बुधवार, २९ मे, २०२४

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर:जयंती स्मरण

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उर्फ तात्या यांचा जयंती दिन बऱ्याच सावरकर प्रेमींनी आनंदात साजरा केला.आपआपल्या सोशल मीडिया खात्यावरून बऱ्याच लोकांनी सावरकरांना स्मरण केले तरीही बहुतांश समाजाला अजूनही सावरकर या जहाल क्रांतिकारकाबद्दल अजूनही म्हणावं तसे प्रेम, आसक्ती आलेली नाही कारण डोळ्यावर बांधलेली झापड,मनात उगाच त्याच्याबद्दल तिढा आणि बुद्धीत पाठ्यपुस्तकात काही विशिष्ट माणसाचा केलेला उहापोह सावरकरांबद्दल अजूनही म्हणावं तसे जन आणि मन परिवर्तन होणे गरजेचे आहे.

सोशल मीडियात व्यक्त झालेल्या काही महत्वाच्या गोष्टी म्हणजे अनादी मी अनंत मी, अस्पृश्य समजले गेलेल्या समाजासाठी निर्माण केलेले पतीतपावन मंदिर, अटलजी नी सावरकर मतलब व्यक्त केलेले मत, ने मजसी ने परत मातृभूमीला, गांधी आणि सावरकर भेट तसेच सुभाषचंद्र बोस आणि सावरकर भेट, जयोस्तुते हे गीत, हिंदू म्हणून लोकांना एकत्र आणणारा नेता, अखंड भारत ही संकल्पना मांडणारे व्यतिमत्व, सामाजिक तसेच लेखक, कवी म्हणून आठवण याव्यतिरिक्त अजून खूप मोठे खूपच मोठे व्यक्तिमत्व म्हणजे सावरकर.

सावरकर कुटुंब त्याने भोगलेल्या अपार दुःख, कष्ट याबद्दल वाचले तरी डोळ्यात पाणी येईल. लहानपणी इंग्रजांविरुद्ध लढण्याचा प्रण केला, खेळण्या बागळण्याच्या दिवसात मुलांमध्ये देशप्रेम वृद्धिंगत करणारे हे बाळ,प्रत्येक सवंगड्याला घरातून एक तरी शस्त्र आणण्याचे आवाहन असेल की छत्रपती शिवाजी महाराज यांच्याप्रमाणे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची बालवयात घेतलेली प्रतिज्ञा असेल वा वेळोवेळी मित्रमेळा, अभिनव भारत सोसायटी सारख्या संघटना करून देशप्रेमी व्यक्तींना पैलू पाडून देशभक्त बनवणारा हा काळाच्या पुढे विचार करणारा नेता. दारुगोळा, बंदुका, बॉम्ब बनवण्याचे आणि ती माहिती भारतात पाठवण्यासाठी केलेली मेहमत असेल की इंग्रजांच्या लिखापडीच अभ्यास करत १८५७ एक स्वातंत्र्यसमर नावाचा इतिहास पुढे करणारा लेखक, बुद्धीच नाही तर शरीर सामर्थ्य, वेळप्रसंगी अक्कलहुषारी वापरण्याचा आग्रह धरणारा नेता, कायद्याचा अभ्यासक म्हणून फ्रान्समध्ये राजकीय कैदी बनण्यासाठी समुद्रात मारलेली उडी, आरोपीच्या पिंजऱ्यात असतानाही कायद्याची समज दाखवताना खटला भारतात नाही तर लंडन मध्ये चालवला गेला पाहिजे असा आग्रह धरणारा धोरणी नेता, काळ्यापाण्याच्या शिक्षेत भोगलेली मरणप्राय यातना, त्यातूनही तिथे निरक्षर कैद्यांना शिक्षण देण्यासाठी केलेली धडपड, बेरी बरोबर खेळेलला मानसिक बुद्धिबळ, त्याच बरोबर तुरुंगातून सुटण्यासाठी केलेले अनेक अर्ज ज्याला आजकाल माफीनामा म्हणणाऱ्या बेअक्कल लोकांना खरंच सावरकर कळले आहेत का? हिंदूंचा खरा शत्रू कोणी इतर समाजातील लोक नसून हिंदूच आहे असं म्हणणारा खमक्या, आईसमान वहिनीच्या मृत्यू, आपल्या लहानग्या मुलाचा मृत झालेली बातमी, काळयापाण्याच्या शिक्षेत वडीलबंधू याच्या भेटीसाठी, एक नजर पाहण्यासाठी झालेली त्याची मनाची स्थिती कोणी समजली असेल का? अनेक प्रयत्नानंतर आणि अनेक अटी मान्य करत अंदमान मधून बाहेर पडल्यानंतर आरश्यातील प्रतिमेसारखे आभासी जीवन जगत असताना स्मरणशक्तीचा वापर करत कैदेत असताना रचलेल्या कविता पुन्हा लिहिणारा अजब व्यक्तिमत्व असणारे हे व्यक्तिमत्त्व कोणत्याही त्या काळातील नेत्याच्या दहा वीस पाऊले पुढे विचार करणारे व्यक्तिमत्व होते. सावरकरांनी मरेपर्यंत केलेला संघर्ष हा समजून घेण्यासाठी, त्याचे विचार वाचण्यासाठी, समजण्यासाठी थोडस आजच्या लोकांनी प्रयत्न केला तर कदाचित सावरकरांच्या मनातील भारत घडवला जाऊ शकतो. 

माझ्यासारखा अज्ञानी, मूर्ख काय त्या धगधगत्या सूर्याचे वर्णन करणार तरीही माझ्या अक्कलहुशारीने जितकं आठवत तितकं लिहून सावरकर तुमच्यापुढे मांडण्याचा हा थोकटा प्रयत्न. चूक भूल माफी असावी पण मला फक्त व्यक्त व्हायचे होते, थोडं जे सावरकर कळले ते सांगायचे होते. सावरकर हे इतका मोठे आहे की अश्या कैक लेख मालिका लिहल्या तरी केवळ नखभर सावरकर लोकांसमोर उलगडता येतील. 

