शनिवार, १३ जुलै, २०२४

इंडियन

नेता असो की अभिनेता वा अन्य कोणीही त्याची सार्वजनिक बाजू, केलेले काम यातून एक त्याची प्रतिमा बनते आणि त्या प्रतिमेच्या प्रेमात पडून अनेक त्या लोकांच्या प्रेमात पडतात, त्याला आदर्श मानायला लागतात पण ही लोक वास्तविक त्याच्या वैयक्तिक जीवनात तसेच असतात का? नसतील कदाचित मग ह्या लोकांना त्याच्या कामाच्या बदल्यात देवत्व बहाल करून त्यांना एक आदर्श म्हणून मागे मागे फिरणाऱ्या सर्व जनतेने घेतलेला निर्णय चुकीचा नाही का? कमल हसन चित्रपटात आणि वैयक्तिक आयुष्यात अश्या दोन गोष्टीत फरक केला पाहिजे. वास्तविक मला तो चित्रपटात किंवा त्याच्या वैयक्तिक सार्वजनिक जीवनात देखील आवडत नाही तरीही त्याचा इंडियन हा चित्रपट पाहिला. वर्तमानपत्रात चित्रपटाचा रिव्ह्यू येतो त्याप्रमाणे चित्रपटाची कथा, कलाकारांची यादी सरत शेवटी चित्रपटाचा शेवट न सांगता चित्रपटातील चांगल्या आणि खराब गोष्टी अशी एकंदरीत मांडणी आणि त्याला दिलेले इतके तितके स्टार असलेले  लेख तुम्ही खूप वाचले असतील. कधी कधी ते प्रायोजित असतात तर कधी ते खरे देखील पण चित्रपट समीक्षा म्हणून ह्याच पद्धतीने लोकांना चित्रपट सांगायचा असतो हा वर्तमानपत्रांचा पायंडा पण आपले तसे नाही त्यामुळे आपण काहीही लिहू शकतो. मुळात हे सगळं वाचायचे असेल तर उद्याचा कोणताही एक पेपर विकत घेऊन हा कॉलम तुम्हाला वाचता येईल त्यामुळे तो पायंडा सोडून चित्रपट पाहिल्यावर मनात आले ते ब्लॉग मध्ये उतरवत आहे.

भ्रष्टाचार ह्या मूळ मुद्यावर असलेला हा चित्रपट पहायला अप्रतिम आहे पण आपल्याच पालक, सगेसोयरे याच्या कुकर्माची शिक्षा त्याच्याच घरातील लोक देतील का? नाही कारण एकच घरात राहून त्यानी केलेली अव्यवहार्य वागणूक पाहून पाहून ती अंग वळणी पडून गेलेली असते. मुळात आपले पालक काय बरोबर वा चुकीचे करतात हे सगळ्यांना माहीत असते पण त्याबद्दल कोणी तक्रार करू शकत नाहीत पण चित्रपटात अशी अनेक पाल्य इंडियनच्या सांगण्यावरून आपल्या पालकांना जगासमोर उघडे करतात असे दाखवले असले तरी खऱ्या आयुष्यात मात्र पोर्श कारने ज्यावेळी आपला पाल्य दारूच्या नशेत दोन लोकांचा जीव घेतो त्यावेळी संपूर्ण कुटुंब आपल्या पाल्याला वाचवण्यासाठी कसे वागते हे जिवंत उदाहरण डोळ्यासमोर आणल्यानंतर लक्षात येते की चित्रपट केवळ मनोरंजनाचे हत्यार आहे त्यातून केवळ मनोरंजन अपेक्षित राहिले आहे अश्या वेळी इंडियन चित्रपट आपले मनोरंजन करेलच.

चित्रपटाच्या दिग्दर्शकाने ज्या पद्धतीने भ्रष्ट पात्रांचे विबंडन केले आहे ते पाहताना मज्जा तर येतेच शिवाय मतदार म्हणून कधी याला तर कधी त्याला मत द्यायचे याव्यतिरिक्त सामान्य माणसाच्या हातात प्रत्येक वेळी मिळणाऱ्या फसवणुकीला हात चोळत बसण्याशिवाय मार्ग नाही असे सांगतो. बरे भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा होत असताना आपल्या घरापर्यत ज्यावेळी झळ पोहचते त्यावेळी योग्य असलेल्या इंडियनला हुकूमशहा, खुनी ठरवत सगळी जनता त्याच्यावर आक्रमण करते,त्याला मारायला घराबाहेर पडते. जोपर्यत इंडियन करत असलेले सामाजिक कार्य लोकांच्या घरात पोहचले नव्हते तोपर्यत आणि घरापर्यंत पोहचल्यानंतरचा इंडियन यात जनतेत झालेला बदल पाहिल्यानंतर शिवाजी जन्माला यावा पण शेजारच्या घरात असे का म्हंटले जाते ते कळेल. घरात जेवायला काय करायचे यावरून चौकोनी कुटुंबातील चार लोकांचे चार कोपरे धरून मेनू सांगतात तर जगाच्या पाठीवर सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशात लोक कोणत्या एका मतावर एक येतील का? धर्मा धर्मात आता जाती जातीत भांडणारे आहे. प्रत्येकाचे काही न काही ध्येय, त्या ध्येयात मदत करणारे अनुसारक, राजकारण किती किळसवाणे आहे याची लोकाना कल्पनाच नाही कारण प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या राजकीय गटाचा अनुसारक असल्याने कोणाला तरी विरोध कोणाला तरी सपोर्ट हे भांडण काही देशात संपेल असे वाटत नाही. 

