सोमवार, ११ सप्टेंबर, २०२३

शेयर मार्केट बेसिक

शेयर मार्केट बेसिक
स्टॉक मार्केट बेसिक म्हणजे काय हे न समजता केलेली गुंतवणूक हा एक जुगारच त्यामुळे शिक्षण महत्वाचे म्हणूनच हा थ्रेड
समाजात जसे श्रीमंत, मध्यमवर्गीय आणि गरीब अशी आर्थिक परिस्थिती असलेले लोक असतात तसेच स्टॉक मार्केट मध्ये लार्ज कॅप, मिडल कॅप आणि स्मॉल कॅप अशी विभागणी असते. ही विभागणी त्या प्रत्येक कंपनीची शेयरची किंमत x एकूण शेयर कंपनीचे कॅपिटल ठरवते. श्रीमंतात सगळ्यात श्रीमंत, गरीबतील सगळ्यात श्रीमंत कोणी ना कोणी असते तसेच स्मॉल,मिडल, लार्ज कॅप मध्ये देखील बेस्ट कंपनी असतेच त्यामुळे स्मॉल कॅप किंवा मिडल कॅप कंपन्या खराब असतात असे नाही. कंपनी खराब की चांगली हे पाहण्याचे, जोखण्याचे जो फंडा आहे त्यालाच फंडामेंटल वाचणे, शिकणे म्हणतात. स्टॉक मार्केट मध्ये किमान 4000पेक्षा अधिक कंपन्या आहेत पण सगळ्याच कंपन्या NSE मध्ये असतील असे नाही त्यामुळे गुंतवणूक करताना कंपनी दोन्ही BSE आणि NSE मध्ये असणारी कंपनी निवडणे गरजेचे असते. कष्टाने कमावलेल्या पैश्याला एखाद्या कंपनीत लावताना ती कंपनी किमान 10 ते 12 वर्ष शेयर मार्केट मध्ये आहे की नाही ते चेक केले पाहिजे कंपनीवर असलेले कर्ज हे ही चेक केले पाहिजे. कंपनीचा दरवर्षीचा ताळेबंद चढता आहे की उतरता की विस्कळीत आहे हे पाहणे देखील तितक्याच गरजेचे असते. फायदा कमवणारी कंपनी झालेल्या फायद्याचे करते काय ते पाहणे महत्वाचे असते. झालेला फायदा डिव्हिडंड रुपात देणारी किंवा झालेला फायदा कंपनीच्या प्रगतीसाठी पुन्हा गुंतवणूक करणे यासारख्या गोष्टी पडताळणे गुंतवणूकदाराचे काम असले पाहिजे. कंपनी करत असलेला व्यवसाय, टीक्त केलेली गुंतवणूक, मिळवणारा फायदा यानंतर त्या कंपनीच्या तिजोरीत स्वतःचे पैसे किती हा मुद्दा देखील त्या कंपनीची आर्थिक परिस्थिती दाखवते त्यामुळे हे मुद्दे पहाणे प्रत्येक गुंतवणूकदारांचे आद्यकर्तव्य असले पाहिजे. यानंतर येणारी महत्वाच्या गोष्टी म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी निवडलेल्या कंपनीची ग्रोथ भविष्यकाळात कशी असेल याची पडताळणी करता येणे महत्वाचे असते. ROE रिटर्न्स ऑन इक्विटी , ROCE रिटर्न्स ऑन कॅपिटल एम्प्लॉय चेक करायला गुंतवणूकदाराचे काम असते. किमान 15% पेक्षा जास्त ROE, ROCE असणाऱ्या कंपनीत गुंतवणूक करणे फायद्याचे असते.
गुंतवणूक करताना कंपनीचा दरवर्षीचा सेल्स, एक्सपेन्स आणि मिळवत असलेला फायदा चढता, उतरता की विस्कळीत हे ही पाहिले पाहिजे. गुंतवणूक करताना कंपनीची सेक्टर मधील इतर कंपनीच्या तुलना करणे हे देखील तितकेच महत्वाचे असते. यानंतर येणारा महत्वाचा मुद्दा म्हणजे शेयर पॅटर्न मध्ये प्रोमोटर,FI, DII आणि सामान्य गुंतवणूकदारांची  हिस्सेदारी चेक केल्यास आपल्याला त्या कंपनीत कोण किती गुंतवणूक केली आहे याचा अंदाज येतो.

याव्यतिरिक्त अनेक गोष्टी गुंतवणूक करताना विचार करणे गरजेचे पण किमान वर उल्लेख केलेल्या गोष्टींची पडताळणी केल्यास चुकीच्या कंपनीत गुंतवून करणे नक्कीच टाळता येणे शक्य आहे.

थ्रेड आवडलाच तर लाईक आणि शेयर करायला विसरू नका आणि काही प्रश्न असतील तर नक्की विचारा म्हणजे त्याची उत्तरे देण्यासाठी मलाही थोडा अभ्यास करावा लागेल. पुढचा असाच नवीन थ्रेड घेऊन परत तुमच्यासमोर येईपर्यंत सर्वांना जय श्रीराम
🚩🚩🚩🚩

बुधवार, १९ एप्रिल, २०२३

मीडिया की माफिया? बातम्यांचा स्वैराचार

मीडिया की माफिया?