अश्याच अनेक अन्य लेख वाचण्यासाठी follow करा dairynotes137.blogspot.com

पुढचा लेख सादर करेपर्यत माझा सर्वांना जय श्रीकृष्णा



शनिवार, २५ मे, २०२४

पार्किंग


आज शनिवार त्यामुळे ऑफिसला सुट्टी, वडील गावाला काकांकडे तर बायको आणि मूल उन्हाळी सुट्टी मामाच्या गावाला गेलेले त्यामुळे घरात एकटाच. वेळ घालवण्यासाठी कोणता चित्रपट पहावा विचार करत असताना पार्किंग हा चित्रपट आणि त्याचा ट्रेलर आवडला म्हणून तो पहिला. भन्नाट विषय आणि गुंफलेली गोष्ट आणि मानवी भावभावनांचे केलेलं चित्रण पाहून अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही

आजच्या घडीला प्रत्येकाला कमावण्याची अक्कल नसली तरी दारासमोर चार चाकी गाडी हवी असते त्यात देश विकसित होत चालला आहे तसे कारखानदारी विशेष जोरात आहे ह्याच कारखाना व्यवसायामुळे प्रचंड प्रमाणात नवनवीन गाड्या निर्माण होतात आणि त्या विकण्यासाठी कर्जदेखील सहजासहजी मिळतात त्याचाच परिणाम भारतात माणसापेक्षा कदाचित गाड्याची संख्या अधिक असेल अशी स्थिती निर्माण झाली आहे आणि जितकी वाहने बनत आहे तितकीच रस्त्यावर येत आहे पण यामुळे निर्माण झालाय पार्किंग समस्येचा जन्म. रस्त्यावर वाहने असतात तोपर्यत रस्त्यावर केवळ गर्दीच गर्दी आणि दिवस मावळतीला आला की हीच रस्त्यावरची गर्दी  घरासमोर, गल्ली, मैदाने, मिळेल तिथे गाड्या पार्किंग करण्याचा परवाना लोकांना मिळाला आहे. गाड्या विकताना पार्किंग आहे की नाही याची चौकशी तरी केली जाते का? पार्किंगचा मुद्दा तरी कोणाच्या लक्षात आलाय का? स्वमालकी असलेल्या कित्येक गाड्याना पार्किंगच नसते कारण तिथे सरकारी, सार्वजनिक जागेवर लोकांनी आपापली मक्तेदारी केली आहे आणि त्यामुळे वाढतोय तो संघर्ष. काही देशात गाडी चालवण्याचा परवाना इतका महाग आहे की तिथे गाडी घेण्यापेक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लोक वापरतात तर काही देशात गाडी पार्क करण्याची जागा नसेल तर गाडी विकत मिळत नाही पण आपल्या भारतात गाडी घेणारा त्या गाडीचे हप्ते तरी देऊ शकतो का हे देखील तपासले जात नसावे कदाचित कारण हप्ते चुकले की आहेच बँका जप्त करायला पण पार्किंग ही समस्या येत्या काळात खूप अडचणीची गोष्ट होणार आहे  हे नक्की. लोक गरज असण्यापेक्षा केवळ श्रीमंतीचा थाट आणि समाजात आपली वट दाखवण्यासाठी गाड्या घेतात. ज्याप्रकारे गाड्या रस्त्यावर येत आहेत ते पाहता रस्ता कितीही मोठा केला तरी ट्रॅफिकची समस्या कमी होणार नाही अश्यावेळी केवळ प्रतिकात्मक विकास नावावर चाललेली समाज व्यवस्थेची घडी नीट बसवण्यासाठी सरकारला येत्या काळात काही ठाम भूमिका घ्याव्या लागतील असे वाटते. 

राजकीय भूमिका घेतली तेव्हा घेतील पण तो दिवस येईल तेव्हा येईल पण तोपर्यंत २०२३ मध्ये प्रदर्शित झालेला हा पार्कींग नावाचा चित्रपट किमान काही लोकांचे डोळे उघडू शकतात. गाडी घेतल्याने पार्किंग आपापली गाडी पार्क करण्यासाठी दोन कुटुंबात कसा संघर्ष होतो हे हा चित्रपट आपल्याला दाखवतो. हा संघर्ष इतक्या टोकाला जातो की दोन्ही कुटुंबातील हेकेखोर कुटुंब प्रमुख दुसऱ्याचा संसार, नोकरी, समाजातील इभ्रत इतकेच काय एकमेकांना आयुष्यातून संपवून टाकण्याचा देखील प्रयत्न करतात. पार्किंगची ही समस्या किती टोकाची भूमिका घ्यायला प्रवृत्त करते हे हा चित्रपट आपल्याला दाखवतो. चित्रपटाचा शेवट होईपर्यंत पुढे काय होईल, माणूस अजून किती जनावरसारखा वागेल याची उत्सुकता लागून राहते. माणूस मी, माझे यात इतका गुरफटून गेला आहे की तो केवळ दिखाव्यासाठी किती खालच्या पातळीला जाऊ शकतो हे हा चित्रपट अचूक दाखवतो त्यामुळे चित्रपट नक्की पहा आणि निव्वळ चित्रपट पाहूग नका तर त्यातून काही शिका देखील. 

