही त्याचे चार पाच संघ चांद तारा नावाने खेळले जायचे. जमातीची लोक गल्लीतून फिरायचे, जी लोक,मूल नमाज ला जायचे नाही त्यांना समजावून गोंजारून तस करण्यास भाग पाडायचे. कित्येकदा त्याची मुलं संध्याकाळी जमातीची मानस येऊन बोअर करतील म्हणून लपून राहायची, जमातीची लोक दिसली की पळून जायची. बुरखा असो की जाळीदार टोपी किंवा बिना मिशीची मोठी दाढी क्वचित दिसायची पण संख्येने कमी असले तरी कुठं थोडस वादाचे कारण झाले की हे अल्पसंख्याक मशिदीतून लोंढेच्या लोंढ्याने आलेले ही मी पाहिले आहे. हिंदू अश्यावेळी एकटा पडतो, शेजारीही सोबत उभा राहत नाही त्यावेळी त्या हिंदूंची जात पहिली जाते नंतर त्याची वागणुक आणि सगळ्यात शेवटी त्याच्याशी असच व्हायला पाहिजे म्हणत घरात जाताना ही पाहिले आहे. याचा अर्थ चाकण मध्ये धार्मिक तेढ आहे, धार्मिक संघर्ष आहे असं अजिबात नाही सगळे एकोप्याने राहतात पण तो एकोपा कुठपर्यंत जपायचा याचे ज्ञान त्या अल्पसंख्याक समाजाला नक्कीच आहे. माझ्या ह्या लिखाणाने तुम्ही चाकण मधील परिस्थितीचे चुकीचे निष्कर्ष काढावे अस वाटत नाही पण अशीच सर्वसाधारण परिस्थिती प्रत्येक भागात असणार याबाबत दुमत नाही. थोडस आठवून पाहिले तर तुमच्या आठवणी देखील अश्याच असण्याची शक्यता आहे. आज चाकण खूप मोठं झाले आहे, नाही नाही त्या ठिकाणाहून लोक चाकणला येत आहे,राहत आहे तस तो बौद्धिकदृष्ट्या मागासलेला, धार्मिक, बुरसटलेला समाज ही वाढत आहे, त्याची कट्टरता वाढत आहे, दाढ्या टोप्या सर्रास झाल्यात, जिथं त्याची संख्या जास्त आहे तिथं हिंदू लोक जागा विकत आहे कारण त्याचे राहणीमान, बहुसंख्य झाल्यावर त्याच्या मानसिकतेत होणारा बदल आणि एकट पडल्याची भावना हिंदूंना आजही पलायन करण्यास भाग पाडत आहे हे सत्य आहे फक्त ते कोणी व्यक्त करत नाही किंवा बोलत नाही. (खंडोबाचा माळ आता मुस्लिम बहुसंख्य आहे)

आज द काश्मीर फाईल्स चित्रपट पाहिला

चित्रपटाची ज्याप्रकारे माऊथ पब्लिसिटी झाली, चित्रपट पाहून परतणारे जसे भारत माता की जयकारे देत होते, लोकांचे रडणारे व्हिडीओ व्हायरल होत होते, पंतप्रधान, उपराष्ट्रपती इतकेच काय करणं जोहर किंवा अन्य फिल्म लाईन संबंधी लोक हा चित्रपट नसून एक विचार आहे, चळवळ आहे असं बोललं गेले. राजकारणी केजरी किंवा उद्धट टॅक्स फ्री न करण्यासाठी केलेले वक्तव्ये एकूण चित्रपट पहायचा अस पहिल्यापासून असणारे मत अजून दृढ झाले आणि आज हा चित्रपट पहिला आणि जास्त फिरून फिरून बोलण्यापेक्षा एका वाक्यात सांगायचे झाले तर माझा अपेक्षाभंग झाला. अनुपम खेर असो की मिथुन यांचा अभिनय चांगला झालाय पण चित्रपटात महत्वाचे कॅरेक्टर करणारा कृष्णा असो की बिट्टा अभिनय अजून चांगला करता आला असता इतकेच नाही तर विवेक अग्निहोत्रीचे डायरेक्शन हे ही सुमार दर्जाचे आहे असं वाटलं. जितक्या प्रचंड प्रकारे चित्रपटाची बुम झाली, शिकरा चित्रपटाशी तुलना झाली ते पाहता जो काही आतंकवाद, हिंसाचार, भीतीचे वातावरण दिग्दर्शक दाखवू शकला असता ते तो दाखवण्यास पूर्णपणे अपयशस्वी ठरला आहे असं माझं मत आहे. गर्दीला डोकं नसत आणि ज्याप्रकारे चित्रपटाची चर्चा झाली, त्याला विरोध झाला, लोकांनी हा विषय राष्ट्रीय मुद्दा बनवला त्यामुळे चित्रपटाला बॉक्स ऑफिस वर खूप यश मिळवून दिले पण मला मात्र यात खरा, वास्तविक कश्मीरमधील हिंसाचार,अत्याचार लोकापुढं आला अस वाटत नाही

