गुरुवार, १० मार्च, २०२२

चाकण८४

 जय श्रीराम

चाकण८४ नावाचे ट्विटर अकाउंट कायम स्वरूपासाठी बॅन केले गेले म्हणून डायरीनोट्स नावाचे दुसरे खाते चालू केले. नवीन खात्याला जुने मित्र मंडळी परत गोळा होत होते त्याचबरोबर ब्लॉगर वरचे ब्लॉगला थोडेफार view मिळत होते पण लोभ वाईटच नाही का? विचारांना जास्त लोकांपर्यंत पोचवण्याची हाव नवीन खात्याचे नाव बदलून पूर्वीच्या चाकण८४  च्या जवळपास नाव Chakan84s ठेवून जुने सहकारी, मित्र याना गोळा करण्याचा प्रयत्न केला आणि ट्विटरने नवीन खात देखील बॅन केले. थोडासा मनस्ताप झाला, वाईट वाटले आणि ठरवून टाकले की आता ट्विटरवर परतायचे नाही पण व्यसनी दारुड्या व्यक्तीचे पाय जसे आपसूक ठरलेल्या वेळी दारूच्या गुत्त्यावर घेऊन जातात तसच मला ट्विटर वर नवीन खात काढावे लागले


बोलण्याचे विषय चित्रपट, राजकारण, शेयर मार्केट वगैरे तेच ते असले तरी मनातलं बोलण्यासाठी, भाव भावनांना मोकळं करण्यासाठी मिळणारे हे व्यासपीठाचा वापर करून हिंदू संस्कृती आणि हिंदुत्व यासाठी वापरून प्रबोधन करणे हीच मानसिकता आहे. परत ती सगळी लोक भेटतील याची गॅरंटी नसली तरी थोडेफार जुने, थोडे नवे मित्र, सवंगडी जोडायचे आहे त्यामुळे आपल्या सगळ्यांची साथ गरजेची आहे. 


जयहिंद


सोमवार, ७ मार्च, २०२२

हिजाब, बुरखा आणि मी

नमस्कार

https://twitter.com/Notes247Diary/status/1500812070811430916?t=qxuUNZxbZyn3zIarnftIWQ&s=19


 ही एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री आहे आणि तिने एक आव्हान लोकांना दिले आहे. एव्हाना सगळ्या लोकांना ही कोण, काय आव्हान केले माहीत असले तरी ही पोस्ट करण्याचा माझा विचार वेगळा आहे. असा पेहराव केल्यावर ती व्यक्ती कोण हे कोणाला ओळखता येईल का?प्रामाणिक राहून स्वतःला उत्तर द्या. नाही हेच उत्तर येणार हे सर्वश्रुत आहेच पण अश्याच पेहरवाचे समर्थन करताना एक समाज मोठी मागणी करताना दिसतो आंदोलन करतोय ते त्यांच्या समाजाचे अनुकरण म्हणून. योग्य आहे का ते? चेहरा म्हणजे ओळख आणि ही ओळख लपवून जर कोणते कांड झाले तर आरोपीला शोधायचे कसे? बर हा हिजाब वा बुरखा सारखे पेहराव घालून, ओळख लपवून काय काय आणि कसं केले जाते याचे दाखले बऱ्याच हिंदी मराठी चित्रपटात दाखवले गेले आहे, आपल्या आजूबाजूला घडत असणाऱ्या गुन्हेगारीत सुद्धा वापरले जाते हा माझा मुद्दा क्रमांक एक. दुसरं म्हणजे ऐच्छिक विषय असतानाही धार्मिक कट्टरता आणि त्यातून सामाजिक वर्चस्व दाखवण्याचा केलेला अट्टाहास सामाजिक तेढ निर्माण करत नाही का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे पारंपरिक, गुलामगिरीत महिलांना ठेवून त्याचे अधिकार, स्वातंत्र हिरावून घेणारा त्याच समाजातील बहुभार्या करताना त्याच महिलांचा अपमान त्यांना दिसत नाही का? ज्याप्रकारे जादुई पुस्तकात हिजाब किंवा बुरखा याचे कोठेही आज जसा वापर आहे तसा उल्लेख केलेला नसताना जादुई पुस्तकातील गोष्टींचा अनादर केलेला त्या समाजाला कसा चालतो? कारण ज्या जादुई पुस्तकात काहीही बदल करण्याची मुभा नसताना त्यातील गोष्टीचा चुकीचा अर्थ काढणारे खरच त्या समाजाचे खरे, सच्चे अनुसारक असावे का? मुळात तो समाज ज्या कुप्रथा अनुसारण्याचे आव्हान किंवा दडपण त्या समाजाच्या महिलांवर करत आहे ते चुकीचे. जिथं एक समाज सती प्रथा, घुंगट, विधवा विवाह वगैरे काळाबरोबर बदल स्वीकारत असताना तो समाज बुरसटलेले,जंगली आचार विचार धरून बसने योग्य का? मुद्दा लहान असला तरी त्यातून त्या समाजातील लोकांसाठी देण्यात येणारी समज धमकी आणि भारतीय सविधानापेक्षा जादुई पुस्तकांचे अनुकरण करून दडपशाही करण्याचा त्या समाजाचा इरादा आहे हे स्पष्ट होते. मुक्ता बर्वेला सगळ्या प्रकारात मुद्दा म्हणून वापरायचे नसले तरी त्याच्या एका फोटोने मला माझा मुद्दा मांडता आला आहे. बंदी कोणत्याच पेहरावाला नसावी पण ती मागणी करत असताना इतर कायदे, नियम तुटणार नाही याची काळजी घ्यायला नको का? पोलीस असणारी स्त्री जर बुरखा घालून ड्युटी करायला लागली तर जसे योग्य ठरणार नाही त्याच प्रकारे स्वतःच्या धर्माचे अनुसरण करत असताना शाळेत विशेषतः वर्गात बसतानाही बुरखा घालण्याची मागणी चुकीची आणि ती कधीच मान्य होणार नाही हे त्या समाजाला सांगावं, शिकवावं लागणार आहे. मुळात लहानपणी माझ्या आजूबाजूला असणाऱ्या मुस्लिम घरातील स्त्रियांना मी काही बुरखा घालताना, वावरताना पहिली नव्हते अपवाद एखादं दुसरी महिला पण हिजाब किंवा बुरखा वाद करून ह्या लोकांनी त्याच्या समाजातील स्त्रियांवर इतके दडपण निश्चित आणले आहे

की हे प्रमाण आज खूप वाढले आहे. अनैतिक आणि चुकीच्या गोष्टीना विरोध केला पाहिजे त्यामुळे हा थ्रेड. 

