शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०२२

प्रश्नचिन्ह

विरोधी पक्ष ज्याचे सख्खे वैरी सत्तेत आणि शेजारी राज्यात असताना राजकारण करून चमकण्याची संधी हातातून जाऊ देतील तरी कसे? महाराष्ट्र, महाराष्ट्रीतील गाव, शहर आणि जनता याचे एकमेव कैवारी असण्याचे केवळ नाटक विरोधी पक्ष करतोय तर दुसरीकडे सगळ्या गोष्टी कश्या नियंत्रणात आहेत हे सांगण्याचे काम सत्ताधारी पक्ष करतोय. मुळात शेजारच्या राज्याच्या मुख्यमंत्री जे अचरट, बोगस दावे करतोय त्याला कवडीची किंमत न देता शांततेत सर्व प्रकरण हाताळता आले असते पण प्रत्येकाला आयत्या आलेल्या वादाच्या आगीत स्वतःच्या पोळ्या भाजायच्या आहेत. केंद्रात आणि दोन्ही राज्यात एकाच पक्षाची सत्ता असताना प्रकरण दाबून टाकण्याचे कोणते प्रयत्न झाले की नाही माहीत नाही पण कर्नाटक सरकारच्या दाव्यावर महाराष्ट्र सरकारचा प्रतिदावा आल्याने परिस्थिती अजून चिघळणार हे सामान्य ज्ञान नसलेल्या राजकारणी लोकांना अक्कल आहे का? बरं केवळ दावे प्रतिदावे यामुळे गावाची हद्द बदलेल का? मूळ वस्तुस्थिती काय याचा कोणताच अभ्यास न करता विरोधक, सत्ताधारी सगळे वातावरण तापवत आहे आणि मीडिया आहेच ह्यात तेल ओतायला. गनिमी काव्यात बैलाच्या शिंगाला मशाली लावून जंगलात सोडून विरुद्ध दिशेला निघून जाण्याची, चकवा देण्याची पद्धत होती तीच पद्धत पद्धतशीरपणे राजकारणी लोक वापरतात की काय आणि सगळं लक्ष वादावर केंद्रित करून दुसरीकडे दुसरेच लपून छपून दुसरंच काम राजकारणी करत नसतील का अस साहजिक मनात येते कारण ही राजकारणी कोणता कुटील डाव खेळातील हे जनतेला समजणारच नाही. ज्याप्रकारे आफताब प्रकरण पुढे आले त्यामुळे लांडयांची प्रतिमा डागळली जाऊ लागल्याने मीडियात हिंदू समाजात तसेच प्रकार, घटना मीडियात येत आहे किंवा एकदा का कोणती मोठी बलात्कार घटना झाली की सलग संपूर्ण देशात बलात्काराचे सत्र चालू आहे अश्या बातम्या एकामागून एक येतात हे केवळ आणि केवळ जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून त्या परिस्तिथीत पडद्यामागे वेगळ्याच खेळया खेळल्या जातात असा माझा समज आहे राजकारणी मितभाषी, सद्गुणी आणि नैतिकतेला, सगळ्या समाजाला एकत्र बांधून पुढे घेऊन जाणारा नेता असावा अशी अपेक्षा असताना राजकारणी पक्ष, पुढारी ह्याची आजकालची भाषा, विचार, बोलण्याची, राजेशाही थाटात राहण्याची जी लाट आली आहे ती त्या लोकाना कशी साध्य करता येते? राजकारणात येण्याआधी रंक असलेला काही वर्षात राव कसा बनतो याचे उत्तर सगळयांना माहीत असले तरी तेच मूठभर लोक बहुसंख्य जनतेवर राज्य करतात ह्यासारखी वाईट गोष्ट दुसरी नाही. कस बदलणार हे सगळं की असच चालू राहणार? आजच्या काळापेक्षा कदाचित इंग्रजांचे राज्य तरी चांगले निदान जनतेला त्याचा खरा शत्रू कोण हे तेही माहीत असायचे, जनतेची लूट, पिळवणूक कोण करतय हे तरी माहीत असायचे त्याच्याविरुद्ध आंदोलन करणे, सशस्त्र क्रांती घडवून आणणे जनतेच्या हातात तरी होते पण आता जनतेने करायचे काय? एकदा विरोधकांच्या हातात सत्ता द्यायची त्यांना कंटाळून त्याच्या विरोधकांना पुढच्या वेळी संधी द्यायची पण सत्तेवर येणारा तो प्रत्येक वेळी जनतेच्या प्रश्नांना करणी लावण्यापेक्षा वैयक्तिक स्वार्थ, सत्ता, पद प्रतिष्ठा, पैसा यात गुरफटून घेत राहतो आणि शेवटी जनतेच्या हातात धुपाटने राहते ज्यात तूप ही नसते आणि तेल ही. रिकाम होय रिकामं कारण मतदान करण्याखेरीज कोणताच अधिकार जनतेच्या हातात नाही तरीही लोकांनी लोकांसाठी लोकांमार्फत चालवलेला कारभार त्याला लोकशाही म्हणत प्रत्येक दिवस फसवणूक करून घेणेच जनतेच्या हातात आहे का? कायदा बनवणारे कायदे तोडणारे असेल तर पावसाने झोडपले, राजाने मारले तर दाद कुठं मागायची.
असो, थांबतो...........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

सी ए टॉपर

स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...