वास्तवाच्या तेजापुढे द काश्मीर फाईल्स चित्रपट म्हणजे मिणमिणता तेलाचा दिवा आणि ह्या दिव्याचा प्रकाश सर्वदूर पडतोय कारण वास्तविकता अंधारात खितपत पडलेली होती, ह्याच वास्तवतेला जगापुढे आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चित्रपट निर्माण करणाऱ्या प्रत्येकाचे अभिनंदन

पण वास्तव अजून प्रखरतेने मांडता आले असते किंवा जे दाखवले ते वास्तव कदाचित १% ही नसावे अस माझं मत आहे. कृष्णा पंडित हे पात्र तर इतकं विस्कळीत आहे की त्याला आपला आजोबा ज्या ३७० हटाव साठी कित्येक वर्षे काम करतोय ते एकत्र राहून कळलेच नाही, दाढी वाढवण्याइतका मोठा झालेला कृष्णाचा मेंदू मात्र विकसनशील राहिला ANU खरतर JNU म्हणायचे असेल पण वाद नको म्हणून चित्रपटात ANU म्हणून उल्लेख केलेल्या कॉलेजात शिकत असे पर्यंत आपल्या आई बापाचा फोटोही न पाहिलेला कृष्णा, प्रसंग लोकांच्या काळजाचा ठाव घेण्यासाठी दर्शवलेला असेल तरी मन ते मान्य करू शकत नाही. आईबाप भावाचा अपघाती मृत्यू हे खोट किती झालं तरी 30 वर्ष सत्य मानणारा, वेळोवेळी कधी प्रोफेसर, कधी आजोबांचे मित्र, कधी आतंकवादी आणि सरत शेवटी मिथुन म्हणजे ब्रह्मने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवणारा कृष्णा खरच JNU शिकण्याचा लायकीचा नसून त्याने लगेच JKG मध्ये दाखला घ्यावा अस चित्रपट संपल्यानंतर वाटलं. कृष्णाच्या मतपरिवर्तनाचा वेग एकवेळ लाईटच्या आणि मनाच्या धावण्याच्या वेगाला हारावेल की काय अस वाटत. तांदळाच्या ड्रम मधील खून, लाकडे कापण्याच्या मशीनवर कत्तल केलेली स्त्री किंवा चित्रपटाच्या शेवटी  २० ते २५ लोकांना एकाच गोळ्या न संपणाऱ्या पिस्टलने केलेला हिंसाचार याव्यतिरिक्त खूप मोठा हिंसाचार, इस्लामी तुष्टीकरण दाखवता आले असते पण तस घडलं नाही. मृत्यू समोर असूनही निव्वळ गोळी लागल्यावर पडण्याचा अभिनय म्हणजे वास्तविकता दर्शवली असा आहे का? शेजारच्या व्यक्तीला गोळीने मारल्यानंतर पुढचा नंबर आपला आहे हे माहीत असताना चेहऱ्यावर भीतीचा लवलेश, एक आर्त आरोळी निघत नसेल का? अभिनयाच्या बाबतीत चित्रपट सुमार दर्जाचा होता, आहे यापेक्षा खूप जास्त अभिनयाची गरज होती हे दिग्दर्शकाने मान्य करायला हवे. पंडितांचे पलायन हा मुद्दा दाबला गेलेला, तो लोकांना माहीत होता पण त्याची व्याप्ती किती मोठी होती यांची थोडीशी जाणीव चित्रपट करून देतो आणि हीच थोडी का होईना व्याप्ती प्रेक्षकांनी एकदा अनुभवायला हरकत नाही. विवेक अग्निहोत्री याचा आधीचा ताशकंद फाईल्स मनाला भावलेला चित्रपट आहे तसाच काहीसा अनुभव हा ही चित्रपट देऊन जातो पण..........