पुण्यात सर्रास प्रत्येक स्त्री उन्हाळ्यात तोंडावर स्कार्फ लावलेल्या दिसतात ते कोणत्याही एकाच समाजाच्या असतात असा अर्थ काढू नका पण ऊन,उन्हाचे चटके इतके असतात की स्वतःच्या त्वचेची काळजी म्हणून स्कार्फ, गॉगल, सनकोट इतकेच काय हॅन्डग्लोज घालून फिरणाऱ्या बऱ्याच माता बहिणी असतात शिवाय जिथं जिथं गरम वातावरण असत तिथं म्हणजे पुणे मुंबई नागपूर इतकेच काय गावागावात याचे लोन पसरलेलं आपण सगळ्यांना माहीत आहे पण त्या महिला त्याच अवस्थेत काम करण्याची, शिकण्याची इच्छा करतात का? नाही ना म्हणून त्या समाजाचा मूळ उद्देश लोकांनी समजून घेतला पाहिजे आणि त्यांचा उद्देश निश्चितच योग्य नसल्याने त्याला विरोध तुम्हाला आम्हाला करावाच लागेल. कोणत्याही कोर्टात तो दावा गेल्यास त्याला अनुमोदन मिळणार नाही हे जितकं सत्य आहे तितकाच त्या समाजाचा उद्देश कट्टरता दर्शवण्याचा आणि त्यांना हवं तसं कायदे वळवण्याचा मनसुबा योग्य नाही,नाही आणि नाही



शुक्रवार, ४ मार्च, २०२२

पेशावर बॉम्बस्फोट, पाकिस्तान आणि आतंकवाद

नमस्कार,

आज शुक्रवार, अ शांतीचा विचार जगाला देणाऱ्या धर्माच्या अनुयायांसाठी महत्वाचा दिवस असतो. लहानपणी ती लोक फक्त आजच्याच दिवशी ओंघोळ करतात अस वाटायचं, क्रिकेटची शुक्रवारी येणारा सामना म्हणजे पोर्किस्तान जिंकणार असा पायंडा त्याकाळी पडला होता. 

असो मूळ मुद्दा असा की काहीवेळापूर्वीच पोरकिस्तानच्या पेशावर मध्ये आतंकी हल्ला झाला अशी ठळक बातमी मोबाईलवर झळकली. निश्चितच भारतीय माणूस म्हणून त्या भिकारी देशाचे काहीही घेणे देणे नसले तरी एक माणूस म्हणून त्यात ठार झालेल्या व्यक्तींबद्दल हळहळ वाटणे स्वाभाविक आहे. बॉम्ब स्फोटानंतर व्हायरल झालेले व्हिडीओ आणि त्यात आक्रोश करणारी लोक, त्यांचे रडणे ऐकले की मन बैचेन होते.

घटनेची माहिती

आत्मघातकी म्हणजे स्वतःच्या अंगावर स्फोटक लावून आलेला तो व्यक्ती लोकांच्या गराड्यात जातो काय ओला उबेर चे नाव घेऊन स्फोट घडवतोय काय हे अनपेक्षित, अचानक हल्ला कोणी, का, कशासाठी केला याची जवाबदारी कोणत्याही व्यक्ती वा संस्थेने घेतलेली नाही पण देवाची प्रार्थना चालू असताना झालेल्या आत्मघातकी स्फोटात किमान ३० जण जागेवर मृत्युमुखी पडले, ५० हुन अधिक लोक जखमी आहेत. आकडेवारी सरकारी आहे शिवाय पोर्किस्तानसारख्या खोटरड्या देशाकडून खरी आकडेवारी लोकांसमोर ठेवली गेली असेल असे नाही याचाच अर्थ मेलेले लोक आणि जखमी यांचा आकडा निश्चितच मोठा असणार आहे. स्फोटानंतर आजूबाजूच्या लोकांनी जखमींना मिळेल त्या वाहनावर दवाखान्यात पोहचते केले, सरकारी अँबुलन्स आणि पाकिस्तानी सुरक्षयंत्रणा मदत कार्य सुरू केले अस ऐकण्यात आले असून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा दावा त्या पाकड्या लोकांनी चालू केला आहे

एकीकडे हा आत्मघातकी हल्ला, दुसरीकडे सोशल मीडियावर युद्ध चालू झाले. पोर्किस्तानचे नागरिक यात भारताचा हात असल्याचा दरवेळीसारखा ओरडा चालू केला आहे ज्यात काहींनी असाही दावा केला की भारताला पोर्किस्तानमध्ये क्रिकेट नांदवू द्यायचे नसल्यानेच मागच्या वेळी न्यूझीलंड आणि आता ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघांनी पोर्किस्तानात आल्यानंतर भारताने डाव केला असो असे दावे करणारे ना तिकडे कमी न इकडे पण एका आतंकवादी देशात आतंकवादाची चव स्वतःच चाखायला मिळत असल्याने दुसऱ्याला पाडण्यासाठी केलेल्या खड्डयात स्वतःच पडल्याचे सप्रमाण सिद्धता जगाला मिळाली आहे..