बातम्यांचा स्वैराचार

@AjitPawarSpeaks जी मीडियाची जी शाळा आज घेतली त्यातून मीडिया काही शिकेल अस अजिबात वाटत नाही. देशातील वातावरण गढूळ करण्याचे श्रेय जितके राजकरणी दोषी त्यापेक्षा अधिक प्रमाणात माध्यम जवाबदार आहे. मीडिया स्वतःला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून घेण्यात जरी गोडकौतुक करत असले तरी बेजवाबदर वागणारा सगळ्यात मोठा गट म्हणजे हा 24 तास बातम्यांचे गुऱ्हाळ चालवणारी ही लोक. 24 तास काही ना काही बातमी दाखवणे हेच ज्याचे टार्गेट अश्यावेळी ही मीडिया स्वतःहून बातम्या तयार करते त्यात भर म्हणजे ते डिबेट शो ज्यात डिबेत कमी एकमेकांची उणिधुनी काढण्याचे काम जोरात चालू असते. कोणी पप्पू समर्थक असतात तर काही भक्त काही गुलाम तर काही सतरंजी उचले. महत्वाचे म्हणजे प्रत्येक चॅनेलवर एकदोन कट्टर धार्मिक नुल्ले आपल्या पंथाच्या चुकीच्या गोष्टीवर पांघरून घालण्याचे काम करत असतात. स्वतःच्या घरातील गु घाण लपवत दुसऱ्या धर्मातील गोष्टींवर बोट ठेवणारे हे नुल्ले आणि त्याची व्यवस्थित शाळा घेणारे काही हुशार लोकांचे टोळके दिवसभर चालू असतात. आजची मीडिया ही ब्रेकिंग न्यूजच्या विळख्यात अशी काही अडकली आहे की  बातमी खरी की खोटी याची पडताळणी न करता, सूत्राचा हवाला देत पत्रकारिता स्वातंत्र्याचा मुबलक प्रमाणात फायदा घेताना दिसते. फुटकळ, रोखठोक अजित पवारांनी त्याच्या शेलकी भाषेत मीडियाची मस्ती उतरवली असली तरी ही जवाबदरीचे भान त्यांना येईल असे नाही. तुम्हाला कदाचित माहीत नसेल पण मनोरंजनाचे चॅनेल कमी पण न्यूज चॅनेल अधिक आहेत आणि ह्या लोकांची खरी मिळकत केवळ बातम्यांच्या मध्ये येणाऱ्या जाहिराती नसून पेंड वृत्तांकन, कोणत्यातरी पक्षाची तळी उचलून विरोधी पक्षावर तोंडसुख घेणे, बदनामी करणे हेच आहे. उद्धव ठाकरेंच्या काळात महाराष्ट्रात किंवा दिल्लीचा केजरीवाल सरकारी जाहिरात यातून सरकारी तिजोरी किती उधळतो ह्याचे आकडे पाहिल्यास भारतात इतके न्यूज चॅनेल का ह्याचे उत्तर सापडते. माईक आणि कॅमेरा घेऊन वाहेर पडणारी ही मंडळी इतके कामसू आहेत की दररोज न थकता 24 तास बातम्यांचे पीक घेत असतात आणि त्याच्या ह्याच कामसूवृत्तीमुळे संजय राऊत, नवाब मलिक सारखे विकृत लोक रोज सकाळी शौचालयात मोकळे न होता दररोज सकाळी टीव्हीवर तोंडातून घाण बाहेर काढत मोकळे होत असलेले कित्येक दिवस आपण पाहिले असेल. बर ते ज्या प्रकारची भाषा, शब्द वापरतात ती ऐकून लहानपणी रोज सकाळी सार्वजनिक नळावर होणाऱ्या बायकांच्या गलका, भांडण आणि हमरीतुमरी आठवल्याशिवात राहत नाही. विरंगुळा म्हणून ही भांडणे लहानपणी पाहताना मज्जा वाटायची पण ह्या नीच राजकारणी लोकांची वक्तव्य ऐकणाऱ्याच्या दिवसाची सुरुवात अशी होते की सामान्य माणूस कामाच्या ठिकाणीही त्याच भाषेत साहेबांच्या शिव्या दिवसभर खातो, त्याचा राग घरी आल्यावर कुटुंबावर देखील काढत असावा. बर हे चक्र इथेच संपले तर बरे पण नाही प्राईम टाइम वर येणारेटे संपादक चर्चा घडवण्यासाठी कमी आणि आग लावायला जास्त येतात अस वाटायला लागते. जगातील, भारतातील आणि परिसरातील माहिती घेण्याच्या ह्या सवयीमुळे न्यूज चॅनेल, राजकरणी याचे फावले आहे अश्या ह्या मीडियाला नियंत्रणात आणणे खरेच गरजेचे आहे आणि त्यासाठी काही वर्षांपूर्वी मीडियाने कसे काम करावे न करावे यावद्दल नवीन कायदा मोदी सरकारने आणला होता त्याचा बराच विरोध मीडियातील एका गटाने करून मोदीला कायदा मागे घेण्यास लावले होते हे बहुतांश लोक तर विसरली देखील असतील. होय कृषी कायदेच नाही तर मीडिया ने कसे काम करावे याबद्दलचा कायदा देखील मोदी सरकारला माघारी घ्यावा लागला होता पण आजच्या दिवसभर चाललेल्या अकल्पित बातम्या पाहून तो कायदा मीडियावर लादला का पाहिजे याचे उत्तर जनतेला मिळाले असेल नाही का? कोणतीही बातमी खरी नसताना, केवळ ठोकताळे, अंदाज यावर केली जाणारी ही पत्रकारिता किती धोक्याची ह्याची कल्पना राजकरणी आणि जनतेला आज आली असेल आणि मोदीने आणलेल्या त्या कायद्याची गरज देखील आह कळली असेल. सत्य, निरपेक्ष बातमी एकदा नाही तर दहादा तपासून सांगणे तर मीडिया विसरली आहे की काय अशी शंका येते. नक्की ही मीडिया की माफिया याबद्दल सामान्य जनमानसात संभ्रम असण्याची शक्यता आहे. कुप्रसिद्ध गुंड अतिकला नेणाऱ्या रस्त्यावर पाठलाग करणारी मीडिया, त्याला मुतताना दाखवणारी आणि त्याच्यावर झालेला खुनी हल्ला याची चित्रणे प्रसिद्ध करण्याचा मूर्खपणाचे काम मीडिया करते ते पाहून वाईट वाटते. आतंकवादी हल्ल्यात वरखा दत्त आणि इतर लोकांनी केलेले वार्तांकन पाहून त्याप्रमाणे पोर्किस्तान मध्ये टीव्हीसमोर बसून हल्ल्यात बदल करणारे आतंकवादी असतील किंवा अश्याच भ्याड हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या जवानांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले व्हिडीओ दाखवणारे गलवान खोऱ्यात घडलेल्या हल्ल्यातील चुकीच्या बातम्या असतील की बलात्कार झालेल्या मुलीची ओळख उघडी करणे यासारखी कित्येक पाप माफिया मीडियाने समर्थपणे स्वतःच्या खांद्यावर वाहिले आहे. पाश्चात्य देशात देखील मीडिया आहे पण भारतातील माफिया मीडिया इतकी स्वैर दुसरी कुठेही नसेल याबाबत मी तरी ठाम आहे. फ्रान्सच्या चार्ली हेबदो प्रकरणातील वृत्ताकन चाळून पहा, रक्ताचा एक थेंब की मेलेल्या माणसाचे एक शरीर त्या मीडियाने दाखवले नव्हते आयाबी याउलट आपली मीडिया, जितकं वाईट दाखवता येईल तितकं वाईट दाखवते. समाजात फूट पडेल असे कार्यक्रम करते. योग्य अयोग्य याचा सारसार विचार न करता काहीही बातम्यांच्या नावावर खपवणारी माफिया मीडियावर निर्बध हवेच अस तुम्हाला ही वाटते का हो? नक्की उत्तर द्या आणि जो कोणी जवाबदार व्यक्ती असे नियम बनवू शकतो त्याला हा थ्रेड टॅग करा म्हणजे कदाचित एक वेगळे मीडियाचे रूप आपल्याला पहायला मिळेल.