असो

जय हिंद



गुरुवार, १० मार्च, २०२२

चाकण८४

 जय श्रीराम

चाकण८४ नावाचे ट्विटर अकाउंट कायम स्वरूपासाठी बॅन केले गेले म्हणून डायरीनोट्स नावाचे दुसरे खाते चालू केले. नवीन खात्याला जुने मित्र मंडळी परत गोळा होत होते त्याचबरोबर ब्लॉगर वरचे ब्लॉगला थोडेफार view मिळत होते पण लोभ वाईटच नाही का? विचारांना जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची हाव नवीन खात्याचे नाव बदलून पूर्वीच्या चाकण८४  च्या जवळपास नाव Chakan84s ठेवून जुने सहकारी, मित्र याना गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि ट्विटरने नवीन खात देखील बॅन केले. थोडासा मनस्ताप झाला, वाईट वाटले आणि ठरवून टाकले की आता ट्विटरवर परतायचे नाही पण व्यसनी दारुड्या व्यक्तीचे पाय जसे आपसूक ठरलेल्या वेळी दारूच्या गुत्त्यावर घेऊन जातात तसच मला ट्विटर वर नवीन खात काढावे लागले


बोलण्याचे विषय चित्रपट, राजकारण, शेयर मार्केट वगैरे तेच ते असले तरी मनातलं बोलण्यासाठी, भाव भावनांना मोकळं करण्यासाठी मिळणारे हे व्यासपीठाचा वापर करून हिंदू संस्कृती आणि हिंदुत्व यासाठी वापरून प्रबोधन करणे हीच मानसिकता आहे. परत ती सगळी लोक भेटतील याची गॅरंटी नसली तरी थोडेफार जुने, थोडे नवे मित्र, सवंगडी जोडायचे आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची साथ गरजेची आहे. 


जयहिंद


सोमवार, ७ मार्च, २०२२

हिजाब, बुरखा आणि मी

नमस्कार

https://twitter.com/Notes247Diary/status/1500812070811430916?t=qxuUNZxbZyn3zIarnftIWQ&s=19


 ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे आणि तिने एक आव्हान लोकांना दिले आहे. एव्हाना सगळ्या लोकांना ही कोण, काय आव्हान केले माहीत असले तरी ही पोस्ट करण्याचा माझा विचार वेगळा आहे. असा पेहराव केल्यावर ती व्यक्ती कोण हे कोणाला ओळखता येईल का?प्रामाणिक राहून स्वतःला उत्तर द्या. नाही हेच उत्तर येणार हे सर्वश्रुत आहेच पण अश्याच पेहरवाचे समर्थन करताना एक समाज मोठी मागणी करताना दिसतो आंदोलन करतोय ते त्यांच्या समाजाचे अनुकरण म्हणून. योग्य आहे का ते? चेहरा म्हणजे ओळख आणि ही ओळख लपवून जर कोणते कांड झाले तर आरोपीला शोधायचे कसे? बर हा हिजाब वा बुरखा सारखे पेहराव घालून, ओळख लपवून काय काय आणि कसं केले जाते याचे दाखले बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटात दाखवले गेले आहे, आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या गुन्हेगारीत सुद्धा वापरले जाते हा माझा मुद्दा क्रमांक एक. दुसरं म्हणजे ऐच्छिक विषय असतानाही धार्मिक कट्टरता आणि त्यातून सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा केलेला अट्टाहास सामाजिक तेढ निर्माण करत नाही का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पारंपरिक, गुलामगिरीत महिलांना ठेवून त्याचे अधिकार, स्वातंत्र हिरावून घेणारा त्याच समाजातील बहुभार्या करताना त्याच महिलांचा अपमान त्यांना दिसत नाही का? ज्याप्रकारे जादुई पुस्तकात हिजाब किंवा बुरखा याचे कोठेही आज जसा वापर आहे तसा उल्लेख केलेला नसताना जादुई पुस्तकातील गोष्टींचा अनादर केलेला त्या समाजाला कसा चालतो? कारण ज्या जादुई पुस्तकात काहीही बदल करण्याची मुभा नसताना त्यातील गोष्टीचा चुकीचा अर्थ काढणारे खरच त्या समाजाचे खरे, सच्चे अनुसारक असावे का? मुळात तो समाज ज्या कुप्रथा अनुसारण्याचे आव्हान किंवा दडपण त्या समाजाच्या महिलांवर करत आहे ते चुकीचे. जिथं एक समाज सती प्रथा, घुंगट, विधवा विवाह वगैरे काळाबरोबर बदल स्वीकारत असताना तो समाज बुरसटलेले,जंगली आचार विचार धरून बसने योग्य का? मुद्दा लहान असला तरी त्यातून त्या समाजातील लोकांसाठी देण्यात येणारी समज धमकी आणि भारतीय सविधानापेक्षा जादुई पुस्तकांचे अनुकरण करून दडपशाही करण्याचा त्या समाजाचा इरादा आहे हे स्पष्ट होते. मुक्ता बर्वेला सगळ्या प्रकारात मुद्दा म्हणून वापरायचे नसले तरी त्याच्या एका फोटोने मला माझा मुद्दा मांडता आला आहे. बंदी कोणत्याच पेहरावाला नसावी पण ती मागणी करत असताना इतर कायदे, नियम तुटणार नाही याची काळजी घ्यायला नको का? पोलीस असणारी स्त्री जर बुरखा घालून ड्युटी करायला लागली तर जसे योग्य ठरणार नाही त्याच प्रकारे स्वतःच्या धर्माचे अनुसरण करत असताना शाळेत विशेषतः वर्गात बसतानाही बुरखा घालण्याची मागणी चुकीची आणि ती कधीच मान्य होणार नाही हे त्या समाजाला सांगावं, शिकवावं लागणार आहे. मुळात लहानपणी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुस्लिम घरातील स्त्रियांना मी काही बुरखा घालताना, वावरताना पहिली नव्हते अपवाद एखादं दुसरी महिला पण हिजाब किंवा बुरखा वाद करून ह्या लोकांनी त्याच्या समाजातील स्त्रियांवर इतके दडपण निश्चित आणले आहे

