तुमच्यातला एक, सर्वसामान्य, कष्टकरी, भरपूर फिरणारा, खूप वाचणारा, चवीने खाणारा, शेयर मार्केट आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांना थोडस वेगळ्या नजरेने पाहणारा आणि शब्दातून व्यक्त होणारा, अभिमानी हिंदू ~ सनातन
रविवार, २८ ऑगस्ट, २०२२
सुख महत्वाचे की दुःख?
गुरुवार, २५ ऑगस्ट, २०२२
बाप्पाची आरती
बाप्पाची आरती
सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी; पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटी शेंदुराची|
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥१॥
जय देव, जय देव जय
मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥धृ॥
रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी, कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी
घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥२॥
लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड,
वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे,
सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पूर्ती ॥३॥
ओम गं गणपताय नमः
मंगळवार, १६ ऑगस्ट, २०२२
धप्पागिरी मठ आणि रावसाहेब
ध्यानाने चित्त शांत होते, एकाग्र होते आणि एकाग्र झालेले मन असाध्य साध्य करण्याची ताकद ठेवते अस अनेक पुस्तकात, थोरामोठ्या लोकांच्या तोंडातून ऐकलेले वाक्य सत्यात येणार ह्या विचाराने रावसाहेब जाम खुश होता. जोखिडसारख्या आदिवासी, शुष्क प्रदेशातून ध्यानसाधना शिकण्यासाठी हिरव्यागार, थंड, नयनरम्य कोकणातील धप्पागिरी मठात जाण्याचे रावसाहेबांनी पक्के केले होते. आजच्या आधुनिक काळात ध्यानासारखा अनुभवाने प्राप्त होणारा, सिद्ध होणारा प्रकार शिकण्यासाठी दहा दिवस लोकांनी काढणे हे विशेषच त्यापेक्षा जास्त विशेष जर कोणाला वाटले असेल तर ते जोखिड गावातील अबालवृद्ध लोकांना. रावसाहेब प्रवासाला निघण्याची तारीख पक्की झाल्यापासून गावातील लोक आपापल्या परिस्थितीनुसार खायचे प्यायचे पदार्थ, वर खर्चाला पैसे याचे नियोजन करत होते. जोखिड गावातून तालुक्याच्या गावापर्यत सायकलवर नंतर लाल डब्याच्या परीतून कोकण हा प्रवास ठरलेला. गावातील पैलवान गडी बलराम याची मास्तर रावसाहेबाला तालुक्याच्या गावाला पोहचते करण्याची जवाबदारी मिळाली होती.
धप्पागिरी जाण्याचा दिवस उजाडतो, रावसाहेब सगळी तयारी करून बलरामची वाट पाहत ओट्यावर बसलेले असतात. थोडयाच वेळात तिथं पैलवान बलराम आपल्या सायकलसोबत रावसाहेबांना हाक मारतो. बलराम गावातील एक प्रतिष्ठित पैलवान, गावागावात होणाऱ्या देवाच्या यात्रेत कुस्त्या करणारा रांगडा गडी. अंगाने धष्टपुष्ट, ओठांवर बहारदार मिशी, सकाळ संध्याकाळ कसरतीत घळवणारा, व्यायामाने दंड मांड्या कसलेला बलरामचाआवाज शरीराच्या मानाने खूपच पातळ होता. त्याने आणलेली सायकल त्याला मागच्या कुस्तीच्या स्पर्धेत बक्षीस मिळाली होती. बलरामाने सायकल बाजूला लावत मास्तर रावसाहेबांना रामराम घालत प्रवासाचे सामान खांद्यावर घेत उशीर तर झाला नाही ना अशी विचारणा केली. रावसाहेब देखील कोणताही बडेजाव न करता आपल्या भोळसट स्वभावाला धरून काही नाही काही नाही म्हणत उरलेले सामान उचलले. सायकलीच्या हँडलला सामान लावताना बलरामच्या बायकोने आणलेले दिलेले बेसनाच्या लाडूंचा डबा मास्तरांच्या हातात देऊन चालयचं का आता मास्तर म्हणत सायकलवर बलरामने टांग मारली थोडस पळत जाऊन मास्तर रावसाहेबाने सायकल वर उडी मारली.