असेच लेख वाचण्यासाठी follow करायला विसरू नका आणि शेयर करायला तर अजिबात विसरू नका.

पुढच्या लेख तुमच्यासमोर सादर करेपर्यत माझा नमस्कार.

।।ॐ नमः शिवाय ।।

शुक्रवार, २४ मार्च, २०२३

राजकारण ह्याचे नाव

राजकारण ह्याचे नाव

राजकीय व्यक्ती आणि #राजकरण यांचा स्तर कालही आणि आजही तळाशीच आहे. वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी केलेले राजकीय डाव वेळप्रसंगी मागे घेत राजकारणात कोणीही कोणाचा कायमचा शत्रू नसतो म्हणत मैत्री करायची असते. एक आमदार चुकून का होईना आज एक सत्य बोलून गेला की राजकीय लोकांचा समाज एकत्रच असतो वितुष्ट कार्यकर्त्यांमध्ये असते. कार्यकर्त्यांना कामाला लावण्यासाठी हेच राजकारणी डावावर डाव खेळत स्वार्थ साधत असतात. थिल्लर, बालिश टीका करण्यात पुढाऱ्यांचे तोंड बंद होऊ शकत नाही तसच पद, खुर्चीची ताकद हातात असणारे कायद्याला हाताशी घेऊन विरोधकांना गतिरोध निर्माण करतात. कायदा शिक्षा करतो पण कधी पाहिले आहे का पुढाऱ्यांना शिक्षा भोगताना? काही अपवाद सोडले तर तात्पुरत्या शिक्षेनंतर बेल, कायद्याच्या पळवाटा शोधून हे पुढारी परत आपले राजकरण खेळताना मैदानात दिसतात. कधी हा माघार घेतो तर कधी तो पण सत्तेची संगीत खुर्ची सदैव ह्याच दोघांकडे असते. खेळत ते दोघे असतात पण खेळवले जाणारे आपण असतो, सर्वसामान्य माणूस. ज्याच्या आयुष्यात मर मर काम करणे, कुटुंबाच्या गरजा भागवणे, कष्टातून विरंगुळा म्हणून मनोरंजनासाठी खेळ, चित्रपट आणि राजकरण यावर भाष्य करणे यापलीकडे त्याच्या हातात असतो तो मोठा घंटा. मुळात हात रिकामेच असतात पण त्या रिकाम्या हातात नसलेली घंटा असतेच. काबाडकष्ट करणारा सामान्य माणूस स्वतःच्या मर्जीने खर्च करताना दहादा विचार करतो कारण मिळकत मर्यादित असते पण राजकारणी यापेक्षा भिन्न कारण स्वतःला मिळणारी मिळकत, भत्ते, पेंशन ठरवण्याचा हक्क स्वतः त्याच्याच हातात असतो. एकीकडे आम्ही जनतेचे सेवक म्हणून घ्यायचे, समाजकारण करतो म्हणायचे आणि दुसरीकडे व्हाईट पैसे पगार पेन्शन मधून तर वाममार्गाने ब्लॅक मनी लाटत राहायचे ह्याचे काम. जनतेचे सेवक म्हणवणारे ही लोक दादा, भाई, साहेब असतात यापेक्षा मोठा विनोद दुसरा कुठे? लिहावं तेवढ थोडंच कारण शिक्षणाच्या डिग्री घेऊन दिवसभर काबाडकष्ट करणारा सामान्य एकावेळी एकच काम करतो पण राजकारणी मात्र एकाचवेळी गल्लीतला, गावातला, सहकारी संस्था, खाजगी संस्था, खेळ, बँका,राजकीय पक्ष आणि अजून काय नाही नाही त्या ठिकाणी काम करण्याचे, निर्णय घेण्याचे काम करतो. साधं शिपाई होण्यासाठी दहावी बारावीचे सर्टिफिकेट सामान्य माणसाला लागते पण राजकारणी होण्यासाठी मात्र शिक्षणाची अटच नसते. स्वतःची राजकीय कारकीर्द घडवण्यासाठी लोकांना लोकांशी भांडायला लावणारे, फायदा नुकसान याचा ताळेबंद लावून आरक्षण, नुकसान भरपाई देणारे हे पुढारी राजकारणात येतात तेव्हा रिकाम्या हाती येतात पण काही वर्षात कुबेराला ही त्याच्या घरी कामाला ठेवतात. पुढाऱ्यांत झालेला ह्या बदलाच्या विरुद्ध सामान्य माणूस खर्चाच्या डोंगराखाली कधी निम्मा तर कधी संपूर्ण बुडून जातो. सत्ता वा सत्तेच्या जवळ राहून राजकारणी सामान्य माणसाला खेळ खेळ खेळवतो. पूर्ण वेळ रिकामा असलेला हा राजकारणी क्षणांचा रिकामा नसतो. अडलेला, पडलेला, कधी स्वतःचे हित साधायला तर कधी कोणावर डुक काढणारा सामान्य माणूस राजकारण्यांच्या दाराचा उंबरा झिजवत असतो. स्वतःहून शिकार शिकाऱ्याचे तोंडात आपसूक पडत असते आणि शिकारी त्यावर ताव मारत असतो. वाचाळ राजकारणी हवे ते निरर्थक बोलतो, त्या बोलण्याची बातमी होते मीडियाच्या माध्यमाने देश,राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहचले जाते पण ह्याच नेत्या, पुढाऱ्यांच्या, राजकारण्यांच्या विरोधात सामान्य नागरिक बोलला की कायद्याच्या, पैश्याच्या जोरावर त्याला धडा शिकवला जातो, त्याला मारहाण केली जाते, आयुष्यातून उठवले जाते. असो इतपर्यत वाचत आलाच असाल तर एक गोष्टीची खूणगाठ नक्की मनाशी पक्की करा की तुमची आवड निवड एखाद्या राजकरण्याशी असू द्या, पक्षाशी असू द्या पण त्या लोकांना आदर्श मानण्याचा, देवत्व पद देण्याची चूक करू नका. कितीही आदर्शवत असणारा नेता हा आदर्श असेलच असे नाही कारण राजकीय डाव करणे हे त्याच्या रक्तात भिनलेले असते. कार्यकर्त्यांनो सजग व्हा रे......