की हे प्रमाण आज खूप वाढले आहे. अनैतिक आणि चुकीच्या गोष्टीना विरोध केला पाहिजे त्यामुळे हा थ्रेड. 

पुण्यात सर्रास प्रत्येक स्त्री उन्हाळ्यात तोंडावर स्कार्फ लावलेल्या दिसतात ते कोणत्याही एकाच समाजाच्या असतात असा अर्थ काढू नका पण ऊन,उन्हाचे चटके इतके असतात की स्वतःच्या त्वचेची काळजी म्हणून स्कार्फ, गॉगल, सनकोट इतकेच काय हॅन्डग्लोज घालून फिरणाऱ्या बऱ्याच माता बहिणी असतात शिवाय जिथं जिथं गरम वातावरण असत तिथं म्हणजे पुणे मुंबई नागपूर इतकेच काय गावागावात याचे लोन पसरलेलं आपण सगळ्यांना माहीत आहे पण त्या महिला त्याच अवस्थेत काम करण्याची, शिकण्याची इच्छा करतात का? नाही ना म्हणून त्या समाजाचा मूळ उद्देश लोकांनी समजून घेतला पाहिजे आणि त्यांचा उद्देश निश्चितच योग्य नसल्याने त्याला विरोध तुम्हाला आम्हाला करावाच लागेल. कोणत्याही कोर्टात तो दावा गेल्यास त्याला अनुमोदन मिळणार नाही हे जितकं सत्य आहे तितकाच त्या समाजाचा उद्देश कट्टरता दर्शवण्याचा आणि त्यांना हवं तसं कायदे वळवण्याचा मनसुबा योग्य नाही,नाही आणि नाही



शुक्रवार, ४ मार्च, २०२२

पेशावर बॉम्बस्फोट, पाकिस्तान आणि आतंकवाद

नमस्कार,

आज शुक्रवार, अ शांतीचा विचार जगाला देणाऱ्या धर्माच्या अनुयायांसाठी महत्वाचा दिवस असतो. लहानपणी ती लोक फक्त आजच्याच दिवशी ओंघोळ करतात अस वाटायचं, क्रिकेटची शुक्रवारी येणारा सामना म्हणजे पोर्किस्तान जिंकणार असा पायंडा त्याकाळी पडला होता. 

असो मूळ मुद्दा असा की काहीवेळापूर्वीच पोरकिस्तानच्या पेशावर मध्ये आतंकी हल्ला झाला अशी ठळक बातमी मोबाईलवर झळकली. निश्चितच भारतीय माणूस म्हणून त्या भिकारी देशाचे काहीही घेणे देणे नसले तरी एक माणूस म्हणून त्यात ठार झालेल्या व्यक्तींबद्दल हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. बॉम्ब स्फोटानंतर व्हायरल झालेले व्हिडीओ आणि त्यात आक्रोश करणारी लोक, त्यांचे रडणे ऐकले की मन बैचेन होते.

घटनेची माहिती

आत्मघातकी म्हणजे स्वतःच्या अंगावर स्फोटक लावून आलेला तो व्यक्ती लोकांच्या गराड्यात जातो काय ओला उबेर चे नाव घेऊन स्फोट घडवतोय काय हे अनपेक्षित, अचानक हल्ला कोणी, का, कशासाठी केला याची जवाबदारी कोणत्याही व्यक्ती वा संस्थेने घेतलेली नाही पण देवाची प्रार्थना चालू असताना झालेल्या आत्मघातकी स्फोटात किमान ३० जण जागेवर मृत्युमुखी पडले, ५० हुन अधिक लोक जखमी आहेत. आकडेवारी सरकारी आहे शिवाय पोर्किस्तानसारख्या खोटरड्या देशाकडून खरी आकडेवारी लोकांसमोर ठेवली गेली असेल असे नाही याचाच अर्थ मेलेले लोक आणि जखमी यांचा आकडा निश्चितच मोठा असणार आहे. स्फोटानंतर आजूबाजूच्या लोकांनी जखमींना मिळेल त्या वाहनावर दवाखान्यात पोहचते केले, सरकारी अँबुलन्स आणि पाकिस्तानी सुरक्षयंत्रणा मदत कार्य सुरू केले अस ऐकण्यात आले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा दावा त्या पाकड्या लोकांनी चालू केला आहे