नक्की हा आत्मघातकी किंवा आतंकवादी हल्ला असावा का? आधीच भिकेला लागलेल्या, महागाईचा पूर आलेल्या आणि पाया ढासळलेल्या या देशात भारताला असे हल्ले करण्याची गरज नाही पण असे हल्ले झाल्याने त्याच्याच हत्याराने त्याचाच गळा कापला जातोय हे पाहून तरी पोर्किस्तानला शहाणपण येणार का? मुळात धर्माच्या आधारावर उभा राहिलेला हा देश बिगर मुस्लिम लोकांना ज्या पद्धतीने वागवतोय याच्या कैक बातम्या आपल्या कानावर आदळत असतात. हिंदू मंदिराची तोडफोड, हिंदू मुलींशी बलात्कार, जबरदस्तीने करत असलेले धर्मांतर किंवा बलुचिस्तान आणि बलुच लोकांशी करत असलेले वाईट प्रकार काही लपून राहिलेले नाही म्हणूनच की काय आप बिती झालेला हा घटक प्रतिहल्ले करत असावा शेवटी केलेल्या कर्माचे फळ इथेच भोगून जावे लागणार आहे. स्वतःवर होत असलेले अन्याय, जुलूम याला वाचा फोडण्याचे काम बलुचिस्तान कित्येक वर्षांपासून करत आहे शिवाय त्याच्या लोकांची बलुचिस्तान हा वेगळा देश निर्माण करण्याची इच्छादेखील आहे. बलुच लोक स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हातात हत्यार घ्यायला हाच अन्याय कारणीभूत आहे आणि जो संग्राम त्यांनी चालू केला आहे त्याला जरी पोर्किस्तानने  आतंकवाद नाव दिले तरी तिथल्या संकटाना सामना करणाऱ्या लोकांसाठी ते एक स्वातंत्रसंग्राम असणार हे नक्की. 

मूलतः त्या देशात कधीही कोठेही बॉम्बस्फोट होणे आश्चर्यकारक नसले तरी तिथं घडणाऱ्या कोणत्याही घटनेशी भारताला जोडण्याचा त्याचा धंदा जुना आहे. मुळात पंतप्रधानांना देण्यात येणारी सुरक्षा त्याच्या देशात खेळायला येणाऱ्या खेळाडूंना देऊन पोर्किस्तान किती असुरक्षित देश आहे याची कबुली स्वतः तेच जगाला देत असतात पण तरीही काही अपवादात्मक परिस्थितीत तिथं परदेशी खेळाडू, संघ श्रीलंकेच्या संघावर झालेल्या हल्ल्यानंतर आता कुठं परत जायला सुरुवात केली होती तेच आजच्या प्रसंगाने पोर्किस्तानला परत दहा पंधरा वर्षे मागे घेऊन गेले हे निश्चित. न्यूझीलंडने सामना चालू होण्याआधी तिथून घरी परतण्याचा निर्णय असो की आजच्या स्फोटानंतर ऑस्ट्रेलिया संघ काही वेगळा निर्णय घेईल अशी परिस्थिती नाही. 

मुळात चुकीची शिक्षण पद्धती, धर्माध, कट्टरवादी वागणे, कालबाह्य झालेल्या जादुई पुस्तक आणि त्याचे अनुसरण पोर्किस्तान आणि इस्लामी समाजाला पुढं घेऊन जात नाही. जोपर्यत ह्या गोष्टीचा त्याग करून ती लोक माणुसकी, शांतता जवळ घेणार नाही तोपर्यत हा नाश चालूच राहील कदाचित त्याच्या ह्याच मानसिकतेने जगाचा सर्वनाश होईल अशी भीती आहे. इस्लामी जादुई पुस्तक आणि त्याच्या रितिभाती याच्यावर बंदी आली पाहिजे तरच कुठं मानवजात दुसऱ्या कोणत्या प्रलयात संपेल अन्यथा धार्मिक हिंसाचार, कट्टरता, इतर धर्मचा द्वेष यातील संघर्ष विकोपाला जाऊन एक दिवस सगळं काही संपेल.

हल्ल्यात मृत्यू झालेला लोकांना शांती मिळो आणि पोर्किस्तान आणि धर्माध लोकांच्या डोळ्यावरची झापडे दूर होऊन त्यांना अक्कल येवो अशी इच्छा बाळगून आजचा हा लेख संपवतो

जय हिंद


गुरुवार, ३ मार्च, २०२२

राजकारण

नमस्कार,


भारतात सर्वाधिक लोकप्रिय, सवंग चर्चा, बातम्या कशाच्या होतात? माणूस श्रीमंत असो की गरीब, सुशिक्षित असो की निरक्षर त्याच्या आवडी निवडी नक्की काय असतात? सर्वसाधारण पण चित्रपट,खेळ त्यातही विशेष म्हणजे क्रिकेट आणि राजकारण.

राजकारण !


हो राजकारणाचे गारुड प्रत्येक भारतीयांच्या डोक्यात नाचत असत कदाचित स्वातंत्र मिळाल्यानंतर सर्वात जास्त चर्चा होत असलेला विषय म्हणजे राजकारण.

भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही पद्धतीने चालणारा देश. लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेले शासन म्हणजे लोकशाही अशी अब्राहम लिंकन याने केलेली व्याख्या नागरिक शास्त्र विषयांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी घोकून पाठ केलेली असेल यात शंका नाही. भारत स्वतंत्र झाल्यापासून बहुतांश वेळा भारतावर काँग्रेस नावाच्या पक्षाची सत्ता राहिली आहे पण काही काही वर्षांपासून त्यांची एकाधिकारशाही संपुष्टात आली आहे. भारतातील बहुतांश राज्यात एक तर भाजपा ची सत्ता आहे. त्याखालोखाल प्रादेशिक पक्षाची मक्तेदारी पाहायला मिळते. 