पुढचा लेख घेऊन येईपर्यंत जय श्रीकृष्णा

मंगळवार, २१ मे, २०२४

लोकसभा निवडणूक निकाल २०२४

लोकसभा निकाल २०२४ यात कोणताही निकाल उल्लेख केला नसला तरी निकालाच्या दिवशी निकालानंतर कोणत्या घडामोडींवर नजर ठेवली पाहिजे याचबरोबर आज मीडियात छोट्या मोठ्या पक्षाचे मोठे नेते काय बोलतात याकडे लक्ष देऊन त्याच्या बोलण्याचा निष्कर्ष काढला पाहिजे. मुळात काही पक्ष तर उरलेल्या दोन निवडणूक टप्पे होण्याआधीच आपली हार मान्य केली आहे. काही लोकांचे तर केवळ आपलं घराणे, माझा पोर, माझी पोरगी यात जीव अटकला आहे तर काहींचे आपल्या घराण्याच्या ऐतिहासिक नाव पुढे चालू राहण्यासाठी रडकुंडीला आले आहे असो इंडी आघाडी हे केवळ एक मृगजळ आहे तसे ते प्रत्येक पक्ष केवळ मी आणि माझा पक्ष इतकाच विचार करत असले तरी निकालानंतर आपण कापसाच्या ढिगाऱ्यात सुई शोधावी अशी गत होणार हे स्पष्ट असल्याने केवळ निडणुकीनंतर आपल्या पक्षाला जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी ती लोक एकत्र आहे. निकालानंतर त्या इंडी आघाडीत होणाऱ्या कुस्त्या, भांडणे, वितुष्ट तर हास्यजत्रेला मागे पाडतील अशी आशा आहे. काही आप सारख्या पक्षाचे बरे आहे की ते पूर्णतः नामशेष होण्याच्या मार्गावर पळत आहे तर त्याचा नेता जून महिना उजाडला की परत अंधार कोठडीत जाणार आहे. नावात ममता असणारी ती पुढारी मतांसाठी पाय मोडून घेते, डोकं फोडून घेते ती निकालानंतर कोलांटी उडी मारताना दिसू शकते.कदाचित भाजपा पूर्ण बहुमत मिळवेल असे ही नाही त्यामुळे उद्या काय होणार ह्याची काहीच कल्पना नसताना नक्की एक व्यक्ती, एक भारतीय नागरिक, मतदार म्हणून पुढची पाच वर्षे ह्या पुढाऱ्यांचा मर्कटलीला पहाव्या लागणार असताना केवळ निवडणुकीत निकालानंतर ह्याच्या स्वार्थासाठी होणाऱ्या माकडचाळे कसे पहायचे, कासआनंद घ्यायचा यासाठी हा लेख. तुमचा आवडता नेता कोणताही असो, पक्ष कोणताही असो तो त्याचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी कधी कोणत्या गटात जाईल याची शक्यता नाही अश्या वेळी कोणताही झेंडा खांद्यावर न घेता निवडणुकीचा आणि निकालांचा आनंद घ्या
आजचा विषय थोडा विचित्र आहे कारण मला भाजपा, मोदी, पुढचा पंतप्रधान, ४००+ जागा या गोष्टींवर न बोलता विरोधकांवर बोलायचे आहे. बोलायचे म्हणजे बोलक्या बहुल्यातील अर्धवटराव सारख्या शाब्दिक कोट्या करायच्या नाही की उद्धवराव सारख्या शाब्दिक टोमणे मारायचे नाही. 

मोदींचे जर ४०० जागा निवडून येणारच असेल तर विचार करा विरोधकांना किती जागा मिळतील? नंबर दोन वर कोण राहील? विरोधी पक्ष नेता हे पद मिळण्याइतके तरी जागा एक पक्ष निवडुन आणेल का? नाही आणता आले तर प्रमुख विरोधी पक्ष आणि विरोधी पक्ष नेता हे पद मिळवण्यासाठी ते काय करतील? मोदी मोदी करत सगळे आनंदात उड्या हाणत असतील, जल्लोष करत असतील तिथे विरोधक मात्र विवंचनेत, आकडे मोडीत अडकलेले असतील. नाही म्हंटले तरी विरोधकात काँग्रेसला जास्तीत जास्त उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे अश्या वेळी मागच्या वेळी काँग्रेसला विरोधी पक्ष नेता, पक्ष म्हणून मान्यता मिळाली पण यावेळी मिळेलच असे नाही म्हणूनच इंडी आघाडीतील छोट्या छोट्या प्रादेशिक पक्षाचा भाव वाढणार आहे. प्रादेशिक पक्ष म्हणजे त्याची जास्त नाही पण थोडे फार उमेदवार निवडून आले आहे पण भविष्य अंधारमय दिसत आहे ती लोक आपला पक्ष विकायला मागे पुढे पाहणार नाही आणि असेच छोटे प्रादेशिक पक्ष विकत घेत काँग्रेस विरोधी पक्ष बनण्याचे आपले स्वप्न पूर्ण करेल. 

काही पक्ष तर असे आहेत की ज्यांना उद्याचा निकाल काय येणार आहे ह्याचा अंदाज आल्याने ४ जून नंतर अनेक छोटे पक्ष काँग्रेस मध्ये समाविष्ट होतील असे भाकीत करणारे आधारवड शरद पवार हे आघाडीवर असणार आहे. एकंदरीत शरद पवार ४ जून नंतरच काँग्रेस मध्ये जायची भाषा का करत आहे ते हुशार वाचकांना समजले असेल त्यामुळे कोणतेही एक स्टेटमेंट असेल किंवा वर्तमानपत्रातील दोन ओळी यातील गांभीर्य, मतितार्थ काढणे सगळ्यांना समजत नाही त्यामुळे केवळ कोणता तरी एक झेंडा खांद्यावर घेत कोण्या नेत्याला अंध पाठींबा देण्याआधी आपल्याला राजकारण किती कळत याची स्वपरीक्षा करत जा. जरी तुम्ही या परीक्षेत अव्वल आलात तरी पुढारी, नेते आणि राजकारणी पुढच्या घडीला स्वार्थ साधण्यासाठी कोणता डाव खेळातील ह्याची हमी कोणीही देऊ शकणार नाही त्यामुळे जे घडतंय ते नीट पहा, वाहवत जाऊ नका, कोणता नेता काय बोलतोय, त्याची देह बोली काय आहे याकडे नक्की लक्ष द्या. मोदी सरकार ४०० पार जाऊ की न जाऊ यापेक्षा विरोधी पक्षाची निवडणूक निकालानंतर होणारी धावपळ पाहण्यासारखी असेल यात शंकाच नाही. केवळ मोदी जिंकला, ४०० पार गेला, तिसऱ्यांदा पंतप्रधान बनला ह्या आनंदात विरोधकांची अवस्था न पाहण्याची चूक तुम्ही करू नये म्हणून हा छोटासा लेख. आवडला तर लाईक करा, शेयर करा आणि आनंदी रहा