माणसाचा स्वार्थ, लोभ इतका वाढलाय की लोकसंख्येच्या गर्दीत असे कितीही इंडियन आले तरी जनता त्यांना मारून आपले स्वार्थ साध्य करतील. नैतिकतेच्या चौकटीत राहून जगणारे जितके असतील त्याच्या दहापट, शंभरपट अनैतिक लोक असणार त्यामुळे कालियुगाच्या या टप्प्यात इंडियन असो की सामान्य माणूस तो पिसला जाणार, त्याचा पराभव होणारच. आता पुढे काय इंडियन नंतर इंडियन 2 आला आणि चित्रपट संपेपर्यंत इंडियन 3 ची पुडी सोडली गेली तरी फिल्मी आणि वास्तव जीवनातील खरी दरी अधिकाधिक वाढत जात आहे, जाणार आहे. कोणी काय करावे, न करावे याचे धडे कितीही दिले तरी भ्रष्टाचार रुपी हा राक्षस दिवसेंदिवस अजून शक्तिमान होणार आहे त्यामुळे तुम्ही ज्याला आदर्श मानत आहे, बनवणार आहे तो खरच त्या आदर्श ह्या व्यक्तिरेखेच्या जवळ आहे का हे तपासले पाहिजे. योग्य आणि अयोग्य ओळखता यायला हवे. कोणाच्याही हातचे बाहुले आपण बनत तर नाही ना हे पाहिले पाहिजे. इंडियन चित्रपटात जसे स्वतःचे घर भ्रष्टाचार मुक्त करा असा नारा देतो तसे आजच्या घडीला आपले विचार, आचार चरित्रवान करण्यावर भर दिल्यास हाव, लोभ, मी, माझे, स्वार्थ यावर विजय मिळवता येईल हे सत्य असले तरी भारतासारख्या प्रचंड लोकसंख्येच्या देशात असा बदल होईल का?

गुरुवार, ११ जुलै, २०२४

दुष्ट मांत्रिक : लहान मुलांसाठी गोष्ट

 मंडळी नमस्कार, आटपाटनगर आणि त्यात घडलेल्या अनेक गोष्टी ऐकून बालपण गेले अशीच एक माझी गोष्ट तुमच्या घरातील लहानग्यासाठी.......

फार फार वर्षांपूर्वी आटपाट नगरात विक्रम राजा राज्य करत होता. विक्रम राजा प्रचंड पराक्रमी, शूर आणि तितकाच प्रजेवर प्रेम करणारा राजा होता. विक्रम राजाची एक सुंदर राणी, सोनल आणि एक छोटा युवराज हर्षवर्धन असे सुखी कुटुंब होते. आपल्या प्रजेला कुटुंबाप्रमाणे मानणाऱ्या विक्रम राजाने आटपाट नगरातील लोकांसाठी अनेक चांगली कामे केली होती म्हणूनच केवळ आटपाट नगरात नाही तर राज्यात प्रजा सुखी होती. प्रजा सुखी, समाधानी असल्याने धनवान देखील होती आणि अश्या धनवान प्रजेतील काही व्यापाऱ्यांवर हल्ला करत लूट करणारी काही दरोदेखोरांची टोळी आटपाट नगरच्या सभोवताली असणाऱ्या जंगलात राहत होती. ह्या दरोडेखोरांना अद्दल घडवण्यासाठी विक्रम राजाने धडक मोहीम पार पाडत दरोडेखोरांच्या मोहरक्याला अटक करत तुरुंगात डांबले होते.

दरोडेखोरांचा मोहरक्या तुरुंगात अटक केल्याने विक्रम राज्यावर प्रचंड राग होता अश्या वेळी त्याने एका अमावस्येच्या रात्री तुरुंगाच्या सळया तोडून बाहेर पडला आणि लपत छपत राजा विक्रमच्या राजवड्याकडे चालायला लागला. आपल्याला कैदेत टाकणाऱ्या राजाला जन्माची अद्दल घडावी म्हणून त्याच्या डोक्यात एक कुटील डाव रंगला होता. पहारेकऱ्यांना गुंगारा देत दरोडेखोर राजाच्या शयनगृहापर्यत पोहचला. शयनगृहात राजा, राणी आणि त्याचे बाळ शांत झोपले होते. आपल्याला अटक करून कित्येक दिवस दरोडेखोराला आपल्या कुटुंबापासून दूर रहावे लागले होते तसेच इतक्या दिवसात कुटुंबावर दारिद्र्य पसरले असेल म्हणून एका दगडात दोन पक्षी मारण्याची अजब कल्पना दरोडेखोरांच्या मनात आली. लहानग्या राजपुत्राचे अपहरण करून त्याला सोडण्याच्या बदल्यात बक्कळ खंडणी बळकवण्याचा धूर्त डाव दरोडेखोराने मनात बांधला. पुढचे मागचे काही न विचार करता हळूच दरोडेखोर शयनगृहात घुसून राजा आणि राणी याच्या झोपेचा फायदा घेत लहान बाळाला अलगद उचलले. दबक्या पावलांनी शक्य तितक्या लांब जात, राजपुत्राची झोपमोड होणार नाही अशी दक्षता घेत असतानाच दरोडेखोरांच्या धक्का मंचकावर ठेवलेल्या फुलदाणील लागल्याने ती फुलदाणी खाली पडली. फुलदाणी पडल्याच्या आवाजाने राजा विक्रम याची झोप मोडली आणि परिस्थितीचा अंदाज घेण्यासाठी तो पलंगावरून उठून फुलदाणी पडली तिथं गेला तेच त्याला बाहेर घोड्याचा चाप ओढून कोणीतरी भल्या मध्यरात्री घोड्यावर दौड लावत असल्याचा आवाज झाला. अवेळी घोड्यावर स्वार होण्याचा आवाज झाल्याने थोडस विचित्र वाटले असले तरी त्याकडे दुर्लक्ष करत राजा विक्रम परत झोपण्यासाठी आपल्या पलंगावर येतो तर तिथे त्याला राणी सोनलच्या बाजूला राजपुत्र हर्षवर्धन दिसत नाही आणि गडबडलेला विक्रम राजा आपल्या राजपुत्राला शोधायला लागतो. राजाची गडबड पाहून राणी सोनल उठते, बाहेरचे पहारा देणारे सैनिक सचेत होतात आणि तितक्यात संदेश देणारा एक सैनिक महाराजाना निरोप देण्यासाठी धावत येत असतो. तुरुंगातून पाळलेला कुख्यात दरोडेखोराची वर्दी देण्यासाठी तो आला होता. त्याच्या मागोमाग दुसरा वेशिवरचा पहारेकरी घामाघूम आणि घाबरलेल्या स्थितीत महाराजांना दरोडेखोर जंगलात धूम ठोकली पण त्याच्या पाठीवर छोटे बाळ होते असा निरोप देतो.