कोणत्या गोष्टीबद्दल बोलण्यासाठी,मुद्दे मांडण्यासाठी कोणत्यातरी एका बाजूला असणं गरजेचे असावं असं मानणारा मी आहे, निपक्ष पद्धतीने आजकाल तर वृत्तपत्र, संपादक किंवा पत्रकार देखील उरलेले नाही. उलट जिथं शित, तिथं या भूतांची गर्दी दिसते. 

जस जसा काळ बदलतो तस केवळ केस पांढरे होतात अस नाही, विचार करण्याची पद्धत, मत यांच्यामध्ये बदल घडू शकतो. सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपा एक मजबूत, ठराविक अजेंडा घेऊन देश चालवताना दिसत आहे त्याच्या विरोधात उभे ठाकलेले पक्ष हे राज्यातील राजकारण जरी अग्रेसर असले तरी त्यांची शक्ती केंद्रात सत्ता बदल करण्यास अपुरी आहे असं माझं स्पष्ट मतच आहे, मुळात हा ब्लॉग लिहण्याचे महत्वाचे कारण भाजपा नसून आज भाजपा ला विरोध करणारे पक्ष आणि त्याचे नेते हाच आहे

विरोधी पक्ष म्हणजे ज्यांना सत्ता मिळवायची तर होती मात्र मिळाली नाही आणि आता परत सत्तेत येण्यासाठी त्याचा जीव कासावीस झाला आहे मात्र तशी कोणतीच संधी दिसत नसल्याने भाजपा पक्षाच्या विचारधारेला फक्त विरोध करण्याचा जो अजेंडा सगळे विरोधी पक्ष राबवत आहे त्याने त्यांना यश मिळेल अस मला अजिबात वाटत नाही.

लहानपणी क्रिकेट खेळताना ज्याची बॉल, बॅट असायची त्याला बाद झाल्यानंतर देखील एक डाव जास्त द्यावा लागायचा किंवा खेळाचे साहित्य ज्याचे असेल त्याच्या मनाप्रमाणे खेळ खेळला जात असायचा आणि जर तस केले गेले नाही तर ती व्यक्ती खेळाचा खेळ करायचा म्हणजेच स्वतःची बॅट बॉल घेऊन निघुब जायचा तसच
राजकारणात एकाधिकारशाही ही वाईट कारण त्यामुळे ज्याची सत्ता असते तो त्याच्या अजेंड्याप्रमाणे कोणतेही नियम बनवू शकतो. नियमांची अडचण नसते, अडचण अजेंड्याची असते जसे आजचे राजकारणी,पक्ष यांचे अजेंडे सत्ता हस्तगत करून त्यातून अपहार, भ्रष्ट मार्गाने स्वतःची मिळकत वाढवणे, श्रीमंत होणे हा एकमेव अजेंडा लक्षात येतो. सत्ता मिळवून लोकांच्या भल्यासाठी, देशाला सौर्वभौम करण्यासाठी, लोकांच्या मनात राष्ट्रीयता भिनवण्यासाठी करण्यापेक्षा लोकांमध्ये भेद करून आपला स्वार्थ साधण्यात आजचे राजकारणी यशस्वी होत आहे. मुळात कोण्या एका पक्षाला विरोध करण्यासाठी किंवा सत्ता मिळवण्यासाठी राजकारण न करता समाजकारण करणे आता या कलियुगात शक्य नाही कदाचित राजकारण हा व्यवसाय/धंदाच झाला आहे असं म्हंटल तर वावग ठरणार नाही आणि हा धंदा आजकाल एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरण केला जात आहे आणि हे निश्चितच गंभीर आहे कारण ती ठराविक लोक सगळं काही स्वतःच्या हातात ठेवून, लोकांना नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत आहेत. अश्या वेळी प्रामुख्याने विशिष्ट ध्येय आणि ते देखील संपूर्ण भारतीयांचे फायदा असणारे ध्येयाला समोर ठेवून होणारे राजकारण गरजेचे आहे.

अनैसर्गिक आणि केवळ सत्तेच्या हव्यासापोटी एकत्र आलेल्या महाराष्ट्रातील तीन पक्ष स्वप्नात देखील सत्ता मिळणार नसताना निव्वळ बहुमताच्या जोरावर चालवलेला पोरखेळ सहन होण्यापालिकडे गेला आहे. सत्तेचा वापर स्वतःचे खिसे भरण्यात आणि भविष्यात सत्ता मिळणार नाही याची जाणीव असल्याने अधाश्याप्रमाणे जो पोरखेळ चालू आहे तो लवकरच थांबला गेला पाहिजे. महाराष्ट्र सरकारने कारनामे लिहत बसल्यास पाने कमी पडतील याची जाणीव असल्याने ते नमूद न करता आजच्या विषयानुसार राजकारण कसे नसावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजचा महाराष्ट्र आणि हे तीन पक्षाचे सरकार. 


राजकारणामुळे मिळालेली सत्तेची शक्ती डोक्यात गेल्याने मीपणा येणे, सत्तेचा वापर करून कायदा हातात घेणे हे केवळ महाराष्ट्रात चालू आहे असं नाही. पश्चिम बंगाल मध्ये असलेले वातावरण, निवडणुका आधी आणि नंतर झालेला हिंसाचार, केरळमध्ये आतंकवादी वाटचाली कडे चालणारा धर्माध प्रवास, दिल्लीत केजरीवाल रुपी स्वार्थाचा महामेरू अशी कितीतरी वाईट उदाहरणे देता येईल. काँग्रेस सारखा फुटून फुटून आज राहिला संकुचित पक्ष, धर्माध एमआयएम राजकारणाला लागलेले आजारच. 


योग्य आणि अयोग्य याचा ताळेबंद  लागला पाहिजे निव्वळ केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी खोटे दावे करून आंतरराष्ट्रीय पटलावर हसू करणे राजकारणी लोकांनी थांबवून भारत देश सगळ्या गोष्टीत अग्रेसर करण्यात लक्ष दिले पाहिजे.