जय श्रीराम, जय श्रीकृष्णा

सोमवार, ६ मे, २०२४

रविवार, कुटुंब आणि किस्सा वाचनाचा

आजचा काळ हा डिजिटल काळ आहे. पुस्तक, वर्तमानपत्र याचा खप असला तरी अधिकाधिक लोक पांढऱ्या प्रकाशात काळे अक्षर वाचताना आपल्याला दिसतात पण खरी गंमत पुस्तक हातात घेऊन ते वाचण्यात आहे ना ते डिजिटल पुस्तकात नाहीच. माणसाने दिवसातून एक तास तरी वाचन केले पाहिजे, दोन तास केले तर अतिउत्तम पण आजकाल मोबाईल, सोशल मिडिया, ते व्हाट्सएप आणि निरनिराळे सोशल साईट यामुळे जे काही उथळ,बिनकामाचे वाचून आजची पिढी मोठी होत आहे ते घातक आहे. पुस्तके आपल्या ज्ञानात भर घालतात, नवीन नवीन माहिती, गोष्टी आपल्याला पुस्तक, मासिके, पुरवण्या, वर्तनमानपत्र यातून मिळत असते. प्रत्येक व्यक्तीची एक आवड निवड असते, बुद्धी असते त्यानुसार तो त्याला आवडेल ते वाचेल पण आपण वाचतोय का? ते म्हणतात ना की ज्ञानाच्या सागरात स्वतःला बुद्धिमान समजणाऱ्या व्यक्तीचे केवळ तळवेच भिजलेले असतात इतकं ज्ञानाचा सागर विशाल आहे त्यामुळे ह्या सागरात कुठे काय वाचायला, शिकायला मिळेल हे सांगता येणार नाही.
वाचाल तर वाचाल अस लहानपणी शिकलोय ते ही विसरलोय का? 

बरं मी का इतकं पेटलोय, तुम्हाला वाचायला सांगतोय त्याला एक कारण आहे. स्वतःला बुद्धिमान समजण्याचे व्यसन मलाही आहे त्यामुळे अनाहूतपणे मिळालेल्या एका कागदाचा तुकडा मला नवीन ज्ञान देऊन गेला ते ज्ञान इथे व्यक्त करून त्यात तुम्हाला सहभागी करावे म्हणून हा लेख. 

तुमचा मित्र सनातन याचा नमस्कार, आज रविवार सुट्टीचा वार आणि महिन्याचा पहिला आठवडा देखील. आज सकाळी निवांत उठलो. सकाळची कामे करायला घेतली तर आमच्या सौ हातात पिशव्या आणि महिन्याची किराणा वही घेत बाहेर पडल्या. महिनाभराचा किराणा आणण्यासाठी दोन्ही मुलीची मदत घेत छोट्या मोठ्या तीन चार पिशव्या घरात आल्या. अर्ध्या तासात मी ही सगळं आवरून सोसायटीच्या कट्यावर फिरायला बाहेर पडणार तेच दुपारच्या जेवणाचा मेनू काय असं विचारण्यात आले. अन्नपूर्णाच्या मनात जे असेल ते करा असे सांगत टाकलेला बॉउन्सर बॉल ताकदीने पूल/ हुकच्या शॉट सारखा परतावत कट्यावर बॉलिंग करायला मी बाहेर पडलो. अर्धा तास स्वतःची हुशारी आणि इतरांची टिंगल टवाळी केल्यावर पोटात दोन तीन उपाशी कावळे चक्कर येऊन पडलेत, उंदर टणाटण उड्या मारताहेत आणि कुत्र्याने तोंड वर करत भुssss करण्याआधीच घरी परतावं असे मनात आल्याने सुबह का भुला परत घरी परतला. सूर्य डोक्यावर यायचा बाकी होता तरी बाहेर उन्हाचा चटका घरात सौंच्या चिडलेल्या चेहरा ग्वाही देत होता. भरलेल्या वांगे तयार होत असलेल्या रस्यात उडी मारण्यासाठी तळमळत होते. छोटी मुलगी त्याच न आवडणाऱ्या वांग्यांना ताटात पाहून गाल फुगवून बसली होती तर मोठी मुलगी उन्हाळ्याच्या सुट्टीत पुढील वर्षाचा अभ्यास करत होती. परिस्थितीचे गांभीर्य पाहत स्वयंपाकघरात आडव्या तिडव्या पडलेल्या त्या किरण्याच्या पिशव्या मला घरातील परिस्थिती निवळण्याची योग्य दिशा दाखवत होत्या. सुट्टीच्या दिवस असूनही अंगातील सर्व आळस झटकत किराण्याच पिशव्यामधून किराणा बाहेर काढायला लागलो आणि जे होऊ नये तेच घडले. एक छोट्या वर्तमानपत्राच्या कागदात बांधलेली कोणती तरी पिवळी डाळ स्वयंपाक घरात चौफेर पसरली आणि जिथं घरातील वातावरण खेळीमेळीचे करायला गेलेलो मी आता मोठे डोळे आणि तोंडाचा आ वासून सौ समोर बसलेलो होतो. दिवाळीच्या दिवसात दुपारी वामकुक्षी घ्यायला डोळे झाकावे आणि कोणी बाहेर सुतळी बॉम्ब फोडवा तस सौ  माझ्यावर फुटली. फुटलेल्या त्या पिवळ्या डाळीचा कागद हातात तसाच पकडत पहिले हॉल मध्ये आमच्या आदरणीय बाबाच्या बाजूला येऊन बसलो. स्वयंपाकघरातून स्टीलच्या डब्याचे आदळण्याचा आवाज मला स्वयंपाक घरातील सौ चा अविर्भाव काय असेल हे महाभारतातील संजयला मिळलेल्या दिव्य दृष्टीची अनुभूती करून देत होत. दूरचित्रवाणी वरच्या बातम्या एकदम पिन ड्रॉप शांतता झालेल्या घरात उगाच शांततेचा खून करत होते आणि हॉल मधील बाबाची उपस्थिती माझा प्रतिकात्मक खून होण्यापासून वाचवत होता. असो एकंदरीत करायला गेलो एक आणि झाले भलतेच पण यावरून घरात मीच कसा राजा आहे हे वाटत नसले तरी सत्ता आपलीच चालते हे तुम्हाला सांगायला मला आवडेल. आत सांडलेली ती डाळ कोणती हे माहीत न्हवते पण तो डाळीचा वर्तमानपत्राचा कागद मात्र हातात होता.