एकीकडे हा आत्मघातकी हल्ला, दुसरीकडे सोशल मीडियावर युद्ध चालू झाले. पोर्किस्तानचे नागरिक यात भारताचा हात असल्याचा दरवेळीसारखा ओरडा चालू केला आहे ज्यात काहींनी असाही दावा केला की भारताला पोर्किस्तानमध्ये क्रिकेट नांदवू द्यायचे नसल्यानेच मागच्या वेळी न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांनी पोर्किस्तानात आल्यानंतर भारताने डाव केला असो असे दावे करणारे ना तिकडे कमी न इकडे पण एका आतंकवादी देशात आतंकवादाची चव स्वतःच चाखायला मिळत असल्याने दुसऱ्याला पाडण्यासाठी केलेल्या खड्डयात स्वतःच पडल्याचे सप्रमाण सिद्धता जगाला मिळाली आहे..

नक्की हा आत्मघातकी किंवा आतंकवादी हल्ला असावा का? आधीच भिकेला लागलेल्या, महागाईचा पूर आलेल्या आणि पाया ढासळलेल्या या देशात भारताला असे हल्ले करण्याची गरज नाही पण असे हल्ले झाल्याने त्याच्याच हत्याराने त्याचाच गळा कापला जातोय हे पाहून तरी पोर्किस्तानला शहाणपण येणार का? मुळात धर्माच्या आधारावर उभा राहिलेला हा देश बिगर मुस्लिम लोकांना ज्या पद्धतीने वागवतोय याच्या कैक बातम्या आपल्या कानावर आदळत असतात. हिंदू मंदिराची तोडफोड, हिंदू मुलींशी बलात्कार, जबरदस्तीने करत असलेले धर्मांतर किंवा बलुचिस्तान आणि बलुच लोकांशी करत असलेले वाईट प्रकार काही लपून राहिलेले नाही म्हणूनच की काय आप बिती झालेला हा घटक प्रतिहल्ले करत असावा शेवटी केलेल्या कर्माचे फळ इथेच भोगून जावे लागणार आहे. स्वतःवर होत असलेले अन्याय, जुलूम याला वाचा फोडण्याचे काम बलुचिस्तान कित्येक वर्षांपासून करत आहे शिवाय त्याच्या लोकांची बलुचिस्तान हा वेगळा देश निर्माण करण्याची इच्छादेखील आहे. बलुच लोक स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हातात हत्यार घ्यायला हाच अन्याय कारणीभूत आहे आणि जो संग्राम त्यांनी चालू केला आहे त्याला जरी पोर्किस्तानने  आतंकवाद नाव दिले तरी तिथल्या संकटाना सामना करणाऱ्या लोकांसाठी ते एक स्वातंत्रसंग्राम असणार हे नक्की. 

मूलतः त्या देशात कधीही कोठेही बॉम्बस्फोट होणे आश्चर्यकारक नसले तरी तिथं घडणाऱ्या कोणत्याही घटनेशी भारताला जोडण्याचा त्याचा धंदा जुना आहे. मुळात पंतप्रधानांना देण्यात येणारी सुरक्षा त्याच्या देशात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना देऊन पोर्किस्तान किती असुरक्षित देश आहे याची कबुली स्वतः तेच जगाला देत असतात पण तरीही काही अपवादात्मक परिस्थितीत तिथं परदेशी खेळाडू, संघ श्रीलंकेच्या संघावर झालेल्या हल्ल्यानंतर आता कुठं परत जायला सुरुवात केली होती तेच आजच्या प्रसंगाने पोर्किस्तानला परत दहा पंधरा वर्षे मागे घेऊन गेले हे निश्चित. न्यूझीलंडने सामना चालू होण्याआधी तिथून घरी परतण्याचा निर्णय असो की आजच्या स्फोटानंतर ऑस्ट्रेलिया संघ काही वेगळा निर्णय घेईल अशी परिस्थिती नाही. 