नक्की काय घडले हे समजायला विक्रम राजाला तसूभर वेळ लागला नाही त्यामुळे तडक आपले तलवारीचे पाते म्यांनीतून बाहेर काढत राजा शयनगृहातून बाहेर पडला. महाराजांनी घेतलेला निर्णय, आपले बाळ दरोडेखोरांच्या तावडीत आहे याची खंत, भीती, दुःख राणी सोनल तर भोवळ येऊन पडली. राजा पराक्रमी, शूर होताच पण आता आपल्या बाळाच्या चिंतेने त्याचे रक्त उसळ्या मारत होते, सारे अंग गरम झाले होते डोळे तर रक्ताच्या आकाराच्या झाल्या होत्या तरीही आपल्या भावनांवर संयम बाळगत राजा घोड्यावर स्वार झाला. राजच्या मागे सैनिकांची तुकडी दरोडेखोर पळाला त्या जंगलाच्या दिशेने स्वार झालेले होते. काळजीयुक्त भीती आणि रागाच्या भरात विक्रम राजा घोड्याला इतका पळवत होता की सौनिकाची तुकडी कधी मागे राहिली हेच कळले नाही.

अमावस्येच्या त्या भयाण काळ्याकुट्ट अंधारात जंगलात घोडा स्वार करत असताना बाळाच्या अंगावरची शाल पुढे गेल्यावर राजपुत्राच्या डोक्यावरची टोपी राजाला तो योग्य मार्गावर आहे याची खात्री देत होता. दरोडेखोर देखील जोरदार घोडा पळवत होता पण घोडा जमिनीवर पडलेल्या ओंडक्याच्या अडथळ्याला धडकला आणि घात झाला. दरोडेखोर राजपुत्रासह जवळच वाहत असलेली ओढ्यात पडला. घोडा ज्याप्रकारे पडला ते पाहता तो उठेल आणि धाव घेईल याची शक्यता नसल्याने दरोडेखोर वाट मिळेल तस त्या ओढ्याच्या पाण्यात धावू लागला. धावून धाप लागलेला हा दरोडेखोर एका झाडाखाली थांबला तर त्याला जवळच अंधारात एक मांत्रिक दिव्याच्या मंद प्रकाशात काही तंत्र, काली जादू करतोय असे दिसले. धावपळीच्या गर्तेत राजपुत्र धायमोकलून रडत होते आणि त्या रडण्याचा आवाज सर्वदूर जंगलात पासरतोय की काय अशी दरोडेखोरला भीती वाटली. काही आसरा मिळेल ह्या शक्यतेने त्याने धावत जाऊन मंत्रिकाच्या गळ्यावर धारधार सुरा धरला.


घोड्याच्या टापाच माग घेत राजा विक्रम घोडा घसरला तिथपर्यत पोहचला होता. घोड्याला पाहताच त्याने आपला वेग मंदावत परिस्थितीचा अंदाज घ्यायला सुरुवात केली तर त्याला राजपुत्राचा रडण्याचा मंद आवाज येऊ लागला. आवाजाच्या दिशेने राजाने आपला घोडा वळवला. 

गळ्याला लावलेला सुरा देखील ज्या मांत्रिकाला घाबरू शकला नाही तो मांत्रिक धीरगंभीर आवाजात दरोडेखोराशी बोलू लागला. भोतीने गाळलेल्या दरोडेखोरांने नव्हती तितकी शक्ती गोळा करत लपण्याची जागा दे अन्यथा मृत्यूला सामोरा जाण्यास तयार हो अशी धमकी मांत्रिकाला दिली. मांत्रिकाने हसत हसत त्याची मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले पण त्याबदल्यात तुझे काम झाल्यावर हे बाळ मला माझी विद्या पूर्ण करण्यासाठी द्यावे लागेल अशी इच्छा प्रकट केली. विक्रम राजा आपला मागोवा घेत जंगलात आला असेल, राजपुत्राला पळवल्याचा राग तो आपल्याला मारून टाकण्यास देखील मागे पुढे पाहणार नाही ह्या भीतीने त्याने मंत्रिकाची अट मान्य केली. वर्षानुवर्षे काली जादूची पूजा करणारा तांत्रिक खुश झाला अरबी त्याने दरोडेखोराला आपल्या गुप्त राजवाड्यात जाण्याचा सल्ला दिला. मांत्रिकाने मदतीचे आश्वासन दिल्याने शांत झालेला दारीदेखोर राजवाड्यात जाणारा गुप्त मार्ग समजून घेण्यासाठी अधीर झाला.