काही लोकांना देवाने लोक वाचायला येतील अशी शक्ती दिलेली असते आणि मी तर त्यातही अव्वल आहे असे माझे मत आहे. लोक घरात पडलेले वर्तमानपत्र वाचतील अशी अपेक्षा धरू नका पण तेच वर्तमानपत्र एस टी त बसून वाचायला लागेल तर शेजारचा इच्छा नसतानाही त्यात डोकं घालत असतो हा माझा अनुभव आहे. आजच्या वर्तमानपत्राला हात ही न लावलेला मी, तो डाळीच्या पुड्याचा वर्तमानपत्राचा तुकडा वाचायला लागलो. ती एक जाहिरात होती आणि ती तुम्हाला पाहायला म्हणून त्या कागदाच्या तुकड्याचा हा तो फोटो
अनाहूतपणे मिळालेला हा तुकडा ज्ञानाची कवाडे उघडून जाईल असे वाटले नव्हते. एकीगाई आपल्याला ह्या जीवनात काय करायचे ते ध्येय देते, कायझेन त्यात प्रत्येकवेळी सुधारणा करत अधिक चांगले काम करण्यास प्रेरित करते.पोमोडोरो प्रत्येक कामात मन लागण्यासाठी, वेळेचे नियोजनाद्वारे आयुष्याचे नियोजन करणे. हारी हाची बु द्वारे जेवण भरपेट न करता थोडं रिकामे ठेवल्याने कसे फायदे होतात ते असेल की आपली चौकस बुद्धी जागृत ठेवत नवीन गोष्ट शिकण्याची नवशिक्या बनण्याची शोशिन पद्धत आपल्याला बरेच काही शिकवून जात नाही का?

कायझेन बद्दल माहिती असले तरी इतर प्रत्येक प्रकार/ टेक्निक याबद्दल मी तरी पहिल्यादा वाचत होतो त्यामुळे त्याबद्दल माहिती लगेच आजच्या काळातील प्रत्येक गोष्टीची माहिती ठेवणारे आणि विचारल्यावर समोर आणू  देणारे गूगल ला विचारले आणि माहिती करून घेतली. ह्या पद्धतीबद्दल माहिती लेखातुन देऊ शकलो असतो पण ह्या पद्धतीची माहिती तुम्ही शोधा, आपल्या मुलांना सांगा कारण आपल्याला तर क्षणाक्षणाला आपल्यात चांगले बदल घडवायला आवडेल नाही का? . हे कात्रण नक्की कोणत्या वर्तमानपत्रातले माहीत नसते तरी केसरी @Kesari_Tours ह्या ट्रॅव्हल कंपनीने केलेल्या ह्या अभिनव जाहिरातीसाठी त्याचे धन्यवाद.

अशीच माहिती, लेख वाचण्यासाठी, इतरांपर्यंत पोहचवण्यासाठी Dairynotes ह्या ब्लॉगपोस्टला follow करायला विसरू नका. आपल्या प्रतिक्रिया Dairynotes137@gmail.com वर मेल करा.....

परत नवीन लेख घेऊन येईपर्यंत जय श्रीकृष्ण





गुरुवार, २८ मार्च, २०२४

इब्राहिमची गोष्ट

इब्राहिमच्या बापाची दोन लग्न झाली होती. पहिल्या बायकोपासून इब्राहिम तर दुसऱ्या बायकोपासून सराह झाली. नंतर इब्राहिमने सराहशी लग्न केले जी त्याची अर्धी सावत्र बहीण होती. (नातेसंबंध, रक्ताचे नाते हा संबंध विसरून आपली हौस भागवण्यासाठी, व्यभिचार करण्यास मागे हटत नाही अशी ही निकृष्ट पद्धती) इब्राहिमचा मूर्ती पूजेला असलेला विरोधामुळे त्याच्या बापाने त्याला घराबाहेर काढले  पुढे हे जोडपे भ्रमंती करत करत मिस्त्र देशात आलं जिथं तिथला राजा सराहच्या सौंदर्यावर लट्टू झाला. राजाचे मन एखाद्या सुंदरीवर आल्यावर तो काय काय करतो हे ठाऊक असल्याने इब्राहिमने सराह त्याची बायको नसून बहीण आहे असं सांगतो. ठरक पूर्ण करण्यासाठी नवऱ्याला मारून त्याची बायको हस्तगत करण्याची त्याकाळात पायंडा असल्याने स्वतःची ओळख लपवून इब्राहिम राहिला (राजापेक्षा कोणीही समर्थवान नसते, राजाने ठरवले तर त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी तो कोणाचाही जीव घेतो त्यामुळे आपला जीव वाचवण्यासाठी इब्राहिम डोकं वापरतो)

मिस्त्रचा राजा स्वतःची इच्छा भागवण्यासाठी खूप प्रयत्न करतो पण ती इच्छा पूर्ण होत नसते ती अल्ला पूर्ण होऊ देत नसतो त्यामुळे आपल्या आवडत्या दासी  हजरा हिला सराहला देऊन पुढच्या भ्रमंतीची परवानगी देतो. लग्नाच्या कैक वर्षानंतर ही मुलं न झाल्याने सराह इब्राहिमला त्याच्या दासी हजराशी समागम करून वंश वाढवण्याचा सल्ला देतो. (गुलाम असलेल्या महिलेशी समागम करणे त्याच्या काळात अधिकार असल्याने) इब्राहिमने लगेच बायको सराहचा सल्ला मानत वंश वाढवण्याचे काम हातात घेतले काही दिवसांनी हजरा पासून इस्माईल आणि सराह पासून इसाक जन्मला. सराह आपल्या लेकाची काळजी असल्याने गुलाम हजरा पासून जन्मलेल्या लेकराला नाकारले ज्यामुळे असेल नसेल त्या संपत्तीत हिस्सेदारी टाळता येईल. भविष्यात कलह नको म्हणून इब्राहिम, हजरा आणि त्याचा  लेक इस्माईल याना दुसरीकडे राहण्यास सराह ने सांगितले त्यानुसार इब्राहिम याना घेऊन मक्केला राहायला आला. एक रात्री स्वप्नात अल्लाने इब्राहिमची सगळ्यात मौल्यवान गोष्ट कोणती अस विचारले त्यावर इब्राहिमने त्याचा मुलगा  इस्माईलचे नाव घेतले. अल्लाने त्या मौल्यवान गोष्टीचे कुर्बानी मागितले. स्वप्नातून जागे झाल्यावर आपला मुलगा इस्माईल याला आपले स्वप्न सांगितले. इस्माईल एका पायावर कुर्बाणीसाठी तयार झाला. कुर्बानी देण्यासाठी जवळच्या एका टेकडीवर बाप आणि लेक आले पण लेकाचा जीव घ्यायला बापाला जमेना म्हणून डोळ्यावर पट्टी बांधत लेक इस्माईलच्या गळ्यावरून सुरा चालवला. गरम रक्त हाताला लागल्यावर आपले डोळे उघडून इब्राहिमने पाहिलं तर इस्माईल लांब उभा राहून स्माईल करत होता तर त्याच्या जागी एक मेंढीसारखा प्राणी मरून पडला होता. अल्लाने घेतलेल्या इब्राहिमच्या परीक्षेत इब्राहिम 100% गुण मिळवत अव्वल आला होता.खरंतर इस्माईल बाजूला करून मेंढी ठेवायची कामगिरी जिब्राईल नावाच्या अल्लाच्या दूताने अल्लाच्या सांगण्यावरून पूर्ण केली होती. अश्यारीतीने बकरी ईद नावाचा सण आणि बकऱ्याला हलाल करून खाण्याचा उद्योग सुरू झाला. 