हे इतकं लिहलेले का तुम्हाला माहित नाही तरीही मूर्खासारखं लिहतोय कारण मनात आलेले हे एकटा मीच विचार करत का खुडत बसावं म्हणून तुम्हाला ऐकवतोय. झालाच तर थोडा त्रास तुम्हालाही व्हायला पाहिजेच की कारण जे घडतंय त्याला जवाबदार आपण दोघेही समान भागीदार आहोत हे लिहताना एकदम मला क्रांतिवीर चित्रपटातील नाना पाटेकर आठवला. का सांगतोय मी हे तुम्हाला, का बरळतोय मी हे सर्व काही असा फील येऊन गेला. असो असाच अनुभव तुम्हाला यावा म्हणून ह्या लिंकवर क्लिक करा हवे तर

https://youtu.be/vfYJUHw5c70

असेच ब्लॉग वाचण्यासाठी संकेतस्थळाला भेट द्या

https://diarynotes137.blogspot.com


लेख आवडला तर लाईक करा, शेयर करा. पुढचा लेख घेऊन येईपर्यत तुम्हा सर्वांना माझा नमस्कार.

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।

बुधवार, २२ मार्च, २०२३

सनातन भाग ६ : नटराज

।।ॐ नमः शिवाय।।

नमस्कार मंडळी, 

आज गुढीपाडवा, साडे तीन मुहूर्तातील एक विशेष दिवस याखेरीज हिंदू नवीन वर्ष देखील आहे, या दिवसाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सनातन धर्मातील गोष्टी ह्या भागात आजची गोष्ट वा माहितीरुपी लेख आहे तो नटराज.

नटराज हे देवाचा देव महादेव शंकराचे एक नाव आहे. नटराज मुद्रा म्हणजे भगवान शंकर तांडव करत असणारी ही मुद्रा आहे. तांडव म्हंटल की क्रोधीत झालेले शंकर भगवान असा समज केला जातो पण तांडवमध्ये देखील दोन प्रकार आहेत. क्रोधीत आणि विनाश करण्यासाठी उत्सुक झालेले शिवशंकर जे तांडव करतात त्याला रौद्र तांडव अस म्हंटल जात तर आनंदात करत असलेले नृत्य म्हणजे नटराज होय.

नटराज शब्दाची फोड केल्यास नट म्हणजे कला आणि राज म्हणजे अधिपत्य. कलेचे अधिपत्य असणारी देवता म्हणून कला, नृत्य याचे शिक्षण घेणारे नटराजाच्या मूर्तीला नतमस्तक होत असतात.


नटराज मूर्तीवरील हावभाव, प्रतीक जाणून घेण्यासाठी वरील चित्र तुम्हाला मदत करेल.
नटराज चतुभुज आहे, उजव्या हातात डमरू जे सृष्टी सृजन करण्याचे तर डाव्या हातातील अग्नी सृष्टी संहार करण्याचे प्रतीक आहे. तिसरा हात भक्ताला आशीर्वाद देण्याचा तर चौथा हात जमिनीपासून वर उचललेला पायाकडे लक्ष देण्याचे सुचवतो. हे पाऊल म्हणजे मोक्ष मिळवण्याचे रस्ता अस प्रतीक असून बुटक्या दानवावर ठेवलेले पाऊल म्हणजे अहंकाराचा, अज्ञानाचा, दुःखाचा सर्वनाश करण्याचे प्रतीक आहे. शरीरावर असणारे सर्प शक्तीचे द्योतक असून नटराज मूर्तीच्या सभोवताली असणारे आगीचे वर्तुळ दुसरे तिसरे काही नसून संपूर्ण ब्रम्हांड असल्याचे प्रतीक आहे. सुटलेले केस एक प्रकारची मुक्तता, शांतता आणि आनंद दाखवत गंगा नदीचे वेगेवेगळ्या शाखा, प्रवाह दाखवत आहेत

बहुतांश लोकांना नटराज म्हणजे काय हे आज समजले असेल त्याची प्रतीक, मुद्रा यामागील भाव प्रथमतः समजले असतील तर ही पोस्ट आपल्या मित्र मंडळीत शेयर करायला अजिबात विसरू नका. नटराज यांच्या पायाशी नक्की लहान बाळ का आहे असा प्रश्न कैक लोकांच्या डोक्यात आला असेल पण ते काही लहान बाळ नसून एक बुटके दानव आहे जे अज्ञान, रोगराई याचे प्रतीक आहे. अहंकाराचा पाडाव करताना शिव कोणताही विचार करत नाही त्यामुळे मोक्ष मिळवण्यासाठी भक्तीत लिन व्हावे असच नटराज सांगत असावा.

हे झाले मूर्तीचे विस्तृत वर्णन पण ह्या नटराजाचे तुम्हाला कळलेले हे वर्णन घरात नक्की सांगायला विसरू नका कारण मिळालेलं ज्ञान स्वतःकडे ठेवल्यापेक्षा इतरांना शिकवले तर त्याचा प्रसार होईलच पण वाचलेले हे तुमच्या लक्षात देखील राहील याची मला खात्री आहे.