क्रमश:

युद्ध : रशिया, गुक्रेन आणि जग

 

नमस्कार

आपल्या देशाचा इतिहास भूगोल पूर्ण माहीत नसताना युक्रेन रशिया यांच्यातील वाद त्यामुळे निर्माण झालेला तिढा आणि युद्ध याचा कोणताही अभ्यास न करता रशिया जे करत आहे तेच योग्य असावं कारण स्वतंत्र असला तरी युक्रेन राशियाबरोबर भूतकाळात संलग्न होता. नाटोच्या देशांनी रशियाला कोंडीत पकडण्यासाठी जर युक्रेनचा वापर केला असेल तर आज जे काही युद्ध होत आहे त्याला जवाबदार फक्त रशिया कसे असेल? अमेरिका सारख्या प्रगत देशाविरुद्ध उभं ठाकणाऱ्या रशियासमोर युक्रेनचा निभाव लागूच शकणार नव्हता इतका साधा विचार न करता कलह वाढवणारा युक्रेन होणाऱ्या युद्धाला जवाबदार का नसावा? शक्तिशाली देशाच्या सूचीत पहिल्या तीन क्रमांकावर येणाऱ्या रशियाशी निभाव लागणार नाही हे स्पष्ट असतानादेखील देश धोक्यात आहे असं भासवून सामान्य नागरिकांना ज्यात लहान मोठे जेष्ठ इतकेच काय जेल मध्ये बंद असलेल्या आरोपींना मरणाच्या दारात ढकलणे हा मूर्खपणा नाही का? कॉमेडियन असलेल्या माणसाला देश चालवायला मिळाला म्हणून आजपर्यंत केली नव्हती इतकी मोठी कॉमेडी होत असताना निव्वळ सहनभूतीचे वातावरण निर्माण करून तो गृहस्थ दुसरा केजरीवाल तर बनत नाही ना? झुकेगा नही साला अस म्हणणे आणि ते पाहणे चित्रपटात बर वाटत असेल तरी वास्तवात तस केल्याने उभं राहायला देश उरणार नाही. बर भांडण फक्त दोन देशांचे असते तर कदाचित हे कुठं थांबलं तरी असत पण दोघांच्या भांडणात नक्की फायदा कोणाचा हे लोकांनी लक्षात घेतले पाहिजे. युद्धामुळे रशिया आणि पुतीन यांची जी बदनामी होत आहे किंवा होणाऱ्या संहाराला जवाबदार धरल्यामुळे आणि इतर देशांनी युक्रेनला पुढे केलेला मदतीचा हात आता हे युद्धाची व्याप्ती वाढवणार नाही ना अशी भीती वाटायला लागली आहे. पृथ्वीवरचे सगळ्यात घातक अस्त्र याचा उल्लेख करून रशिया जिंकेपर्यत युद्ध करण्याचा मानस व्यक्त केला आहे हे जगाने समजले पाहिजे. अमेरिकेला स्वतःचे सौर्वभौम आणि पृथ्वीवरील कोणत्याही घटनेत नाक घालून स्वतःचे स्थान अबाधित राखण्याचे अवघड काम करायचे असल्याने जगात अस्थिरता कशी राहील आणो त्याचा फायदा घेऊन जगाच्या राजकारणावर अमेरिकेचा हात कसा राहील हा अजेंडा गेल्या कित्येक वर्षांपासून पूर्ण करत आहे. आता वेळ आली आहे की अमेरिकेचे हे नासके राजकारण संपुष्टात यायला हवं अन्यथा स्वतःला उंच करण्यासाठी अमेरिका कोणत्याही देशाला, त्या देशातील लोकांना पायदळी तुडवू शकते. युक्रेन लवकरच पडेल आणि हा कलह शांत होईल अशी अपेक्षा आहे कारण ह्या युद्धामुळे बऱ्याच इतर देशात भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने महागाईचा फुगा फुटून अस्थिरता निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे. बलवान शिकारी आणि कमकुवत सावज यांनी किती मोठा खेळ मांडला तरी खेळाचा शेवट काय होणार हे सर्वश्रुत असल्याने वास्तव स्वीकारून चर्चेने मार्ग काढला गेला पाहिजे.असंख्य निरपराध लोकांचा बळी गेल्यानंतर चर्चा हा विकल्प योग्य नसला तरी जी लोक अजून जिवंत आहेत त्याच्यासाठी शांतता प्रस्थपित होणे गरजेचे. भारतीय नागरिकांना युक्रेन रशियामधून बाहेर काढण्यात जरी भारत सरकारला बऱ्यापैकी यश मिळाले असले तरी युक्रेन मध्ये भारतीय विद्यार्थीचा झालेला मृत्यू किंवा भारतीय नागरिकांना झालेल्या मारहाणीच्या बातम्या, एकंदरीत भारत देशाच्या विरोधात केलेले भूतकाळातील राजकारण यामुळे युक्रेनबद्दल विशेष अस चांगलं मत नाहीच पण वेळोवेळी भारताच्या मदतीला उभे राहिलेल्या रशियाला समर्थन भारताने दिले पाहिजे पण मानवता, भविष्यात भारताकडे जगाची बघण्याची दृष्टी सारख्या प्रश्नामुळे भारत सरकारला कोणतीही बाजू सक्षमपणे मांडता येत नसली तरी भविष्यात एक मित्र देश दूर जाणार नाही ना याची काळजी केली पाहिजे अन्यथा उद्या आपल्या शेजारील शत्रू देशांनी काही कुरघुडी केल्यावर मदतीला उभं रहाणारा एक मित्र दूर व्हायला नको. एकंदरीत रशिया युक्रेन विवादावर कोणत्याही एका बाजूने विचार करणे चुकीचे असले तरी निव्वळ मीडियात उभं राहिलेलं वादळ,ज्यात रशियाला एक खलनायक म्हणून पुढं केले जात आहे हे चुकीचे. जरी कर्ता रशि9या असला तरी करीवता कोण याचे मूल्यमापन करणे गरजेचे