बलराम सपासप सायकल मारत होता आणि एकसारखी बडबड देखील करत होता पण रावसाहेबाचे त्या बदबडीमागे काही लक्ष नव्हते. रावसाहेव मनाने कधीच कोकणात पोहचले होते. तस कोकणातल्या ह्या धप्पागिरी ध्यान केंद्राबद्दल केवळ ऐकीव माहिती त्याला होती. राहण्याची, खायची चांगली सोय शिवाय काही बंधन असतात तिथे अस ऐकले होते. दहा दिवसात केंद्रात ध्यान कसे करायचे हे शिकवणार होते. रावसाहेब ह्या नवीन प्रकार शिकण्यास खूपच इच्छुक होते. विचारांच्या तंद्रीत आणि बलरामाची तालमीतील कसरतीची करामत पण जोखिड गावातून तालुक्याच्या गावात पोहवहण्याचा हा प्रवास चुटकीसरशी संपवा इतका लवकर संपला असा भास रावसाहेबांना तेव्हा झाला जेव्हा आडदांड बलराम रावसाहेबाच्या खांद्याला धरून त्यांना हलवायला लागला. कोकणातून थेट एस टी स्टँड वर भानावर येत मास्तर सायकलवरून खाली उतरले. बालरामने झाडाला सायकल उभी करत एसटी लागली का ते पहायला गेला.
मास्तर रावसाहेब सायकलवरून आपल्या पिशव्या काढत, हातातील पिशवी सांभाळत बलरामच्या बायकोने दिलेला पितळी डबा सावरत झाडाच्या सावलीला उभे राहिले.
सनातन धर्मातील गोष्टी
दिनांक २६/८/२०२२
दिनांक २६/०८/२०२२
आजची गोष्ट: बलराम आणि श्रीकृष्ण याच्याआधी जन्मलेल्या सहा मुलांची कथा
सनातन धर्म इतका प्राचीन आहे की त्याचा अभ्यास करण्यासाठी आयुष्य थिटे पडेल पण ब्लॉग किंवा ट्विट यातून सनातन धर्माच्या काही ज्ञात अज्ञात गोष्टी तुमच्या पर्यत पोहचवण्याचे जो मनोमन संकल्प केला आहे त्यात आज एक नवीन गोष्ट सादर करत आहे, पण ही एक गोष्ट आहे की एका गोष्टीत अनेक गोष्टी हे समजून घेण्यासाठी नक्की वाचा आणि आवडली तर इतरांना फॉरवर्ड देखील करा ही माझी नम्र विनंती आणि तेवढं follow करायला विसरू नका कारण follow केलेत तरच अश्याच प्रकारचे अनेक लेख तुमच्यापर्यत पोहचणार ना
आपल्या सगळ्यांना कृष्ण जन्माची कथा माहीत असेलच पण ही कथा ऐकताना, मुलांना सांगताना मनात एक प्रश्न उत्पन्न झाला की कृष्णाचा जन्म आठवा होणार होता तर आधी जन्मणाऱ्या त्या सहा मुलांचा असा काय दोष होता की ते जन्मतःच मृत्यूला सामोरे गेले. आता इथे सहा असा उल्लेख केल्यामुळे वासुदेव आणि देवकी याच्या सात मुलांचा वध कंसाने केला अस सांगण्यात येते त्यामुळे नक्की सहा की सात याबद्दल शंका उपस्थित होणे साहजिक पण हीच तर गंमत आहे आपल्या सनातन धर्माची की इथे प्रत्येक गोष्टीला एक बॅकअप असतो आणि तो सप्रमाण सिद्ध आजच्या गोष्टीने नक्की होईल. सहा मुलाचा वध केल्यावर देवी योगमायाने देवकीच्या पोटातील सातवा गर्भ वसुदेवाच्या अन्य पत्नी रोहिणीमध्ये हस्तांतरित केला ज्यामुळे बलरामचा जन्म झाला, रोहिणी कंसाने पती वासुदेव आणि देवकी यांना तुरुंगात टाकले असताना वासुदेवचा मित्र नंद याच्या घरी शरण आली होती. या गोष्टींमुळे हे सिद्ध होते की कंसाने देवकीच्या सहा मुलांना ठार मारले होते आणि सातव्या मुलाच्या जन्म होण्याआधी गर्भपात झाल्याची बातमी त्याच्यापर्यंत पोहचली होती त्यानंतरची कृष्ण जन्म, वासुदेव यामुनेतून नंदाकडे जाणे मुलांची अदलाबदल ही गोष्ट तर सर्वांना तोंडपाठ असेलच नाही का? पण सुरुवातीला म्हंटल्याप्रमाणे कृष्ण बलराम याच्या आधी जन्मलेल्या त्या सहा मुलांचा असा काय दोष असेल की जन्मतः त्यांना मृत्यूला आलिंगन द्यावे लागले?