असाच पुढचा लेख घेऊन येईपर्यत 

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।


गुरुवार, ९ मार्च, २०२३

हटके अलोन चित्रपट

खरंतर चित्रपट हे मनोरंजनाचे साधन पण मनोरंजनाबरोबर सामाजिक प्रश्न,समाजाला आरसा दाखवणारे चित्रपट मध्येअधे येत असतात पण हे असले चित्रपट बनवण्यासाठी निर्माते तयार नसतात कारण चित्रपटासाठी लागणारा पैसा आणि त्यातून मिळणारा परतावा ह्या गणितावर चालणारा हा व्यवसाय आहे. पैसे कमावण्याच्या हव्यासानेच कथा नसलेला, निरस चित्रपट बनवणे आणि मार्केटिंगच्या जोरावर त्यांना हिट करणे आजकाल सोपा खेळ आहे पण तरीही काही लोक केवळ पैश्याकडे न पाहता काही प्रयोग करत असतात. हे प्रयोग चित्रपट रसिक कधी आनंदाने स्वीकारतात तर कधी नाकारतात.  प्रायोगिक चित्रपट किंवा ठरलेल्या सरळढोड चित्रपटापेक्षा वेगळा प्रयत्न असणारे चित्रपट लक्षात राहतात.आज असेच तीन चित्रपट माहिती तुमच्यासमोर घेऊन आलो आहे.
हटके चित्रपट म्हंटल की सगळ्यात पहिले लक्षात येणारे नाव म्हणजे पुष्पक 
पुष्पक चित्रपटात एकही संवाद प्रमुख कलाकार बोलताना दिसत नाही. पूर्वीच्या काळी संवाद रेकॉर्ड करण्याचे कसब नसल्याने मूक चित्रपट बनवले जायचे. प्रत्येक खेळाच्या वेळी कसलेले कलावंत लाईव्ह म्युझिक द्यायचे पण पुष्पक चित्रपटात मुद्दाम एकही संवाद न वापरता एक सुंदर चित्र प्रेक्षकाना दिला. चित्रपटात मुख्य कलाकार जरी मुके दाखवलेले असले तरी बॅकग्राऊंडमध्ये गर्दीचा आवाज,रेडिओवरील गाणी,बाजारातील गोंधळ हे आवाज होते. 
कठीण परिस्थितीशी दोन हात करणारा सुशिक्षित बेरोजगाराला अचानक एके दिवशी एक श्रीमंत व्यक्ती नशेत रस्त्यावर भेटतो त्याला मदत करायला पुढे गेल्यावर त्याचे अपहरण करून काही दिवस श्रीमंतीचा अनुभव घ्यायचा धूर्त डाव नायकाच्या मनात येतो आणि त्यानंतर एकामागे एक असे प्रसंग घडतात की चित्रपट पाहणारा प्रसंगाच्या श्रुखलेत अडकून जातो त्यावेळी त्याला कोणत्याही संवादाची गरज पडली नसावी. हा चित्रपट म्हणजे एक मास्टर क्लासच होता हे वाचणारे कित्येक जण मान्य करतील.
दुसरा असाच हटके चित्रपट म्हणून माझ्या डोक्यात मराठी चित्रपट येतो तो म्हणजे बिनधास्त ह्या चित्रपटाचे हटकेपन म्हणजे सगळ्या महत्वाच्या भूमिका स्त्रियांनी केल्यात. यात पुरुष कलाकार आहेत पण पुरुष कलाकारांच्या तोंडी क्वचितच एखादा संवाद दिला गेला असावा. हा चित्रपट पाहणाऱ्या कित्येकांना तर हा हटके प्रयोग लक्षात आलाही असेल का अशी मनात शंका येते पण लिहले ते खोटे वाटत असेल तर नक्की या चित्रपट पहायला विसरू नका. दोन जिगरी मैत्रिणी, कॉलेज लाईफ, दोन गटातील वाद आणि एका रंगेल व्यक्तीचा खून असा रहस्यमय चित्रपट पुण्याच्या मंगला थिएटरमध्ये पाहताना मज्जाच आलेली. दोन मैत्रिणी एका खुनात अडकल्यानंतर त्यातून त्याची मैत्री सुलाखून बाहेर येते पण ह्या दोन मुलींना वास्तवाची जाणीव करून देण्यासाठीच एकीच्या आत्याने केलेला हा एक गंमतीचा डाव अनावधानाने वेगेळेच वळण घेतो. खून झालेल्या व्यक्ती, त्याचा आरोप त्या दोन मुलींवर येणे, स्वतःला निर्दोष दाखवण्यासाठी त्यांनी केलेला। प्रतिकार,खून झालेला इसम आणि त्याची खुनाची गोष्ट म्हणजे रहस्यमय चित्रपट बिनधास्त. 
ह्या दोन हटके चित्रपट आणि हा लेख लिहण्यास कारणीभूत ठरलेला आजचा तिसरा चित्रपट म्हणजे अलोन (Alone) हा चित्रपटदेखील रहस्यमय कटेगिरीत येतो. कथेची गुंफण इतकी बेमुलायम आहे की चित्रपटात केवळ एकच व्यक्तीने अकटिंग केली आहे हे मन मान्य करणार नाही. होय या चित्रपटात केवळ एकच माणूस आहे आणि तेही संपूर्ण चित्रपटात. मुख्य आणि एकमेव कलाकार असलेला कदाचित असला प्रयोग कोणी आजपर्यत केला नसावा. कोरोना ह्या महारोगाची प्राश्वभूमी असलेला हा चित्रपटात सहकलाकाराचे आवाज तर आहे पण एकही सहकलाकार नाही. पहिल्या फ्रेमपासून ते शेवटची फ्रेम पडेपर्यत कोणताही दुसरा चेहरा दिसत नाही. कोरोना,लॉकडाउन यामुळे घरा घरात स्वतःला कैद करून घेतलेल्या गोष्टीवर एक अद्भुत चित्रपट बनवला गेला आहे. कोरोनामुळे कुटुंबापासून लांब एका फ्लॅटमध्ये आलेला चित्रपटाचा नायकाला काही भास होऊ लागतात. भूतकाळात झालेल्या दोन खून आणि त्याचा खुनी याची आभासी माहिती नायकाला मिळते. यानंतर नक्की काय होते, खून कोणाचे आणि का झाले? खुनी कोण? नायकाला होत असलेले भास की नियोजित कट यासारखी असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधायची असल्यास रहस्यमय चित्रपट अलोन पहायला हरकत नाही.

यासारखे चित्रपट, राजकारण, धार्मिक आणि काही मनातल्या गोष्टी वाचण्यासाठी follow करायला विसरू नका. अनेक इतर लेख तुम्हाला माझ्या ब्लॉगर संकेतस्थळावर पहायला मिळतील. लेख आवडत असतील, माझ्या लिखाणाचा किडा वाढवण्यासाठी लाईक, शेयर करायला विसरू नका. पुढचा असाच एखादा लेख घेऊन तुमच्या समोर सादर करेपर्यत माझा रामराम

शनिवार, २५ फेब्रुवारी, २०२३

सनातन भाग ५ : विठ्ठल

नमस्कार सनातनी मित्रानो,

सनातन ह्या मालिकेतील गोष्टी वाचता आहात, शेयर लाईक करत आहात, कौतुकही करत आहे हे पाहून दररोज सनातन हिंदू धर्मातील एक गोष्ट तुमच्यासमोर मांडावी अस सारख वाटत पण दररोज असे होईलच असे नाही कारण एखादी गोष्ट आठवली, वाचली तरी तुमच्यपर्यत पोहचवण्याआधी तिची विस्तृत माहिती काढणे त्या माहितीला लिहून काढणे यात किमान चार ते पाच तास कुठे निघून जातात हे कळत नाही. तरीही कमीत कमी वेळेत नवीन आणि तुम्ही न ऐकलेल्या किंवा ऐकलेल्या पण विस्मृतीत गेलेल्या गोष्टी आणण्याचे मला व्यसन लागले आहे. ह्या व्यसनाची झिंग तुमच्या मनावर, बुद्धीवर,शरीरावर चढावी अशी माझी इच्छा असते. ब्लॉगमधून हिंदू जनजागृती व्हावी, हिंदू सजग व्हावा, संघटित व्हावा यासाठी चाललेल्या ह्या प्रयत्नांना तुमच्या पाठिंब्याची खूप गरज आहे. मी मांडत असलेली माहिती आणि तुमच्या माहितीत विसंगती असेल तर ती मला नक्की सांगत जा ही नम्र विनंती....
 