मुळात चुकीची शिक्षण पद्धती, धर्माध, कट्टरवादी वागणे, कालबाह्य झालेल्या जादुई पुस्तक आणि त्याचे अनुसरण पोर्किस्तान आणि इस्लामी समाजाला पुढं घेऊन जात नाही. जोपर्यत ह्या गोष्टीचा त्याग करून ती लोक माणुसकी, शांतता जवळ घेणार नाही तोपर्यत हा नाश चालूच राहील कदाचित त्याच्या ह्याच मानसिकतेने जगाचा सर्वनाश होईल अशी भीती आहे. इस्लामी जादुई पुस्तक आणि त्याच्या रितिभाती याच्यावर बंदी आली पाहिजे तरच कुठं मानवजात दुसऱ्या कोणत्या प्रलयात संपेल अन्यथा धार्मिक हिंसाचार, कट्टरता, इतर धर्मचा द्वेष यातील संघर्ष विकोपाला जाऊन एक दिवस सगळं काही संपेल.

हल्ल्यात मृत्यू झालेला लोकांना शांती मिळो आणि पोर्किस्तान आणि धर्माध लोकांच्या डोळ्यावरची झापडे दूर होऊन त्यांना अक्कल येवो अशी इच्छा बाळगून आजचा हा लेख संपवतो

जय हिंद


गुरुवार, ३ मार्च, २०२२

राजकारण

नमस्कार,


भारतात सर्वाधिक लोकप्रिय, सवंग चर्चा, बातम्या कशाच्या होतात? माणूस श्रीमंत असो की गरीब, सुशिक्षित असो की निरक्षर त्याच्या आवडी निवडी नक्की काय असतात? सर्वसाधारण पण चित्रपट,खेळ त्यातही विशेष म्हणजे क्रिकेट आणि राजकारण.

राजकारण !


हो राजकारणाचे गारुड प्रत्येक भारतीयांच्या डोक्यात नाचत असत कदाचित स्वातंत्र मिळाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा होत असलेला विषय म्हणजे राजकारण.

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही पद्धतीने चालणारा देश. लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले शासन म्हणजे लोकशाही अशी अब्राहम लिंकन याने केलेली व्याख्या नागरिक शास्त्र विषयांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी घोकून पाठ केलेली असेल यात शंका नाही. भारत स्वतंत्र झाल्यापासून बहुतांश वेळा भारतावर काँग्रेस नावाच्या पक्षाची सत्ता राहिली आहे पण काही काही वर्षांपासून त्यांची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे. भारतातील बहुतांश राज्यात एक तर भाजपा ची सत्ता आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्षाची मक्तेदारी पाहायला मिळते. 

कोणत्या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी,मुद्दे मांडण्यासाठी कोणत्यातरी एका बाजूला असणं गरजेचे असावं असं मानणारा मी आहे, निपक्ष पद्धतीने आजकाल तर वृत्तपत्र, संपादक किंवा पत्रकार देखील उरलेले नाही. उलट जिथं शित, तिथं या भूतांची गर्दी दिसते. 

जस जसा काळ बदलतो तस केवळ केस पांढरे होतात अस नाही, विचार करण्याची पद्धत, मत यांच्यामध्ये बदल घडू शकतो. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपा एक मजबूत, ठराविक अजेंडा घेऊन देश चालवताना दिसत आहे त्याच्या विरोधात उभे ठाकलेले पक्ष हे राज्यातील राजकारण जरी अग्रेसर असले तरी त्यांची शक्ती केंद्रात सत्ता बदल करण्यास अपुरी आहे असं माझं स्पष्ट मतच आहे, मुळात हा ब्लॉग लिहण्याचे महत्वाचे कारण भाजपा नसून आज भाजपा ला विरोध करणारे पक्ष आणि त्याचे नेते हाच आहे

विरोधी पक्ष म्हणजे ज्यांना सत्ता मिळवायची तर होती मात्र मिळाली नाही आणि आता परत सत्तेत येण्यासाठी त्याचा जीव कासावीस झाला आहे मात्र तशी कोणतीच संधी दिसत नसल्याने भाजपा पक्षाच्या विचारधारेला फक्त विरोध करण्याचा जो अजेंडा सगळे विरोधी पक्ष राबवत आहे त्याने त्यांना यश मिळेल अस मला अजिबात वाटत नाही.