गोष्ट समजून घेण्यासाठी अजून थोडे मागे जावे लागेल, कलानेमी नावाचा एक दैत्य होता त्याला सहा मुले आणि एक मुलगी जीचे नाव वृंदा होते तिचा विवाह जालंधरशी झालेला होता आणि कलानेमीला सहा मुलगे होते जे त्यांच्या पूर्वीच्या जन्मात ब्रह्मदेवाचा मानसपुत्र मरिचीचे पुत्र होते .धर्मग्रंथानुसार ब्रह्मलोकात स्मर, उद्रिथ, परिश्वंग, पतंग, क्षुद्रामृत आणि घ्रिणी नावाच्या 6 देवता होत्या. जे ब्रह्माजींचे आशीर्वाद होते. पौराणिक कथांनुसार ब्रह्माजींची कृपा आणि स्नेह त्यांच्यावर सदैव राहात होता. ब्रह्म त्याच्याकडून होणाऱ्या प्रत्येक छोट्या चुकीकडे दुर्लक्ष करायचे. त्यामुळे हळूहळू त्याला स्वतःचा अभिमान वाटू लागला. त्याला वाटले की समोर काहीच नाही. याच दरम्यान एके दिवशी त्यांनी ब्रह्माजींचाही अपमान केला. त्यामुळे ब्रह्माजींचा त्याच्यावर कोप झाला, या क्रोधाच्या भरात येऊन त्यांनी त्याला पृथ्वीवर राक्षसवंशात जन्म घेण्याचा शाप दिला. शाप मिळताच त्याची भ्रष्ट बुद्धी बरी झाली आणि तो ब्रह्माजींकडे क्षमा मागू लागला. ब्रह्माजींना त्यांची दया आली आणि त्यांनी शाप कमी करताना त्यांना सांगितले की आता तुला दैत्य वंशात जन्म घ्यावा लागेल पण तुझे पूर्वज्ञान कायम राहील.
त्यानंतर त्या सहा देवांनी कालानुसार राक्षस राजा हिरण्यकशिपूच्या घरी जन्म घेतला. या दरम्यान त्यांनी पूर्वजन्मीचे ज्ञान असल्याने कोणतेही चुकीचे काम केले नाही. ब्रह्माजींना प्रसन्न करण्यासाठी त्यांनी सर्व वेळ तपश्चर्या करण्यात व्यतीत केले. यावर प्रसन्न होऊन ब्रह्माजींनी त्याला वरदान मागायला सांगितले.
त्या सहा देवांनी, दानव योनीच्या प्रभावाखाली, त्यांनी एकच वरदान मागितले की आपण देवतांच्या, गंधर्वांच्या हातून मरू नये आणि रोगाने मरू नये. त्यांच्याकडून हे वरदान ऐकून ब्रह्माजींना अस्तु म्हणत कुतूहल वाटले. इकडे हिरण्यकशिपू देवांची पूजा केल्यामुळे आपल्या पुत्रांवर रागावला होता. त्यानंतर त्याने त्या सर्वांना शाप दिला की तुमचा मृत्यू देवता किंवा गंधर्वाच्या हातून नाही तर राक्षसाच्या हातून होईल.
या शापामुळे तो देवकीच्या पोटी जन्माला आला आणि कंसाच्या हातून मरण पावल्यानंतर त्याला सुतला लोकात स्थान मिळाले असे म्हणतात.