आजची गोष्ट आहे विठ्ठलाची. विठ्ठल हा नक्की कोण? याच्या जन्माची गोष्ट काय अस तुम्हाला विचारले तर त्याचे उत्तर तुम्ही देऊ शकाल असे नाही. मुळात विठ्ठल हा देवच नाही असं म्हंटल तर तुम्ही मला वेडात काढाल याची अपेक्षा असली तरी मी ते मत तुमच्या पुढे व्यक्त होत आहे. हो विठ्ठल नावाचा कोणताही देव नाही आणि हीच आजची कथा आहे पण त्याआधी विठ्ठलाच्या ह्या नयनरम्य, सुंदर मूर्तीचे दर्शन घेऊया

विठ्ठल ह्या शब्दाची फोड केल्यास वीट आणि थल हे शब्द सापडतात. पुंडलिकाने फेकलेली वीट आणि थल म्हणजे जमीन. पुंडलिकाने फेकलेल्या विटेवर उभा राहून त्या थल जमिनीवर विराजमान झालेला विठ्ठल. 
विठ्ठल ह्या शब्दचा दुसरा सुंदर अर्थ म्हणजे
वि - विधाता
ठ्ठ  - नीलकंठ
ल - लक्ष्मीकांत
परमपिता ब्रम्हा विधाता, नीलकंठ भगवान महादेव आणि लक्ष्मीचा पती असलेला लक्ष्मीकांत भगवान विष्णू याचे नाव एकाच नावात आहे तो विठ्ठल.

इतक्या वर्ष तुम्ही ही मूर्ती पहिली आहे पण केवळ ती पहिली तिचे निरीक्षण केले का हो कधी? आज तुम्ही जी माहिती वाचाल ती तुम्हाला नवीन काही माहिती देऊन जाईल यात मला शंका वाटत नाही..

वर अनुउल्लेख केल्याप्रमाणे देवाचे देव परमात्मा ब्रम्हा, विष्णू आणि महेश याचे स्वरूप असलेली ही मूर्तीची माहिती सर्वप्रथम आपण घेऊ. विठ्ठलाच्या डोक्यावर असणारी मुकुटासारखी टोपी आपल्याला शिवलिंगाचा भास करून जाते. चेहरा उभट, गाल फुगीर तर डोळे समचरण म्हणजेच आपल्या दर्शन घेणाऱ्या भक्तांकडे पाहणारी, केंद्रित झालेली आहे.कानात खांद्यापर्यत येणारी मत्स्यकुंडले, गळ्यात हार, दंडावर आणि मनगटावर आभूषणे दिसतात. सनातन भाग ३ मध्ये सांगितल्या प्रमाणे तपस्वी भृगु यांनी बालाजीच्या छातीवर पाय मारल्याने झालेली जखम देखील विठ्ठलाच्या मूर्तीवर उजव्या छातीवर पहायला मिळेल. सनातन हिंदू छोट्या छोट्या डिटेल्स, गोष्टींची एकमेकात असलेली गुंफण इतकी बेमालूमपणे केलेल्या आहेत की त्या गोष्टी नसून वास्तव होत्या म्हणूनच त्याची इतकी छान सांगड सनातन धर्मात पहायला मिळते अशी ही गुंफण इतर कोणत्याही पंथाच्या कथानकात पाहायला मिळत नाही कारण त्या गोष्टी बनावटी आहेत हे समजायला अध्यात्मिक लोकांना क्षणाचा विलंब लागणार नाही.  विठ्ठलाचे दोन्ही हात कमरेवर असून डाव्या हातात शंख तर उपड्या उघड्या असणाऱ्या उजव्या हातात कमळाचे फुलांचा देठ पहायला मिळतो. पोटावर नाभी, कमरेवर सुंदर वस्त्राचे धोतर तर दोन्ही पायाच्या मध्ये घुंगराची काठी स्पष्ट दिसते अशी ही काळ्या रंगाच्या ओबडधोबड दगडात असलेली मूर्ती एका विटेवर गेली अठ्ठावीस युगे उभी असणारी प्रतिमा आकर्षक आणि सुंदर दिसते.

मला माहीत आहे ही श्रीविठ्ठलाच्या मूर्तीचे हे वर्णन वाचल्यानंतर प्रत्येक डिटेल्स तुम्ही आज पहिल्यांदाच निरीक्षण करण्यासाठी फोटो न्याहाळत असणार असो......

विठ्ठल जन्माची कथा
द्वापार युगात मुचकंद नावाच्या पराक्रमी राजाने देव दानव याच्या युद्धात देवांना मदत करत असुरांना हरवले. देवाचा राजा इंद्र या गोष्टींमुळे खूप प्रसन्न झाला आणि मुचकंद राजाला हवा तो वर मागण्यास सांगितले. युद्धात केलेल्या पराक्रमामुळे राजा खूप थकला होता म्हणून त्याने इंद्राकडे एकांतात गाढ झोप हवी आहे असा वर मागितला पण एकदा झोपल्यावर माझा निद्रानाश जो करेल त्याच्याकडे केवळ पाहिल्याने मृत्यूदंड देण्याचा अधिकार मागितला. इंद्र आणि इतर देवतांनी त्याची ही मागणी मान्य करत तथास्तु म्हंटले. थकलेला राजा मुचकंद एका गुहेत जाऊन झोपून घेतले. 
कृष्ण अवतारात माजलेला मदमस्त आणि बदलाच्या आगीत होरपोळणाऱ्या जरासंध याने कालयौवन नावाचा राक्षसाला कृष्णाला मारून टाकण्याची आज्ञा केली. कालयौवन राक्षसाला कोणत्याही अस्त्र, शस्त्र याने मारता येणार नाही असे वरदान होते शिवाय परमात्मा विष्णू याना मायेचा सहारा घेत अनेक लीला करायची सवय असल्याने कालयौवन याच्याशी लढाई न करता तिथून पळून जाणे बरोबर वाटले. युद्धातून पळून जाणाऱ्या श्रीकृष्णाला म्हणूनच रनछोडदास ही उपाधी मिळाली होती. श्रीकृष्णाने युद्धात पाठ दाखवत थेट त्या गुहेत गेले जिथे पराक्रमी राजा मुचकंद आराम करत होता. मुचकुंद राजाच्या अंगावर स्वतःचे उपरणे टाकून श्रीकृष्ण अंधारात लपून बसले. श्रीकृष्णाला ठार करण्यासाठी कालयौवन राक्षस देखील गुहेत घुसला. श्रीकृष्णाच्या उपरण्यावरून कृष्ण तिथे झोपला आहे असं समजत त्याने मुचकंद राजाच्या छातीत जोरात पाय मारला. जोरात झालेला हा प्रहारामुळे मुचकंद राजाची निद्रानाश झाला आणि मिळालेल्या वरदानानुसार केवळ कालयौवन यांच्याकडे पाहत जागेवर भस्मसात केले. श्रीकृष्णनी योजलेली ही क्लुप्ती पूर्ण होताच ते मुचकंद राजाच्या समोर उभे ठाकले आणि सर्व कथा त्यांना सांगितली. स्वतः श्रीविष्णू याचा अवतार श्रीकृष्ण समोर उभे आहेत हे पाहताच मुचकंद राजाने कृष्णाला माझ्या समोर असाच उभा रहा असे आवाहन केले. आपल्या प्रत्येक अवतारात लीला करणाऱ्या श्रीविष्णूने मुचकंद राजाला त्याची ही इच्छा त्याच्या पुढच्या जन्मी पूर्ण होईल असे आश्वासन दिले. हाच मुचकंद राजा त्याच्या पुढच्या जन्मात पुंडलिक नावाच्या माणसाच्या रूपात पंढरपूर जवळ जन्म झाला.