मंगळवार, १ मार्च, २०२२

दैनंदिन नोंदी

आज महाशिवरात्री, 

मार्च महिन्याचा पहिला दिवस. याआधी दोन मुद्दे घेऊन लिहण्याचा प्रयत्न केलेला पण म्हणावं तसा काही प्रतिसाद मिळाला अस वाटत नाही त्यामुळे आजपासून कोणा इतरांसाठी लिहणे बंद,कोणी लाईक करेल,प्रतिसाद देईल,कौतुक करेल की टीका करेल यांच्याकडे लक्ष न देता मनात येईल ते लिहण महत्वाचे अस वाटायला लागले आहे. तसही डायरी लिहणे आणि नंतर कधी तिची पाने चाळून भूतकाळातील गोष्टीत रमण्यासारखी दुसरी मनोरंजक गोष्ट कोणतीही नाही.तसही @chakan84 नावाचे ट्विटर हँडल बॅन झाल्याने मनात येईल ते, दिसेल ते यावर मत प्रदर्शन करण्याची इतकी सवय जडली होती की ट्विटरवर भेटलेल्या अनेक समविचारी लोकांशी भेटण्या बोलण्यात दिवसभरातील बराच वेळ खर्ची करायचो त्यापेक्षा आता लिहण्याचा किडा ब्लॉग लिहून पूर्ण करण्याचा मानस किती दिवस लांब नेऊ शकणार आहे ते मला शोधायचे आहे.

आज बऱ्याच बातम्या झळकत आहेत जस भारतपे चा निर्माता ग्रोव्हर याचा राजीनामा, हा ग्रोव्हर तोच आहे जो कोणत्या त्या कार्यक्रमात नवीन धंदा करू पाहणाऱ्या लोकांचा यच्छेद अपमान करत होता, हो हा तोच बोल घेवडा जो त्याच्या दिवसाचा किंवा तासाचा इनकम किती करोड याची शेखी मिरवायचा त्याला स्वतःला आज स्वतःच्या कंपनीतुन राजीनामा द्यावा लागला, कर्मा अजून काय? बऱ्याच लोकांचा सार्वजनिक स्वरूपात केलेला अपमान आणि त्याचे फळ म्हणून त्याचा स्वतःचा झालेला सार्वत्रिक अपमान म्हणजे जशास तस झालं म्हणायला हरकत नाही

युक्रेन रशिया विवाद आणि त्यातून चाललेला संघर्ष, त्यात सामान्य माणसाची होणारी पिळवणूक दयनीय असली तरी युद्ध म्हटलं की अमानवीय अश्या घटना घडणार. एकमेकांची उणिधुनी दाखवून स्वतःचे मत कस योग्य हे बिंबवण्याची एकही संधी युद्ध करणारे देश का सोडतील? रशिया, युक्रेन देशात शिकण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांना सुखरूप फुकट देशात परत आणण्याचे मिशन गंगा, आल्यानंतर त्यांचे होत असलेले कौतुक यापेक्षा ज्यावेळी युद्ध चालू होण्याचे ढग देशांवर गोळा होत होते त्यावेळी ही लोक अक्कल चालवायला विसरली होती का? काहींना गंगा नावावरून देखील अडचण आहे तर भारताने तटस्थ राहिल्याने युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण झाली आणि निष्काळजी दाखवली म्हणून मोदींचे आतंरराष्ट्रीय राजकारण किती कुचकामी आहे अशी बोंब विरोधक करू लागले आहे.

महाराष्ट्रातील राजकारण विशेषतः ते तीन पक्ष एकत्र येऊन चालवलेले भेसळयुक्त, भ्रष्ट शासन याबद्दल बोलावे,लिहावे ते कमीच की काय म्हणून त्यांचे नाव नवीन उद्योग दररोज उघड होत असले तरी गिरे तो भी टांग उपर. भंगारवाला, कट्टर धर्माध मलिक पाठोपाठ त्याच्या मुलाला देखील ईडीने जवळ केले, कोट्यवधी रुपय शिवसेनेच्या नगरसेवक यशवंत जाधवकडे निघतात तरीही तीन तिघाडी राज्य बिघडी सरकार जनतेच्याया डोक्यावर मिऱ्या लटण्याचे काही थांबत नाही. भ्रष्टवादीच नाव असलं पाहिजे त्या पक्षाचा नेता जयंत पाटील शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देऊ करून शरद पवारांनी कसा मास्टर स्ट्रोक मारला आणि ह्या पाच वर्षात संघटन मजबूत करून पक्ष कसा वाढवायचा, मजबूत करायचा अस बाष्पळ बडबड करण खर तर विनोद वाटतो. मुळात इतक्या वर्षात साडे तीन जिल्हा किंवा फार फार तर 50 ते साठ जागा जिंकणाऱ्या, सतत स्वार्थी राजकारण करणाऱ्या शरद पवारांना जनतेनी योग्य जागा दाखवली पाहिजे पण तस होत नाही याचाच फायदा गेल्या कित्येक वर्षे ते कुटुंब घेऊन काही एकरात करोडो रुपयांचे उत्पन्न घ्यायला लागले पण राज्यातील इतर शेतकरी मात्र हालअपेष्टा, आत्महत्या चक्रात अडकलेला आहे. महाराष्ट्रात किंवा समस्त देशात देवासमान पूजल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या गुरुबद्दल संशय निर्माण केला जातोय ज्यात काही लोक मुद्दाम जात,धर्म वगैरे गोष्टी मध्ये आणत आहे. आमच्या लहानपणी शिकलेला इतिहास असेल की पाहिलेले चित्रपट यात शिवाजीना शिकवणारा पहिला गुरू म्हणजे जिजाईबाई, ज्यांनी छोट्या शिवाजीला रामाच्या,कृष्णाच्या गोष्टी सांगितल्या, देव,धर्म आणि देश याची जाण करून लहानपणीच एक क्रांतिकारी विचार त्याच्या डोक्यात घातला नंतर त्यांना शस्त्र आणि राजकारण यांचे शिक्षण देणारे दादोजी कोंडदेव, अध्यात्मिक वाटेवर दृष्टांत देणारे तुकाराम महाराज,रामदास स्वामी हे सगळेच त्यांचे गुरू होते आणि आहे. आजच्या कोणत्याही फुटकळ लोकांनी कितीही स्वार्थी राजकारण करून लोकांची माथी भडकवण्याचे जे कट कारस्थान करत आहे ते आज ना उद्या जगासमोर उघडे पडतीलच