मांत्रिक साधूने जवळच असलेल्या भल्या मोठ्या झाडाच्या खोडावर तीन वेळा वाजवण्याची खूण केली. तीन वेळा झाडाच्या खोडावर हात मारल्याने एक गुप्त दरवाजा खुला होऊन आता एक झोपडी दिसेल त्या झोपडीच्या दार उघडून आत असलेल्या भयंकर यज्ञात उडी मारण्यास दरोडेखोराला सांगितले. मृत्यूच्या भयाने पांढरा पडलेला दरोडेखोर मंत्रिकाच्या ह्या यावजनेवर अधिकच घाबरला आणि त्यावर चिडत म्हणाला की मरायचे असते तर त्या विक्रम राजाशी दोन हात करत लढत मेलो असतो तुझ्याकडे कशाला मदत मागितली असती म्हणत हातातील सुऱ्याने वार करण्याचा इशारा मांत्रिकाला दिला त्यावर कुटील मांत्रिक गडगडाटी आवाजात हसत न घाबरण्याचे आव्हाहन दरोडेखोराला केले त्याला शांत करत ती अग्नी जादुई आहे त्यात उडी मारल्याने तुला काही न होता तू शांत शीतल निळ्या नदीत पडशील तसेच त्या नदीत तुला दोन मासे दिसतील एक लहान तर दुसरा मोठा. लहान माश्याच्या शेपटीला स्पर्श करताच तुला मोठा मासा गिळून टाकेल आणि माझ्या गुप्त राजवाड्यावर घेऊन जाईल असे दरोडेखोराला समजावले.

राजवाड्यात जाण्याचा हा मार्ग ऐकून दरोडेखोराचे निम्मे झालेले बळ अजून निम्मे झाले पण विक्रम राजाच्या दहशतीने त्याने मांत्रिकाने सांगितलेल्या मार्गावर जाण्याचे ठरवले. कोणताही विलंब न लावता दरोडेखोर मोठे खोड असलेल्या झाडाजवळ गेला त्यावर तीन वेळा हाताचा डोसा लगावला आणि काय ते आश्चर्य मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे आत एक झोपडी होती. घाबरतच त्याने झोपडीचे दार उघडले तर आत एक तेजस्वी आणि अंगाला चटका भाजेल असा यज्ञाचा प्रखर जाळ तिथे दिसला. आगीला घाबरलेल्या दरोडेखोराशी इच्छा त्या जाळात उडी घेण्याची होईना पण तोच त्याला विक्रम राजा आणि मंत्रिकाच्या भांडणाचा आवाज येऊ लागला. इच्छा नसतानाही त्याने त्या जाळात राजपुत्रासाहित उडी टाकली तर अंग भाजणार तो अग्नी यज्ञ त्याला शीतल नदीसारखा भासू लागला. मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे समोर त्याला एक छोटा आणि एक मोठा असे दोन मासे दिसले. छोट्या माश्याला स्पर्श करतोय ना करतोय तोच बाजूला असलेला मोठा मासा आपले तोंड आ वसंत आकारमान मोठे करू लागला. क्षणांचा विलंब न होता त्या माश्याने दरोडेखोर आणि राजपुत्राला आपल्या तोंडात ओढून घेतले आणि अवघ्या काही क्षणात कैक मैल दूर अश्या भव्य राजवड्यासमोर दोघांना फेकून दिले. घडलेले खरे की खोटे ह्या संभ्रमात असलेला दरडेखोर जिवाच्या आकांताने राजवाड्यात धूम ठोकली. सर्वात प्रथम राजपुत्राला एका खोलीत बंद करत भिंतीवर लावलेल्या धारधार कुऱ्हाड आणि। तलवार हातात घेतली.

राजाने मांत्रिकाला विनंती केली, हातापाया पडला तरी मांत्रिक दरोडेखोर बद्दल बोलेना म्हणून शेवटी त्याने आपली तलवार मंत्रिकावर धरली. मांत्रिकाला राजाच्या रागाची कल्पना आल्याने त्याने निमूट दरोडेखोराला आपल्या राजवाड्यावर जाण्याचा गुप्त मार्ग सांगितला आणि सध्या तो तिथेच असेल असे सांगितले. मांत्रिकाने सांगितलेला गुप्त मार्ग परी कथेतील बाष्पळ गोष्ट तर नाही ना असे राजाला वाटले पण मांत्रिक खरेच बोलतोय खात्री झाल्यावर तो तडक मोठ्या खोडाच्या झाडाजवळ धावत गेला.

राजाने झाडाच्या खोडावर तीन वेळा टकटक केली तर दरवाजा उघडावा तसा झाडाचा खोडात एक प्रशस्त जागेत एक झोपडी राजाला नजरेला पडली. झोपडीचे दार उघडताच आत प्रचंड मोठ्या ज्वाळा अंगाच्या लाहीलाही करू लागल्या. राजपुत्राला भेटण्याच्या आतुरतेमुळे कशाचा विचार न करता राजाने त्या अग्निकुंडात उडी टाकली पण अंग जळण्यापेक्षा ते शीतल शांत नदीचा ओलावा देत होते. नदीत पडताच राजाने मासे शोधायला सुरुवात केली आणि मांत्रिकाने सांगितल्या प्रमाणे त्याने छोट्या माश्याच्या शेपटीला स्पर्श केला तसे बाजूचा मोठा मासा अजस्त्र आकार घ्यायला लागला. माश्याने राजाला आपल्या जबड्यात पकडत वाऱ्याच्या वेगाने मंत्रिकाच्या राजवाड्यावर आणून टाकले. 