श्रीकृष्ण आणि रुक्मिणी याचा एकदा वाद झाला आणि वादाचा परिणाम रुक्मिणी देवी नाराज होऊन श्रीकृणाला सोडून वनात तपश्चर्या करायला बसली. ज्यावेळी श्रीकृष्ण आपल्या पत्नीला शोधत शोधत पंढरपूरजवळील वनात आले त्यांनी देवी रुक्मिणीना तपश्चर्येत लिन पाहिले. तिची तपश्चर्या मध्ये विघ्न न घालता ते मागच्या जन्मी मुचकंद राजाला दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी निघून गेले. श्रीकृष्णा रूपातील स्वतः श्रीविष्णू पुडलिकाच्या घरी त्याला भेटायला गेले असता पुंडलिक आपल्या वृद्ध आई वडिलांची सेवा करणे होता. सेवेत खंड पडू नये म्हणून श्रीकृष्णाकडे एक वीट फेकत त्यावर उभा राहून थोडा वेळ वाट पाहण्याची विनंती केली. धैर्यशील श्रीविष्णू आपल्या भक्ताने छातीवर लाथ मारल्यानंतरही तपस्वी मुनी भृगु याच्या पायाला लागले तर नाही ना अशी काळजी वाटणाऱ्या देवाने स्मितहास्य करत गुपचूप त्या विटेवर उभे राहिले. पुंडलिकाची आई वडिलांची सेवा पूर्ण केल्यावर श्रीकृष्णाकडे परतले आणि आहे त्या परिस्थितीत आहे त्या विटेवर आजन्म तुमचा वास पंढरपुरात असावा असे मागणे मागितले. तेव्हा पासून श्रीकृष्ण पुंडलिकाने फेकलेल्या त्या विटेवर उभे आहे म्हणूनच विटेवर पंढरपूरच्या थल/ जमिनीवर उभ्या कृष्णाला विठ्ठल असे म्हटले जाते.

लेखाच्या सुरुवातीला केलेल्या दाव्याप्रमाणे विठ्ठल नावाचा हा देव दुसरा तिसरा कोणी नसून कृष्णवतार आहे हे सप्रमाण सिद्ध केले आहे. मग आजची ही कथा तुम्हाला आवडली का? अश्याच अनेक सनातन धर्मातील निवडक गोष्टी वाचण्यासाठी, धर्म जागृती, हिंदू संगठन दृढ करण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका. पुढची अशीच एक सनातन गोष्ट तुमच्यासमोर आणेपर्यत 

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०२३

सनातन भाग 4 भगवद्गीता

सनातन भाग चार.

लवजिहाद असेल की प्रेम प्रकरणे हे जातीबाह्य विवाह याचे मूळ कारण चित्रपट, आधुनिक जीवन किंवा पालकांचे दुर्लक्ष हे कारण आहेच शिवाय हिंदूंनी आपल्या घरात, घराबाहेर हिंदू संस्कृती, धर्मग्रंथ याचे अनुकरण बंद केल्याने आपला सनातन हिंदू धर्माची शिकवण मुलांमध्ये प्रवाहित होत नाही.समजा जर भगवद्गीतेसारखा प्राचीन पुरातन धार्मिक ग्रंथ याचा थोडा जरी हिंदूंनी घरात वाचला असता तर कदाचित मुलांची मानसिकता आज जशी आहे तशी राहिली नसती. दुसऱ्या पंथाची लोक कट्टर असण्याची आणि हिंदू तसे नसण्याचे  कारण धर्मग्रंथांना घरात नसलेले स्थान हेच आहे. पटत नाही ना? मग पुढे वाचाच
भगवद्गीतेचा पहिला अध्याय अर्जुनविषादयोग म्हणजे युद्धाला सुरुवात होण्याआधी रणांगणात आपल्याच रक्ताचे  भाऊ, आप्त, गुरू, नातेवाईक याच्याविरुद्ध युद्ध करण्याची वेळ आली त्यावेळी त्याचे हातपाय गळून पडले, अर्जुन भयभीत झाला, त्याला भयंकर दुःख झाले आणि पडलेले अनेक प्रश्न त्याने योगेश्वर श्रीकृष्णाना विचारू लागला. हेच प्रश्न भगवद्गीतामधील श्लोक, भगवद्गीता घरात शिकवली, बोलली गेली असती तर त्याचा परिणाम मुलांवर होऊन विवाह संस्था, धर्म जाती याचे महत्व मुलांना लहानपणीच कळले असते आणि मोठे झाल्यावर त्याचे अनुकरण ही 
केले असते असा माझा तरी समज आहे. हा सगळेच नाही पण बहुतांश मुलांना लव जिहाद, धर्म किंवा जाती बाहेर प्रेम वा लग्न न करण्याचे कारण कळले असते अस मला वाटते. काही प्रगत झालेल्या, विकसित, पाश्चात्य देशाची संस्कृती, वैयक्तिक आयुष्य, खुलेपणाचा स्वीकार करणाऱ्यांना कुंपण वाटेल पण त्या वाटण्यापेक्षा धर्माने कसे वागावे, योग्य अयोग्य याची ओळख लहानपणीच झाली असती. म्हणूनच मी तुम्हा सर्वांना आवाहन करेल की आता तरी आपल्यात बदल घडवा, सजग व्हा कारण हिंदू म्हणून असलेली ही ओळखच माणसाला माणूस म्हणून जगण्यास मदत करते. दिवसातील अर्धा तास, एक एक श्लोक असे ध्येय ठेवले तरी घरातील अबालवृद्ध मध्ये अध्यात्मिक जागृती तुम्ही करू शकता त्यासाठी आता तुम्हाला कोण्या गुरुची गरज आहे असे नाही. हातातील हा मोबाईल ज्यावर तासनतास बिभस्य रील पाहण्यात वेळ घालवण्यापेक्षा एखादे भगवद्गीता अँप, youtube वरील भगवद्गीता विश्लेषण  व्हिडीओ यातूनही ज्ञान घेता येऊ शकते. आता तुम्हाला वर दिलेले मुद्दे भगवद्गीतेत आहे हेच माहीत नसेल. मुळात आयुष्यात पडणारे कोणतेही प्रश्न याचे उत्तर गीतेत आहे असं साधू संत म्हणून गेलेत ते काही उगीच नाही. अर्जुनाला पडलेले प्रश्न श्रीकृष्णांना विचारात असताना त्याने उपस्थित केलेले हे प्रश्न आणि त्याची मीमांसा यासाठी आजचा हा थ्रेड. उदारणार्थ अध्याय एक श्लोक 38 ते 43 याची माझ्या बौद्धिक पातळीवर मीमांसा मी करतो आहे.ज्याची माहिती तुम्ही स्वतः स्वतंत्र पद्धतीने नक्की करा असंही मी सांगू इच्छितो. चला ह्या ब्लॉगमुळे गीतेचा पहिला अध्याय