घरगुती सिलेंडरचा भाव रुपय 100 ते 110 रुपयांनी महागले, युद्धाचा परिणाम म्हणून इंधनाचे दर देखील वाढवले जातील, सोने चांदी महाग होत राहतील यात शंका नाही त्यामुळे सामान्य माणसाचे महागाईमध्ये भरडण्याचे दिवस काही संपतील अस वाटत नाही

एकामागून एक सिरीज जिंकून भारत यशाचे नवनवीन इमले रचत आहे, क्रिकेटमध्ये भारतीय संघात खेळण्यासाठी एकाहून एक खेळाडू यांची रांग लागली आहे यातच रणमशिन म्हणून घेणारा माजी कर्णधार विराट कोहली काही दिवसात त्याचा 100 वा कसोटी सामना श्रीलंकेविरुद्ध खेळणार आहे, बऱ्याच दिवसांपासून शतकांचा दुष्काळ या सामन्यात त्याने संपवावा ही प्रत्येक भारतीयांची इच्छा तो पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरेल. पाकिस्तानसारख्या आतंकवादी देशात जिथं आतंकवादी जन्म घेतात त्या देशात ऑस्ट्रेलिया तीस वर्षांनी दौरा करतोय त्यामागे येत्या काही काळात भारतीय दौऱ्यात आजपर्यंत न मिळालेले यश चाखण्याची पूर्वतयारी करण्यासाठी पाकिस्तानसारख्या देशाचा दौरा करण्याची जोखीम घेणे निश्चितच त्याचे कौतुक करावे लागेल पण भारतीय भूमीत जिंकण्याचे स्वप्न यावेळीही पूर्ण होईल असं मला वाटत नाही. न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका कसोटी मालिका बरीबरीत संपली तर पाकिस्तानची लीग लाहोर ने जिंकली

कच्चा बदाम वर पक्क्या बदामाची शारीरिक हालचाली पाहून धन्य झालेल्या अनेक भारतीयांप्रमाणे त्या गीताच्या गायकाची झालेली आर्थिक फसवणूक किंवा काल झालेल्या अपघात यातून सहीसलामत बाहेर यावे यासाठी लोकांनी प्रार्थना केली पाहिजे.

आयुष्यात आजपर्यंत कधीही उपास तपास केले नाही पण आज पहिल्यांदा न खाता न पिता महाशिवरात्रीचा उपवास करण्याचा मानस केलेला आहे शिवाय यावर्षात 12 जोतिर्लिंग दर्शन करण्याचे जे स्वप्न पाहिले आहे त्यात जानेवारी महिन्यात भीमाशंकर, फेब्रुवारीत त्रंबकेश्वर पूर्ण केले आहे. या महिन्यात कुठले ना कुठले जोतिर्लिंग दर्शन घ्यायला जायचे आहे. केदारनाथचे कपाट शक्यतो मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात उघडतील अशी घोषणा आज होईल त्याआधी बद्रीनाथ मंदिर 8 मे ला उघडणार याची घोषणा झाली आहे. केदारनाथ मंदिराला मे महिन्यात जाण्याचा योजले आहेच म्हणजे काशी,पुष्कर आणि केदारनाथ हा टप्पा पूर्ण करेल अस वाटतय.

शेयर मार्केट हा माझा जिव्हाळ्याचा विषय,ज्यात जास्त काही समजत नसलं तरी वेगवेगळे व्यवसायाचे चार्ट पाहणे, त्याचे लेखा जोखा (बॅलन्सशीट) वाचणे चालू असते. जवळपास दोन लाख वीस हजार रुपयांची वेगवेगळ्या 15 शेयर मध्ये गुंतवणुक केली आहे.मार्केट कस चालत याचा अंदाज आला असला तरी अजून बरच शिकणे बाकी आहे. अजून इंट्राडे, ऑपशन यांची ओळख ही झालेली नाही पण ते शिकून दिवसाला किमान रक्कम कमावण्याची इच्छा आहे,त्या दृष्टीने एक एक पाऊल पुढे टाकत आहे. हा लेख, नोंदी वाचून कोणाला काही प्रश्न असतील, स्टॉक मार्केट मध्ये गुंतवणूक किंवा काहीही विचारायचे असेल तर नक्की प्रतिक्रिया नोंदवा.