मंत्रिकाचा राजवाडा प्रशस्त आणि सुंदर असला तरी वातावरणात एक प्रकारची भयानकता, भीषणता होती ज्यामुळे कोणाचेही मन पिळवटून निघेल. सगळीकडे भयाण शांतता होती म्हणजेच ह्या राजवाड्यावर मंत्रिकाशिवाय कोणीही येत जात नसावे, सैनिक नसावे असा राजाने प्राथमिक अंदाज केला. तिकडे दरोडेखोराने राजाला राजवाड्यावर आल्याचे पाहिल्याने त्याच्याशी दोन हात करण्यास सिद्ध झाला. राजाने राजवाड्याच्या प्रवेशद्वारात पाय टाकतो ना टाकतो त्याला राजपुत्राच्या रडण्याचा आवाज येतो. राजा आवाजाच्या दिशेने जायला धावला तर हातात दोन धारधार तलवारी धारण करत दरोडेखोराने राजावर चाल केली. दोघांमध्ये तुंबळ लढाई जुंपली. दोघे एकमेकांवर जीवघेणे वार करत होते. एकीकडे राजपुत्राला वाचवण्याची शर्थ करणारा तर दुसरीकडे द्वेष आणि बदला घेण्याच्या मन्सूब्याने लढणारा दरोडेखोर एकमेकांवर तुल्यबळ होण्याचा प्रयत्न करत होते पण शेवटी राजा विक्रम दरोडेखोरवर प्राणघातक हल्ला करत विजय मिळवला. धावत जात त्याने आपल्या मुलाला उचलले आणि भाव विभोर होत त्याने राजपुत्राचे अनेक मुके घेतले. राजपुत्राला घेऊन राजा विक्रम राजवाड्याच्या बाहेर पडला पण त्याच्यापुढे एक नवीन प्रश्न यक्ष म्हणून उभा होता कारण घरी परतण्याचा एकही मार्ग त्याला दिसत नव्हता. राजवाड्याच्या चोहोबाजुनी गर्जणारा समुद्र होता, ना तिथे होडी ना नाव न राजा समोर दिसते ते अंतर पोहून पार करू शकणार होता. राजपुत्र तर भेटला पण आता घरी परतायचे कसे असा मोठा प्रश्न राजासमोर आ वासून उभा होता. तिकडे जंगलात मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात मांत्रिक साधू ध्यान मुद्रेतून जागे होत एक कुटील हास्य करायला लागतो.

मित्रानो कशी वाटली गोष्ट? मग सांगणार ही गोष्ट तुमच्या घरातील लहान मुलांना? महत्वाचे म्हणजे गोष्ट अपूर्ण आहे आणि लवकरच गोष्टीचा पुढचा भाग घेऊन तुमच्यासमोर सादर करील पण त्यासाठी ह्या ब्लॉगला लाईक करा, शेयर करा.

राजा मंत्रिकाच्या सापळ्यात तर अडकला नाही ना? राजा कसा तिथून निसटणार की दुष्ट मांत्रिक आपल्या योजनेत  यशस्वी होणार वा अनेक असे प्रश्न तुमच्या डोक्यात सोडत मी आज निरोप घेतो, परत भेट होईपर्यत जय श्रीकृष्णा........

बुधवार, १० जुलै, २०२४

पु ल ची हसवणूक भाग एक

रामराम मंडळी, मी सनातन माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत करतो. लिहायचे काय असा प्रश्न मनात कधी पडत नाही, पडत नाही म्हणण्यापेक्षा मेंदूच्या जटील संरचनेत तो विचार येतच नाही कारण मेंदूला विचार करण्यापासून परावृत्त करणाऱ्या अनेक गोष्टींची गर्दी आपण आपल्या आयुष्यात केलेली आहे तसे पहायला गेले तर कुटुंबातील लोक सोडली तर आजकाल घरात असणारा एडियट बॉक्स म्हणजेच दूरचित्रवाणी, आकाशवाणी प्रेक्षपक हे कालबाह्य झालेले आहे. लहानपणी कुटुंब, दूरचित्रवाणी, शालेय शिक्षण, थोडाफार अभ्यास आणि मरेपर्यत खेळून दमल्यावर खा खा करत आईने बनवलेली नावडती भाजीही गटाकवून टाकल्यानंतर जवळपास फेकून द्यायच्या उंबरठ्यावर असलेली शिळी चपातीला तूप साखर लावत संपवण्याच्या मोठा अनुभव असलेला मी आज काहीच काम नसल्याने गादीवर लोळत पडलेलो होतो. हातातील भ्रमणध्वनी आणि त्यातील चलचित्र पाहण्यात निम्मा दिवस कुठे गेला हे कळले देखील नाही. शाळेत गेलेल्या लेकरं आणि वारीला गेलेल्या वडिलांच्या अनुपस्थितत घरात मी आणि आमचे कुटुंब असे दोनच प्राणी होतो. जगातील इतर स्त्रियांप्रमाणे आमच्या हिला घरात राहून कधीही न संपणाऱ्या कामाच्या गुरफुटून घेण्याचा प्रचंड मोठा छंद आहे. दुपारी दीडच्या सुमारास बायकोचा स्वयंपाक घरातून अहो अशी हाक ऐकल्यानंतर अर्धा दिवस संपला आणि जेवणाची वेळ झाली हे लक्षात आले. थोडयाच वेळानंतर शाळेतील किलबिल संपवून आमचे छोटी आणि मोठी चिमणीपाखरु घरात गलबलाट करायला हजर होतील याचीही आठवण झाली. आज झिम्बाब्वे विरुद्ध टी ट्वेंटी प्रकारातील तिसरा सामना असल्याने जेवायला उठता उठता भ्रमणध्वनीला तिच्या कुटुंबाच्या सर्वात महत्वाच्या चार्जेरशी सोबत लावत पुढच्या करमणुकीची सोय लावली. सरळ मोर्चा स्वयंपाक घरात नेल्यावर चपाती आणि कारल्याची मसालेदार भाजी असलेले ताट डोळ्यासमोर दिसले. त्याच क्षणी ही भाजी बघितल्यानंतर आमच्या चिऊ आणि काऊंच्या कपाळावर ज्या आठ्या पडत असतात त्या माझ्या कपाळावर आपसूक आलेल्या होत्या पण त्या आठ्या सौं ना दिसू नये म्हणून अरे व्वा आज कारल्याची भाजी असा खोटा पण आनंदी बोल काढत स्वतःचे दुःख लपवत पाटावर बसलो.महत्वाचे म्हणजे चिऊ आणि काऊ दोघीना डब्यात हीच भाजी असणार ह्या विचारानेच त्याच्या मनाची अवस्था काय झाली असेल याची काही सेकंदाची पण एक संपूर्ण चित्रपट डोळ्यासमोर आला. पाटावर बसलाच असताना बाजूला नुकतीच पाचवीला गेलेल्या आमच्या चिऊने शाळेच्या ग्रंथालयातून आणलेले भाईंचे म्हणजे आपल्या पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे अका पु ल चे हसवणूक हे छोटेखानी पुस्तक पडलेले दिसले. एकतर ताटातील ती नावडती भाजीला गोड करण्याची हीच ती सुवर्णसंधी असे समजत पुस्तक उचलले. मराठी माणूस आणि वाचनाचा किडा चावलेला माझ्यासारख्या अनेकांनी काही नाही पण पु ल नक्की वाचवा म्हणजे तुम्हाला वाचनाची आवड लागेल असे माझे प्रामाणिक मत आहे. हे हसवणूक पुस्तक माझ्या जेवणातील नावडते पण आवडते करण्यात आणि हा लेख लिहण्यास कारणीभूत ठरले.