बहुतांश लोकांना ही गोष्ट माहीत असेलच असे नाही पण हिंदू धर्माच्या कर्म सिद्धांतानुसार, वाईट आणि चांगल्या कर्मांच्या एकत्रित कृतींचा परिणाम पुण्य/आशीर्वाद किंवा पाप/शिक्षामध्ये होतो. कर्म कसेही फिरून परत आपल्याला भेटणार हे निश्चित असते मग ते चांगले कर्म असो की वाईट. हिंदू सनातन धर्मात पुनर्जन्म हा सिद्धांत आहे त्यामुळे शरीर जीर्ण होऊन संपल्यानतरही आत्मा नवीन शरीराचा आसरा घेऊन पुन्हा जन्म घेतो आणि पूर्वी केलेल्या कर्माची फळे चाखतो. जिथे देव दानव याना हा फेरा सुटला नाही तिथे आपली काय बिषात त्यामुळे धार्मिक, पुराण गोष्टीतून शिक्षा घेऊन आपण आपले कर्म सत्कर्मात घालवण्याचा प्रण करून जिवंत असे पर्यत सर्वांना बरोबर घेऊन सुखाने संसार केला पाहिजे.
चला तर परत भेटू पुढच्या गोष्टीत, गोष्ट आवडली तर नक्की follow करा शेयर करा.
धन्यवाद
क्रमशः
२५ ऑगस्ट २०२२
नमस्कार,
आज तुम्हाला बलराम आणि श्रीकृष्ण यांचा देहत्यागाची गोष्ट सांगणार आहे.
महाभारताचा निकाल पांडवांच्या बाजूने लागला, पांडवांनी सुयोग्य राज्यकारभार चालू केला आणि ह्याच काळात यादवांचा प्रभाव वाढायला लागला होता. श्रीकृष्णाने ठरवले असते तर युद्ध झालेच नसते आणि कौरव कुळाचा नाश झाला नसता अशी धारणा कौरवाची आई गांधारीची होती म्हणूनच रागाच्या भरात तिने श्रीकृष्णाला यादव कुळाचा सर्वनाश होईल आणि कृष्ण तिच्यासारखा एकटा राहील असा शाप दिला होता. काही वर्षानंतर हा शाप पूर्ण होण्याची वेळ आली होती, श्रीकृष्णाचा अवतार कार्य संपले होते अश्यावेळी वायूदेवाने हा निरोप श्रीकृष्णापर्यत पोहचवला पण यादव कुळाचा अंत झाल्याशिवाय अवतार संपणे अशक्य होते त्यामुळे दुसऱ्याच दिवसापासून अशुभ, असंतोषाचे वारे गोकुळावर फिरू लागले, यादव महाभारतातील पराक्रम आणि सामर्थ्य यावरून भांडणे करू लागले, भांडणे इतकी वाढली की त्याचा कलह मारामारीत आणि नंतर युद्धात परावर्तित झाला. यादव एकमेकांशी युद्ध करत करत गांधारीच्या शापाप्रमाणे संपून गेले हे बलराम याना कळल्याने त्यांनी समुद्राच्या जवळ ध्यानस्थ बसून आपले प्राण सोडले. बलराम म्हणजे आदिशेषनाग, त्यांनी बलरामच्या देहातून आपला अवतार संपवून बाहेर पडले आणि समुद्राच्या तळाशी निघून गेले. ज्यावेळी यादवांचा संहार आणि बलराम यांचे देहत्याग माहिती श्रीकृष्णाना मिळाली त्यांनी आपला अवतार संपवण्याचा निर्णय घेऊन जंगलाच्या दिशेने प्रवास चालू केला, थोड्या वेळाने ते आपल्या चतुर्भुज अवतारात एका झाडाखाली विलाप आणि आराम करण्यासाठी बसले असताना एक विषारी बाण त्याच्या पायाच्या अंगठ्यात घुसला. बाण मारणारा आदीवासी जरा नामक व्यक्तीने ज्यावेळी श्रीकृष्ण याना बाण लागला हे पहिले त्यावेळी तो खूप घाबरला पण श्रीकृष्णाने त्याला शांत करून मागील अवतारात श्रीरामाने बालीला झाडामागे लपून बाण चालवला त्या कर्माचे फळ आपल्याला ह्या अवतारात मिळाले आणि त्या अवतारात बालीला दिलेले वचन पूर्ण केले असे आदिवासी जरा याला पूर्वजन्माचे रहस्य सांगून श्रीकृष्णाने आपला अवतार संपवला. त्याच दिवसापासून पृथ्वीवर कलियुगाची सुरुवात झाली.