इब्राहिम वयाची 150 ते 175 वर्ष जिवंत होता म्हणे ज्यात त्याने मूर्तिपूजेला विरोध, काही मुर्त्या तोडून टाकण्याचे आणि लोकांना मूर्ती पुजा चुकीचे असल्याचे सांगणे अशी कामे केली होती. मुर्त्या तोडण्याच्या आरोपात ह्याला गावकऱ्यांनी आगीत ढकलला होता पण त्या आगीतून तो बाहेर आला, त्याला काहीच झाले नव्हते अस म्हणलं जात इतका मोठा चमत्कार झाल्यानंतरही लोकांनी इब्राहिमच्या अल्ला आणि मूर्तीत देव नसतो या दाव्यांवर अविश्वास दाखवत हाकलून दिले होते. मरणाच्या जवळ आल्यावर तो एकदम शांत, निस्तेज झाला होता. काही काही दाव्यानुसार इस्माईल बळीच्या वेळी नसून इसाक होता असे म्हंटले जाते. इब्राहिम हे पात्र केवळ इस्लाम नाही तर यहुदी आणि ख्रिस्त धर्मात देखील महत्वाचे पात्र आहे. तिन्ही धर्मात ह्या व्यक्तीचा उल्लेख म्हणजे हे तिन्ही धर्म कोणत्या ना कोणत्या कारणाने एकत्र जोडलेले आहे हे निश्चित. कदाचित आपली विचारधारा, गट प्रस्थपित करण्यासाठी प्रस्थापित समान धागा पकडून तो विचार, व्यक्ती आपलाच अस बिंबवण्याचा प्रयत्न ही असावा. एकूणच हा पंथ खोट्याच्या पायावर उभी राहिलेली एक इमारत आहे हे सारासार विचार करणाऱ्या व्यक्तीला लक्षात येऊ शकते.

ह्या पंथातील गोष्टी माणुसकीला धरून आहेत, स्त्रीचा सन्मान आणि इतर अनेक खोट्या गोष्टीची आतली गोष्ट बहुतेकांना नाही म्हणूनच ह्या गोष्टी तुम्हाला कळाव्या म्हणून हा लेख. हा लेख पूर्णतः एक्स मुस्लिम जफर हेरिटीकच्या व्हिडीओवरून बनवला आहे हे वाचकांनी लक्षात घ्यावे.

व्हिडीओ लिंक

https://youtu.be/gMB1_LV8yxQ?si=_K026w1uCn4jFG2I

अश्याच बेढब, मूर्ख आणि माणुसकीचा खून करणाऱ्या ह्या पंथाच्या पुढच्या गोष्टींसाठी फोल्लो करा सनातन.

सनातन हिंदू धर्म एकमेव धर्म बाकी सर्व पंथ.

शुक्रवार, २२ मार्च, २०२४

डिटेक्टिव्ह विनय

माझे नाव विनय, मी महाराष्ट्रातील छोट्याश्या खेड्यात जन्मलो, वाढलेलो एक सामान्य मराठी कुटुंबातील साधारण मुलगा. राहते घर सोडले तर मोठा भाऊ वहिनी आणि छोटा भाऊ हीच माझी संपत्ती. भाऊ आणि वहिनी दोघे श्रद्धाळू, देवभोळे त्यामुळे घरात देव देवाचे कार्य ते स्वतः नित्यनियमाने करत आणि त्यामुळे तीच सवय मला आणि छोट्या बंधू याना लागली होती. देश पारतंत्र्यात असल्याने स्वातंत्र्य म्हणजे काय हे केवळ घरातच अनुभवायला मिळायचे. मुलांनी खूप शिकावे आणि मोठे व्हावे हा मोठ्या बंधूंचा आग्रह असल्याने मी आणि माझा छोटा बंधू गावातल्या शाळेत शिक्षण घेत होतो. शिक्षणाशिवाय दुसरा कोणताच पर्याय हातात नसल्याने आम्ही शिक्षणात संपूर्ण झोकून दिले होते त्याचीच शाबासकी म्हणजे संपूर्ण गावात आमच्या कुटुंबाची हुशारी खास प्रसिद्ध होती. शिक्षकांचा आमच्यावर जास्त स्नेह होता त्यामुळेच की काय अभ्यासाव्यतिरिक्त बरेचसे साहित्य, देशविदेशातील बातम्या, विज्ञान याच्या बरोबर देशातील इंग्रजी राजवटीबद्दल इतम्भू माहिती मिळवण्याचे हक्काचे स्थान म्हणजे आमचे हे गुरुजन असायचे. गुरुजनांनी तसेच गावातील काही धनाढ्य व्यक्ती सतत आम्हला आमच्या शिक्षणात आर्थिक मदत करायला सतत पुढे असायचे. लोकांच्या ह्याच मदतीमुळे आमचे पाय सदैव जमिनीवर टेकलेले असायचे म्हणूनच गावातील कोणीही कामासाठी हाक मारल्यास न चुकरता आम्ही सदैव एका पायावर उभे असोयचो. ह्याच आमच्या चांगल्या स्वभावाचे फळ मला गावातील प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर उच्च शिक्षण घेण्यासाठी गावातील लोकांनी निधी काढला आणि विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात शिक्षणासाठी मला पाठवले होते. पुण्यात आल्यावर मात्र गावापासून दूर एका वेगळ्याच जगात प्रवेश झाला. पुण्यातील एका नामांकित इंग्रजी शाळेत गावातील सरपंचाच्या मदतीने प्रवेश मिळाला होता.
पुण्यात नवीन शाळेत ज्ञानसाधनेला सुरुवात झाली. गावातील शिक्षणापेक्षा इथला दर्जा वेगळाच होता, जरी मी अभ्यासू असलो तरी इथे मात्र शिक्षकांच्या आवडत्या विद्यार्थ्यांत माझी गणना झाली नव्हती. इंगजी शाळेत व्यवस्थापन काही इंगज पाहत असल्याने इथे स्वातंत्र्यावर काही प्रमाणात गदा असली तरी ह्या शाळेत माझा देशप्रेमाचे धडे देणारा एक मित्र, गुरू मला भेटणार होता अस कोणी मला सांगितले असते तर कदाचित मला ते पटले नसते पण भविष्याच्या पोटात काय दडले आहे हे कोणीही सांगू शकत नाही तसच माझ्या आयुष्यात समुद्राच्या प्रचंड फेसळणाऱ्या लाटा किनाऱ्या रुपी माझ्यावर येऊन आदळणार होत्या याची कल्पना मला देखील नव्हती.
भूतकाळाच्या आठवणीत रममाण झालेलो मी आणि माझ्या विचारांच्या तंद्रीला तोडत तुरुंगाचा वॉर्डन मला हाक मारत होता. " ओ डिटेक्टिव्ह, झोपला की काय डोळे उघडे ठेवून? उठा, साहेबांनी तुमची आठवण काढली आहे" अस कानावर शब्द आदळल्याने माझी तंद्री तुटली. दहा बाय दहाच्या अंधाऱ्या खोलीत गजांच्या आड असलेलो मी अचानक भानावर आलो