अर्जुनविषादयोग आहे हे आज भरपूर लोकांना समजले असेल. जोडलेल्या स्क्रिन शॉट मधील हे श्लोक अर्थ असा आहे की अति लोभामुळे बुद्धी भ्रष्ट झालेल्याना कुळाचा (कुटुंब वा वंश) नाश होण्यामुळे निर्माण होणारे दोष व मित्राशी वैर केल्याचे पाप दिसत नसले तरी बुद्धी नितीमत्तेने वागणाऱ्या लोकांनी तरी लाभापासून दूर का राहू नये. कुळाचा नाश झाला तर परंपरागत कुळधर्म नष्ट होतो आणि कुळधर्म नष्ट झाला तर मोठ्या प्रमाणात पाप वाढण्यास मदत होते. पाप वाढल्याने कुळातील स्त्रिया बिघडतात. कुळात वर्णसंकर उत्पन्न होतो ( वर्णसंकर म्हणजे भिन्न जातीच्या स्त्री पुरुषाच्या जवळ आल्याने जन्मणारी व्यक्ती) वर्णसंकरामुळे कुळाचा नाश होतो, नरकात ढकलतो. वर्णसंस्कारामुळे परंपरागत जातीधर्म आणि कुळधर्म उधवस्थ होतात. एकदा का कुळधर्म नष्ट झाला तर अनिश्चित काळासाठी नरकात रहावं लागते.

असा शब्दशः अर्थ आहे. समजा भगवद्गीता घराघरात शिकवली गेली असती तर लहानपणीच पाल्याना कुळ म्हणजेच वंश, धर्म,जाती याची माहिती मिळाली असती ह्या  माहितीच्या आधारे जगात घडणारे लव जिहाद सारख्या प्रकारात न अडकण्याचे शिक्षण लहानपणीच समजले असते तसे संस्कार त्याच्यावर झाले असते. मुलगा असो की मुलगी यांना जातीबाह्य विवाह चुकीचे असतात त्यामुळे दोष निर्माण होऊ शकतात हे बाल्यवयातच कळल्याने तरुणपणात प्रेम प्रकरणे, जाती बाहेर लग्न यासारखे प्रश्नच उद्भवले नसते का? पण हिंदूंनी चार पुस्तक शिकून धर्मग्रंथांना बाजूला सारले ज्यामुळे संस्कृती मुलापर्यत पोहचत नाही आणि जे व्हायला नको ती पावले मूल तरुणपणात घेतात. काहींना जे वाचतोय ते खटकेल, संकुचित वाटेल, चुकीच्या वाटतील पण ज्या पालकांच्या मुलीचे 40 तुकडे करून फ्रीज मध्ये ठेवले जातात किंवा मुलींना प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवून त्याचा उपभोग करून सोडून दिले जाते त्या पालकांना किंवा ज्यांनी असे प्रसंग जवळून घडलेले पाहिले त्यांना अर्जुनाने मांडलेले मुद्दे चुकीचे वाटतील का हो? भले आज आपण जाती व्यवस्था मानत नसलो, प्रगत पुढारलेले झालो असेल तरी जवळच्या व्यक्तीचे असे आंतरजातीय विवाह कपाळावर आठ्या निर्माण करतात की नाही. भले असे विवाह झाल्याने नरकात अनिश्चित काळासाठी अडकणार नाही पण आयुष्याचाच नरक झाला तर?  माझा उद्देश गीतेतील श्लोक सांगून, जातीभेद, धर्म, आंतरजातीय विवाह, आजची जगण्याची पद्धत यावर बोट ठेवायचे नाहीच मुळी. कसे वागायचे हे ज्यांनी त्यांनी ठरवायचे आहे पण जर आपण आपल्या धर्मीक ग्रंथांना जवळ घेतले, त्याचा अभ्यास केला,घरात चर्चा केली तर नैतिकता, सभ्य असभ्य वर्तन, समाजात वावरण्याचे पद्धत यांचे सामान्य ज्ञान मुलाना देऊ शकू याची खात्री वाटते. प्रसंग बेतल्यावर त्याचे गांभीर्य समजण्यापेक्षा ते आधीच समजले तर वाईट कुठे आहे. जीवापाड प्रेम असणाऱ्या आपल्या जवळच्या लोकांचे भले व्हावे, आयुष्यभर त्यांनी सुखात रहावे यासाठीच झटत असतो ना आपण मग हा छोटासा बदल केवळ धार्मिक नाही तर कौटुंबिक स्वास्थ सुधारणा करेल अस मला वाटत. भगवद्गीतेचा मी काही खूप मोठा अभ्यासक नाही कदाचित छोट्या तोंडी मोठा घास घ्यावा तसा उपदेश द्यायचा मला काहीच अधिकार नाही पण समाजातील आजची परिस्थिती पाहता हिंदूंना जागृत करण्यासाठी, धर्माशी जोडण्यासाठी भगवद्गीता हा धार्मिक ग्रंथ खूप मोठे काम करू शकतो अस मला वाटले. गेल्या दोन तीन महिन्यांपासून मी स्वतः पहिलाच अध्याय समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपणच आपले धार्मिक ग्रंथांना जवळ करणार नाही तर कोण करणार. भले त्यातल्या सगळ्याच गोष्टी पटणार नाही पण काही तर पटतील. आज पाहिल्यानंदा लेखाचा शेवट कसा करायचा हे समजत नाही आहे. कित्येकदा लिहलेले खोडुन परत लिहले पण शेवट काही जमेना पण कुठं तरी थांबावे लागेल त्यामुळे हिंदूंनो  भविष्यकाळातील धोके ओळखून सजग व्हा, संघटित व्हा ह्या माझ्या पेटंट डायलॉग मारून विश्रींती घेतो. पुढचा लेख येईपर्यत

।।ॐ नमोः नारायणाय नमः।।
।।ॐ नमोः भगवते वासुदेवाय नमः।।
।।ॐ नमः शिवाय।।

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...