आधाशीपणा खरेतर खाण्याच्या निगडित शब्द असला तरी जेवताना मी अधाशीपणाने ते पुस्तक घेऊन त्यात नजर घुसवली आणि एकीकडे ती नावडती भाजीचा एक एक घास ढकलू लागलो, मधेच भाजी छान झाली आहे असा सूरही लावत सौंची मर्जी संपादण्याची संधी देखील सोडत नव्हतो. पु ल चे लहानपण, कोकणात नातेवाईक यांच्यात इतरत्र फिरणे त्यातून मिळालेले अनुभव, हरहुन्नरी लोकात उठबस, मित्र परिवरातून मिळणाऱ्या मूल्यवान वेळेचा फायदा घेत थोडस खऱ्यातील भाग घेत आपल्या कल्पना विस्तारी विचारांनी आणि प्रत्येक वाक्यात हसू आणण्याचे त्याचे कसब कमाल होते. ज्या ज्या कथा पु ल नी फुलवल्या आहेत त्याला तर तोड नाही. त्याकाळी जर त्याच्या हातात भ्रमणध्वनी असता तर आज आपण किती मोठ्या अमूल्य कथा, कवितांच्या साठ्यापासून पोरके झालो असती याची कल्पना करवत नाही. तसा मी एककल्ली एकलकोंडा स्वभावाचा माझ्यासारख्या एकांगी माणसाला माझी बहिण कोपरापासून हात जोडत लाखोली वाहत असते त्यामुळे असणाऱ्या वेळेचा सदुपयोग करत डोक्यात आलेल्या आणि समोर दिसलेल्या गोष्टींची सांगड घालत लिहण्याचा मला छंद लागला पण लिहायचे काय यासाठी मात्र बहुतेक वेळा कोणत्या ना कोणत्या गोष्टीची मदत आजपर्यंत मला झाली. आज पु ल चे हसवणूक पुस्तक ह्या गोष्टीला कारणीभूत ठरले.

विचार केला तर किती सोप्प आणि तितकेच अवघड आहे लिहणे हे कमाल उंचीच्या लेखकाची कथा वाचताना अनुभवायला मिळते. लिहताना एखादा विषय निवडणे, त्या विषयाचा धागा पकडत ती कथा फुलवणे त्यात हास्याचे तुषार उडवत वाचणाऱ्याल मंत्रमुग्ध करणे हे सोप्प काम अजिबात नाही. चेहऱ्याचे, अंग विक्षिप्त चाळे करून लोकांना हसवणे सोप्पे असते पण केवळ शब्दाच्या आधारे लोकांच्या चेऱ्यावर हसू आणणारा भाई काही आगळाच. हसवणूक पुस्तकाचा पहिल्या कथेत भाईंनी कोणताही व्यक्ती जीवन जगण्यासाठी विशिष्ट एक काम निवडतो, ते त्यांनी का निवडले ह्या साध्या प्रश्नावर ते त्याच्या जवळच्या लोकांच्या मुलाखती घेतात त्यात ज्याप्रकारे विनोद निर्माण झालाय तो अप्रतिमच. भाईंनी केवळ इतरांवर व्यंग न करता विनोदी कथा लिहण्याचा त्याच्या अनुभवाबद्दल देखील तितक्याच व्यंगात्मक शब्दात बोलतात. शब्दाची ती साखळी वाक्य आणि ती प्रत्येक वाक्य अशी पेरली जातात की कधी चिमटा घेत टीका तर कधी हलकेच बोट फिरवून गुदगुल्या करणारा हा माणूस माणसाच्या गर्दीतील असामी/ तोड नसलेला माणूसच. त्याच्याबद्दल माझ्यासारख्या अल्पज्ञानी व्यक्तीने बोलावे, लिहावे किंवा कौतुक करणे म्हणजे मुंगीने हत्ती बनण्याचा प्रकार आहे पण मुद्दामच हे सगळे लिहले कारण त्यामुळे हसवणूक पुस्तकातील पहिला भाग वाचून मनात निर्माण झालेल्या विचारांना ब्लॉगच्या रूपातून बाहेर काढले. आशा आहे की आपल्याला माझा आजचा ब्लॉग आवडेल आणि ह्या ब्लॉगमुळे तुम्हीदेखील पु ल  देशपांडे वा तुमच्या कोणत्याही आवडीच्या लेखकाचे कोणते तरी एक पुस्तक धूळ खात पडलेल्या कपाटातुन बाहेर काढून वाचाल. एकामागे एक रील पाहत तासंतास अडकून राहण्यापेक्षा जिवंत आणि एक अमूल्य आनंद साजरा करण्यासाठी पुस्तकाशिवाय पर्याय नाही.