लहानपणी क्रिकेट खेळताना ज्याची बॉल, बॅट असायची त्याला बाद झाल्यानंतर देखील एक डाव जास्त द्यावा लागायचा किंवा खेळाचे साहित्य ज्याचे असेल त्याच्या मनाप्रमाणे खेळ खेळला जात असायचा आणि जर तस केले गेले नाही तर ती व्यक्ती खेळाचा खेळ करायचा म्हणजेच स्वतःची बॅट बॉल घेऊन निघुब जायचा तसच
राजकारणात एकाधिकारशाही ही वाईट कारण त्यामुळे ज्याची सत्ता असते तो त्याच्या अजेंड्याप्रमाणे कोणतेही नियम बनवू शकतो. नियमांची अडचण नसते, अडचण अजेंड्याची असते जसे आजचे राजकारणी,पक्ष यांचे अजेंडे सत्ता हस्तगत करून त्यातून अपहार, भ्रष्ट मार्गाने स्वतःची मिळकत वाढवणे, श्रीमंत होणे हा एकमेव अजेंडा लक्षात येतो. सत्ता मिळवून लोकांच्या भल्यासाठी, देशाला सौर्वभौम करण्यासाठी, लोकांच्या मनात राष्ट्रीयता भिनवण्यासाठी करण्यापेक्षा लोकांमध्ये भेद करून आपला स्वार्थ साधण्यात आजचे राजकारणी यशस्वी होत आहे. मुळात कोण्या एका पक्षाला विरोध करण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी राजकारण न करता समाजकारण करणे आता या कलियुगात शक्य नाही कदाचित राजकारण हा व्यवसाय/धंदाच झाला आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही आणि हा धंदा आजकाल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण केला जात आहे आणि हे निश्चितच गंभीर आहे कारण ती ठराविक लोक सगळं काही स्वतःच्या हातात ठेवून, लोकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्या वेळी प्रामुख्याने विशिष्ट ध्येय आणि ते देखील संपूर्ण भारतीयांचे फायदा असणारे ध्येयाला समोर ठेवून होणारे राजकारण गरजेचे आहे.

अनैसर्गिक आणि केवळ सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आलेल्या महाराष्ट्रातील तीन पक्ष स्वप्नात देखील सत्ता मिळणार नसताना निव्वळ बहुमताच्या जोरावर चालवलेला पोरखेळ सहन होण्यापालिकडे गेला आहे. सत्तेचा वापर स्वतःचे खिसे भरण्यात आणि भविष्यात सत्ता मिळणार नाही याची जाणीव असल्याने अधाश्याप्रमाणे जो पोरखेळ चालू आहे तो लवकरच थांबला गेला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने कारनामे लिहत बसल्यास पाने कमी पडतील याची जाणीव असल्याने ते नमूद न करता आजच्या विषयानुसार राजकारण कसे नसावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा महाराष्ट्र आणि हे तीन पक्षाचे सरकार. 


राजकारणामुळे मिळालेली सत्तेची शक्ती डोक्यात गेल्याने मीपणा येणे, सत्तेचा वापर करून कायदा हातात घेणे हे केवळ महाराष्ट्रात चालू आहे असं नाही. पश्चिम बंगाल मध्ये असलेले वातावरण, निवडणुका आधी आणि नंतर झालेला हिंसाचार, केरळमध्ये आतंकवादी वाटचाली कडे चालणारा धर्माध प्रवास, दिल्लीत केजरीवाल रुपी स्वार्थाचा महामेरू अशी कितीतरी वाईट उदाहरणे देता येईल. काँग्रेस सारखा फुटून फुटून आज राहिला संकुचित पक्ष, धर्माध एमआयएम राजकारणाला लागलेले आजारच. 


योग्य आणि अयोग्य याचा ताळेबंद  लागला पाहिजे निव्वळ केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी खोटे दावे करून आंतरराष्ट्रीय पटलावर हसू करणे राजकारणी लोकांनी थांबवून भारत देश सगळ्या गोष्टीत अग्रेसर करण्यात लक्ष दिले पाहिजे.

क्रमश:

युद्ध : रशिया, गुक्रेन आणि जग

 