जेलर स्मिथ हा रागीट, दुष्ट आणि भारतीयांचा द्वेष करणारा इंग्रज अधिकारी होता. कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवरील एका तुरुंगाचा तो अधिकारी होता. जंगलाच्या मध्यवर्ती भागात तुरुंग बांधलेला होता आणि ह्या तुरुंगातुन कोणताही कैदी अजूनपर्यत पळून जाण्यात यशस्वी झाला नव्हता असे रेकॉर्ड होते. हे रेकॉर्ड पूर्ण होण्यासाठी दोन गोष्टीं महत्वाच्या होत्या त्या म्हणजे एक स्वतः जेलर स्मिथ आणि दुसरे तुरुंगाच्या बाजूला असलेले हे जंगल. वर्षभर पुरेल असा शिधा, संरक्षणासाठी दोनशे सैनिकांची सशस्त्र फळी आणि चिरेबंदी तटबंदी असलेला किल्ल्यासमान हा तुरुंग ही जेलर स्मिथची खरी ताकद होती. तुरुंगातून पळून जाणार कैदी एकतर सैनिकांच्या गोळीने मारला जायचा किंवा जंगलातील हिंस्त्र पशूंकडून त्यामुळे ह्या तुरुंगातून पळून जाण्याचा प्रयत्न कोणताही चोर, दरोडेखोर असो की क्रांतिकारी करत नसायचा. क्रांतिकारी अस मनात येताच मला पुन्हा कॉलेजच्या जुन्या भूतकालीन विश्वात घुसण्याची संधीच मिळाली . तुरुंगाचा वार्डन मला जेलर स्मिथकडे घेऊन जात असताना मी मात्र माझ्या भूतकाळातील आठवणीत गुंगून गेलो.
पुण्यात येऊन महिना झाला असेल, कॉलेज, नवीन शहर, शिक्षक यात पहिला महिना कसा गेला ते कळत नव्हते. पोटापाण्याची व्यवस्था म्हणून सदाशिव पेठेत वृद्ध कुलकर्णी काकाकडे जेवणाची व्यवस्था चालू केली होती तर सकाळी कॉलेजातून परतताना काकांच्या घरी जेवायचे आणि तासभर पुण्यातील पेठा, गल्लीबोळ हिंडायचे अस दिनचर्या चालू होती. पुणे म्हणजे केवळ विद्याचे माहेरघर नाही तर क्रांतिकारक, समाजसेचक, नेत्यांचे शहर. पुण्यात वावरताना पुण्यातील लोकांचा धाडसीपणा बऱ्याच वेळा पाहिला होता. कधी कधी छत्रपती शिवाजी महाराजच्या गनिमी काव्याचा तर कधी कधी सरळ तोंडावर इंग्रज अधिकारी, पोलीस शिपाई यांच्यावर छोटे मोठे मजेशीर हल्ले कित्येकदा पहायला मिळाले होते. 

एक दिवशी जेवल्यानंतर शतपावली करत शनिवारवाडा परिसरात फिरत असताना एक युवक धावत येताना मला दिसला त्याच्या मागे दोन शिपाईही धावताना दिसले. माझ्याजवळून जाताना त्याचा मला जोरदार धक्का लागला आणि त्या धक्क्याने आम्ही दोघे रस्त्यांवर पडलो. मागे धावत असणारे दोन्ही शिपाई त्या युवकाला धरावे अस ओरडत होते पण डोळ्याची पापणी लवते न लवते तो युवक कोणत्या गल्लीत घुसून पसार झाला हे मला तरी लक्षात आले नाही पण ह्या धावपळीत त्याचा चेहरा मात्र मला दिसला होता. धाप टाकत आलेले दोन्ही शिपाई  माझ्या दंडाला पकडून दमात घेत त्या युवकाला पकडले का नाही असं दरडावू लागले पण ज्या वेगात हे सगळे काही घडले ते पाहता माझ्या दंडावरची पकड सैल करत तोंडात शिट्टी घालून वाजवत दोन्ही त्या युवकांच्या शोधात कोणत्यातरी गल्लीत घुसले. मीही तात्काळ शतपावली संपवत माझ्या  वसतीगृहाकडे वळून धूम ठोकली. थोडीशी भीती तर वाटलीच होती पण कसे बसे धाडस गोळा करत खोलीपर्यत मागेपुढे पाहत पोहचलो. संबंध दिवस खोलीतून बाहेर पडणे सोडा,डोकावले देखील नाही. बाहेर पडलो ते दुसऱ्या दिवशी कॉलेजला जायलाच.
दुसऱ्या दिवशी कॉलेजच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत जात असताना कालचा तोच धडकलेला मुलगा मला मैदानात दिसला. जवळच उभ्या असलेल्या मित्राला त्याच्याबद्दल विचारले तर त्याचे नाव जगदीश आहे आणि आपल्याला सिनियर असून वरच्या वर्गात आहे हे सांगितले. पोरगा अभ्यासात हुशार असला तरी तरुण टोळक्यांना घेऊन काहीतरी खुसपट करत असतो अस ही कळले. नंदू आणि मी त्याच्याकडेच पाहुन बोलतोय हे पाहून जगदीश आमच्याकडे येऊ लागला.
जगदीश दिसायला सर्वसाधारण मुलांसारखाच असला तरी रोजच्या व्यायामाने सदृढ बाधा होता. पांढरा सदरा आणि पांढरे धोतर घातलेला जगदीश जवळ आला आणि खांद्यावर हात टाकत ओळखले का मला असा प्रश्न केला. काल झालेली धडक, पाठीमागे लागलेले पोलीस असा सगळा प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून अलगद चालून गेला. अडखळत मी हो हो आठवतंय की अस बोलून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला.