पुढची कथा वाचल्यावर लिहण्याचा मोह झालाच तर पुढचा ब्लॉग घेऊन तुमच्यासमोर सादर करीलच पण तोपर्यत ह्या ब्लॉगला लाईक करा, प्रतिक्रिया द्या कारण जे मी लिहतो आहे ते केवळ ह्याच तुमच्या प्रेमासाठी. परत भेटीपर्यत जय श्रीकृष्णा.........

शुक्रवार, २८ जून, २०२४

कल्की अवतार


कल्की पाहिला नाही तर काही नाही पाहिले. एक युनिव्हर्स म्हणून पहाल तर समजेलच पण हा चित्रपट गुंफलेला आहे सनातन धर्माच्या सिद्धांतांवर.  थोडस सनातन धर्माचे ज्ञान असेल तर कथा लवकर समजेल हे नक्की. असे चित्रपट एक वेगळ्या प्रकारे सनातन धर्म लोकांना समजावेल. बच्चन इतका उंच का किंवा अश्या अनेक प्रश्नाचे उत्तर सनातन धर्म आहे. जस जसे विश्व कलियुगात प्रवेश करत आहे तस तसे माणसे, जनावरे आणि परिसरात बदल झाला आहे. पूर्वीची लोक अधिक उंच, शक्तिशाली, दीर्घकाळ जगणारे होते त्याच काळातील अश्वत्थामा म्हणून तो इतर पात्रांपेक्षा उंच, शक्तिशाली आहे असो हा केवळ एक प्रश्न उत्तर दिले ते संकल्पना स्पष्ट करायला पण हा चित्रपट अजून बरेच भव्य होऊ शकतो. भगवान विष्णूचा जन्म कल्की या शेवटच्या अवतारात जन्म, सात चिरंजीवीची त्यात असणारी भूमिका सगळं सगळं चित्रपटातून मांडले गेले तर अज्ञानी हिंदूंना थोडस अधिक जागृत करता येईल याच अपेक्षेचे ओझे निर्मात्या, दिग्दर्शक जोडीवर टाकूया. चित्रपट नक्की पहा. भगवद्गीतेतील प्रसिद्ध श्लोक

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥4.7

म्हणजे

धर्माचा ऱ्हास होतो, अधर्माचे पारडे जड होते, जेव्हा जेव्हा पापाचे वर्चस्व वाढते त्यावेळी दुर्जनांचा नाशासाठी आणि सज्जनांच्या रक्षणासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात जन्म घेतो. 

माझा विषय चित्रपट त्यातील पात्र हा नाहीच तर आपल्या धर्माबद्दल सजग करणे, त्यानुसार वागणे, बदल घडवण्यासाठी उत्सुक करणे हा आहे आणि जर हा उद्देश हा चित्रपट निर्माण करणार असेल तर ते सोन्याहून पिवळे होणार नाही का? मारवल, डीसी युनिव्हर्स खूप पाहिले असतील पण आपल्या सनातन धर्म त्याचे युनिव्हर्स नक्कीच त्याहून खूप उच्च प्रतीचे आहे हे समजून घ्या. संसाराच्या जवाबदरीत, कष्टाचे फळ म्हणून मिळवणाऱ्या पैश्यातुन सुख खरेदी करणाऱ्या लोकहो सुख म्हणजे नक्की काय हे अजून तुम्हाला समजलेच नाही. स्वर्ग नरक ही प्रतीके पण आपले जीवन सत्याच्या, सनातन धर्माच्या मार्गावर चालले तर स्वर्ग तुमच्या पायाशी असल्याचा भास तुम्हाला होईल. असो आजच्या पुरते इतके बास पुढचा लेख सादर करेपर्यत जय श्रीकृष्णा......