१६ ऑगस्ट २०२२
१५ ऑगस्ट २०२२
नमस्कार,
#सनातन धर्म प्राचीन आहे आणि त्यातील एक ना एक घटना याला पुरावा असतो अश्या खूप #गोष्टी आहेत ज्या लोकांना माहीत असतात पण धावपळीच्या या युगात लक्षात राहत नाही अश्याच गोष्टी ह्या थ्रेड मध्ये गुंफायचे आणि हिंदू धर्म, गोष्टी, संस्कार वाढवायचे अस मनात आले आहे. वेळ मिळेल तस लिखाण करेल आणि तुमच्या पुढे सादर करेल अशी अपेक्षा आहे.
आजची गोष्ट
द्वारपाल जय विजय
शापाच्या शेवटच्या जन्मात जय आणि विजय यांनी शिशुपाल आणि दंतवक्र याच्या रुपात जन्म घेतला ज्यांचा अंत भगवान विष्णू यांनी द्वापारयुगामध्ये श्रीकृष्ण अवतार घेऊन केला. शिशुपाल हा पराक्रमी, शूर आणि खूप चांगला राजा होता, त्याच्या राज्यात सर्व लोक आनंदाने आयुष्य जगत होते, कोणीही खोट बोलत नसत, वर्ण व्यवस्था असूनही सामाजिक समानता होती पण रुक्मिणी विवाहामुळे शिशुपाल आणि श्रीकृष्ण यांच्यात वितुष्ट निर्माण झाले आणि त्या दिवसापासून शिशुपाल श्रीकृष्णाचा राग करू लागला. युधिष्ठिर याच्या राजसूय यद्याच्या वेळी शक्तिशाली राजा म्हणून श्रीकृष्णाला पूजने सहमतीने ठरल्यानंतर शिशुपाल याचा राग अनावर झाला आणि भरसभेत तो कृष्णाला शिव्या देऊ लागला. शिशुपालच्या आईला दिलेल्या शब्दानुसार त्याचे 100 पाप माफ करण्याच्या वचनामुळे श्रीकृष्ण शिशुपालकडे दुर्लक्ष करत होता यामुळे शिशुपाल अधिकच जोशात येऊन शिव्या देत राहिला. एक एक करत ज्यावेळी शिशुपालचे 100 अपराध पूर्ण होणार असतात त्यावेळी श्रीकृष्ण त्याला चेतावणी देतात ती झुगारून तो शिव्या देतच राहतो शेवटी श्रीकृष्ण आपल्या तेजस्वी सुदर्शन चक्राचे आव्हान करून शिशुपालाचे शीर धडापासून दूर करतात अश्याच प्रकारे दंतवक्र श्रीकृष्ण याच्या छातीवर गदा प्रहार करण्यासाठी धावत येत असताना श्रीकृष्ण दंतवक्र याचा वध करतात. अशापद्धतीने
द्वारपाल जय विजय यांची 3 वेळा भगवान विष्णू याच्या विरोधात जन्म घेऊन मृत्यू मिळतो आणि त्याचा शाप पूर्ण होतो. शाप पूर्ण झाल्यावर ते परत आपल्या द्वारपाल ह्या कामात गुंतवून घेतात आणि अहंकाराला सोडून देतात
सी ए टॉपर
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...
-
९० च्या काळात एड्स आणि एड्सबद्दलची जनजागृती यामुळे टीव्हीवर कंडोमच्या जाहिराती सर्रास दिसत असल्याच्या. बलवीर पाशा कौन है ते मादक...
-
Afghanistan played well अस म्हणत हरलेल्या संघाचे मनोधैर्य वाढवण्यासाठी बोलणारे अनेक पुढे येतील पण त्या शब्दांनी खरच काही बदलणार ...
-
स्वभावाला औषध नाही कारण प्रत्येक व्यक्तीच्या एक स्वभाव असतो.स्वभाव म्हणजे त्याची वागण्याची, बोलण्याची किंवा निर्णय घेण्याची प्रक्रिया. प्रत्...