क्रमशः


श्रीकृष्णाचा शंख : पांचजन्य

भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायातील श्लोक १.१५ मध्ये, युद्धाच्या प्रारंभी शंखनादाचा वर्णन केला गेला आहे.

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जयः।
पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदरः॥ १.१५

 या श्लोकात, भगवान श्रीकृष्ण (हृषीकेश) आणि अर्जुन (धनञ्जय) यांच्या शंखांची नावे दिली गेली आहेत. श्रीकृष्णाचा शंख पाञ्चजन्य आणि अर्जुनाचा शंख देवदत्त असे आहे. तसेच, भीम (वृकोदर) यांनी पौण्ड्र नावाचा महाशङ्ख वाजवला.

या श्लोकाचा अर्थ असा आहे की युद्धाच्या प्रारंभी, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी आपले-आपले शंख वाजवले. भीमाने देखील त्याचा शंख वाजवला. या शंखनादाने युद्धाच्या मैदानात उत्साह आणि शौर्याची भावना निर्माण झाली.

“पांचजन्य ” शंखाची गोष्ट त्याबद्दल अधिक माहिती म्हणजे, पांचजन्य हे श्रीकृष्णाचे शंख होते जे त्यांनी महाभारतातील कुरुक्षेत्र युद्धात वाजवले. या शंखाचा नाद अत्यंत प्रबल आणि प्रेरणादायी होता, ज्याने पांडवांच्या सैन्यात उत्साह आणि आत्मविश्वास निर्माण केला. पांचजन्य शंखाचा नाद युद्धाच्या मैदानात धर्माचा आवाज मानला जातो आणि तो अधर्माविरुद्ध लढण्याची प्रेरणा देतो. या शंखाच्या नादाने युद्धाच्या मैदानातील धर्माचे रक्षण करण्याची आणि अधर्माचा नाश करण्याची भावना जागृत केली जाते.

पांचजन्य शंखाची उत्पत्ती एक अत्यंत रोचक पौराणिक कथा आहे. समुद्र मंथनातून निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक म्हणजे पांचजन्य शंख होता. या शंखाचा नाद एक हजार सिंहांच्या गर्जनेइतका प्रबल होता

पौराणिक कथानुसार, श्रीकृष्ण आणि बलराम यांच्या गुरु सांदिपनींनी गुरुदक्षिणेत आपल्या मृत पुत्राला परत आणण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांचा पुत्र पुनर्दत्त समुद्रात बुडाला होता. श्रीकृष्ण आणि बलराम समुद्रात गेले आणि त्यांनी शंखासुर नावाच्या दैत्याशी लढाई केली, ज्याने पुनर्दत्ताचे अपहरण केले होते. श्रीकृष्णाने शंखासुराचा वध केल्यानंतर, त्याच्या शंखाचे अवशेष पांचजन्य शंख म्हणून प्रसिद्ध झाले.

यमराजाने पुनर्दत्ताची आत्मा परत न केल्याने श्रीकृष्णाने पांचजन्य शंखाचा नाद केला, ज्यामुळे यमलोक हादरला. यमराजाने भयभीत होऊन पुनर्दत्ताची आत्मा परत केली. गुरु सांदिपनींनी आपल्या पुत्राला परत मिळवल्याबद्दलत आनंदित होऊन श्रीकृष्णाला पांचजन्य शंख भेट म्हणून दिला.

या शंखाचे महत्त्व फक्त युद्धातच नव्हे तर सनातन धर्मातील पूजा-अर्चना आणि शुभ कार्यांमध्येही आहे. शंखनादाचा आवाज शुभ मानला जातो आणि त्याचे वाजवणे शरीरासाठी लाभदायक मानले जाते.

हिंदू धर्मात शंखाचे महत्व अत्यंत उच्च आहे. शंख हे पवित्रता आणि शुभता चे प्रतीक मानले जाते. शंखनादाने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि शुभ लहरींना चालना मिळते. शंखाचा उपयोग पूजा, आरती आणि धार्मिक अनुष्ठानांमध्ये देवतांना जल चढवण्यासाठी केला जातो. शंखाचा नाद देवतांच्या उपस्थितीचे आह्वान करतो आणि आध्यात्मिक चैतन्य निर्माण करतो.

शंखाचा उपयोग विविध धार्मिक समारोहांमध्ये देखील केला जातो, जसे की त्योहार आणि उत्सव. शंखाची ध्वनि व्यक्तियों को शुद्ध करते, त्यांची रक्षा करते आणि त्यांना परमात्मा से जोडते. शंखाचा उपयोग घरातील आणि मंदिरातील सजावटीसाठी देखील केला जातो. शंखाचा नाद ऐकल्याने वातावरणातील भूत, पिशाच्च वगैरे वाईट शक्तींचा त्रास होत नाही.

शंखाचा उपयोग आयुर्वेदात देखील केला जातो, जसे की शंखभस्माचा उपयोग अनेक व्याधींवर केला जातो. शंखाच्या पाण्याने अनेक व्याधी नाहीशा होतात आणि त्याचे पाणी शरीरासाठी लाभदायक मानले जाते1. शंखाचा उपयोग विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक म्हणून देखील केला जातो. शंखाचा नाद श्री हरि विष्णुला प्रसन्न करतो. त्यामुळे, हिंदू धर्मात शंखाचे अत्यंत महत्व आहे आणि त्याचा उपयोग विविध धार्मिक आणि शुभ कार्यांमध्ये केला जातो.

अशीच नवीन माहिती एकत्रित करून नवीन लेख सादर करे पर्यत माझा जय श्रीराम 🙏🙏🙏🙏🙏






सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...