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।

।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।

।।ॐ नमः शिवाय।।

गुरुवार, २७ जून, २०२४

क्रिकेट आणि जीवन

Afghanistan played well अस म्हणत हरलेल्या संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलणारे अनेक पुढे येतील पण त्या शब्दांनी खरच काही बदलणार आहे का?थोडस दुःख सहन करण्याची शक्ती त्यातून मिळेल पण मूळ दुःख जसेच्या तसे. एक मोठी संधी गेल्याचे दुःख आणि हे दुःख विसरत,आठवत करण्याचा उद्याचा प्रवास अनेक अयशस्वी प्रयत्नानंतर अखेर आज दक्षिण आफ्रिका संघ उपांत्य फेरीची दारे उघडत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. सामन्याचा निकाल जर वेगळा लागला असता तर आज जी लोक अफगाणिस्तानसाठी सांत्वन करत आहे तेच दक्षिण आफ्रिकेचे करत असते. सुख असो दुःख, विजय वा पराजय हे त्या त्या लोकांबरोबर आयुष्यभर राहणार आहे त्यामुळे कोणी साथ देवो ना देवो सगळ्या परिस्थितीत तुम्हालाच तर उभे राहायचे आहे. दक्षिण आफ्रिकेने विश्वचषक जिंकावा असे कायम वाटायचे पण समोर भारतीय संघ असेल तर दक्षिण आफ्रिकेचा पराभव जवळचा वाटणार. अंतिम सामन्याआधी इंग्लंडचे आव्हान भारतीय संघ मोडणार का? चांगली दहा बारा वर्षे चांगला खेळ करून शेवटच्या घडीला गटांगळ्या खाणारा आपला संघ यावेळी तर अंतिम फेरी पार करणार का हा महत्वाचा प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे. अफगाणिस्तान आज पहिल्यांदा इतक्या उंच यशाच्या शिखरावर पोहचल्याने त्याचे कौतुक पराभवानंतर होत आहे दक्षिण आफ्रिका संघाचे पराभवानंतर कौतुक लोकांनी केले असते का? चोकर म्हणत त्यांची खिल्ली उडवली असती त्यामुळे यश वा अपयश काहीही असले तरी त्यात हुरळून जाऊ नका की वाहत जाऊ नका. कुछ तो लोग कहेंगे या तत्वावर यश अपयश यातून शिकून आपला पुढचा प्रवास करत रहायचा. कोणीही कोणाचे नसते तरीही कोणी बरोबर आले तर त्याच्या सोबत नाही सोबत आले तर त्याच्या विना आपल्याला आपला प्रवास करावाच लागणार आहे. भारतीय संघाला शुभेछा देत आजचे दोन शब्द थांबवतो.  

रविवार, ९ जून, २०२४

भारत

भारत देश म्हणजे असलेल्या जमिनीचा तुकडा नाही पण देश बनलाय तो इथल्या जमिनीवर जगणाऱ्या माणसांमुळे. ह्याच माणसाच्या विचारांनी एक ध्येय निश्चित होते आणि त्या ध्येयाचा पाठलाग करत लक्ष्य प्राप्त होते पण जर ह्याच माणसाचे ध्येय वेगवेगळे असतील तर त्याचे लक्ष्य देखील वेगळे असतील आणि हेच आज आपल्या देशात, भारतभूमीत घडत आहे.

भारत देश जगातील सर्वाधिक जनसंख्या असलेला देश त्यामुळे जितकी डोकी तितके विचार तर असणार पण स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी विचाराचा उपयोग करून देशात मतांतरे होणार असतील तर देश भविष्यात आपल्या ध्येयापासून विचलित होण्याचे अधिक चिन्ह आहे. देशात निवडणुका झाल्यात, निकाल मागच्या दोन वेळेप्रमाणे बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापन करण्यासाठी काही पक्षांची युती सरकार स्थापन करत आहे पण सत्ताधारी आणि विरोधक दोन्ही सत्ता मिळवण्यासाठी जे विषमता भारत देशात पसरवत आहे ते एक भयानक आहे. राजकारणी लोकांना सत्ता हवी पण सत्ता मिळवण्यासाठी जे एकमेकांवर आरोप, डाव केले जात आहे ते पाहता त्या सत्तेचा मोह त्यांना सत्ता उपभोगायला हवी आहे पण देशातील जनतेला, देशाला मोठं करण्यात त्याचा दृष्टिकोन आहे का? देशाला सत्ताधारी जितके गरजेचे तितकेच विरोधक पण केवळ सत्ता मिळवण्यासाठी होत असलेल्या कुरघोडी म्हणजे राजकारण हा विषय आता बंद करून सत्ताधारी पक्षाने देश चालवताना विरोधकांना बरोबर घेणे तसेच विरोधकांनी योग्य गोष्टींना पाठिंबा, त्यात बदल सांगत देश मोठा कसा होईल याकडे लक्ष का नाही द्यावे? पण वेगवेगळ्या गटात, पक्षात विखुरलेल्या लोकांना देशाबद्दल विचार करायला खरच का वेळ आहे? मत मिळवण्यासाठी ज्याप्रकारे लोकांना पैसा वाटला जातोय, आश्वासने दिली जात आहे आहे, स्वप्ने दाखवली जात आहे, समाजात दोन जातीत, धर्मात एखाद्याला कुरवाळले जात आहे तर दुसऱ्याला फटकारले जात आहे हे भारत देशाला समृद्ध तर अजिबात बनवत नाही आहे. पक्ष त्याचे वैयक्तिक अजेंडे यामुळे त्या पक्षाला अनुसारक अधिक वेडे होत त्या अजेंड्यावर काम करताना आपल्याला दिसेल पण खरा अजेंडा तर देश हवा आहे ना पण देश हा अजेंडाच हरवला आहे.

देश माणसांनी बनतो, विचारांनी बनतो पण आपल्या देशातील अडचणी हेच माणसे आहेत. काहींना खलिस्तान बनवायचा आहे, काहींना मुस्लिम राष्ट्र तर काहींना देशात इतक्या अडचणी निर्माण करायच्या आहेत की हा देश खंड खंड वेगळा होईल. ज्याप्रकारे मुस्लिम लोकांनी मतदान केले आहे, ज्याप्रकारे काही विशिष्ट पक्षांनी त्यांना आश्वासने दिलीत ती देश घडवणारे नाही तर बिघडवणारे आहेत असं माझं तरी मत आहे. त्या समाजाचे विचार, ध्येय तर ठरलेले आहे पण सत्तेच्या मोहात, मुठभर मताच्या भिकेसाठी हे विरोधक देशाचे किती मोठे नुकसान करत आहेत हे त्यांना कळत नसावे. विचार माणसाच्या जीवनाला आकार देतात म्हणजे विचारांवर माणूस घडतो वा बिघडतो अश्यावेळी तो एक विचार देश होईल का?


सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...