नमस्कार

आपल्या देशाचा इतिहास भूगोल पूर्ण माहीत नसताना युक्रेन रशिया यांच्यातील वाद त्यामुळे निर्माण झालेला तिढा आणि युद्ध याचा कोणताही अभ्यास न करता रशिया जे करत आहे तेच योग्य असावं कारण स्वतंत्र असला तरी युक्रेन राशियाबरोबर भूतकाळात संलग्न होता. नाटोच्या देशांनी रशियाला कोंडीत पकडण्यासाठी जर युक्रेनचा वापर केला असेल तर आज जे काही युद्ध होत आहे त्याला जवाबदार फक्त रशिया कसे असेल? अमेरिका सारख्या प्रगत देशाविरुद्ध उभं ठाकणाऱ्या रशियासमोर युक्रेनचा निभाव लागूच शकणार नव्हता इतका साधा विचार न करता कलह वाढवणारा युक्रेन होणाऱ्या युद्धाला जवाबदार का नसावा? शक्तिशाली देशाच्या सूचीत पहिल्या तीन क्रमांकावर येणाऱ्या रशियाशी निभाव लागणार नाही हे स्पष्ट असतानादेखील देश धोक्यात आहे असं भासवून सामान्य नागरिकांना ज्यात लहान मोठे जेष्ठ इतकेच काय जेल मध्ये बंद असलेल्या आरोपींना मरणाच्या दारात ढकलणे हा मूर्खपणा नाही का? कॉमेडियन असलेल्या माणसाला देश चालवायला मिळाला म्हणून आजपर्यंत केली नव्हती इतकी मोठी कॉमेडी होत असताना निव्वळ सहनभूतीचे वातावरण निर्माण करून तो गृहस्थ दुसरा केजरीवाल तर बनत नाही ना? झुकेगा नही साला अस म्हणणे आणि ते पाहणे चित्रपटात बर वाटत असेल तरी वास्तवात तस केल्याने उभं राहायला देश उरणार नाही. बर भांडण फक्त दोन देशांचे असते तर कदाचित हे कुठं थांबलं तरी असत पण दोघांच्या भांडणात नक्की फायदा कोणाचा हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. युद्धामुळे रशिया आणि पुतीन यांची जी बदनामी होत आहे किंवा होणाऱ्या संहाराला जवाबदार धरल्यामुळे आणि इतर देशांनी युक्रेनला पुढे केलेला मदतीचा हात आता हे युद्धाची व्याप्ती वाढवणार नाही ना अशी भीती वाटायला लागली आहे. पृथ्वीवरचे सगळ्यात घातक अस्त्र याचा उल्लेख करून रशिया जिंकेपर्यत युद्ध करण्याचा मानस व्यक्त केला आहे हे जगाने समजले पाहिजे. अमेरिकेला स्वतःचे सौर्वभौम आणि पृथ्वीवरील कोणत्याही घटनेत नाक घालून स्वतःचे स्थान अबाधित राखण्याचे अवघड काम करायचे असल्याने जगात अस्थिरता कशी राहील आणो त्याचा फायदा घेऊन जगाच्या राजकारणावर अमेरिकेचा हात कसा राहील हा अजेंडा गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्ण करत आहे. आता वेळ आली आहे की अमेरिकेचे हे नासके राजकारण संपुष्टात यायला हवं अन्यथा स्वतःला उंच करण्यासाठी अमेरिका कोणत्याही देशाला, त्या देशातील लोकांना पायदळी तुडवू शकते. युक्रेन लवकरच पडेल आणि हा कलह शांत होईल अशी अपेक्षा आहे कारण ह्या युद्धामुळे बऱ्याच इतर देशात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने महागाईचा फुगा फुटून अस्थिरता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. बलवान शिकारी आणि कमकुवत सावज यांनी किती मोठा खेळ मांडला तरी खेळाचा शेवट काय होणार हे सर्वश्रुत असल्याने वास्तव स्वीकारून चर्चेने मार्ग काढला गेला पाहिजे.असंख्य निरपराध लोकांचा बळी गेल्यानंतर चर्चा हा विकल्प योग्य नसला तरी जी लोक अजून जिवंत आहेत त्याच्यासाठी शांतता प्रस्थपित होणे गरजेचे. भारतीय नागरिकांना युक्रेन रशियामधून बाहेर काढण्यात जरी भारत सरकारला बऱ्यापैकी यश मिळाले असले तरी युक्रेन मध्ये भारतीय विद्यार्थीचा झालेला मृत्यू किंवा भारतीय नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या बातम्या, एकंदरीत भारत देशाच्या विरोधात केलेले भूतकाळातील राजकारण यामुळे युक्रेनबद्दल विशेष अस चांगलं मत नाहीच पण वेळोवेळी भारताच्या मदतीला उभे राहिलेल्या रशियाला समर्थन भारताने दिले पाहिजे पण मानवता, भविष्यात भारताकडे जगाची बघण्याची दृष्टी सारख्या प्रश्नामुळे भारत सरकारला कोणतीही बाजू सक्षमपणे मांडता येत नसली तरी भविष्यात एक मित्र देश दूर जाणार नाही ना याची काळजी केली पाहिजे अन्यथा उद्या आपल्या शेजारील शत्रू देशांनी काही कुरघुडी केल्यावर मदतीला उभं रहाणारा एक मित्र दूर व्हायला नको. एकंदरीत रशिया युक्रेन विवादावर कोणत्याही एका बाजूने विचार करणे चुकीचे असले तरी निव्वळ मीडियात उभं राहिलेलं वादळ,ज्यात रशियाला एक खलनायक म्हणून पुढं केले जात आहे हे चुकीचे. जरी कर्ता रशि9या असला तरी करीवता कोण याचे मूल्यमापन करणे गरजेचे

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...