शनिवार, २६ फेब्रुवारी, २०२२

विश्वचषक T20 आणि भारतीय संघ

 नमस्कार,


मंडळी आजचा ब्लॉग क्रिकेटवर, भारताचा सर्वात जास्त पसंतीचा आणि पाहिला जाणारा खेळ. खेळला जाणारा असही लिहावं वाटत होतं पण आजकालची तरुण पिढी मोबाईल, पबजी, इन्स्टा यांच्यामध्ये इतकी अडकून पडले आहे की कोणी खेळताना दिसतच नाही. माझ्या लहानपणी पावसाळा सोडला तर दरदिवशी मुलं क्रिकेट खेळत असायची. तुमच्या माझ्यासारख्या 90 च्या दशकाच्या मुलांना मैदानी खेळ खेळण्याचा दांडगा अनुभव आहे असं माझं मत आहे. त्याकाळात काही सामने दूरदर्शनवर पहायला मिळायचे पण बहुतांश सामने केबल टीव्ही नावाचे जे फ्याड बाजारात आले होते त्यामुळे इसपीएन, स्टार स्पोर्ट्स नावाच्या चॅनेलवर यायच्या. मुळात घरात असलेला काळा पांढरा टीव्ही आणि महागडी केबल यांचा ३६ आकडा असायचा,रडून रडून डोळे पांढरे केले तरी पालकांना पाझर फुटायचा नाही तरीही क्रिकेट म्हणजे जीव की प्राण असलेले आपण ज्याच्या घरी केबल असेल तिथं किंवा गावातील मोठ्या टीव्हीच्या दुकानाबाहेर गर्दीत क्रिकेटचा आनंद घ्यायचो. एक वेगळीच दुनिया असायची ती, सामन्याचा निर्णय काहीही असला की क्रिकेटच्या गप्पा मारायला सगळी पोर परत मैदानात. मग तेंडल्या कसा खडूस खेळला, अमका बॉलर घेतात तरी का अश्या गप्पा तासनतास रंगायच्या मग कोणाची आई किंवा बाप पोराला शोधत बसलेली मिटिंग तोडत नाही तोपर्यत झालेल्या सामन्याचे चिरहरण करणं हे आपलं आद्यकर्तव्य समजयचो आपण, नाही का?

क्रिकेट खेळ छोटा झाला, जलद झाला तस क्रिकेट आता खूप होत. आता एक सिरीज संपत नाही तोपर्यंत दुसरी,दुसरी सिरीज संपत नाही तोपर्यत तिसरी इतकं क्रिकेट खेळले जाते. यात भर म्हणून वेगवेगळ्या देशाच्या लीग पण त्यातही आपली आयपीएल. भारत देश आता थांबायचं नाव घेत नाही आहे मग ती अर्थव्यवस्था असो, लोकसंख्या असो की क्रिकेट.

दर चार वर्षांनी येणारा विश्वचषक म्हणजे प्रेक्षकांसाठी आणि क्रिकेट या खेळावर सर्वस्व अर्पण करणाऱ्या आपल्या भारतीय फॅन्ससाठी कुंभमेळाच पण २००७ साली झालेला ५० षटकाचा विश्वचषक कोणी भारतीय लक्षात ठेवत असेल अस नाही. आपली तर गॅरंटी आहे की स्पर्धेच्या पहिल्या फेरीतून भारत बाहेर पडल्यावर कोणी ती स्पर्धा पुढं पाहिली असेल असे भारतीय हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच असतील. मानहानीकारक पराभवामुळे देशात सुतकी वातावरण होते सेम सुतक लागल्यासारखे भारतीय खेळाडूंचे चेहरे त्याच्या मनातील संताप,लाज दाखवत होते कदाचित हाच अंधार कारणीभूत होता की काय तो विश्वचषकाचा अंतिम सामना अंधारात ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात खेळवला गेलेला. दुखावलेले, शरमेने मान खाली घातलेले ते अनुभवी खेळाडू पुढच्या नवीन अतिजलद प्रकारात न खेळण्याचा निर्णय घेतला आणि महेंद्रसिंग धोनी नावाच्या नवख्या पोराच्या गळ्यात कर्णधारपदाची माळ येऊन पडली आणि सोबत अगदीच नवखे खेळाडूंना घेऊन T20 चा पहिली स्पर्धा खेळायला भारतीय संघ गेलेला. मानहानीकारक पराभवाचे शल्य पचवणारा भारतीय प्रेक्षकांनी मला नाही वाटत की हवं तेवढं महत्व दिले असावे आणि हीच कदाचित त्यात खेळणाऱ्या खेळाडूंची स्थितीदेखील असावी पण याच नवख्या खेळाडूंनी छोट्या प्रकारातील हा विश्वचषक जिंकला आणि क्रिकेटचे नवे पर्व भारतात आणि विश्वात वहायला सुरुवात झाली. ह्या गोष्टीला कमी म्हणून की काय थोड्याच दिवसात आयपीएल नामक लीग स्वरुपातील वादळ छोट्या प्रकारातील खेळाला कळसाच्या ठिकाणी ठेवून गेले.

वर्ष आणि वर्ष सरत गेली,पुलावरून बरच पाणी बघून गेल्यावर आता काही दिवसात परत आठव्यांदा आपल्या पुढे येणार आहे

२००७ नंतर म्हणावं तस यश भारतीय संघाला मिळालं नाही शिवाय भारतीय संघात परिवर्तनाचे वारे फिरत असताना नवीन कर्णधार रोहित शर्माच्या डोक्यावर यावेळी चषक जिंकून आणण्याची जवाबदारी आहे आणि ही जवाबदारी पेलण्याची किमया आजचा भारतीय संघ नक्कीच पूर्ण करेल. आज किमान 3 संघ तयार करता येतील इतके खेळाडू भारतीय संघाचे दार ठोकवत आहेत. कोणत्याही एका खेळाडूला निवडले नाही तर तो का नाही यासाठी मोठी चर्चासत्र, विवाद होऊ शकतील.
आजच्या पुरते इतकेच असले तरी यापुढचा एक मोठा भाग  नक्की येणार आहे ज्यात विश्वचषक आणि भारतीय संघात निवड होणाऱ्या खेळाडू आणि एक संभाव्य संघ याचे अंदाज तुमच्यापुढे घेऊन लवकरच येईल

तोपर्यंत कृपया मला follow करा, आपल्या प्रतिक्रिया नोंदवा. आपल्याला अपेक्षित विषय किंवा लिखाणातील त्रुटी सांगा म्हणजे लिखाणात सुधारणा करता येईल.

क्रमशः


सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...